मराठी भाषा
नीतीशास्त्र
सामाजिक नीती
खालील काव्यपंक्तीचा सरळ अर्थ कोणता येईल? तोंडाळाशी भांडू नये, वाचाळाशी तंडू नये?
3 उत्तरे
3
answers
खालील काव्यपंक्तीचा सरळ अर्थ कोणता येईल? तोंडाळाशी भांडू नये, वाचाळाशी तंडू नये?
3
Answer link
तोंडळाशी भांडू नये । वाचाळाशी तंडो नये । सतसंग खंडु नये। अंतर्यामी ।
वरील ओव्या या संत रामदास स्वामी यांच्या दासबोध
या ग्रंथातील आहेत.
संत रामदास हे भारतातील अतिशय थोर असे संत होते. त्यांनी आपल्या आयुष्यात वेगवेगळ्या भूमिका साकारल्या. ते एक थोर कवी होते, विचारवंत होते, लेखक होते आणि आध्यात्मिक गरु देखील होते. त्यांनी आपल्या काव्याच्या माध्यमातून समाज प्रबोधन करण्याचे खूप मोठे कार्य केले. समाजात वावरत असताना माणसाचे कार्य कसे असावे याचे मार्गदर्शन त्यांनी आपल्या साहित्यातून केले.
तोंडळाशी भांडू नये वाचाळाशी तंडो नये सतसंग खंडु नये। अंतर्यामी।
वरील ओव्या या संत रामदास यांच्या दासबोध या ग्रंथातील आहेत. वरील ओव्यांच्या माध्यमातून संत रामदास समाजात माणसाने कसे वागावे याबद्दल मार्गदर्शन करतात. संत रामदास म्हणतात समाजात प्रत्येक प्रकारचे व्यक्ती असतात जर कोणी भांडखोर असेल तर त्याच्याशी भांडण करून काही फायदा नाही कारण ती त्याची सवय आहे. एखादा नेहमी बडबड करत असेल तर तो आपले म्हणणे कधीही ऐकून घेणार नाही. अशा व्यक्तीं पासून लांब राहिलेलेच नेहमी चांगले. ते म्हणतात आपले आचरण विकसित करण्यासाठी संतांची साथ नेहमी लाभली पाहिजे. कारण संतांच्या सहवासाने आपल्याला आत्मज्ञानाची जाणीव होते व आपले आचरण शुद्ध होते...
**************************************
उत्तमलक्षण या श्री दासबोधातील उपदेशपर रचनेतुन संत रामदासांनी आदर्श व्यक्तिची लक्षणे सांगितली आहेत. यात कोणात्या गोष्टी कराव्यात आणि कोणत्या नाही याचा खुलासा केला आहे. भांडखोर व्यक्तिशी भांडायला जावू नये. सतत बडबड करतात अशा व्यक्तिशी वाद घालत बसू नये कारण या दोन्ही प्रकारच्या व्यक्ति समोरच्याचे बोलाणे येकू न घेता स्वतःचे खरे करत असतात. त्यांच्याशी बोलणे म्हणजे आपला वेळ वाया घालवणे आहे. त्यामुळे अशांना टाळावे व संतांच्या संगतीत रमावे मनापासून त्यांच्या सहवासाचा लाभ घ्यावा. कारण त्यांच्या संगतीत राहून आपनही सज्जन बनतो. असा संदेश वरील काव्यपंक्तीतुन लेखक व्यक्त करतात.
0
Answer link
या काव्यपंक्तीचा सरळ अर्थ असा आहे:
- तोंडाळाशी भांडू नये: जे माणूस मुळातच भांडखोर वृत्तीचे आहे, त्याच्याशी वाद घालू नये. कारण, तो माणूस कोणत्याही कारणावरून भांडण काढू शकतो आणि त्यातून काही निष्पन्न होणार नाही.
- वाचाळाशी तंडू नये: जो माणूस खूप बडबड करतो, उगाचच काहीतरी बोलत राहतो, त्याच्याशी वाद घालू नये. कारण, तो आपल्या बोलण्याने आपल्याला त्रास देऊ शकतो आणि आपला वेळ वाया घालवू शकतो.
म्हणूनच, ज्या लोकांमध्ये समजूतदारपणा नाही किंवा जे सतत भांडायला तयार असतात, त्यांच्यापासून दूर राहणेच योग्य आहे.