दलित साहित्य साहित्य

दलित साहित्याची वैशिष्ट्ये उदाहरणासह स्पष्ट करा?

2 उत्तरे
2 answers

दलित साहित्याची वैशिष्ट्ये उदाहरणासह स्पष्ट करा?

1
★★★★दलित वाङ्मयाची वाटचाल ★★★

दलित वाङ्मयाचा उदय १९६० नंतर झाला. चीड आणि बंड ही चळवळीची दोन प्रमुख वैशिष्ट्ये होती; तर वेदना विद्रोह आणि नकार ही या साहित्यातील महत्त्वाची तत्त्वे होती. [१] स्वातंत्र्य, समता, बंधुता, विज्ञाननिष्ठा, न्याय आणि लोकशाही ही मूल्दोये दलित साहित्याचा मूलाधार आहेत.

●हिंदु समाज व्यवस्थेमध्ये माणसाला माणूस म्हणून स्थान नाही. तर त्नयांच्यात जातीची उतरंड आहे. त्अयामुळे उच्माच जात व कनिष्नुठ जात अशी विषमता असून 'दलितत्व' हे या विषमतेचे अपत्य आहे. दलितांवर या विषमतावादी समाजव्यवस्थेने पिढ्यांपिढ्या अन्याय केला. त्याला विरोध करण्यासाठी साहित्यकलेला दलितांनी त्यांच्याविरुद्ध लढण्याचे एक हत्यार बनविले आहे. त्यामुळे दलित लेखकांची जबाबदारी या विषमतेविरुद्लेध लेखन करून लढा देणे ही आहे, असे हा साहित्यप्रवाह मानतो. ही जबाबदारी स्पष्ट करताना अण्णा भाऊ साठे , "आम्ही दलित साहित्यिकांनी दलितांना वास्तव जगण्याच्या सर्व जुलुमातून मुक्त करणारे साहित्य निर्माण केले पाहिजे' असे यांनी सांगितले आहे. (संदर्भ?)

शत्रूंवर मात करण्यासाठी आयुधापेक्षा विचार हे फार मोठे शस्त्र आहे. ही इतिहासाची साक्ष असून डॉ. बाबासाहेबांनीदेखील रक्तपातविरहित समाज परिवर्तनासाठी शब्दशस्त्रांचाच वापर करून, आपल्या तत्त्वज्ञानाच्या सामर्थ्यावर भारतीय समाजात परिवर्तन घडवून आणले. अण्णा भाऊ साठे यांनी त्याच शब्दसामर्थ्याची जाणीव ठेवून समाजप्रबोधनासाठी लेखनमाध्यम उपयुक्त असल्याचे दलित साहित्यिकांना सांगितले. त्याचप्रमाणे स्वतःही लेखन केले. दलितकथा लिहून त्यांनी मोलाचे काम केले आहे.

★★दलित लेखनाचे प्रकार ★★

■आत्मकथन ■
मराठीमध्ये दलित आत्मकथने हा प्रकार इ.स.१९६० नंतरच्या काळात मराठीत विशेष लोकप्रिय झालेला असून दलित साहित्यालाच नव्हे तर मराठी साहित्याला समृद्ध केलेले आहे. आत्मकथनांमुळे मराठी साहित्य राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचलेले आहे. बलुतं- दया पवार, आठवणींचे पक्षी- प्र.ई. सोनकांबळे, उपरा- लक्ष्मण माने, मुक्काम पोष्ट देवाचे गोठणे- माधव कोंडविलकर, जिणं आमुचं- बेबी कांबळे, मला उद्ध्वस्त व्हायचंय- मल्लिका अमरशेख, माझ्या जल्माची चित्तरकथा-शांताबाई कांबळे, उचल्या- लक्ष्मण गायकवाड, कोल्हाट्याचं पोर- किशोर शांताबाई काळे, अक्करमाशी- शरणकुमार लिंबाळे, बेरड- भिमराव गस्ती, काट्यावरची पोटं- उत्तम बंडू तुपे, आमचा बाप आन आम्ही- नरेंद्र जाधव, अंत:स्फोट- कुमुद पावडे, तराळ अंतराळ - शंकरराव खरात, ढोर - भगवान इंगळे, संगराच्या पायवाटा - मारोतराव गोविंदराव भवरे ही मराठीतील काही गाजलेली दलित आत्मकथने आहेत.

■दलित रंगभूमीचा उदय ■
सन १९५५मध्ये मिलिंद महाविद्यालयात स्नेहसमेलनाला डॉ.बाबासाहेब आंबेडकर पाहुणे म्हणून आले होते. त्यांनी तिथे विद्यार्थी व प्राध्यापकांनी सादर केलेली नाटके पाहिली. सर्वसाधारण विषयावर नाटके लिहिण्यापेक्षा 'दलित जीवनावर नाटके लिहा' असे त्यांनी सांगितले आणि तिथेच दलित रंगभूमीची मुहूर्तमेढ रोवली गेली. मिलिंद महाविद्यालयाचे प्राचार्य म.भि. चिटणीस यांनी 'युगयात्रा' (१९५६) लिहून आंबेडकरांच्या समाजप्रबोधन हाकेला प्रतिसाद दिला. १९५६ मध्ये नागपूरच्या दीक्षाभूमीवर डॉ. आंबेडकरांच्यासमोर लाखो प्रेक्षकांसमोर, अनुयायांसमोर या नाटकाचा प्रयोग झाला. त्यानंतर काही वर्षात दलित व अन्या लेखकांनी अनेक दलित नाटके, एकांकिका लिहिल्या.
'दलित' ह्या शब्दाचाच अर्थ मुळी पीडलेले, नाडलेले, तुडवलेले, शोषित, वंचित, उपेक्षित, असा आहे. अशा समूहाचा दडपलेला आवाज ज्या नाटकामध्ये, ज्या जाणिवेने प्रगट होतो, ते दलित नाटक होय.
दलित नाटकांची वैशिष्ट्ये संपादन करा
मराठी नाटय परंपरेच्या इतिहासात दलित नाटकांचे वेगळे अस्तित्व आहे हे मान्य करायला हवे. आजपर्यंत लिहण्यात आलेली दलित नाटके ही सामाजिक परिवर्तनाची आणि सामाजिक बांधिलकीचे केंद्रबिंदू आहेत. म्हणजेच सामाजिकतेला व परिवर्तनाला सामोरे जाणारे विचारप्रवाह दलित नाटकाला मंजूर आहेत.
या देशातील समाजव्यवस्थेला एक जबरदस्त हादरा देणारे धारदार हत्यार म्हणून दलित नाटकाचे एक वेगळे अस्तित्व आहे. दुसरी गोष्ट म्हणजे नाट्य परंपरेतील नाटकीपणा दलित नाटकाला मान्य नाही.
प्रस्थापित वर्गाकडून दलितांवर होणाऱ्या अन्याय, अत्याचाराला वाचा फोडण्याचे कार्य दलित नाटकाने केले आहे.
आपल्या वेदना दलित नाटककारांनी नाटक व एकांकिकातून मांडल्या.

●इतर दलित साहित्यप्रकाराप्रमाणे वेेदना, विद्रोह, नकार ही दलित नाटकाची वैशिष्ट्ये आहेत.
दलित नाटक सामाजिक दुःखातून जन्माला येते. दलित नाटकातून येणारा इतिहास हा केवळ एक इतिहास म्हणून येत नाही तर मानवी संस्कृतीची साक्ष म्हणून येतो. दलित नाटक हे इतिहासाचे गोडवे गात नाही, तर इतिहासाचे विश्लेषण करून भविष्याचा वेध घेते.
■मानवतेविषयी, माणुसकीविषयी दलित नाटक आग्रही आहे.
दलित नाटक हे वैचारिक बांधिलकी मानणारे, अखिल मानव कल्याणासाठी सिद्ध झालेले व ह्या जगात जे सर्वोत्तम असे मूल्य 'माणूस' त्याच्या रक्षणासाठी सिद्ध झालेले आहे.


उत्तर लिहिले · 29/5/2022
कर्म · 53710
0

दलित साहित्याची वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे आहेत:

  1. वास्तवता: दलित साहित्य हे दलितांच्या जीवनातील वास्तव अनुभवांवर आधारित आहे. यात त्यांची दुःखं, वेदना, समाजातील अपमान आणि संघर्ष यांचे चित्रण असते.
    उदाहरण: अण्णाभाऊ साठे यांच्या 'फकिरा' कादंबरीत फकिरा नावाच्या नायकाद्वारे समाजातील विषमतेवर आणि अत्याचारावर प्रकाश टाकला आहे.
  2. अनुभवकथन: दलित साहित्य हे लेखकांच्या स्वतःच्या अनुभवांवर आधारित असते. त्यामुळे ते अधिक प्रामाणिक आणि हृदयस्पर्शी असते.
    उदाहरण: दया पवार यांच्या 'बलुतं' या आत्मकथेत त्यांनी त्यांच्या जीवनातील जातीभेदाचे अनुभव सांगितले आहेत.
  3. विद्रोह: दलित साहित्य हे सामाजिक अन्याय आणि विषमतेच्या विरोधात एक विद्रोह आहे. हे साहित्य समाजाला बदलण्याची आणि न्याय प्रस्थापित करण्याची प्रेरणा देते.
    उदाहरण: नामदेव ढसाळ यांच्या कवितांमधून समाजातील विषमतेवर आणि अन्यायावर प्रखर टीका केली आहे.
  4. भाषा: दलित साहित्याची भाषा ही सामान्य माणसांना समजेल अशी सोपी आणि सरळ असते. यात ग्रामीण भाषेचा आणि बोलीभाषेचा वापर केला जातो.
    उदाहरण: शरणकुमार लिंबाळे यांच्या साहित्यात बोलीभाषेचा प्रभावी वापर आढळतो.
  5. मानवतावाद: दलित साहित्य हे केवळ दलितांच्या दुःखांचे चित्रण करत नाही, तर ते मानवतावादाचा संदेश देते. हे साहित्य माणसांना एकमेकांबद्दल सहानुभूती आणि समजूतदारपणा ठेवण्यास प्रवृत्त करते.
    उदाहरण: बाबूराव बागूल यांच्या कथांमधून माणसांमधील प्रेम आणि सद्भावना यांवर जोर दिला आहे.

अधिक माहितीसाठी, आपण खालील संकेतस्थळांना भेट देऊ शकता:

उत्तर लिहिले · 24/3/2025
कर्म · 1440

Related Questions

तुम्ही वाचलेल्या कोणत्याही एका दलित कथेचे थोडक्यात विवेचन करा?
दलित साहित्याचे स्वरूप थोडक्यात लिहा?
दलित साहित्याची मराठी साहित्याला देणगी कोणती ते सविस्तर सांगा?
दलित साहित्यावर घेतले जाणारे आक्षेप कोणते, याची सविस्तर चर्चा करा?
दलित साहित्या मागील प्रेरणांचा सविस्तर शोध घ्या?
दलित साहित्याच्या विविध व्याख्यांचा सविस्तर परामर्श घ्या?
दलित साहित्याच्या भाषेचे वेगळेपण थोडक्यात लिहा?