2 उत्तरे
2
answers
राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा म्हणजे काय?
0
Answer link
राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा
काही ठिकाणी भाषांतर तर काही ठिकाणी मत मांडले आहे.अर्थात माझाहा असा १ ला प्रयत्न आहे.
हा अनुवाद वाचल्यावर आपणास आज सुरु असलेल्या बदलामागील विचार समाजतील.अगदी संक्षिप्त रुपात
.प्रस्तावनेच्या सुरवातीलाच हा आराखडा का बदलला ? कसा बदलला?
यातील सहभागी मान्यवर यांचा उल्लेख आहे. ,बदलामागील मुख्य दृष्टीकोन ओझ्याविना अध्ययन हाच आहे
हे जाणवते.ज्या प्रमाणे स्वतंत्र भारताच्या १ ल्या शिक्षण धोरणात वा कुठेतरी एक वाक्य मी वाचलेय ते म्हणजे
भारताचे भविष्य वर्गखोलीत घडवले जात आहे ”. अगदी तसेच एक वाक्य यात आहे.कविवर्य रवींद्रनाथ टागोर
यांच्या civilization and Progress या निबंधातीलहे वाक्य आहे.“ नवनिर्मिती चा उत्साह व निखळ आनंद हि
बालकाची गुण वैशिष्ट्ये असून अविचारी प्रौढांच्या जगात ती उधवस्त होऊ शकतात
यातून बालकेंद्री आराखडा सूचित करत आहेत असे जाणवते.सुरवातीच्या प्रकरणात १९४७ पासून च्या विविध
शिक्षण विषयक धोरणाचा आढावा घेतला आहे.भारताच्या राज्यघटनेची धर्मनिरपेक्ष एकात्मता यांसारख्या
वैशिष्ट्या ना समोर ठेवत विचार - कृतीस्वातंत्र्य, परस्पर आदरभाव,वेगवेगळ्या प्रसंगांना अधिक लवचिक व
नाविन्यपूर्ण रीतीने सामोरे जाण्याची क्षमता विकसित करणे,आर्थिक प्रगती व सामिजिक बदलात कृतीशील
सहभाग देणारा नागरिक घडव्याची अपेक्षा आहे.teaching म्हणजे लोकशाही बळकट करणारी सेवा असे यांना
वाटते. अर्थात याचा जर खोलात जावून विचार केला तर हे विधान निश्चित च पटते. कारण RTE कायद्याचे पालन
करून आम्ही teacher नकळत लोकशाहीला बळकट करतोयच की.त्याचवेळी बालक व पालक यांवर मानसिक
तणाव व बौद्धिक ओझे निर्माण करणारी यंत्रणा हे चित्र बदलण्यासाठी
खालील पंचसूत्री सुचवलीय.
१.शाळेच्या बाहेरील ज्ञानाशी संबंध प्रस्थापित करणे.
२.शिकणे व शिकवणे यांच्या पारंपारिक पद्धीताला फाटा देणे.
३.पाठ्यपुस्तके ओलांडणारा अभ्यासक्रम तयार करावा.
४.परीक्षा पद्धत अधिक लवचिक करावी.
५. लोकशाही मुल्यांची अधिक जपणूक करावी.
आजवरच्या बहुतांश अध्ययन –अध्यापन कृती याECCE वर अवलंबून आहेत.इतकेच काय curriculum वर
देखील ECCE चा प्रभाव जाणवतो.ज्ञानाची रचना कशी करावी व त्यातून मूल कसे शिकते हे प्रकरण २ मध्ये
मांडलेय.काही शिफारशी प्रकरन३ मध्ये मांडल्यात ज्यात अभ्यासक्रमाची वेगवेगळी क्षेत्रे सांगितली आहेत.
अभ्यासक्रम,पाठ्यक्रम यातून शिक्षका ने वर्गात बालकाच्या सभोवतालच्या परिस्थितीला अनुकूल अशा कृतींची
सांगड घालावी कि त्यातून मुले ज्ञानाची रचना करण्यास प्रवृत्त होतील.आपल्या कृती अशा असाव्यात ज्यातून
बालकाच्या शिकण्याच्या उपजत इच्छा प्रोत्सहीत व्हावी.कारण सभोवतालचे जाणून घेण्याची बालकाची धडपड
ही कृतीतूनव्यक्त होते.अगदी सोप्या भाषेत सांगू का तर लहान मूळ किती कृती करत असत. ते आपल्या सारख
स्वस्थ बसत का एका जागीका नाही बसत?तर त्याला हे विश्व जाणून घ्यायचे असते. म्हणून ते धडपडत असते.
मात्र शिक्षक म्हणून आपण अशा कृतींची निवड करावीकि ज्या बालाकचे अनुभव समृद्ध करतील.एक मात्र
जाणीवपूर्वक लक्षात ठेवा कि ज्ञान हे माहिती पासून कायम वेगळे राहिले पाहिजे. नाहीतर माहितीलाच ज्ञान
समजण्याची गल्लत होईल.याठिकाणी ज्ञान रचनावाद स्पष्ट होतोय असे वाटते.(मात्र ग्रुप वर वेगळाच ज्ञान
रचनावाद वाचला होता.)पाठांतराला प्रोत्साहन देणारी कृती म्हणजे अध्यापन असे न करता एक पूर्णतःव्यावसायिक
कृती म्हणजे अध्यापन असायला हवे.भाषा, गणित,विज्ञान व सामाजिक शास्त्रे अशी आपल्या अभ्यासक्रमाची
सर्वपरिचित असेविभाग आहेत.मात्र यात देखील बदल करावेत असे सुच्वालेय.यातूनबालकाला एकत्रित पद्धतीचे
ज्ञान मिळावे असाच प्रयत्न असावा.( महाराष्ट्र सरकारने यासाठीच तर ४ थीच्या पाठ्यपुस्तकात विज्ञान व सामजिक
शास्त्र हे विषय एकाच पुस्तकात शिकवावे असा निर्णयघेतला नाही ना) पण सरकारचा हा बदल मला अमान्य आहे.
तो वरील integrated knowldge शी सुसंगत वाटत नाही.पाठ्यपुस्तकात बालकाच्या स्थानिक अनुभवाला
प्राधान्य द्व्यावे.त्याची बोली भाषा हि स्वीकारलीच पाहिजे. त्याक वेळी त्रिभाषा सूत्राचा देखील स्वीकार कायम
ठेवण्यात यावा असाही आग्रह आहे.कारण बहुभाषा समृद्ध अशा भारतात बोली भाषा जतन केलीच
पाहिजे. गणितातून मुलांना तार्किक विचारांना प्रोत्साहन , समस्या निराकरण क्षमता विकसनव्हायला हवे.
गणिताचा इतर विषयांशी सहज समवाय साधता येईल.विज्ञान विषया संदर्भात खालील अपेक्षा आहेत:
दैनंदिन जीवनातील अनुभावामागील तर्कसंगत शास्त्रीय विश्लेषण करता यावे.. वातावरण बदलाविषयी जागरूकता
निर्माण करावी..प्रोजेक्ट based teaching असावे.. चिल्ड्रेन science कॉंग्रेस सारखा व्यासपीठाचा वापर करावा.
अशाच पद्दतीने सामजिक शास्त्रे साठी पण सूचना आहेत.सोबतच कार्य कला हस्तकला शाररीक शिक्षण साठी
पण विचार मांडलेत.उदा. कार्य : यातून ज्ञानाचे उपयोजन हि क्षमता विकसित व्हावीप्रत्यक्ष अनुभवाला महत्व.
नवनिर्मिती,स्वयंसिद्धता, परस्पर सहकार्य यांची रुजवण यातून होणे अपेक्षित.हस्तकला याचा जाणीवपूर्वक उल्लेख.
हि आपलीसंस्कृतीचा भाग आहे.याचे व्यावसायिक शिक्षण दिले जावे हि सूचना केलीय..
सेवापूर्व अभ्यास्क्रमाबत काही सूचना आहेत.
१. शांततेचे शिक्षण हाविषय शिक्षक अभ्यासक्रमात असावा
२. अभ्यासक्रम व्यापक असावा
३. कालावधी वाढवावा.
४. बालकाच्या निरीक्षणास पुरेशी संधी मिळावी......
अजून एक महत्वाची सूचना आहे ती म्हणजे पंचायत राज या व्यवस्थेचे सक्षमीकरण पाठ्यक्रमातून
करण्याची शिफारस आहे.शाळा,केंद्र,बीट स्तरावर नेतृत्वगुण विकसित करावेत हि अपेक्षा ठेवलीय.
परीक्षा पद्दतीबाबत देखील विचार मांडलेत.स्मरणावर भर देणारे प्रश्न देण्याऐवजी तार्किकता,
नवनिर्मिती, कल्पकता, उपयोजन करणारे प्रश्न असावेत.ताण कमी करण्यासठीश्रेणी असावी असाही सूर दिसतो.
शेवटी शाळा-समाज-शिक्षक या त्रिसूत्रीचा अवलंब करावा हीच अपेक्षा आहे.
0
Answer link
राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा (National Curriculum Framework - NCF):
- राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा (NCF) हा भारतातील शिक्षण व्यवस्थेचा एक महत्त्वाचा भाग आहे.
- हा आराखडा राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद (National Council of Educational Research and Training - NCERT) तयार करते.
- NCF मध्ये शिक्षण धोरणे, अभ्यासक्रम, अध्यापन पद्धती आणि मूल्यमापन यांबद्दल मार्गदर्शन दिलेले असते.
- नवीन NCF 2023-24 नुसार, इयत्ता 3 ते 12 साठी वर्षातून दोन वेळा बोर्ड परीक्षा होणार आहेत.
- NCF 2005 नुसार, मुलांच्या शाळेतील शिक्षण त्यांच्या घरातील भाषेशी जोडले जावे.
NCF चे मुख्य उद्देश:
- शिक्षणाला जीवनाशी जोडणे.
- शिकणे आनंददायी करणे.
- परीक्षा पद्धतीत सुधारणा करणे.
- सर्वांगीण विकास करणे.
संदर्भ:
- NCERT: ncert.nic.in