निसर्ग भूगोल

निसर्गवाद व शक्यतावाद सविस्तर कसा स्पष्ट कराल?

2 उत्तरे
2 answers

निसर्गवाद व शक्यतावाद सविस्तर कसा स्पष्ट कराल?

0

(१) निसर्गवाद: 'निसर्ग' श्रेष्ठ आहे असे मानणारा हा दृष्टीकोन आहे. निसर्गवादाच्या अभ्यासकांच्या मते मानवी इतिहास, संस्कृती, जीवनशैली आणि मानवी विकासाचे टप्पे इ. वर पर्यावरणाच्या प्राकृतिक घटकांचा प्रभाव असतो. अशा ठिकाणी निसर्ग हा क्रियाशील तर मानव हा निष्क्रीय असतो.

'निसर्गवाद' संकल्पना जरी १९ व्या शतकात उदयास आली असली तरी त्याचे मूळ हे मात्र इसवी सनाच्या ५ व्या शतकात आहे. त्या काळातील हिप्पोक्रिटस यांनी 'मानवी जीवन हे पूर्णपणे निसर्गावर आधारीत आहे' असे मत मांडले होते.

स्ट्रबो या प्रसिध्द रोमन भूगोल तज्ञाने असे स्पष्ट केले होते. की भू-उतार भूरचना हवामान ह्या सर्व गोष्टी निसर्गाने / देवाने निर्माण केल्या असून त्यांचा प्रभाव मानवी जीवन शैलीवर होतो.
१२

जर्मन भूगोलातज्ञ हंबोल्ट आणि रिटर यांनीही निसर्ग मानवावर कसे नियंत्रण ठेवतो यावर अभ्यास केला. कांट या प्रसिध्द भूगोल तज्ञानेही निसर्गवादाची संकल्पना विकसित करण्यामध्ये योगदान दिले. खरे पाहता मानव आणि पर्यावरण यांच्यातील संबंध विषयीचे काट यांचे विचार हुम्बोल्ट आणि रिटर यांनी नंतर पुढे नेले.

निसर्गवादाच्या संकल्पनेवर काही भूगोलतज्ञांनी टीका केली. त्यांच्या मते हचा दृष्टीकोनामध्ये शिस्तीची कमतरता असून ही शिस्त मानवाकडूनच फक्त विकसित होवू शकेल. मानवाकडे निसर्गात बदल घडवून आणण्याची क्षमता आहे निसर्ग एकांगी असून मानवाने त्यात विविधता निर्माण केली आहे. मानवाने घनदाट जंगले दलदलीचा भाग आणि उजाड़ वाळवंटे इ. मध्ये बदल केले. मानवाने त्याच्या ज्ञानाचा वापर करून हे सर्व बदल केले.

मानवानेच बागा, रस्ते आणि कृषिक्षेत्रे निर्माण केली आणि निसर्ग समृध्द केल. मानवच निर्माण होणाऱ्या समस्या दूर करू शकतो पण निसर्ग नाही. निसर्गवादावर जरी विविध अंगानी टिका झालेली असली तरी ही हा मानवी भूगोलातील महत्त्वाचा दृष्टीकोन आहे.

 -

मानव पर्यावरण संबंधामध्ये मानव हा अतिशय महत्वाचा आहे हे सांगणारा हा दृष्टीकोन आहे. मानव बुध्दी व ज्ञानाच्या जोरावर निसर्गातील शक्तींवर विजय मिळवू शकतो. असे या विचारसरणीच्या लोकांचे मत आहे. मानव हा क्रियाशील असून निसर्ग हा निष्क्रीय आहे. मानव हा सर्व शक्तीमान असून तो निसर्गाचा कधीच गुलाम बनणार नाही निसगपेिक्षा जास्त क्रियाशील असल्याने मानवाकडे निसर्गात बदल करण्याची क्षमता आहे.

व्हीडाल-दी-ला-ब्लाश हे शक्यतावादाचे कट्टर पुरस्कर्ते होते. त्यांच्या मते निसर्ग हा नुसता विविध प्रकारच्या संधी देतो त्यातील कोणती संधी निवडायची हे मानवावर अवलंबून असते सध्या मानवाने नवीन प्रकारची पिके घेतली आहेत अनेक प्राणी पाळीव प्राणी म्हणून उपयोगात आणले आणि निसर्गाला मानवी क्रियांवर नियंत्रण ठेवता आले नाही. आगीचा शोध हा फक्त मानवामुळेच लागू शकला. शक्यतावादाचे अनेक भूगोल तज्ञ पुरस्कर्ते असून त्यांच्या मते निसर्ग हा नुसता मानवाचा सल्लागार असतो.

‘शक्यताबाद' दृष्टीकोनही पूर्णपणे स्वीकारला नाही. अनेकवेळा मानवाला निसर्गापुढे नमते घ्यावे लागते मानवाला खनिजे आणि ऊर्जा साधने निर्माण करता येत नाही. ही सर्व साधनसंपत्ती निसर्ग निर्माण करतो. नैसर्गिक आपत्तीच्या वेळी मानवाला अनेकदा अडचणींना तोंड द्यावे लागते आणि निसर्ग हा शक्तीमान असतो. मानवाने निश्चितपणे अनेक बदल केलेले आहेत परंतु हे सर्व बदल मानवी क्रिया किंवा ताकद ह्या एका ठराविक मर्यादिपर्यंतच केले आहेत.१३

हचा सर्व टीका झालेल्या असल्या तरीही शक्यतावाद दृष्टीकोन हा खूप महत्वाचा दृष्टीकोन आहे हचा दृष्टीकोनामुळेच मानवाला मानव पर्यावरण संबंधाचा सविस्तर अभ्यासाची प्रेरणा मिळाली.



ग्रिफिथ टेलर यांनी ही संकल्पना मांडली त्यांनी असे स्पष्ट केले की निसर्गवाद किंवा शक्यतावाद कल्पना पूर्णपणे स्वीकारता येत नाही निसर्गावर मानव नियंत्रण ठेवतो. परंतु हे फक्त निसर्ग क्रियाशील नसेल तरच शक्य होते. निसर्ग जेव्हा क्रियाशील असतो तेव्हा बदलाची वाट बघावी लागते. ही संकल्पना स्पष्ट करण्यासाठी वाहतूक सिग्नलचे उदाहरण दिले जाते. जेव्हा लाल सिग्नल असतो तेव्हा माणसाला थांबायला लागते. आणि जेव्हा हिरवा होतो तेव्हा तो पुढे जातो. जर लाल सिग्नल असताना रस्ता ओलांडला तर अपघात होतील. तसेच माणसालाही परिस्थिती अनुकूल होण्याची वाट पहावी लागते तरच तो यशस्वी होतो.

'थांबा व जा' संकल्पना आणि शक्यतावादातून हेच लक्षात येते की मानवी प्रगती ही निसर्गाने दिलेल्या संधी मानव कशाप्रकारे घेतो यावरच अवलंबून असेल

वरील सर्व गोष्टींमधून हे लक्षात येते की मानव पर्यावरण संबंध हे फार पूर्वीच निर्माण झाले होते निसर्गाचा प्रभाव मानवी जीवनाच्या प्रत्येक घटाकांवर दिसून येतो. त्यामुळे त्या पर्यावरणात जर बदल झाला तर त्याचा परिणाम त्याच्या वर होईल.

मानव पर्यावरणातील संबंध अभ्यासणे हा मानवी भूगोलाचा गाभा आहे. ऐतिहासिक काळातील पुराव्यांमधून हे लक्षात येते की मानव हा फक्त नैसर्गिक घटकांचाच विकास करू शकतो उदा. सर्व प्राचीन संस्कृतीचा विकास हा नदयांच्या खोऱ्यात झाला कारण तेथे मानवाला पाणी सुपिक मृदा वस्तीसाठी अनुकूल जागा इ. सारख्या निसर्गतः उपलब्ध होत्या. तसेच मानव हा फक्त शेतीसाठी मान्सूनवर अवलंबून राहिला. हेच संबंध आजही दिसतात. मानव हा निसर्गावर खूपच अवलंबून होता तसाच तो आजही अस्तित्व टिकवण्यासाठी निसर्गावर अवलंबून आहे. अशा प्रकारे निसर्गाची भूमिका आणि शक्ती ही अलौकीक आहे.

अलीकडच्या काळात मानव पर्यावरण संबंध हे मानवी बुध्दीमतेमुळे बदलू लागले आहेत. बुध्दीच्या जोरावर मानव हा निसर्गातील समस्यांवर मात करण्याचा प्रयत्न करत आहे. मानवाने विविध तंत्राच्या सहाय्याने शेती केली घरे बांधली पाण्याचा जलसिंचनासाठी वापर केला तसेच दुसरीकडून पाणी आणून कायमस्वरूपी वस्त्यांची निर्मिती केली रस्ते आणि शहरांचा विकास केला. निसर्गावर कमीत कमी अवलंबून राहण्याचे क्षेत्र हे खरे तर तंत्रज्ञानाचे आणि से निर्माण करणाऱ्या लोकांचे आहे.निसर्गवादी प्रामुख्याने विविध भागांतील नैसर्गिक पर्यावरणाचा अभ्यास करीत असत. 2. शक्यतावादी पुढे असे म्हणतात की वारे, नद्या, हिमनद्या याप्रमाणे मानव हा भूपृष्ठावर प्रचंड वेगाने बदल घडवून आणणारा घटक आहे. इतर घटकांपेक्षा मानवी क्रिया-प्रक्रियांमुळे फार वेगाने भूपृष्ठावर बदल घडून येत असतो.ही संकल्पना निसर्ग आणि संस्कृती यांच्यातील संबंधातून अभ्यासता येते या संकल्पनेच्या माध्यमातून पर्यावरणीयवाद किंवा निसर्गवाद आणि शक्यतावाद यांतील समतोल स्पष्ट केला जातो. सध्याच्या पर्यावरणीय स्थितीवर यातून प्रकाश टाकला जातो. प्राकृतिक पर्यावरण आपल्याला भविष्यातील अनुभवायला येणाऱ्या घटनांची माहिती करुन देण्यास मदत करते अशा प्रकारे या सिध्दांताच्या मदतीने आज असणाऱ्या पर्यावरणीय स्थितीमुळे भविष्यात होणारे परिणाम किंवा त्यांचे अंदाज वर्तवता येतात.
उत्तर लिहिले · 1/5/2022
कर्म · 53710
0

निसर्गवाद आणि शक्यतावाद या दोन विचारधारा मानवी भूगोल आणि पर्यावरणाशी संबंधित आहेत. या विचारधारांचा अर्थ, त्यांची वैशिष्ट्ये आणि त्यातील फरक खालीलप्रमाणे स्पष्ट केले आहेत:

1. निसर्गवाद (Determinism):

  • अर्थ: निसर्गवाद म्हणजे निसर्गावर आधारित विचारधारा. या विचारधारेनुसार, मानवी जीवन आणि समाजावर निसर्गाचा प्रभाव असतो. निसर्गातील घटक, जसे की हवामान, भूभाग, नैसर्गिक संसाधने, मानवी जीवनातील कृती, वस्ती आणि आर्थिक क्रियाकलाप निश्चित करतात.
  • मुख्य कल्पना:
    • निसर्ग सर्वश्रेष्ठ आहे.
    • मानव निसर्गाचा एक भाग आहे आणि तो निसर्गाच्या नियमांनुसार वागतो.
    • पर्यावरणातील घटकांचा मानवी जीवनावर थेट परिणाम होतो.
  • उदाहरण:
    • ज्या प्रदेशात पाण्याची उपलब्धता असते, तेथे शेती अधिक विकसित होते.
    • पर्वतीय प्रदेशात राहणारे लोक डोंगर उतारावर पायऱ्या पायऱ्यांची शेती करतात, कारण तेथील भूभाग सपाट नसतो.
  • टीका: निसर्गवादावर अशी टीका केली जाते, की ते मानवी प्रयत्नांना आणि बुद्धीला कमी लेखतात.

2. शक्यतावाद (Possibilism):

  • अर्थ: शक्यतावाद म्हणजे मानवावर आधारित विचारधारा. या विचारधारेनुसार, निसर्गात अनेक शक्यता असतात आणि मानव आपल्या बुद्धीचा वापर करून त्या शक्यतांमध्ये बदल घडवू शकतो. मानव आपल्या तंत्रज्ञानाचा आणि ज्ञानाचा उपयोग करून निसर्गावर मात करू शकतो.
  • मुख्य कल्पना:
    • निसर्गात अनेक शक्यता उपलब्ध आहेत.
    • मानव आपल्या बुद्धी आणि क्षमतेनुसार निसर्गात बदल करू शकतो.
    • तंत्रज्ञान आणि सामाजिक विकासामुळे मानव निसर्गावर नियंत्रण मिळवू शकतो.
  • उदाहरण:
    • वाळवंटी प्रदेशात मानवाने सिंचन प्रणाली विकसित करून शेती करणे.
    • डोंगराळ प्रदेशात रस्ते आणि बोगदे बांधून वाहतूक सुलभ करणे.
  • टीका: शक्यतावादावर अशी टीका केली जाते, की ते पर्यावरणाच्या ऱ्हासाला प्रोत्साहन देतात, कारण मानव निसर्गाचा मोठ्या प्रमाणात वापर करतो.

निसर्गवाद आणि शक्यतावाद यांच्यातील फरक:

मुद्दा निसर्गवाद शक्यतवाद
प्राधान्य निसर्गाला सर्वाधिक महत्त्व मानवाला सर्वाधिक महत्त्व
मानवाची भूमिका मानव निसर्गाचा दास आहे मानव निसर्गाचा स्वामी आहे
आधार पर्यावरणाचे घटक मानवी बुद्धी आणि तंत्रज्ञान
परिणाम नैसर्गिक घटकांवर अवलंबित्व पर्यावरणावर मानवी नियंत्रण

निष्कर्ष: निसर्गवाद आणि शक्यतावाद दोन्ही विचारधारा एकमेकांच्या विरोधात आहेत, परंतु त्या दोन्हीमध्ये सत्यता आहे. निसर्गवादानुसार, मानवी जीवनावर निसर्गाचा प्रभाव असतो, तर शक्यतावाद मानवी क्षमता आणि तंत्रज्ञानावर जोर देतो.

उत्तर लिहिले · 24/3/2025
कर्म · 1420

Related Questions

एखाद्या निसर्गरम्य पर्यटन स्थळाला भेट द्या. लोक तेथे का जातात? दरवर्षी किती लोक या ठिकाणी भेट देतात? या पर्यटनामुळे पर्यावरणावर होणाऱ्या परिणामांची यादी करा. हे परिणाम टाळण्यासाठी उपाय सुचवा.
आपण जर-तर, किंतु-परंतु, तुलना-भेद करत आचरण कृती करत राहिलो असता आपले मिलवर्तन घडून येईल का? संवेदनशील, परोपकारी, विवेकी विचार व निसर्ग माझा गुरू, मायभूमी कल्पतरू, विना आराम काम करू आणि आवश्यक गरजांची पूर्तता करू हेच उच्च जीवन शिक्षण होय हे खरे शाबीत करता येईल काय? उत्तर समर्पक लिहावे.
सूर्य, चंद्र, तारे आणि निसर्गचक्र यांचा पशुपक्षी व मानवी जीवनाशी काय संबंध आहे आणि माणसाला या चक्रातून नवनवीन प्रयोग तंत्रज्ञान यांची अनुभूती येते, त्यामुळे मानवी जीवन परिवर्तनशील झाले आहे, याबाबत आपली प्रतिक्रिया प्रकट करावी?
निसर्ग विज्ञान, सामाजिक शास्त्रे आणि मानव्य विद्या यांच्या अभ्यास पद्धती कोणत्या, ते थोडक्यात लिहा?
एखाद्या निसर्गरम्य पर्यटन स्थळाला भेट द्या. लोक तेथे का जातात? दरवर्षी किती लोक या ठिकाणी येतात? ह्या पर्यटनामुळे पर्यावरणावर होणाऱ्या परिणामांची यादी करा, हे टाळण्यासाठी उपाय सुचवा?
संत गाडगे महाराजांनी जनतेला कोणता उपदेश दिला? निसर्गाचे संतुलन राखण्यासाठी शालेय अभ्यासक्रमानुसार पर्यावरणाचे महत्त्व थोडक्यात सांगा?
निसर्गाने दिलेला ठेवा राहीबाई पोपेरे यांनी कशाप्रकारे जतन केला?