6 उत्तरे
6
answers
वैचारिक लेखनाचे प्रकार कोणते?
1
Answer link
वैचारिक लेखनाचे स्वरूप व प्रकार
वैचारिक स्वरूपाच्या लेखनात लेखक हा लोकसत्ताक समाजव्यवस्थेत वैचारिक स्वातंत्र्याच्या माध्यमातून स्वतःचे विचार मांडत असतो.या विचार प्रकटिकरणातून कधी तो इतरांचे विचार ग्रहण करतो किंवा कधी त्या विचारांना सभ्यपणे मतभेद देखील व्यक्त करत असतो.भाषेद्वारे जेव्हा आपण एखाद्या व्यक्ती,वस्तू,स्तिथीविषयी किंवा इतर कुठल्याही विषयांवर विचार प्रकट करतो,त्या विचारांमधून आपण आपले ज्ञान,अभिरुची,आपली जीवनधारणा,नैतिक भूमिका,आपले व्यक्तिमत्त्व देखील प्रकट करत असतो.
एखाद्या विषयांवरील इतरांच्या मतांना मांडत जात त्यातील उणिवा,त्रुटी दर्शवत स्वतःचे विचार युक्तिवाद कौशल्याने पूरक उदाहरणे,संदर्भ देऊन पटवून देणे अशीही एक पद्धत वैचारिक लेखनात आहे.ज्याला खंडन मंडन असे म्हणतात.
तर्कशुद्ध निष्कर्ष काढून,विषय विवेचन करत साहित्य व कला समीक्षा,वर्तमानपत्रे, ग्रंथ,संशोधन,पाहणी अहवालाचे निष्कर्ष इत्यादी क्षेत्रात वैचारिक लेखन केले जाते. सामान्यतः न्याय व्यवस्था,कलामुल्य मापन,अध्यात्म,वर्तमानपत्र,संस्कृती-इतिहास मीमांसा,तत्वज्ञानात्मक ग्रंथ या क्षेत्रात मोठया प्रमाणात वैचारिक लेखन होत असते.
अग्रलेख
नियतकालिके वा वर्तमानपत्र यांच्या संपादकांनी लिहलेल्या संपादकीय लेखाला अग्रलेख म्हणतात.जागृती, लोकशिक्षण,जाणीव या प्रेरणेतून हे लेख लिहिले जातात. सद्यस्थितीतील प्रश्न, समस्या,घटना,व्यक्तीच्या कृती अशा विविध जीवनक्षेत्रासंबंधित विषयांवर अग्रलेखातून ठराविक शब्दात विचार मांडल्या जातो.सामान्य माणसाला जागे करणे व विधायक कृतिसाठी प्रेरित करणे हे अग्रलेखाचे उद्दिष्ट असते.उदा. नमुना.संपादकीय लेखणाचे मूळ कार्य हे वर्तमानातील सामाजिक,राजकीय परिस्थितींवर भाष्य करणे असते.अलीकडच्या काळात जवळपास सर्वच राजकीय पक्षांचे मुखपृष्ठ असलेले स्वतंत्र असे वर्तमानपत्र आहे.त्यामुळे अग्रलेखातील निष्पक्षपणा(जो असायलाच हवा) वाचायला मिळत नाही.अग्रलेखातील भूमिका ही त्या वर्तमानपत्राची अधिकृत भूमिका असते.
वैचारिक निबंध लेखन :-
आपल्या विचारांची सुसूत्र,तर्कशुद्ध मांडणी वैचारिक निबंध लेखनात केली जाते.हा गांभीर्यपूर्वक लिहलेला तसेच समाजाला उपयुक्त असे विचार,दृष्टिकोन मांडत असतो.निबंध या साहित्य प्रकाराचा उदय विचारप्रतिपादन करण्यासाठी झाला आहे.विचार अनुभूती किंवा कल्पनांची,मुद्यांची सुसूत्र बांधणी येथे अभिप्रेत आहे.निबंध एक प्रकारे सौंदर्यपूर्ण रचनेशी संबंधित आहे.ही रचना विचार,विषय,कल्पना,विषय विश्लेषण यांची असू शकेल.मराठी शब्दकोशात 'निबंध म्हणजे =प्रबंध,नियमबद्ध असणारा लेख,मोठा लेख,नीटपणे पक्का जडलेला लेख' असा अर्थ दिलेला आहे
0
Answer link
वैचारिक लेखनाचे अनेक प्रकार आहेत, त्यापैकी काही प्रमुख प्रकार खालीलप्रमाणे आहेत:
- निबंध (Essay): निबंध हा वैचारिक लेखनाचा एक महत्त्वाचा प्रकार आहे. यात लेखक एखाद्या विषयावर आपले विचार, मतं आणि विश्लेषण सादर करतो. निबंधात विषयाची मांडणी, विश्लेषण आणि निष्कर्ष असतो.
- लेख (Article): लेख हा विशिष्ट विषयावर आधारित असतो. यात माहिती, विश्लेषण आणि विचार दिलेले असतात. लेख वर्तमानपत्रे, मासिके आणि वेबसाइट्सवर प्रकाशित होतात.
- स्फुटलेखन (Short Essay/Editorial): स्फुटलेखन म्हणजे लहान लेख. यात लेखक एखाद्या घटनेवर किंवा विषयावर आपले विचार थोडक्यात मांडतो. हे लेख वाचायला सोपे आणि विचार करायला लावणारे असतात.
- समीक्षा (Review): समीक्षा म्हणजे एखाद्या पुस्तकाचे, चित्रपटाचे, नाटकाचे किंवा इतर कलाकृतीचे विश्लेषण करणे. यात त्या कलाकृतीची गुणवत्ता, महत्त्व आणि वैशिष्ट्ये यावर विचार मांडले जातात.
- वैचारिक स्तंभ (Opinion Column): वर्तमानपत्रे आणि मासिकांमध्ये काही लेखक नियमितपणे विशिष्ट विषयांवर आपले मत व्यक्त करतात, त्याला वैचारिक स्तंभ म्हणतात. यात सामाजिक, राजकीय आणि आर्थिक विषयांवर भाष्य केले जाते.
- शोध निबंध (Research Paper): शोध निबंध म्हणजे एखाद्या विषयावर केलेले सखोल संशोधन. यात संशोधनाचे निष्कर्ष, माहिती आणि विश्लेषण सादर केले जाते. हे निबंध शैक्षणिक क्षेत्रात महत्त्वाचे मानले जातात.
- प्रबंध (Thesis/Dissertation): प्रबंध हा उच्च शिक्षणासाठी महत्त्वाचा असतो. यात विद्यार्थी एखाद्या विषयावर सखोल संशोधन करून आपले विचार आणि निष्कर्ष सादर करतात.
- अहवाल (Report): अहवाल म्हणजे एखाद्या घटनेची,Project ची किंवा विषयाची माहिती सादर करणे. अहवालात आकडेवारी, विश्लेषण आणि निष्कर्ष दिलेले असतात.
हे काही वैचारिक लेखनाचे प्रकार आहेत. प्रत्येक प्रकाराचे स्वतःचे वैशिष्ट्य आहे आणि ते विशिष्ट उद्देशाने लिहिले जातात.
टीप: अधिक माहितीसाठी आपण पुस्तके आणि विश्वसनीय शैक्षणिक संकेतस्थळांचा वापर करू शकता.