अध्यात्म देव

श्री स्वामी समर्थ महाराज यांची माहिती?

2 उत्तरे
2 answers

श्री स्वामी समर्थ महाराज यांची माहिती?

2
 

स्वामी समर्थ
जय जय श्री स्वामी समर्थाय नम:।।


श्री स्वामी समर्थ अर्थात अक्कलकोट स्वामी (प्रकटकाल : इ.स. १८५६-१८७८)२२ वर्ष आयुष्यात हे इसवी सनाच्या १९ व्या शतकात होऊन गेलेले, महाराष्ट्रातील अक्कलकोटयेथे खूप काळ वास्तव्य केलेलेश्रीपाद वल्लभ व श्रीनृसिंहसरस्वती यांच्या नंतरचे भगवान श्रीदत्तात्रेयांचे ते तिसरे पूर्णावतार अवतार आहेत, अशी मान्यता आहे. गाणगापूरचे श्री नृसिंह सरस्वती हेच नंतर श्रीस्वामी समर्थांच्या रूपाने प्रकट झाले. "मी नृसिंह भान असून श्रीशैलम्‌‍जवळील कर्दळी वनातून आलो आहे" हे स्वामींच्या तोंडचे उद्‌गार ते नृसिंह सरस्वतींचा अवतार असल्याचे सुचवतात. विविध ठिकाणी स्वामी विविध नावांनी वावरले.

श्री स्वामी समर्थ (अक्कलकोट)
ShriSwamiSamarth.jpg
श्रीस्वामी समर्थ (अक्कलकोट)
संप्रदाय
दत्त संप्रदाय
भाषा
मराठी
कार्य
महाराष्ट्र व कर्नाटकात दत्त संप्रदायाचा प्रसार
प्रसिद्ध वचन
'भिऊ नकोस,
मी तुझ्या पाठीशी आहे'
संबंधित तीर्थक्षेत्रे
अक्कलकोट, गाणगापूर
जीवन संपादन करा
स्वामी समर्थ हे विद्यमान आंध्रप्रदेशातल्या श्री शैल्यम क्षेत्राजवळील कर्दळीवनातून प्रकट झाले.[१] त्यांनी तेथून आसेतुहिमाचल भ्रमण केले.

स्वामी समर्थ प्रकट दिन संपादन करा
इ.स. १८५६ च्या सुमारास स्वामी समर्थ अक्कलकोटास आले. मंगळवेढ्याहून पहिल्यांदा जेव्हा ते अक्कलकोट नगरीत प्रवेशले, तेव्हा त्यांनी गावातील खंडोबा मंदिरात मुक्काम केला. तो दिवस चैत्र शुद्ध द्वितीया, शके १७७८, अनल नाम संवत्सरे,रविवार दि. ०६/०४/१८५६ हा होता.

वासुदेव बळवंत फडके संपादन करा
इ.स. १८७५ सालच्या सुमारास महाराष्ट्रात जेव्हा मोठा दुष्काळ पडला होता, तेव्हा क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी आले होते, त्या वेळी त्यांनी फडक्यांना सध्या लढायची वेळ नाही असा सल्ला दिल्याचे सांगितले.[ संदर्भ हवा ]

महती संपादन करा
सबसे बडा गुरू... गुरूसे बडा गुरू का ध्यास... और उससे भी बडे श्री स्वामी समर्थ महाराज... तसेच स्वामी महाराजांनी त्यांच्या भक्तांना अभयदान दिले, भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे...! अशा शब्दांंमधे स्वामी समर्थांंची महती वर्णन केली जाते.

प्रकटनाची पूर्वपीठिका संपादन करा
इ.स. १४५९ मध्ये, माघ वद्य १, शके १३८० या दिवशी[२] श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज ह्यांनी गाणगापुरास निर्गुण पादुका स्थापन केल्या व त्यानंतर शैल यात्रेचे निमित्त साधून ते कर्दळीवनात अदृश्य झाले. ह्या कर्दळी वनात सुमारे ३०० वर्ष महाराजांनी कठोर तपश्चर्या केली. ह्या काळात मुंग्यांनी त्यांच्यावर वारूळ रचले. एके दिवशी उद्धव नावाचा लाकूडतोड्या त्याच कर्दळीवनात लाकडे तोडीत असताना त्याच्या हातून कुऱ्हाड निसटली व ती वारुळावर पडली. उद्धवाचे निमित्त साधून स्वामी महाराजांना पुन्हा भक्तांच्या कल्याणासाठी प्रगट व्हायचे होते. कुऱ्हाड वारुळावर पडताच त्यातून रक्ताची धार उडाली व क्षणातच दिव्य प्रकाश पडून उद्धवासमोर एक आजानुबाहू तेजस्वी मूर्ती प्रगट झाली; तेच अक्कलकोटचे स्वामी समर्थ महाराज होत. .

आपल्या हातून ह्या महापुरुषाला जखम झाली ह्या विचाराने उद्धवाला दुःख झाले व भय वाटू लागले; पण भक्तांसाठी माताच असलेल्या महाराजांनी उद्धवाला अभय व आशीर्वाद देऊन गंगातीरी प्रयाण केले. गंगातीरावर भ्रमण करता करता ते कलकत्त्यास गेले व तेथे त्यांनी महाकाली मातेचे दर्शन घेतले. नंतर काशी, प्रयाग असे भ्रमण करीत ते उत्तरेकडून दक्षिणेस आले.

दीक्षा संपादन करा
श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे त्यांनी शेगावचे श्री गजानन महाराज व शिर्डीचे श्री साई महाराज ह्यांना दीक्षा दिली. त्यानंतर स्वामी पंढरपूर, मोहोळ असे भ्रमण करीत सोलापुरास आले. त्यानंतर मंगळवेढे नामक गावास स्वामींनी काही काळ वास्तव्य केले व तिथल्या भक्तांना विविध स्तरावर मार्गदर्शन केले. भेटेल त्याला आपल्या लीलेने आगळ्यावेगळ्या पद्धतींनी दुःखमुक्त करून कार्यरत केले.

अक्कलकोट प्रवेश संपादन करा
इसवी सन १८५६ मध्ये स्वामी महाराजांनी अक्कलकोटमध्ये प्रवेश केला व तिथल्या बावीस वर्षांच्या वास्तव्यात अक्कलकोट हे तीर्थक्षेत्र झाले. येथे त्यांनी जगातील अनेक मान्यवरांना मार्गदर्शन केले.

अवतार कार्य समाप्ती संपादन करा
स्वामींनी अनेकांना कामाला लावून इसवी सन १८७८ मध्ये त्यांचा एक आविष्कार संपविला असे भासवले. प्रत्यक्षात स्वामी महाराज आजदेखील भक्तांच्या पाठीशी सतत राहून त्यांना मार्गदर्शन करून कार्यरत करीत आहेत व अनंतकाळपर्यंत करीत राहतील अशी धारणा आहे.

स्वामी समर्थ पुण्यतिथी संपादन करा
श्री स्वामी समर्थ महाराज यांनी रविवार दि. ३० एप्रिल १८७८ रोजी (चैत्र वद्य त्रयोदशी, शके १८००, बहुधान्य नाम संवत्सर) अक्कलकोट येथे 'वटवृक्ष समाधी मठ स्थानी' माध्याह्नकाली आपल्या अवतारकार्याची समाप्ती केली. नंतर श्री स्वामी समर्थ यांना त्यांचे परम शिष्य चोळप्पा यांच्या निवासस्थानाजवळ समाधिस्थ करण्यात आले. असे म्हणतात की स्वामी महाराज पुन्हा कर्दळी वनात लुप्त झाले...


उत्तर लिहिले · 3/8/2021
कर्म · 121765
0

श्री स्वामी समर्थ महाराज: एक संक्षिप्त माहिती

श्री स्वामी समर्थ महाराज हे एकोणिसाव्या शतकातील एक थोर भारतीय दत्त संप्रदायी गुरु होते. त्यांना श्रीपाद श्रीवल्लभ आणि नृसिंह सरस्वती यांच्यानंतर दत्तात्रेयांचे तिसरे अवतार मानले जाते.

जीवन आणि कार्य:

  • जन्म: स्वामी समर्थांच्या जन्माची निश्चित माहिती उपलब्ध नाही, पण ते १८५६ मध्ये महाराष्ट्रातील अक्कलकोट येथे आले आणि तिथेच वास्तव्य केले.
  • अक्कलकोटमधील वास्तव्य: त्यांनी अक्कलकोटमध्ये सुमारे २२ वर्षे वास्तव्य केले. त्यांचे वास्तव्य अत्यंत साधे होते. ते नेहमी भक्तांना मार्गदर्शन करत असत आणि त्यांच्या समस्यांचे निराकरण करत असत.
  • उपदेश: स्वामी समर्थांनी आपल्या भक्तांना प्रेम, भक्ती, आणि निस्वार्थ सेवेचा मार्ग दाखवला. त्यांनी जात-पात आणि धर्माच्या पलीकडे जाऊन मानवतेची शिकवण दिली.
  • शिष्य: त्यांचे अनेक शिष्य होते, ज्यांनी त्यांच्या शिकवणीचा प्रसार केला. त्यापैकी काही प्रमुख शिष्य म्हणजे बाळप्पा, चोळप्पा आणि नरसिंह सरस्वती.
  • महाप्रयाण: स्वामी समर्थांनी १८७८ मध्ये अक्कलकोट येथे समाधी घेतली.

महत्व:

  • स्वामी समर्थ महाराजांनी समाजाला अध्यात्मिक मार्गदर्शन केले.
  • त्यांनी प्रेम, करुणा आणि निस्वार्थ सेवेचे महत्त्व सांगितले.
  • आजही त्यांचे भक्त त्यांच्या शिकवणींचे पालन करतात आणि त्यांच्या आशीर्वादाने जीवन जगतात.

मंदिरे:

  • अक्कलकोट हे स्वामी समर्थांचे प्रमुख स्थान आहे. येथे त्यांचे समाधी मंदिर आहे, जेथे दररोज हजारो भक्त दर्शनासाठी येतात.
  • या व्यतिरिक्त, भारतभर स्वामी समर्थांची अनेक मंदिरे आहेत.

अधिक माहितीसाठी:

  1. श्री स्वामी समर्थ चरित्र : shreeswamisamarth.org
  2. विकिपीडिया : mr.wikipedia.org
उत्तर लिहिले · 23/3/2025
कर्म · 860

Related Questions

जो व्यक्ती मनोभावे पूजा करतो, दानधर्म करतो, सरळमार्गी राहतो, भविष्याबद्दल विचार न करता दुसर्‍यांसाठी खिसा रिकामा करतो, तर त्याच्याच वाटेला दुःख आणि अडचणी का येतात?
देवाचे गुरू बृहस्पति यांचे मंदिर कोठे आहे?
स्वर्गात जागा बुक करणार्‍या व्यवसायाबद्दल माहिती द्या?
'माणूस मिथ्य सोने सत्य' याचा काय अर्थ होतो?
समाजात व प्रपंचात वावरताना देवाचे आचरण करावे कि गुरूचे आचरण करावे?
सापेक्ष आर्द्रता या संज्ञेची व्याख्या लिहा.
गुरू करणे का गरजेचे असते?