3 उत्तरे
3
answers
सांगलीच्या आयर्विन पुला बद्दल माहिती द्या?
3
Answer link
http://anilpatilmahitiseva.blogspot.com/2020/08/blog-post_77.html
सन १९१४ ला सांगलीत महापुर आला त्यावेळची गोष्ट आहे.कृष्णेचा महापुरामुळे सांगलीचा संपर्क तुटला होता. कोल्हापुर व तळ कोकणाशी होणारा व्यापार उदीम थंडावला होता. त्यावेळी सांगली संस्थानचे राजे चिंतामणराव पटवर्धन दुसरे यांनी निर्णय घेतला महापुराच्या या कटकटीतुन कायमचा मार्ग काढायचा.
कृष्णेचा या महापुरामुळे जनजिवन विस्कळीत होत होतं. त्यांनी आपल्या दरबारातल्या इंग्रज अधिकाऱ्याशी चर्चा केली आणि सांगलीच्या स्टेट असेंब्लीत एका पुलाचा प्रस्ताव मांडण्यात आला.त्यांच्या मनात होतं प्रचंड असा पुल बांधायचा.
पण इंग्रजाचे राज्य असल्याने त्यांनीही हो ना करत अनेक वर्ष घेतली खर्चाचा प्रश्न होताच.पुलास अंदाजे साडेसहा लाख खर्च अपेक्षित होता. संस्थानचा इतर खर्च पाहता पैसा अपुरा पडत होता. अन्य कामे यामुळे थांबवावी लागणार होती. राजेसाहेबानी तर फारच मनावर घेतले होते.दिल्ली पर्यन्त पत्रव्यवहार झाला. शेवटी १९२७ साली पुलाला मंजुरी मिळाली.व पुलाचे काम पुण्यातील त्यावेळची प्रसिध्द रानडे कंपनिस हे काम देण्याचे ठरले.
👁- - - - - - - - - - - -●
*_𖣘Mahiti seva group, pethvadgaon𖣘_*
________________________
पायाखुदाई चिंतामणराव पटवर्धनांच्या हस्ते १७ फेब्रुवारी १९२७ रोजी करण्यात आली, व १६ एप्रिलला चिंतामणराव आणि राणीसाहेब यांच्या हस्ते बांधकामाचा पहिला दगड ठेवण्यात आला. पुढे २ वर्षे ९ महिन्यात हा भव्य आणि सुंदर पूल बांधून तयार करण्यात आला.पुलाला त्यावेळच्या गाॅथिक शैलीचा प्रभाव जाणवतो. नदीच्या तळापासून याची उंची जवळपास ७० फुट आहे. एकूण तेरा मजबूत खांबावर हा पूल उभा आहे. यातीलच एका खांबावर नदीच्या पातळीचे वेगवेगळे माप लिहून ठेवली आहेत.हा पूल बांधताना पटवर्धन राजांनी इंग्रज अधिकाऱ्यांच्या मदतीने पूररेषेचा अभ्यास केला होता. जर अख्खी सांगली बुडली तरचं हा आयर्विन पूल बुडेल यावरून पाण्याची पातळी समजुन येते. आजही आयर्विन पुलावर पाणी किती आहे त्यावरून महापुराचा अंदाज लावला जातो. या पुलाला तत्कालीन व्हॉइसरॉय आयर्विन यांचे नाव देण्याचे ठरले.
१८ नोव्हेंबर १९२९ रोजी भारताचे व्हाईसंरॉय एडवर्ड लिंडलेवुड उर्फ बॅरन आयर्विन ऑफ कर्बी अंडरडेल आणि त्यांची पत्नी उद्घाटनासाठी सांगलीला आले.उदघाटनला सांगलीच्या पंचक्रोशीतुन जनसागर लोटला होता. भव्य समारंभांनंतर हा आयर्विन पूल सामान्य जनतेसाठी खुला करण्यात आला.
९० वर्षानंतरअजुनही हा पुल ताठपणे उभा आहे. वयाची पुटंही दिसतात खरचं तो आता थकतं चाललाय.
अनिल पाटील पेठवडगाव
9890875498
http://anilpatilmahitiseva.blogspot.com/2020/08/blog-post_77.html

1
Answer link
आयर्विन पूल हा महाराष्ट्राच्या सांगली शहरातील कृष्णा नदीवरील पूल आहे.
सांगलीत इ.स. १९१४ व इ.स. १९१६ साली आलेल्या महापुरानंतर कृष्णा नदीवर पूल असण्याची गरज निर्माण झाली. यासाठी तत्कालीन सांगली संस्थानाचे अधिपती चिंतामणराव अप्पासाहेब पटवर्धन दुसरे यांनी पुढाकार घेतला. व इ.स. १९२७ साली पुलाचे बांधकाम सुरु झाले व इ.स. १९२९ साली ते पूर्ण झाले. पुलाचे उद्घाटन तत्कालीन व्हाईसरॉय आयर्विन यांच्या हस्ते इ.स. १९२९ साली झाले.
0
Answer link
आयर्विन पूल, सांगली
सांगलीतील आयर्विन पूल हा कृष्णा नदीवर बांधलेला एक महत्त्वाचा पूल आहे. या पुलामुळे सांगली आणि परिसरातील वाहतूक अधिक सोयीस्कर झाली आहे.
- बांधकाम: हा पूल ब्रिटीश राजवटीत बांधला गेला.
- नाव: लॉर्ड आयर्विन यांच्या नावावरून या पुलाला आयर्विन पूल असे नाव देण्यात आले.
- महत्व: हा पूल सांगली शहराला जोडतो आणि परिसरातील गावांसाठी दळणवळणाचे महत्त्वाचे साधन आहे.
- वास्तुकला: हा पूल जुन्या बांधकाम शैलीचा उत्कृष्ट नमुना आहे.
हा पूल आजही वाहतुकीसाठी वापरला जातो आणि सांगलीच्या इतिहासाचा एक भाग आहे.
अधिक माहितीसाठी आपण खालील संकेतस्थळांना भेट देऊ शकता: