2 उत्तरे
2
answers
अभिनेते बाबुराव पेंढारकर यांच्याबद्दल माहिती द्या?
2
Answer link
बाबूराव पेंढारकर' ऐसा नटश्रेष्ठ होणे नाही
🇦 नटश्रेष्ठ बाबूराव पेंढारकरांचा जन्म २२ जून, १८९६ रोजी कोल्हापूरमध्ये झाला.
मराठी चित्रपट-अभिनेते, दिग्दर्शक, निर्माते अशी त्यांची ख्याती होती. आज त्यांचा जन्मदिवस. त्यानिमित्ताने त्यांच्याबद्दल थोडक्यात जाणून घेऊया.
बाबूराव पेंढारकरांनी १९२० साली 'सैरंध्री' या मराठी चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन केले. या चित्रपटाद्वारे त्यांनी चित्रपट क्षेत्रात पदार्पण केले. १९२० च्या दशकापासून १९६० दशकापर्यंत त्यांनी पन्नासहून अधिक चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे. तर ६८ चित्रपटांमध्ये अभिनेता म्हणून काम केले. दोन चित्रपटांची निर्मितीही केली. तसेच त्यांनी चित्रपटांमध्ये विवध भूमिकाही साकारल्या. त्यांच्या असंख्य चित्रपटांपैकी एक उल्लेखनीय चित्रपट म्हणजे 'अयोध्येचा राजा' होय. ६ फेब्रुवारी, २०२० रोजी या चित्रपटाला ८८ वर्षे पूर्ण झाली.
🇦 व्ही. शांताराम दिग्दर्शित 'अयोध्येचा राजा' हा बोलपट ६ फेब्रुवारी १९३२ रोजी प्रदर्शित झाला होता. हा मराठीत बनलेला पहिला बोलपट आहे. याची निर्मिती प्रभात फिल्म कंपनीने केली होती. 'अयोध्येचा राजा'मध्ये बाबूराव पेंढारकर, मास्टर विनायक, गोविंदराव टेंबे, दुर्गा खोटे, शंकरराव भोसले, मानाजीराव माने, बुवासाहेब, कुमार दिगंबर यांच्या प्रमुख भूमिका होत्या. 'अयोध्येचा राजा' या चित्रपटाने दुर्गा खोटेंच्या रूपाने बोलपटासाठी पहिली अभिनेत्री मिळाली.
---------------------------------------
शेअरचॅट https://sharechat.com/post/AgRPXJa?referrer=copiedLink
---------------------------------------
मराठी चित्रपट दिग्दर्शक भालजी पेंढारकर हे बाबुरावांचे मोठे भाऊ होते. बाबूराव पेंढारकर, बाबालाल रहमान, चित्रकार पेंटर बंधू, भालजी पेंढारकर, मास्टर विनायक, कृष्णराव मिस्त्री यांच्यासारख्या कलाकार, दिग्गजांमुळे कोल्हापूरची ओळख 'कलापूर' अशी झाली.
पुढे प्रभात कंपनी पुण्याला हलवण्यात आली. परंतु, बाबुराव पेंढारकर पुण्याला गेले नाहीत. मेजर निंबाळकर आणि भालजी यांनी 'कोल्हापूर सिनेटोन कंपनी' काढली आणि बाबूरावांना मॅनेजर करण्यात आले. 'कोल्हापूर सिनेटोन कंपनी'चा 'विलासी ईश्वर' हा चित्रपट प्रदर्शित झाला. यामध्ये बाबूरावांनी अभिनय केला होता. पुढे त्यांनी मित्राच्या सहाय्याने 'हंस पिक्चर्स' नवी कंपनी उभारली.
पुढे 'हंस पिक्चर्स'चा 'ज्वाला' चित्रपट आला. परंतु, तो फारसा न चालल्यामुळे कंपनीचे नुकसान झाले होते. नंतर बाबूरांवांनी आचार्य अत्रेंशी संपर्क साधला. आठवड्याभरात नवा चित्रपट काढायला हवा, असे अत्रेंना सांगून बाबुराव कंपनी पुन्हा स्थिरसावर करण्याचे प्रयत्न करत होते. अत्रेंनी आपल्या विशिष्ट शैलीत 'ब्रह्मचारी' या चित्रपटाची पटकथा लिहून दिली. हा चित्रपट चांगला चालला आणि डबघाईला आलेली कंपनी पुन्हा मार्गावर आली. पुढे अत्रेंच्या 'महात्मा फुले' या चित्रपटात त्यांनी फुलेंची भूमिका साकारली. त्यांच्या या अप्रतिम भूमिकेचे कौतुकही झाले होते.
https://m.facebook.com/story.php?story_fbid=1011208639277059&id=100011637976439
'श्यामची आई,' 'महात्मा फुले,' 'धर्मवीर,' 'देवता,' 'अर्धांगी अमृत,' 'पहिला पाळणा,' 'भक्त दामाजी,' 'पुनवेची रात,' 'जय मल्हार,' 'मी दारू सोडली' यांसारख्या मराठी चित्रपटांबरोबरच त्यांनी हिंदी चित्रपटही केले. यामध्ये 'डॉ. कोटनीस की अमर कहानी', 'नवरंग', 'दो आँखे बारह हाथ' या हिंदी चित्रपटांचा समावेश आहे. पुढे बाबूराव रंगभूमीकडे वळसे, आचार्य अत्रेंच्या सांगण्यावरून त्यांनी रंगभूमीवर 'झुंझारराव' ही भूमिका साकारली. नाट्यअभिनेता म्हणून त्यांनी आपली प्रतिमा अधिक उंचावली.
पोटाच्या कर्करोगाने बाबूराव यांचे ९ नोव्हेंबर, १९६७ रोजी निधन झाले.
*✺ 𝑾𝒉𝒂𝒕𝒔𝒂𝒑𝒑 9890875498 ✺*
*_❍ माहिती सेवा ग्रूप ❍_*
*_❍ पेठवडगांव,जि. कोल्हापुर ❍_*
----------------❍--------------------

🇦 नटश्रेष्ठ बाबूराव पेंढारकरांचा जन्म २२ जून, १८९६ रोजी कोल्हापूरमध्ये झाला.
मराठी चित्रपट-अभिनेते, दिग्दर्शक, निर्माते अशी त्यांची ख्याती होती. आज त्यांचा जन्मदिवस. त्यानिमित्ताने त्यांच्याबद्दल थोडक्यात जाणून घेऊया.
बाबूराव पेंढारकरांनी १९२० साली 'सैरंध्री' या मराठी चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन केले. या चित्रपटाद्वारे त्यांनी चित्रपट क्षेत्रात पदार्पण केले. १९२० च्या दशकापासून १९६० दशकापर्यंत त्यांनी पन्नासहून अधिक चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे. तर ६८ चित्रपटांमध्ये अभिनेता म्हणून काम केले. दोन चित्रपटांची निर्मितीही केली. तसेच त्यांनी चित्रपटांमध्ये विवध भूमिकाही साकारल्या. त्यांच्या असंख्य चित्रपटांपैकी एक उल्लेखनीय चित्रपट म्हणजे 'अयोध्येचा राजा' होय. ६ फेब्रुवारी, २०२० रोजी या चित्रपटाला ८८ वर्षे पूर्ण झाली.
🇦 व्ही. शांताराम दिग्दर्शित 'अयोध्येचा राजा' हा बोलपट ६ फेब्रुवारी १९३२ रोजी प्रदर्शित झाला होता. हा मराठीत बनलेला पहिला बोलपट आहे. याची निर्मिती प्रभात फिल्म कंपनीने केली होती. 'अयोध्येचा राजा'मध्ये बाबूराव पेंढारकर, मास्टर विनायक, गोविंदराव टेंबे, दुर्गा खोटे, शंकरराव भोसले, मानाजीराव माने, बुवासाहेब, कुमार दिगंबर यांच्या प्रमुख भूमिका होत्या. 'अयोध्येचा राजा' या चित्रपटाने दुर्गा खोटेंच्या रूपाने बोलपटासाठी पहिली अभिनेत्री मिळाली.
---------------------------------------
शेअरचॅट https://sharechat.com/post/AgRPXJa?referrer=copiedLink
---------------------------------------
मराठी चित्रपट दिग्दर्शक भालजी पेंढारकर हे बाबुरावांचे मोठे भाऊ होते. बाबूराव पेंढारकर, बाबालाल रहमान, चित्रकार पेंटर बंधू, भालजी पेंढारकर, मास्टर विनायक, कृष्णराव मिस्त्री यांच्यासारख्या कलाकार, दिग्गजांमुळे कोल्हापूरची ओळख 'कलापूर' अशी झाली.
पुढे प्रभात कंपनी पुण्याला हलवण्यात आली. परंतु, बाबुराव पेंढारकर पुण्याला गेले नाहीत. मेजर निंबाळकर आणि भालजी यांनी 'कोल्हापूर सिनेटोन कंपनी' काढली आणि बाबूरावांना मॅनेजर करण्यात आले. 'कोल्हापूर सिनेटोन कंपनी'चा 'विलासी ईश्वर' हा चित्रपट प्रदर्शित झाला. यामध्ये बाबूरावांनी अभिनय केला होता. पुढे त्यांनी मित्राच्या सहाय्याने 'हंस पिक्चर्स' नवी कंपनी उभारली.
पुढे 'हंस पिक्चर्स'चा 'ज्वाला' चित्रपट आला. परंतु, तो फारसा न चालल्यामुळे कंपनीचे नुकसान झाले होते. नंतर बाबूरांवांनी आचार्य अत्रेंशी संपर्क साधला. आठवड्याभरात नवा चित्रपट काढायला हवा, असे अत्रेंना सांगून बाबुराव कंपनी पुन्हा स्थिरसावर करण्याचे प्रयत्न करत होते. अत्रेंनी आपल्या विशिष्ट शैलीत 'ब्रह्मचारी' या चित्रपटाची पटकथा लिहून दिली. हा चित्रपट चांगला चालला आणि डबघाईला आलेली कंपनी पुन्हा मार्गावर आली. पुढे अत्रेंच्या 'महात्मा फुले' या चित्रपटात त्यांनी फुलेंची भूमिका साकारली. त्यांच्या या अप्रतिम भूमिकेचे कौतुकही झाले होते.
https://m.facebook.com/story.php?story_fbid=1011208639277059&id=100011637976439
'श्यामची आई,' 'महात्मा फुले,' 'धर्मवीर,' 'देवता,' 'अर्धांगी अमृत,' 'पहिला पाळणा,' 'भक्त दामाजी,' 'पुनवेची रात,' 'जय मल्हार,' 'मी दारू सोडली' यांसारख्या मराठी चित्रपटांबरोबरच त्यांनी हिंदी चित्रपटही केले. यामध्ये 'डॉ. कोटनीस की अमर कहानी', 'नवरंग', 'दो आँखे बारह हाथ' या हिंदी चित्रपटांचा समावेश आहे. पुढे बाबूराव रंगभूमीकडे वळसे, आचार्य अत्रेंच्या सांगण्यावरून त्यांनी रंगभूमीवर 'झुंझारराव' ही भूमिका साकारली. नाट्यअभिनेता म्हणून त्यांनी आपली प्रतिमा अधिक उंचावली.
पोटाच्या कर्करोगाने बाबूराव यांचे ९ नोव्हेंबर, १९६७ रोजी निधन झाले.
*✺ 𝑾𝒉𝒂𝒕𝒔𝒂𝒑𝒑 9890875498 ✺*
*_❍ माहिती सेवा ग्रूप ❍_*
*_❍ पेठवडगांव,जि. कोल्हापुर ❍_*
----------------❍--------------------

0
Answer link
बाबुराव पेंढारकर (जन्म: २९ ऑगस्ट १८९६; - मृत्यू: १९ जानेवारी १९६७) हे मराठी चित्रपट अभिनेते, दिग्दर्शक आणि निर्माते होते. ते मराठी चित्रपटसृष्टीतील एक महत्त्वाचे व्यक्तिमत्त्व होते.
कारकीर्द:
- बाबुराव पेंढारकर यांनी १९२० च्या दशकात चित्रपटांमध्ये काम करायला सुरुवात केली.
- त्यांनी अनेक ऐतिहासिक चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या, ज्यात 'नेताजी पालकर', 'शिवाजी महाराज', आणि 'बाजी प्रभु देशपांडे' यांचा समावेश होतो.
- 'सिंहासन' (१९५१) आणि 'स्वराज्याची तोरण' (१९३९) यांसारख्या चित्रपटांचे दिग्दर्शन त्यांनी केले.
- त्यांनी 'प्रभात फिल्म कंपनी'साठी अनेक चित्रपटांची निर्मिती केली.
पुरस्कार आणि सन्मान:
- १९६२ मध्ये, संगीत नाटक अकादमी पुरस्काराने त्यांना गौरवण्यात आले.
- त्यांच्या चित्रपट योगदानाला आदराने गौरवण्यात येते.
बाबुराव पेंढारकर यांचे मराठी चित्रपटसृष्टीतील योगदान खूप मोठे आहे. त्यांनी आपल्या अभिनयाने आणि दिग्दर्शनाने अनेक चित्रपट अजरामर केले.
संदर्भ: