शिक्षण परीक्षा औद्योगिक ट्रेनिंग प्रवेश

सरकारी आयटीआयला प्रवेश घ्यायचा असेल तर किती मार्क लागतात?

2 उत्तरे
2 answers

सरकारी आयटीआयला प्रवेश घ्यायचा असेल तर किती मार्क लागतात?

1
शासनाची किंवा शासनाची मान्यता असलेल्या शिल्पकारागीर प्रशिक्षण देणार्‍या संस्थेला आयटीआय म्हणजे औद्योगिक प्रशिक्षण संस्था म्हणतात.

कुशल कामगार तयार करणे व विद्यार्थांना स्वावलंबी बनवणे आहे हे या संस्थांचे उद्दिष्ट असते..

महाराष्ट्र राज्यात ४१७ शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था व ३८१ खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्था आहेत. या संस्था १३४ प्रकारच्या व्यवसायांचे (ट्रेड)चे प्रशिक्षण देतात. या संस्थांमध्ये दरवर्षी सुमारे १ लाख ५० हजार विद्यार्थी प्रवेश घेतात.

सर्वच पालकांना आपल्या मुलांना डॉक्टर, इंजिनिअर व्हावे असे वाटते. अनेकदा मुलगा हुशार असतो पण आथिर्कदृष्ट्या परवडणारे नसते, तर कधी आर्थिक स्थिती चांगली असते पण मुलाची आवड ध्यानात घेतली जात नाही. त्यामुळे पालकांनी आपल्या मुलासाठी करिअर निवड करताना बर्‍याच गोष्टी ध्यानात घ्याव्या लागतात..

इंडस्ट्रीला प्रशिक्षित कारागिरांची मोठी गरज भासत असते. मागणी वाढत असली तर त्याप्रमाणात कुशल कामगार मिळणे अवघड जाते. त्यामुळे आयटीआय करणार्‍या विद्यार्थ्यांना नोकरीच्या उत्तम संधी चालून येतात.. शिवाय आयटीआय झाल्यानंतरही इंजिनिअरिंगमध्ये उच्च शिक्षणाचा पर्यायसुद्धा विद्यार्थ्यांसमोर खुला असतोच. आयटीआय केल्यानंतर नोकरीसोबतच स्वयंरोजगार करण्याचाही विचार विद्यार्थी करू शकतात. त्यामुळे सर्वांनी आयटीआयकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलायला हवा.

सध्या इंडस्ट्रीजच्या गरजा लक्षात घेऊन राज्य सरकारनेही आयटीआयमधील अभ्यासक्रमांमध्ये बदल केले आहेत. इंडस्ट्रीसोबत टाय-अप करून नव्या नव्या योजना हाती घेण्यात येत आहेत.

प्रत्येक आयटीआय संस्थेतून सर्वच कोर्सेस शिकवले जात नाहीत. ज्या संस्थेत उप्रवेश घ्यायचा असेल त्या संस्थेमध्ये उपलब्ध असलेल्या कोर्सेसची माहिती घेऊन त्यानुसारच प्रवेश घ्यावा.

प्रवेशासाठी वेबसाईट वर फॉर्म भरावे लागतात.

प्रवेशाच्या अटी

आठवी, दहावी आणि बारावी या किमान अर्हतेच्या अटीपेक्षा अधिक अर्हता असणारे उमेदवारही अर्ज करण्यास पात्र ठरतात.

उमेदवार ज्या तालुका क्षेत्रातील मान्यताप्राप्त शाळेतून उत्तीर्ण झाला असेल त्या तालुका क्षेत्रातच प्रवेश पात्र ठरेल. एखाद्या उमेदवारास एका विशिष्ट अभ्यासक्रमासाठी प्रवेश घ्यायचा असेल आणि तो त्याच्या औद्योगिक संस्थेत नसेल तर अशा बाबतीत अन्य तालुक्यात अर्ज करता येतो.

औद्योगिक प्रशिक्षण संस्थांतील सर्व व्यवसायातून महिलांसाठी २५ टक्के आरक्षण ठेवण्यात आले आहे. अपंग उमेदवारांसाठीही ३ टक्के जागा राखीव असतात. प्रवेशासाठी उमेदवाराचे वय १४ ते ४० वर्षांदरम्यान असावे लागते.

प्रवेश पात्र उमेदवारांची वैद्यकीय अधिकार्‍याकडून वैद्यकीय तपासणी करण्यात येते. प्रशिक्षणासाठी शारीरिकदृष्ट्या पात्र असलेल्या उमेदवारांनाच प्रवेश दिला जातो.

प्रवेशपात्र परीक्षेमध्ये उमेदवारांनी मिळवलेले गुण व विशेष अर्हता, खेळातील प्रावीण्य, आरक्षण यांना अनुसरून उमेदवारांची निवड केली जाते. वसतिगृह शुल्क आकारले जाते.

प्रवेशासाठी आवश्यक कागदपत्रे

शाळा सोडल्याचा दाखला, गुणपत्रिका, जन्म दाखला, जातीचा दाखला.

प्रशिक्षणादरम्यान मिळणार्‍या सुविधा

एसटी, रेल्वे प्रवास सवलत

खेळ, करमणूक व वैद्यकीय मदत यांची विनामूल्य सोय

आदिवासी प्रशिक्षणार्थ्यांना मिळणार्‍याया विशेष सुविधा

अनुसूचित जातीच्या दहावी पास प्रशिक्षणार्थ्यांना मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती

प्रचंड फीवाढ

महाराष्ट्र राज्यात भाजप-शिवसेना युतीचे सरकार येताच उच्च व तंत्रशिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाअंतर्गत येणार्‍या राज्यातील ८७१ शासकीय व खासगी आयटीआयचे शिक्षण शुल्क १८० रुपयावरून थेट ५ हजारावर नेल्याने राज्यात सर्वत्र आरडाओरड होत आहे. (जुलै २०१५ची बातमी)

शिक्षण शुल्क वाढीमुळे गरीब व होतकरू मुलांना व्यवसाय शिक्षण घेणे कठीण झाले आहे. विशेषत: ग्रामीण भागातील मुला-मुलींसोबतच शेतकर्‍यांच्या मुलांचा आयटीआय शिक्षणाचा मार्ग खडतड झाला आहे. अशा स्थितीत शिक्षण शुल्क कमी करण्याची आवश्यकता असतांना आयटीआयच्या परीक्षा शुल्कातही ६५० रुपयांइतकी भरमसाठ वाढ करण्यात आलेली आहे. या पूर्वीपर्यंत आयटीआयचे परीक्षा शुल्क केवळ ५० रुपये होते. हे नाममात्र शुल्क होते तरीही गडचिरोली, नंदुरबार, बुलढाणा धुळे, ठाणे या अतिदुर्गम आदिवासी जिल्ह्य़ातील विद्यार्थ्यांकडे ते सुद्धा राहात नाही. ही वस्तुस्थिती असतांना उच्च व तंत्रशिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी ५० रुपयावरून थेट ६५० रुपये इतकी शुल्कवाढ केल्याने गरीब विद्यार्थ्यांना अडचणीचे झाले आहे. विशेष म्हणजे, आयटीआयची परीक्षा सुद्धा सेमिस्टर पद्धतीने होते. त्यामुळे विद्यार्थ्यांना वर्षांतून दोनदा म्हणजे १३०० रुपये केवळ भरावे लागणार आहे. एखादा विद्यार्थी प्रथम वर्षांत नापास झाला तरी तो थेट दुसर्‍या वर्षांत जातो. अशा वेळी विद्यार्थ्यांना प्रथम सत्रासोबतच द्वितीय सत्राची सुद्धा फी भरावी लागणार आहे. म्हणजे, सेमिस्टर पद्धतीने त्याला तीन वेळा फी भरावी लागेल.

एखाद्या परीक्षेची शुल्कवाढ टप्प्याटप्प्याने होत असते. मात्र, येथे सरसकट बारा पट शुल्कवाढ केल्याने विद्यार्थ्यांमध्ये तीव्र रोष व्यक्त केला जात आहे. राज्यात भाजप-शिवसेना युतीची सत्ता येताच शिक्षणाचे बाजारीकरण होत आहे. अभियांत्रिकीपासून तर आयटीआयपर्यंतचे शिक्षण उच्च व तंत्रशिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी महागडे करून गरीब विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित ठेवण्याचा डाव रचल्याचा आरोप होत आहे. आयटीआयसारख्या अभ्यासक्रमाचे शुल्क १८० रुपयांवरून थेट पाच हजारापर्यंत वाढविणे व परीक्षा शुल्क ५० रुपयांवरून थेट ६५० इतकी करणे हा विद्यार्थ्यांवर अन्याय आहे. ही शुल्कवाढ तातडीने कमी करावी अन्यथा, आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे.

राज्यात भाजप-शिवसेना युतीची सत्ता येताच शिक्षणाचे बाजारीकरण होत आहे. अभियांत्रिकीपासून तर आयटीआयपर्यंतचे शिक्षण उच्च व तंत्रशिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी महागडे करून गरीब विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित ठेवण्याचा डाव रचल्याचा आरोप होत आहे. आयटीआयसारख्या अभ्यासक्रमाचे शुल्क १८० रुपयांवरून थेट पाच हजारापर्यंत वाढविणे व परीक्षा शुल्क ५० रुपयांवरून थेट ६५० इतकी करणे हा विद्यार्थ्यांवर अन्याय आहे. ही शुल्कवाढ तातडीने कमी करावी अन्यथा, आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे.

अधिक माहितीसाठी

व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय, ३, महापालिका मार्ग, टपाल पेटी क्र. १००३६, मुंबई-१ येथे चौकशी करावी.

Directorate of Vocational Education and Training, Maharashtra State, 3, Mahapalika Marg, Post Box No. 10036, Mumbai 400 001

वेबसाईट
201906अ430967

www.dvet.gov.in;itinerary

प्रवेशाच्या माहितीसाठी
http://admission.dvet.gov.in, उघडून वाचावे.

ईमेल पत्ता - itiadmission@dvet.maharashtra.gov.in
उत्तर लिहिले · 25/2/2020
कर्म · 3860
0

ITI (औद्योगिक प्रशिक्षण संस्था) मध्ये प्रवेश घेण्यासाठी किती गुण लागतील हे काही गोष्टींवर अवलंबून असते, जसे की:

  • तुम्ही कोणत्या ITI मध्ये अर्ज करत आहात: प्रत्येक ITI संस्थेचे Cut-off Marks वेगवेगळे असू शकतात.
  • तुम्ही कोणत्या ट्रेड (Trade) साठी अर्ज करत आहात: काही ट्रेडसाठी जास्त Cut-off Marks असू शकतात, तर काहींसाठी कमी.
  • तुमची Category काय आहे: SC, ST, OBC, EWS अशा आरक्षित जागांसाठी Cut-off Marks मध्ये सवलत असते.

तरीसुद्धा, सर्वसाधारणपणे, ITI मध्ये प्रवेश घेण्यासाठी खालीलप्रमाणे गुण अपेक्षित असतात:

  • Minimum Marks: ITI मध्ये प्रवेश घेण्यासाठी कमीत कमी 35% गुण आवश्यक असतात.
  • सरकारी ITI: सरकारी ITI मध्ये प्रवेश मिळवण्यासाठी चांगले गुण असणे आवश्यक आहे. Cut-off Marks 60% ते 80% किंवा त्याहून अधिक असू शकतात.

तुम्ही ज्या ITI आणि Trade मध्ये प्रवेश घेऊ इच्छिता, त्यांच्या मागील वर्षांचे Cut-off Marks तपासणे उत्तम राहील.

तुम्ही खालीलप्रमाणे माहिती मिळवू शकता:

  • ITI च्या Website ला भेट द्या.
  • स्थानिक ITI कार्यालयात चौकशी करा.

Accuracy: 70

उत्तर लिहिले · 21/3/2025
कर्म · 980

Related Questions

माझी मुलगी ११वी सायन्स शाखेत शिक्षण घेत आहे आणि तिला गुण कमी मिळाले आहेत. आता ती १२वी कला शाखेत प्रवेश घेऊ इच्छिते, तर तिला १२वी कला शाखेत प्रवेश मिळेल का? जर मिळत असेल, तर प्रक्रिया काय असेल? कृपया लवकर उत्तर अपेक्षित आहे.
11वी सायन्सला पास झालो, पण मला 12वी कला शाखेत प्रवेश घ्यायचा आहे. घेता येईल का? पद्धत काय असेल?
30 सप्टेंबरला 10 प्लस वयातले सगळे विद्यार्थी कोणत्या वर्गात समाविष्ट होण्यास लागतात?
उत्तर प्रदेश येथील मेरठ मध्ये गुरुकुल प्रभात आश्रम प्रवेश पद्धती कशी आहे?
तुम्ही ग्रामीण व शहसरी भागातील विद्यार्थ्यांसाठी?
समावेश आत येणाऱ्या विद्यार्थ्यांची यादी?
समाविष्ट करण्यात येणाऱ्या विद्यार्थ्यांची नावे काय आहेत?