पर्यटन भूगोल जिल्हा

कोल्हापूर जिल्ह्याचे विशेष महत्त्व काय आहे?

2 उत्तरे
2 answers

कोल्हापूर जिल्ह्याचे विशेष महत्त्व काय आहे?

4
*📍कोल्हापूर जिल्हा : ऐतिहासिक महत्त्व*


कोल्हापूर भारतातील महाराष्ट्र राज्यातील एक जिल्हा आहे. कोल्हापूर ऐतिहासिक महालक्ष्मी मंदिर, कोल्हापुरी चपला, कुस्ती, मांसाहारी जेवण आणि कोल्हापुरी गूळ या गोष्टींसाठी प्रसिद्ध आहे. येथील मसालेदार पाककृतीही तिखटपणासाठी भारतभर प्रसिद्ध आहेत. या भागातील भरपूर नद्या आणि सुपीक जमीन यामुळे मुख्यत: शेतीवर आधारित उद्योग असूनही कोल्हापूर दरडोई उत्पन्नाच्या बाबतीत आघाडीच्या जिल्ह्यांमध्ये गणला जातो.

*💁‍♀ऐतिहासिक महत्त्व -*

⚡कोल्हापूर ज्या मूळ गावापासून विस्तार पावले ते गाव ब्रह्मपुरी होय. इतिहासकारांच्या मतानुसार कोल्हापूर जिल्हा परिसरावर आंध्रभ्रुत्य, कदंब, चालुक्य, राष्ट्रकूट, शिलाहार, देवगिरीचे यादव व बहामनी अशा अनेक राजवटींचा अंमल होता. कोल्हापूरच्या आसपास केलेल्या उत्खननात, तेथील पुरातन अवशेषांवर सातवाहनकालीन व बौद्ध धर्माच्या खुणादेखील आढळल्या आहेत. कोल्हापूर परिसरावर विजापूरच्या आदिलशहाची अनेक वर्षे सत्ता होती. छत्रपती शिवाजी महाराजांनी मार्च, १६७३ मध्ये पन्हाळा जिंकून स्वराज्यात आणला, तसेच १६७५ मध्ये कोल्हापूर परिसर खर्‍या अर्थाने जिंकून आपल्या अखत्यारीत आणला.

*⚡कोल्हापूरच्या गादीचा इतिहास -*
इ.स. १६८० मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी देह ठेवला त्या वेळी छत्रपती संभाजी महाराज पन्हाळ्यावर होते. महाराजांच्या मृत्यूनंतर संभाजी राजांनी पन्हाळ्यावरून राज्य चालवण्याचा प्रथम प्रयत्न केला. परंतु नंतर त्यांनी रायगडाकडे कूच केले. छत्रपती शिवाजी महाराजांचे दुसरे पुत्र राजाराम(ताराबाईने राजारामाच्या नंतर संभाजीपुत्र शाहू महाराज व ताराबाई यांच्या सत्ता संघर्षाची परिणती म्हणून ही गादी निर्माण झाली ) यांनी इ़ स.१६९८ मध्ये सातार्‍याला छत्रपतींच्या गादीची स्थापना केली. पण राजारामांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पत्नी ताराबाईंनी राज्याची सूत्रे हाती घेऊन स्वतंत्र गादीची स्थापना कोल्हापुरात केली. राणी ताराबाईंनी पन्हाळ्यावर १७१० मध्ये स्वतंत्र राज्य स्थापनेची घोषणा केली.

*⚡करवीर गादीची स्थापना -*
करवीर गादीची स्थापना करणार्‍या सरदार राणी ताराबाईंची कारकीर्द १७०० ते १७६१ अशी प्रदीर्घ होती. या कालावधीत मराठी राज्यात दुही माजली होती. ताराबाई व संभाजी महाराजांचे पुत्र शाहू यांच्यामध्ये अनेक वर्षे संघर्ष चालू होता. त्याचे केंद्र करवीरची गादी व कोल्हापूरचा परिसरच होता. राजारामांच्या दुसर्‍या पत्‍नीचा मुलगा दुसरा संभाजी तसेच, छत्रपती शाहू यांच्यामध्येही संघर्ष चालू होता. १७३१ मध्ये याच परिसरात वारणा नदीच्या काठी शाहू व दुसरा संभाजी यांच्यामध्ये तह झाला व महाराष्ट्रातील दुर्दैवी कलहाची सांगता झाली.

⚡१७८२ मध्ये कोल्हापूरची राजधानी पन्हाळ्याहून कोल्हापूरला आली. तिसरा शिवाजी यांचे त्यांच्या मृत्यूपर्यंत म्हणजे १८१२ पर्यंत (५२ वर्षांची प्रदीर्घ कारकीर्द) कोल्हापूर गादीवर वर्चस्व होते. १८१८ च्या दरम्यान बहुतांश महाराष्ट्र ब्रिटिशांच्या ताब्यात गेला होता. पण ब्रिटिशांनी कोल्हापूर संस्थान खालसा केले नाही, त्याचे अस्तित्त्व कायम ठेवले. पुढे १९४९ मध्ये संस्थान भारतीय संघराज्यात विलीन होईपर्यंत कोल्हापूर स्वतंत्र होते.
उत्तर लिहिले · 13/11/2019
कर्म · 569225
0

कोल्हापूर जिल्ह्याला महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये एक विशेष महत्त्व आहे. खाली काही महत्त्वाचे मुद्दे दिले आहेत:

1. ऐतिहासिक महत्त्व:

  • मराठा साम्राज्य: कोल्हापूर हे मराठा साम्राज्याचा एक महत्त्वाचा भाग होता. शहाजी महाराजांनी या शहराला महत्त्व दिले आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातही कोल्हापूर एक महत्त्वाचे केंद्र बनले.
  • राजर्षी शाहू महाराज: राजर्षी शाहू महाराजांनी (छत्रपती शाहू महाराज) येथे सामाजिक न्याय आणि शिक्षण क्षेत्रात मोठे योगदान दिले. त्यांनी जातीय भेदभावाला विरोध केला आणि सर्वांसाठी समान संधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला.

2. सांस्कृतिक महत्त्व:

  • कला आणि साहित्य: कोल्हापूरची कला आणि साहित्य क्षेत्रात मोठी परंपरा आहे. येथे अनेक थोर लेखक, कलाकार आणि संगीतकार झाले आहेत.
  • चित्रपटसृष्टी: कोल्हापूर हे मराठी चित्रपटसृष्टीचे एक महत्त्वाचे केंद्र आहे. अनेक चित्रपटांचे चित्रीकरण येथे होते.
  • सण आणि उत्सव: कोल्हापूरमध्ये अनेक सण आणि उत्सव मोठ्या उत्साहात साजरे केले जातात. उदाहरणार्थ, दसरा, दिवाळी आणि गणेशोत्सव.

3. धार्मिक महत्त्व:

  • महालक्ष्मी मंदिर: कोल्हापूर हे महालक्ष्मी (अंबाबाई) मंदिरासाठी प्रसिद्ध आहे. हे मंदिर भारतातील ५१ शक्तिपीठांपैकी एक आहे आणि येथे देशभरातून भाविक दर्शनासाठी येतात.
  • इतर मंदिरे: या जिल्ह्यामध्ये अनेक प्राचीन मंदिरे आहेत, ज्यामुळे या भागाला धार्मिक महत्त्व प्राप्त झाले आहे.

4. भौगोलिक महत्त्व:

  • कृषी: कोल्हापूर जिल्हा कृष्णा नदीच्या खोऱ्यात वसलेला असल्यामुळे येथील जमीन सुपीक आहे. त्यामुळे येथे ऊस, भात, आणि इतर पिकांचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होते.
  • पर्यटन: कोल्हापूरमध्ये अनेक डोंगर आणि निसर्गरम्य स्थळे आहेत, ज्यामुळे ते पर्यटकांसाठी एक आकर्षक ठिकाण आहे. कोल्हापूर जिल्ह्याची वेबसाईट वर तुम्हाला याबद्दल अधिक माहिती मिळेल.

उत्तर लिहिले · 21/3/2025
कर्म · 980

Related Questions

कांदळगांवचा रामेश्वर बद्दल माहिती द्या?
पट्टा किल्ल्याबद्दल माहिती द्यावी?
पाचगणीतील गेस्ट हाऊस मध्ये फ्री मध्ये राहण्यासाठी काय अटी आहेत?
भारतातील अजबगजब ठिकाणे कोणती?
महाराष्ट्रातील कोणत्या गावात चार महिने धुके पडते?
इटलीच्या कोणत्या गावात राहण्यासाठी पैसे व घर दिले जाते?
फ्रान्स मध्ये सुट्टी का घेत नाहीत?