कायदा मुस्लिम धर्म न्यायालयीन प्रकरणे

बाबरी मशीद बद्दल कोर्टात काय फैसला आहे? काय आहे हे सर्व प्रकरण? माहिती मिळेल का?

3 उत्तरे
3 answers

बाबरी मशीद बद्दल कोर्टात काय फैसला आहे? काय आहे हे सर्व प्रकरण? माहिती मिळेल का?

3

  • अयोध्या विवादाचा निकाल दिनांक 9 नोव्हेंबर 2019 रोजी ऐतिहासिक निकाल सुप्रीम कोर्टाद्वारे देण्यात आला.
सुप्रीम कोर्टाच्या पाच न्यायाधीशांच्या घटनात्मक खंडपीठाने हा ऐतिहासिक निर्णय सुनावला आहे.

या खंडपीठामध्ये खालील न्यायाधीशांचा समावेश होता.
१) मुख्यन्यायाधीश – रंजन गोगोई
२) न्यायाधीश – अशोक भूषण
३) न्यायाधीश – डी. वाय. चंद्रचूड
४) न्यायाधीश – एस. ए. बोबडे
५) न्यायाधीश – एस. अब्दुल नझीर



अयोध्या विवाद –
1850-85 – या काळात पहिल्यांदा हिंसा झाल्याच्या घटना नोंदण्यात आल्या.

1885 – महंत रघुवर दास यांनी फैजाबाद जिल्ह्या न्यायालयात मंदिर बांधण्यासाठी परवानगी मिळावी असा अर्ज केला. तेंव्हा भारतावर ब्रिटिश सत्ता होती.



डिसेंबर 1949 – श्री रामाची मूर्ती, सीता मातेची मूर्ती व अन्य काही मुर्त्या जबरदस्ती मस्जिदीच्या गाभाऱ्यात ठेवण्यात आल्या.

1950 – गोपालसिंह विशारद यांनी ठेवलेल्या मूर्त्यांना पूजण्याची परवानगी मिळावी, यासाठी कोर्टात अर्ज दाखल केला.

1959 – निर्मोही आखाडा याने जागेचा ताबा मिळावा यासाठी कोर्टात अर्ज दाखल केला.

1961 – सुन्नी वक्फ बोर्डाने जागेचा ताबा मिळावा यासाठी कोर्टात अर्ज दाखल केला.

1986 – स्थानिक कोर्टाने मस्जिदीचे कुलूप काढण्यासाठी आदेश दिले आणि हिंदूंना प्रार्थना करण्यास परवानगी दिली.

6 डिसेंबर 1992 – कारसेवकांकडून बाबरी मस्जिद पाडण्यात आली.

30 सप्टेंबर 2010 – अलाहाबाद हाय कोर्टाने जागेचे तीन विभाग करून तिन्ही गुटात वाटण्यात आले. राम लल्ला, निर्मोही आखाडा आणि सुन्नी वक्फ बोर्ड या तिघांमध्ये जागा वाटण्यात आली.



अलाहाबाद उच्च न्यायालयाद्वारे 2010 मध्ये दिलेला जागा वाटपाच्या निर्णयाद्वारे –

● राम लल्ला विराजमान – घुमट असलेला मध्य भाग यांना देण्यात आला.

● निर्मोही आखाडा – राम चबुतरा आणि सीता रसोई निर्मोही आखाडा यांना देण्यात आला.

● सुन्नी वक्फ बोर्ड – या दोघांना देऊन राहिलेली सर्व जमीन सुन्नी वक्फ बोर्डाला देण्यात आली.


या निर्णयामुळे या तिन्ही अर्जदारांपैकी कोणीही खुश नव्हतं. त्यामुळे 2011 मध्ये या सर्वांनी परत सुप्रीम कोर्टात, अलाहाबाद हाय कोर्टाच्या निर्णयावर पुन्हा सुनावणी करण्यात यावी, अशी मागणी केली.

जानेवारी 2019 – मुख्यन्यायाधीश रंजन गोगोई यांनी पाच न्यायाधीशांच्या खंडपीठाची स्थापना केली.

सप्टेंबर 2019 मध्ये लागतार 40 दिवस सुनावणी सुरू होती आणि ती सुनावणी 16 ऑक्टोबर रोजी पूर्ण झाली.

आता नेमका मुख्य मुद्दा काय आहे, हे समजून घ्या.
मुख्य मुद्दा हा ना धार्मिक आहे, ना कोणाच्या आस्थेचा आहे. मुख्य मुद्दा हा ती जागा कोणाच्या मालकीची आहे, हाच आहे.



सुप्रीम कोर्टाने 9 नोव्हेंबर 2019 रोजी हा निर्णय जाहीर केला. पाचही न्यायाधीशांनी एकमताने हा निर्णय सुनावला आहे.

सुप्रीम कोर्टाच्या निर्णयातील प्रमुख मुद्दे –
निर्मोही आखाडा यांनी केलेला दावा फेटाळला आहे.
शिया वक्फ बोर्डाचाही दावा फेटाळला आहे.
ASI च्या उत्खननातून हे सिद्ध होते की बाबरी मस्जिद ही मोकळ्या जागेत बांधण्यात आली नव्हती.
बाबरी मस्जिदीखाली निश्चित गैर इस्लामिक स्ट्रक्चर होतं.
आणि त्यावरच बाबरी मस्जिद बांधण्यात आली होती.
त्यासोबतच मस्जिदिच्या आजूबाजूला हिंदू अनेक शतकांपासून पूजा करत होते.
कोर्टाने म्हटलं आहे की नेहमी पासूनच हिंदू मस्जिदीचा जो आतला भाग आहे त्याला राम जन्मभूमीची जागा आहे असे मानत आले आहेत.
आता पाहूया विवादित जागेचा ताबा कोणाला मिळाला ?
या विवादात जागेच्या ताबा मिळावा यासाठी पुढील तीन प्रमुख दावेदार होते.

१) राम लल्ला विराजमान

२) सुन्नी वक्फ बोर्ड

३) निर्मोही आखाडा

● राम लल्ला विराजमानला मिळाला विवादित जागेचा ताबा.

● मुस्लिमांसाठी सुन्नी वक्फ बोर्डाला अयोद्धेतच मस्जिद बांधकामासाठी सरकारकडून 5 एकर प्रॉमिनंट जमीन देण्यात येईल.

● निर्मोही आखाड्याचा दावा सुप्रीम कोर्टाने फेटाळून लावला.

केंद्र सरकारला मंदिराच्या बांधकामासाठी तीन महिन्यांच्या आत एका ट्रस्टची स्थापना करण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत.



।।।अजूनही तुम्ही आपण सर्वांनी लक्षात घ्या, हा संपूर्ण विवाद हा जागेच्या मालकी हक्कावर अवलंबून होता. सर्वांनी एक गोष्ट लक्षात ठेवा, देशाच्या सुप्रीम कोर्टाने दिलेला हा निर्णय आहे, त्यामुळे सर्वांनी याचा आदर करणे गरजेचे आहे. लोकशाहीसाठी हे अंत्यत महत्वाचे आहे. लोकांचा न्यायपालिकेवरचा विश्वास वाढणे गरजेचे आहे. आपल्या संविधानात प्रत्येक धर्माला समान न्याय, अधिकार आणि सन्मान देण्यात आला आहे.।।।
उत्तर लिहिले · 16/11/2019
कर्म · 36090
1
प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने व लवकरच निकाल असल्याने उत्तर देता येत नाही.
0
नक्कीच, बाबरी मशीद प्रकरणाबद्दलची माहिती खालीलप्रमाणे:

बाबरी मशीद-राम जन्मभूमी प्रकरण:

बाबरी मशीद-राम जन्मभूमी हा भारताच्या इतिहासातील एक अत्यंत महत्त्वाचा आणि संवेदनशील विषय आहे. या प्रकरणात अनेक वर्षांपासून वाद चालू होता.

प्रकरणाची पार्श्वभूमी:

  • बाबरी मशीद: 1528 मध्ये मुघल बादशाह बाबरच्या आदेशानुसार अयोध्येत एक मशीद बांधली गेली, जिला बाबरी मशीद म्हणून ओळखले जाते.
  • राम जन्मभूमी: हिंदू मानतात की याच ठिकाणी प्रभू रामाचा जन्म झाला होता आणि तिथेच त्यांचे मंदिर होते. असा दावा केला जातो की मोगलांनी ते मंदिर तोडून मशीद बांधली.

विवाद:

  • 1980 च्या दशकात हा मुद्दा अधिक तापला, जेव्हा हिंदू संघटनांनी मशीद पाडून तिथे राम मंदिर बांधण्याची मागणी केली.
  • 6 डिसेंबर 1992 रोजी बाबरी मशीद पाडली गेली, ज्यामुळे देशभरात दंगली झाल्या.

कोर्टाचा निर्णय:

  • अलाहाबाद उच्च न्यायालय: 2010 मध्ये अलाहाबाद उच्च न्यायालयाने वादग्रस्त जमिनीला तीन भागात विभागण्याचा निर्णय दिला - राम मंदिर न्यास, निर्मोही आखाडा आणि सुन्नी वक्फ बोर्ड.
  • सर्वोच्च न्यायालय: 9 नोव्हेंबर 2019 रोजी सर्वोच्च न्यायालयाने ऐतिहासिक निर्णय दिला. न्यायालयाने सांगितले की वादग्रस्त जमीन राम मंदिर न्यासला दिली जाईल आणि मशीद बांधण्यासाठी सुन्नी वक्फ बोर्डाला दुसरी जागा दिली जाईल.

सद्यस्थिती:

  • सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, राम मंदिराचे बांधकाम सुरू झाले आहे.
  • अयोध्या शहरात मशीद बांधण्यासाठी सुन्नी वक्फ बोर्डाला जमीन देण्यात आली आहे.

अधिक माहितीसाठी:

  1. सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय (Supreme Court Verdict): SC Judgement
  2. राम मंदिर ट्रस्ट (Shri Ram Janmbhoomi Teerth Kshetra): Ram Mandir Trust Official Website
उत्तर लिहिले · 21/3/2025
कर्म · 2800

Related Questions

कोर्टाची केस डिस्पोज झाल्यानंतर पुढची तारीख कशी बघता येईल?
ज्ञानवापी मस्जिद केस कुठल्या कोर्टात प्रलंबित आहे?
जिल्हाधिकारी न्यायालयातील केसेस कशा बघतात?