2 उत्तरे
2
answers
अण्णाभाऊ साठे यांच्याबद्दल माहिती मिळेल का?
4
Answer link
🙏 *अण्णाभाऊ साठे स्मृतिदिन*
शाहीर तसेच दीन-दुबळ्यांचे, उपेक्षितांच्या जीवनाचे वास्तव चित्रण करणारे साहित्यिक, लेखक अण्णाभाऊ साठे यांचा स्मृतिदिन.
सांगली जिल्ह्याच्या वाळवा तालुक्यातील वाटेगाव या गावात 1 ऑगस्ट इ.स. 1920 रोजी अण्णाभाऊ साठे यांचा जन्म झाला. त्यांचे वैशिष्ट्य असे की, ते कधीच शाळेत गेले नाहीत.
परंतु तरीही आपल्या लेखणीच्या जोरावर समाजमन ढवळून काढण्याची ताकद त्यांच्या लेखणीत होती. त्यांनी गायलेले पोवाडे, लेखण, रचना, समाजकार्य आणि राजकारण आजही लोकांच्या हृदयात आहे. आज त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांचे काही प्रेरणादायी विचार पाहुयात...
1) हे मानवा तू गुलाम नाहीस, तू या वास्तव जगाचा निर्माता आहेस.
2) जग बदल घालूनी घाव, आम्हा सांगून गेले भीमराव.
3) नैराश्य हे तलवारीवर साचलेल्या धुळीसारखे असते. धुळ झटकली की ती तलवार पुन्हा धारदार बनते.
4) जात हे वास्तव आहे, गरिबी ही कृत्रिम आहे. गरिबी नष्ट करता येऊ शकते. जात नष्ट करणे आपले सर्वांचे काम आहे.
5) अनिष्ठ धर्माच्या आचरणाने माणसांना हीन समजणे हा धर्म नसून तो एक रोग आहे.
📍 *विशेष बाबी* :
▪ तमाशा या कलेला लोकनाट्याची प्रतिष्ठा मिळवून देण्याचे श्रेय त्यांना दिले जाते.
▪ ते दलित समाजाचे विशेषत: मांग जातीचे प्रतीक बनले.
▪ 1 ऑगस्ट 2001 रोजी भारतीय पोस्टाने विशेष ₹4 टपाल तिकिटावर साठेंचे चित्र ठेवले होते.
▪ पुण्यातील लोकशाहीर अण्णाभा साठे स्मारक आणि कुर्ला मधील एक उड्डाणपूल यासह अनेक इमारतींना त्यांचे नाव देण्यात आले आहे.
▪ अण्णाभाउंनी छत्रपती शिवरायांचे चरित्र रशिया पर्यंत पोवाड्यातून सांगितले पुढे त्याचे रशियन भाषेमध्ये भाषांतर झाले आणि राष्ट्राध्यक्षांकडून त्यांचा सन्मान देखील झाला.
▪ अण्णाभाऊ यांच्या जातीव्यवस्था, दलित सवर्ण संघर्ष, निसर्ग, स्थलांतरण, शहर आणि ग्रामिण जीवन यांतील संघर्ष असे अनेक पैलू पाहायला मिळतात.
▪ महाराष्ट्रातील विद्यापीठांत अण्णाभाऊंवर अकरा प्रबंध सिद्घ केले गेले आहेत.
▪ पुणे विद्यापीठात त्यांच्या सन्मानार्थ ‘अण्णाभाऊ साठे’ अध्यासन सुरु करण्यात आले आहे.
▪ त्यांच्या कथा-कादंबऱ्यांची केवळ भारतीयच नव्हे, तर 22 परकीय भाषांत भाषांतरे झाली आहेत.
📝 *साहित्य संपदा* : लोकनाट्य : 13 I नाटके : 3 I कथासंग्रह : 13 I कादंबर्या : 35 I पोवाडे : 15 I प्रवास वर्णन : 1 I चित्रपट कथा : 7
👍 *'फकिरा'ला प्रचंड यश* : त्यांच्या फकिरा (1959) या कादंबरीला प्रचंड यश मिळाले. या कादंबरीस राज्य सरकारने 1961 सालात उत्कृष्ट कादंबरी पुरुस्कार देऊन गौरविले.
आज लोकशाहीर सामाजिक कार्यकर्ते आणि सुप्रसिद्ध लेखक अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांना विनम्र अभिवादन
शाहीर तसेच दीन-दुबळ्यांचे, उपेक्षितांच्या जीवनाचे वास्तव चित्रण करणारे साहित्यिक, लेखक अण्णाभाऊ साठे यांचा स्मृतिदिन.
सांगली जिल्ह्याच्या वाळवा तालुक्यातील वाटेगाव या गावात 1 ऑगस्ट इ.स. 1920 रोजी अण्णाभाऊ साठे यांचा जन्म झाला. त्यांचे वैशिष्ट्य असे की, ते कधीच शाळेत गेले नाहीत.
परंतु तरीही आपल्या लेखणीच्या जोरावर समाजमन ढवळून काढण्याची ताकद त्यांच्या लेखणीत होती. त्यांनी गायलेले पोवाडे, लेखण, रचना, समाजकार्य आणि राजकारण आजही लोकांच्या हृदयात आहे. आज त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांचे काही प्रेरणादायी विचार पाहुयात...
1) हे मानवा तू गुलाम नाहीस, तू या वास्तव जगाचा निर्माता आहेस.
2) जग बदल घालूनी घाव, आम्हा सांगून गेले भीमराव.
3) नैराश्य हे तलवारीवर साचलेल्या धुळीसारखे असते. धुळ झटकली की ती तलवार पुन्हा धारदार बनते.
4) जात हे वास्तव आहे, गरिबी ही कृत्रिम आहे. गरिबी नष्ट करता येऊ शकते. जात नष्ट करणे आपले सर्वांचे काम आहे.
5) अनिष्ठ धर्माच्या आचरणाने माणसांना हीन समजणे हा धर्म नसून तो एक रोग आहे.
📍 *विशेष बाबी* :
▪ तमाशा या कलेला लोकनाट्याची प्रतिष्ठा मिळवून देण्याचे श्रेय त्यांना दिले जाते.
▪ ते दलित समाजाचे विशेषत: मांग जातीचे प्रतीक बनले.
▪ 1 ऑगस्ट 2001 रोजी भारतीय पोस्टाने विशेष ₹4 टपाल तिकिटावर साठेंचे चित्र ठेवले होते.
▪ पुण्यातील लोकशाहीर अण्णाभा साठे स्मारक आणि कुर्ला मधील एक उड्डाणपूल यासह अनेक इमारतींना त्यांचे नाव देण्यात आले आहे.
▪ अण्णाभाउंनी छत्रपती शिवरायांचे चरित्र रशिया पर्यंत पोवाड्यातून सांगितले पुढे त्याचे रशियन भाषेमध्ये भाषांतर झाले आणि राष्ट्राध्यक्षांकडून त्यांचा सन्मान देखील झाला.
▪ अण्णाभाऊ यांच्या जातीव्यवस्था, दलित सवर्ण संघर्ष, निसर्ग, स्थलांतरण, शहर आणि ग्रामिण जीवन यांतील संघर्ष असे अनेक पैलू पाहायला मिळतात.
▪ महाराष्ट्रातील विद्यापीठांत अण्णाभाऊंवर अकरा प्रबंध सिद्घ केले गेले आहेत.
▪ पुणे विद्यापीठात त्यांच्या सन्मानार्थ ‘अण्णाभाऊ साठे’ अध्यासन सुरु करण्यात आले आहे.
▪ त्यांच्या कथा-कादंबऱ्यांची केवळ भारतीयच नव्हे, तर 22 परकीय भाषांत भाषांतरे झाली आहेत.
📝 *साहित्य संपदा* : लोकनाट्य : 13 I नाटके : 3 I कथासंग्रह : 13 I कादंबर्या : 35 I पोवाडे : 15 I प्रवास वर्णन : 1 I चित्रपट कथा : 7
👍 *'फकिरा'ला प्रचंड यश* : त्यांच्या फकिरा (1959) या कादंबरीला प्रचंड यश मिळाले. या कादंबरीस राज्य सरकारने 1961 सालात उत्कृष्ट कादंबरी पुरुस्कार देऊन गौरविले.
आज लोकशाहीर सामाजिक कार्यकर्ते आणि सुप्रसिद्ध लेखक अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांना विनम्र अभिवादन
0
Answer link
div >
अण्णाभाऊ साठे यांच्याबद्दल माहिती:
जन्म: १ ऑगस्ट, १९२०
मृत्यू: १८ जुलै, १९६९
पूर्ण नाव: तुकाराम भाऊराव साठे
व्यवसाय: समाजसुधारक, लोककवी, लेखक, नाटककार
अण्णाभाऊ साठे: एक समाजसुधारक आणि लोककवी अण्णाभाऊ साठे हे एक थोर समाजसुधारक, लोककवी आणि लेखक होते. त्यांनी समाजातील गरीब आणि उपेक्षित लोकांसाठी खूप मोठे काम केले. अण्णाभाऊ साठे यांचा जन्म १ ऑगस्ट १९२० रोजी महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातील वाटेगाव येथे झाला. त्यांचे पूर्ण नाव तुकाराम भाऊराव साठे होते. त्यांचे बालपण अत्यंत गरीबीत गेले. त्यांनी शिक्षणाचे महत्त्व जाणले आणि ते स्वतः शिक्षण घेऊ शकले नाहीत, तरी त्यांनी इतरांना शिक्षणासाठी प्रेरित केले. अण्णाभाऊ साठे यांनी अनेक सामाजिक विषयांवर लेखन केले. त्यांच्या कार्यामुळे समाजात जनजागृती झाली आणि लोकांना नवी दिशा मिळाली. त्यांनी अनेक नाटके, कथा, कादंबऱ्या आणि पोवाडे लिहिले, ज्यात समाजातील वास्तव परिस्थितीचे चित्रण होते. अण्णाभाऊ साठे यांचे १८ जुलै १९६९ रोजी निधन झाले. त्यांच्या कार्यामुळे ते आजही लोकांच्या मनात जिवंत आहेत. अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य: अण्णाभाऊ साठे यांनी विपुल लेखन केले. त्यांच्या काही प्रमुख साहित्यकृती: फकिरा (कादंबरी) वैजयंता (कादंबरी) चिखलातील कमळ (कथासंग्रह) St. Martin ची डायरी Attorneys at Law संदर्भ: Lokmat - अण्णाभाऊ साठे: समाजसुधारक आणि लोककवी Lokmat