2 उत्तरे
2
answers
शतपत्रे कोणी लिहिली?
3
Answer link
शतपत्रे ही गोपाळ हरी देशमुख ऊर्फ लोकहितवादी यांनी लिहिली आहेत. लोकहितवादी हे स्वातंत्र्यपूर्व काळातील ज्येष्ठ विचारवंत आणि प्रखर देशभक्त होते. समाजात बदल घडवण्याचा, समाज सुधारण्याचा एक प्रभावी मार्ग म्हणून लोकहितवादींनी लेखणी हातात घेतली आणि लहान-थोर सगळयांना हिताच्या गोष्टी सांगणारी तब्बल १०८ पत्रे त्यांनी लिहिली. शंभर पत्रे या अर्थाने शतपत्रे म्हणून ही पत्रे प्रसिद्ध आहेत. इतिहास, राजकारण, अर्थशास्त्र, नवीन विद्या, परंपरा, धर्मकारण, जातिभेद, स्त्रीजीवन अशा कितीतरी विषयांवर ते सतत लिहीत राहिले. ‘प्रभाकर’ या त्यावेळच्या साप्ताहिकातून त्यांची शतपत्रे प्रसिद्ध झाली.
१८८२ साली त्यांनी स्वतःचे मासिक लोकहितवादी या नावाने चालू केले. या मासिकातून त्यांनी स्थानिक स्वराज्यव्यवस्था, ग्रामरचना, पृथ्वीराज चौहान, दयानंद स्वामी यांची चरित्रे अशी पुस्तके प्रसिद्ध केली. १८८३ मधे त्यांनी ऐतिहासिक विषयांसाठी स्वतंत्र मासिक चालू केले आणि त्याचे नावही लोकहितवादी असेच होते. बदलत्या काळाची पावले लोकहितवादींसारख्या धुरीणांनी ओळखली आणि त्यासंबंधी लेखन केले. लोकांच्या चांगल्याचा, हिताचा विचार करणारे म्हणून त्यांनी स्वतःसाठी लोकहितवादी हे टोपणनाव घेतले आणि ते नाव सार्थही केले. स्वतःच्या कामाची त्यांना किती योग्य जाणीव होती हेतेच या नावातून दिसून येते.
‘प्रभाकर’ नावाच्या साप्ताहिकात महाराष्ट्रातील चळवळींची माहिती गोपाळरावांनी दिलेली आहे. २६ मार्च १८४८ साली लिहिलेल्या तिसऱ्या पत्रात ते पुण्यात ग्रंथालय चालू व्हावे यासाठी कशा सभा घेतल्या गेल्या आणि इंग्रजी शाळेत शिकणाऱ्या अभ्यासू लोकांनी त्याला कशी मान्यता दिली हे लिहिले आहे. याच पत्रात ते पुढे लिहितात की ‘पुण्यातील किती एक आळशी लोकास लायब्ररी काय, हे माहीत नाही. याच कारणामुळे सरदार आणि कामदार लोकांनी पैसा दिला नाही . तथापि अजमासे दीड हजार रुपये जमले आहेत.’ याच पत्रात लोकांना विद्या शिकण्याची कशी लाज वाटते, गरज वाटत नाही आणि पोटापुरते मिळण्यावरच ते कसे खूश आहेत याचे वर्णन त्यांनी केले आहे. वर्तमानपत्रांत लेख लिहून सामाजिक आणि राजकीय प्रश्नांविषयी लोकमत जागे करण्याचा गोपाळरावांनी आरंभ केला होता. पुढे त्यांच्या प्रेरणेने पुण्यातील पहिले दैनिक वर्तमानपत्र ज्ञानप्रकाश सुरू झाले. कदाचित त्यातील काही लिखाण हे लोकहितवादींचे असावे असे वाटते.
लोकहितवादी आणि त्या काळातल्या समाज सुधारकांनी समाजाच्या भविष्याचा विचार केला. भारतीय समाज, भारतीय माणसे जगात मागासलेली राहू नयेत. जगात जे नवीन, चांगले चालू आहे त्याच्या बरोबरीने भारतीय समाजाने गेले पाहिजे. या तळमळीने ते लिहीत होते. त्याच पत्रात हे स्पष्ट करत असताना ते पुढे म्हणतात, ‘थोरपणा पाहिजे असेल त्यांनी सांप्रत काळच्या ज्ञानाची संपदा मिळवण्याचा प्रयत्न करावा. ज्या ज्ञानाने इतर लोकांनी आपली सरशी केली ते ज्ञान आपण धिक्कारू नये. कारण की, आपणांस त्याचा अनुभव आला आहे. याजकरिता सावधगिरीचे लक्षण हेच कीं, काळास ओळखून त्याप्रमाणे करावे, असे न केले तर फार फजित होऊन दुर्दशा झाली आहे त्यापेक्षा अधिक होण्याचा संभव आहे. आता आपण अनेक देशांच्या कल्पना एके ठायी करून नवे शोध करून ते सुधारावें म्हणजे खरा थोरपणा मिळेल व लोकांचे हित होईल.’
लोकहितवादी सांगतात, ‘कोणास खोटें वाटेल तर त्याने स्वदेशीय राजधानीतील लोकांकडे पाहावे आणि त्यांस पुसावें की, इंग्रज हिंदुस्थानांत कोठे कोठे राज्य करतात ? ते म्हणतील की, छी, इंग्रज कोठे आहेत ? आमचे संस्थानांत तो एक ताम्रमुखी मात्र असतो. याप्रमाणे पेशवाईत अवस्था होती.’ पत्र क्र. ४८ मधे ते लिहितात, ‘ब्राह्मणांना अजूनही वाटते की पृथ्वी शेषावर आहे, ग्रहणांत राहू चंद्रास ग्रासतो, हिंदुस्थानाएवढीच पृथ्वी. पलीकडे गतीच नाही. (पत्र क्र. ६२) कोणी म्हणतो पेशव्यांचे राज्य कसें बुडालें हो? दुसरा उत्तर करतो, अहो, ते अवतारी पुरुष होऊन गेले. जे होणार तें झालें. त्यास उपाय काय? सद्दी फिरली म्हणजे क्षण लागत नाही. देव देणार त्याला देतो. त्याचे मनात आले म्हणजे पाहिजे तसें घडतें.’ (पत्र क्र. ५५) ‘ज्ञान म्हणजे काय हेंच लोकांस ठाऊक नाही. इंग्लंडांतील थोरली सनद, पार्लमेंट, फराशीस (फ्रान्स) यांची राज्यक्रांति, रूमचे राज्याचा नाश, अमेरिका खंडात युरोपियन लोकांची वस्ती, लोकसत्तात्मक राज्य, या शब्दांचा अर्थहि बहुत हिंदु मनुष्यास ठाऊक नसेल. पृथ्वीवर काय आहे व लोक कसे आहेत, याविषयी त्यांस कांही कळत नाही. पुराणिक एक पोथी सोडून बसला म्हणजे सर्व आनंदाने डोलतात व रावणास दहा डोकी, सहस्रार्जुनास हजार हात, दुधाचा समुद्र, दह्याचा समुद्र इ. गोष्टी ऐकल्या की बायका फार खुष होतात व पुरुष म्हणतात आम्ही आज फार मोठें ज्ञान संपादन केलें.’
बदलत्या काळाची पावले ओळखून लोकहितवादी आणि त्यांच्या बरोबरीच्या समाजसुधारकांनी इंग्रजांनी आणलेल्या नवीन ज्ञानाची, नवीन विषयांची माहिती करून घेण्याची गरज पुन्हा पुन्हा दाखवून दिली. लोकहितवादींनी पहिल्या काही पत्रांतून त्यांनी त्याकाळातील लोकांच्या अज्ञानावर टीका केली आहे. त्यावेळच्या समाजाचा कोणी तरी कान पकडायची गरज होतीच. मरगळलेल्या, निष्क्रिय झालेल्या समाजाला कोणी तरी हलवण्याची, मनात उभारी भरण्याची गरज होती. ती गरज लोकहितवादींसारख्या समाजसुधारकांनी पूर्ण केली.
भारतीय समाजात संस्कृत ही ज्ञानभाषा होती. प्राचीन काळी व्याकरण, वेदान्त, ज्योतिषशास्त्र आणि खगोलशास्त्र, गणित अशा अनेक विषयांवरचे ग्रंथ संस्कृतात लिहिले गेले. त्या काळी संस्कृत ही ज्ञानवंतांची भाषा होती. तत्कालीन अभ्यासकांनी अतिशय बारकाईने केलेले निरीक्षण, विश्लेषण या ग्रंथातून परत परत दिसते. पण दुर्दैवाने काळाच्या ओघात इथे बाहेरच्यांची आक्रमणे होऊ लागली. त्या आक्रमणांमुळे कदाचित समाजाची घडीच बदलली. नवीन अभ्यास बंद झाला. नवीन विचार, नवीन संशोधन बंद झाले आणि संस्कृत विद्येला वाईट परिस्थिती आली. काळाप्रमाणे, बदलत्या परिस्थितीप्रमाणे नवीन ज्ञानशाखा, अभ्यासशाखा, विद्याशाखा विकसित होण्यासाठी समाजाला वेळ मिळाला नाही. पत्र क्र. ३० आणि ५९मधे लोकहितवादी म्हणतात, ‘धर्मशास्त्र, ज्योतिषशास्त्र, ही सर्व प्राचीन काळी लिहिली गेली, आणि सांप्रत काळास फरक पडला आहे, त्यामुळे आज प्रत्यक्षांत व शास्त्रांत मेळ पडत नाही. प्रत्येक वेळी लोकस्थिती पाहून धर्मशास्त्रांत परिवर्तन केले पाहिजे. पण असे न झाल्यामुळे आमचे धर्मशास्त्र व त्याचबरोबर इतर शास्त्रे अगदी निरुपयोगी झाली आहेत.’ ‘संस्कृतात इतिहास नाही. भारतात राज्ये किती होतीं, कोणाची होती, तीं बुडाली केव्हा, कशामुळे बुडाली, मुसलमान केव्हा आले, पाश्चात्त्य केव्हा आले याविषयीं संस्कृत पंडितांचे ज्ञान, नांगरहाक्याइतके असते.’
समाजातील लोकांची विचारांची पद्धत बदलणे हे सोपे नव्हते. लोकांच्या आपल्या पिढयानुपिढया चालत आलेल्या विचारांवर दृढ विश्वास होता. लोक कसा विचार करत होते हे दाखवून देताना पत्र क्र. ३०मध्ये लोकहितवादींनी लिहिले आहे, ‘हे शास्त्री, भट व संपूर्ण हिंदू लोक अजून मागल्या गोष्टींचे भरांत आहेत. त्यांस अजून सांप्रतचे काही सुचत नाही. त्यामुळे कित्येक लोक पोरासारखे बोलतात की, विलायत बेट लहान दोनचार कोसांचे आहे. कोणी म्हणतो टोपीकर हे पाण्यांतले राहणारे, कोणी म्हणतो कंपनी सरकार बायको आहे. इंग्रजांस राज्य करूं लागल्यास दोनशे वर्षे झाली आणि या लोकांच्या डोकीवरचे केश देखील त्यांनी मोजले. पण या लोकांस त्यांचे डोळेहि ठाऊक नाहीत.’
एकीकडे आजूबाजूला काय चालू आहे याची जाणीव अनेकांना नव्हती आणि दुसरीकडे विद्या, ज्ञान यासंबंधीच्या कल्पनाही जुन्या होत्या. अनेकदा संस्कृत विद्येचा नीट अर्थही माहीत नसायचा. केवळ पाठांतर करणे यालाच विद्या म्हणण्याची पद्धत पडली होती. विद्या या शब्दाचा असा अर्थ करावा याची लोकहितवादींना अगदी चीड यायची. ते ७७व्या पत्रात यासंबंधी म्हणतात, ‘अहो, पाठ म्हणणें ही विद्या केली कोणी? यांत फळ काय? हा मूर्खपणा उत्पन्न कसा झाला असेल तो असो. परंतु एवढा मूर्खपणा कधी कोणत्याहि देशात झाला नसेल.’ लोकहितवादी म्हणत की, नुसते व्याकरण पाठ म्हणणे ही विद्या नव्हेच. त्यापेक्षा माणसाला लाकडे तोडण्याचे कौशल्य शिकवलेले बरे. कारण नुसते समजून न घेता पाठ केल्यामुळे काहीच फायदा होत नाही. उलट केवळ अज्ञान नव्हे तर विपरीत ज्ञान हे भारताच्या अधःपतनाचे पहिले कारण आहे असे त्यांना वाटत असे.
परदेशी आक्रमणांमुळे भारतातल्या अनेक भूभागातील राज्यव्यवस्था, कामाच्या पद्धती, अर्थव्यवस्था बदलू लागली. राजे-महाराज्यांचा जमान संपत चालला होता. त्यामुळे त्यांच्या पदरी काम करणाऱ्या अनेकांची नोकरी संपली. महाराष्ट्रात इ.स. १८१८ च्या सुमारास दुसऱ्या बाजीराव पेशव्यांच्या नामर्दपणामुळे पेशावाई बुडाली. त्यामुळे पूर्वीच्या सगळयाच व्यवस्था कोलमडू लागल्या. समाजात वेगळे वारे वाहू लागले. आगरकर याचे वर्णन करताना म्हणतात की, पूर्वीच्या हजार वर्षांच्या काळात भारताला सतत पाण्यात पडून राहिलेल्या लाकडाचे वा हाडकाचे, रूप प्राप्त झाले होते. त्याच्यात चैतन्य असे कसले राहिलेच नव्हते. पण पाश्चात्त्य विद्येमुळे नवी दृष्टी प्राप्त होताच हा समाज पुन्हा जिवंत होऊ लागला आणि नवभारताची निर्मिती झाली.
इंग्रजी शिक्षण पद्धतीमुळे इंग्रजी भाषा शिकणे आवश्यक झाले. या भाषेमुळे भारतीयांसाठी जगाचे दरवाजे खुले झाले. तोपर्यंत हिमालयापलीकडच्या जगात काय आहे याची हिंदुस्थानी लोकांना जाणीवच नव्हती. जगात काय चालू आहे, नवीन काय घडते आहे, जगात कोणत्या मूल्यांवर समाजघडणी होते आहे अशी सगळी माहिती शिकलेल्या भारतीयांना समजू लागली. त्यामुळे एक विस्तृत जग खुले झाले. इंग्रजी शिकलेल्या नवशिक्षितांना स्वातंत्र्य, समता, बंधुता ही समाज बांधणीची नवीन तत्त्वे समजली. लोकशाहीची नवी तत्त्वे समजू लागली. त्याच्या बाबतीत २८ मे १८४८ साली लिहिलेल्या पत्र क्र. १८मध्ये लोकहितवादी लिहितात ‘आता फिराशिसांचे (फ्रान्स) मुलखात असे झाले की ’राजा रयतेस पीडा करूं लागला व विनाकारण खर्च करून रयतेकडून नानाप्रकारचे कर वगैरे बसवून पैका घेऊं लागला, तेव्हा पारीस (पॅरीस) म्हणून फ्रेंचांची राजधानी आहे, व तेथे मोठमोठे विद्वान लोक आहेत. त्यांणी संपूर्ण रयतेस त्रास आला आहे, असे जाणून तेथें एक युद्धविद्या शिकविण्याची शाळा आहे, तेथील विद्यार्थी वगैरे लोक मिळवून राजवाड्यावर गेले व तेथें फौजफाटा होता त्यांस सांगितले की, आम्ही राज्याची सुधारणा करावी व आपल्यास स्व-इच्छ राजापासून सुख होत नाहीं. यास्तव लोकसत्तात्मक राज्य करावें यांसाठी झटतों. आमचा हेतु इतकाच कीं, सर्व लोकांस सुख व्हावें व जाचे त्याचे हक्क कायम राहावें, आम्ही लुटणारे नव्हेत; व आम्हांस काही नको. हें ऐकून ती फौज त्यांस वश झाली आणि त्यांचेबरोबर गेली. मग ते सर्व लुईस फिलीप राजास हस्तगत करणार तों तो धाकानें स्त्रीसहित पळून गेला. मग मागें शहरचे लाकांनी वाडा घेऊन सभा भरवली व असें ठरविलें कीं, आजपासून रयतेचें राज्य रयतेनें करावें. व त्याप्रमाणे नऊशें आसामी सभेस बसण्यास मुकरर केले. आणि राजाचे असबाबास काहीं हात लाविला नाहीं. राजाचे खोलीत जे मोहोर केलेले लखोटे सांपडले तेही जांचे नावावर होते त्यांजकडे पाठवून दिले. असे मर्यादेने ते लोक चालले. हल्ली फ्रेंचांचे राज्यांत लोक राज्य करतात, हे पाहून दुसरे टोपकारचे (इंग्रज) मुलूख म्हणजे अमेरिका व सुइजरलंड (स्वीग्झरलंड) वगैरे यांणीहीं आपले देशांत लोकांचे राज्य स्थापन केलें. फ्रेंचांचे देशातं ज्या वेळेस राजास काढून टाकिले तेव्हां फौजेमध्यें बोनापार्ट म्हणून एक नामांकित सरदार होता. त्याणें जय पुष्कळ मिळविले व त्यास राज्याचा लोभ उत्पन्न होऊन त्याणें राज्य बळकावलें, तेव्हां, इंग्रजांनी वेसलीसाहेब म्हणजे ड्यूक वेलिंग्टन यास पाठवून त्यास कैद करून टाकले आणि पूर्वीचे राजाचा वंशज बसविला परंतु हल्लीं प्रेंचांचे राज्यांत हात घालूं नये असा निश्चय इंग्रजांनीं केला आहे कारण संपूर्ण लोकांचा एकोपा ठरला कीं, राजा नसावा आणि प्रजा एकत्र होऊन राज्य चालवितात व इंग्रजांशी स्पर्धाही करीत नाहीत. त्यापेक्षां आपल्यास बोलण्यास काहीच जरूर नाही. असे इंग्रजांनी ठरविले आहे व इंग्रजांचे काही आधीच्या राजे-रजवाड्यांच्या काळाची पडझड होऊ लागली होती. त्यावेळचे समाजाचे नेतृत्व करणारे ब्राह्मण, सरदार, जहागीरदार यांची सत्ता तर नष्ट झाली होतीच पण त्यातल्या अनेकांना दारिद्र्याला तोंड द्यावे लागत होते. आजूबाजूला नेमके काय चालू आहे. काय बदल होत आहेत याचे त्यांना भान नव्हते. पूर्वी रावणाचे संकट आले तेव्हा रामाच जन्म झाला आणि रामाने रावणाचा संहार केला. त्याप्रमाणे कोणी देव पुन्हा या भूतलावर येईल आणि आपल्या संकटाचे निवारण करेल अशा कल्पनांमधे हा समाज अडकला होता. त्यासाठी वेगवेगळी व्रते, उपास, परंपरा यांचा सांभाळ करत होता. अशा जुनाट उपायांनी आपण संकटातून बाहेर पडू शकणार नाही. एवढेच नाही तर भारताबाहेरील देश ज्या वेगाने प्रगती करत आहेत त्यातही आपण मागे पडू हे या द्रष्टया समाजसुधारकांनी जाणले. आज आपण भारताचे जे रूप पाहतो आणि अनुभवतो आहोत त्यामागे या समाजसुधारकांचे विचार आहेत. त्यांनी काळाची बदलती पावले वेळेवर ओळखली त्यामुळेच आज आपला देश आधुनिक भारताच्या रूपात दिमाखात उभा आहे.
‘ इंग्रजी विद्वान पूर्वी हिंदुस्थानात एक असता तर राज्य न जाते याचा भावार्थ हाच की ती विद्या येथे असती तर आम्ही इतिहास, भूगोल, गणित, रसायन, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र यात प्रवीण झालो असतो. आणि मग आम्ही पाश्चात्त्य विद्येच्या प्रसारानंतर गेल्या शंभर वर्षात जसे संघटित व समर्थ झालो, तसें आधीच झालो असतो व मग अर्थातच आपले राज्य गेलें नसतें. पण हे भट, कारकून, मूर्ख जमा झाले म्हणूनच राज्य बुडालें. जर विद्या पहिल्यासारखी असती तर हिंदू लोकांची अशी अवस्था न होती.’
१८८२ साली त्यांनी स्वतःचे मासिक लोकहितवादी या नावाने चालू केले. या मासिकातून त्यांनी स्थानिक स्वराज्यव्यवस्था, ग्रामरचना, पृथ्वीराज चौहान, दयानंद स्वामी यांची चरित्रे अशी पुस्तके प्रसिद्ध केली. १८८३ मधे त्यांनी ऐतिहासिक विषयांसाठी स्वतंत्र मासिक चालू केले आणि त्याचे नावही लोकहितवादी असेच होते. बदलत्या काळाची पावले लोकहितवादींसारख्या धुरीणांनी ओळखली आणि त्यासंबंधी लेखन केले. लोकांच्या चांगल्याचा, हिताचा विचार करणारे म्हणून त्यांनी स्वतःसाठी लोकहितवादी हे टोपणनाव घेतले आणि ते नाव सार्थही केले. स्वतःच्या कामाची त्यांना किती योग्य जाणीव होती हेतेच या नावातून दिसून येते.
‘प्रभाकर’ नावाच्या साप्ताहिकात महाराष्ट्रातील चळवळींची माहिती गोपाळरावांनी दिलेली आहे. २६ मार्च १८४८ साली लिहिलेल्या तिसऱ्या पत्रात ते पुण्यात ग्रंथालय चालू व्हावे यासाठी कशा सभा घेतल्या गेल्या आणि इंग्रजी शाळेत शिकणाऱ्या अभ्यासू लोकांनी त्याला कशी मान्यता दिली हे लिहिले आहे. याच पत्रात ते पुढे लिहितात की ‘पुण्यातील किती एक आळशी लोकास लायब्ररी काय, हे माहीत नाही. याच कारणामुळे सरदार आणि कामदार लोकांनी पैसा दिला नाही . तथापि अजमासे दीड हजार रुपये जमले आहेत.’ याच पत्रात लोकांना विद्या शिकण्याची कशी लाज वाटते, गरज वाटत नाही आणि पोटापुरते मिळण्यावरच ते कसे खूश आहेत याचे वर्णन त्यांनी केले आहे. वर्तमानपत्रांत लेख लिहून सामाजिक आणि राजकीय प्रश्नांविषयी लोकमत जागे करण्याचा गोपाळरावांनी आरंभ केला होता. पुढे त्यांच्या प्रेरणेने पुण्यातील पहिले दैनिक वर्तमानपत्र ज्ञानप्रकाश सुरू झाले. कदाचित त्यातील काही लिखाण हे लोकहितवादींचे असावे असे वाटते.
लोकहितवादी आणि त्या काळातल्या समाज सुधारकांनी समाजाच्या भविष्याचा विचार केला. भारतीय समाज, भारतीय माणसे जगात मागासलेली राहू नयेत. जगात जे नवीन, चांगले चालू आहे त्याच्या बरोबरीने भारतीय समाजाने गेले पाहिजे. या तळमळीने ते लिहीत होते. त्याच पत्रात हे स्पष्ट करत असताना ते पुढे म्हणतात, ‘थोरपणा पाहिजे असेल त्यांनी सांप्रत काळच्या ज्ञानाची संपदा मिळवण्याचा प्रयत्न करावा. ज्या ज्ञानाने इतर लोकांनी आपली सरशी केली ते ज्ञान आपण धिक्कारू नये. कारण की, आपणांस त्याचा अनुभव आला आहे. याजकरिता सावधगिरीचे लक्षण हेच कीं, काळास ओळखून त्याप्रमाणे करावे, असे न केले तर फार फजित होऊन दुर्दशा झाली आहे त्यापेक्षा अधिक होण्याचा संभव आहे. आता आपण अनेक देशांच्या कल्पना एके ठायी करून नवे शोध करून ते सुधारावें म्हणजे खरा थोरपणा मिळेल व लोकांचे हित होईल.’
लोकहितवादी सांगतात, ‘कोणास खोटें वाटेल तर त्याने स्वदेशीय राजधानीतील लोकांकडे पाहावे आणि त्यांस पुसावें की, इंग्रज हिंदुस्थानांत कोठे कोठे राज्य करतात ? ते म्हणतील की, छी, इंग्रज कोठे आहेत ? आमचे संस्थानांत तो एक ताम्रमुखी मात्र असतो. याप्रमाणे पेशवाईत अवस्था होती.’ पत्र क्र. ४८ मधे ते लिहितात, ‘ब्राह्मणांना अजूनही वाटते की पृथ्वी शेषावर आहे, ग्रहणांत राहू चंद्रास ग्रासतो, हिंदुस्थानाएवढीच पृथ्वी. पलीकडे गतीच नाही. (पत्र क्र. ६२) कोणी म्हणतो पेशव्यांचे राज्य कसें बुडालें हो? दुसरा उत्तर करतो, अहो, ते अवतारी पुरुष होऊन गेले. जे होणार तें झालें. त्यास उपाय काय? सद्दी फिरली म्हणजे क्षण लागत नाही. देव देणार त्याला देतो. त्याचे मनात आले म्हणजे पाहिजे तसें घडतें.’ (पत्र क्र. ५५) ‘ज्ञान म्हणजे काय हेंच लोकांस ठाऊक नाही. इंग्लंडांतील थोरली सनद, पार्लमेंट, फराशीस (फ्रान्स) यांची राज्यक्रांति, रूमचे राज्याचा नाश, अमेरिका खंडात युरोपियन लोकांची वस्ती, लोकसत्तात्मक राज्य, या शब्दांचा अर्थहि बहुत हिंदु मनुष्यास ठाऊक नसेल. पृथ्वीवर काय आहे व लोक कसे आहेत, याविषयी त्यांस कांही कळत नाही. पुराणिक एक पोथी सोडून बसला म्हणजे सर्व आनंदाने डोलतात व रावणास दहा डोकी, सहस्रार्जुनास हजार हात, दुधाचा समुद्र, दह्याचा समुद्र इ. गोष्टी ऐकल्या की बायका फार खुष होतात व पुरुष म्हणतात आम्ही आज फार मोठें ज्ञान संपादन केलें.’
बदलत्या काळाची पावले ओळखून लोकहितवादी आणि त्यांच्या बरोबरीच्या समाजसुधारकांनी इंग्रजांनी आणलेल्या नवीन ज्ञानाची, नवीन विषयांची माहिती करून घेण्याची गरज पुन्हा पुन्हा दाखवून दिली. लोकहितवादींनी पहिल्या काही पत्रांतून त्यांनी त्याकाळातील लोकांच्या अज्ञानावर टीका केली आहे. त्यावेळच्या समाजाचा कोणी तरी कान पकडायची गरज होतीच. मरगळलेल्या, निष्क्रिय झालेल्या समाजाला कोणी तरी हलवण्याची, मनात उभारी भरण्याची गरज होती. ती गरज लोकहितवादींसारख्या समाजसुधारकांनी पूर्ण केली.
भारतीय समाजात संस्कृत ही ज्ञानभाषा होती. प्राचीन काळी व्याकरण, वेदान्त, ज्योतिषशास्त्र आणि खगोलशास्त्र, गणित अशा अनेक विषयांवरचे ग्रंथ संस्कृतात लिहिले गेले. त्या काळी संस्कृत ही ज्ञानवंतांची भाषा होती. तत्कालीन अभ्यासकांनी अतिशय बारकाईने केलेले निरीक्षण, विश्लेषण या ग्रंथातून परत परत दिसते. पण दुर्दैवाने काळाच्या ओघात इथे बाहेरच्यांची आक्रमणे होऊ लागली. त्या आक्रमणांमुळे कदाचित समाजाची घडीच बदलली. नवीन अभ्यास बंद झाला. नवीन विचार, नवीन संशोधन बंद झाले आणि संस्कृत विद्येला वाईट परिस्थिती आली. काळाप्रमाणे, बदलत्या परिस्थितीप्रमाणे नवीन ज्ञानशाखा, अभ्यासशाखा, विद्याशाखा विकसित होण्यासाठी समाजाला वेळ मिळाला नाही. पत्र क्र. ३० आणि ५९मधे लोकहितवादी म्हणतात, ‘धर्मशास्त्र, ज्योतिषशास्त्र, ही सर्व प्राचीन काळी लिहिली गेली, आणि सांप्रत काळास फरक पडला आहे, त्यामुळे आज प्रत्यक्षांत व शास्त्रांत मेळ पडत नाही. प्रत्येक वेळी लोकस्थिती पाहून धर्मशास्त्रांत परिवर्तन केले पाहिजे. पण असे न झाल्यामुळे आमचे धर्मशास्त्र व त्याचबरोबर इतर शास्त्रे अगदी निरुपयोगी झाली आहेत.’ ‘संस्कृतात इतिहास नाही. भारतात राज्ये किती होतीं, कोणाची होती, तीं बुडाली केव्हा, कशामुळे बुडाली, मुसलमान केव्हा आले, पाश्चात्त्य केव्हा आले याविषयीं संस्कृत पंडितांचे ज्ञान, नांगरहाक्याइतके असते.’
समाजातील लोकांची विचारांची पद्धत बदलणे हे सोपे नव्हते. लोकांच्या आपल्या पिढयानुपिढया चालत आलेल्या विचारांवर दृढ विश्वास होता. लोक कसा विचार करत होते हे दाखवून देताना पत्र क्र. ३०मध्ये लोकहितवादींनी लिहिले आहे, ‘हे शास्त्री, भट व संपूर्ण हिंदू लोक अजून मागल्या गोष्टींचे भरांत आहेत. त्यांस अजून सांप्रतचे काही सुचत नाही. त्यामुळे कित्येक लोक पोरासारखे बोलतात की, विलायत बेट लहान दोनचार कोसांचे आहे. कोणी म्हणतो टोपीकर हे पाण्यांतले राहणारे, कोणी म्हणतो कंपनी सरकार बायको आहे. इंग्रजांस राज्य करूं लागल्यास दोनशे वर्षे झाली आणि या लोकांच्या डोकीवरचे केश देखील त्यांनी मोजले. पण या लोकांस त्यांचे डोळेहि ठाऊक नाहीत.’
एकीकडे आजूबाजूला काय चालू आहे याची जाणीव अनेकांना नव्हती आणि दुसरीकडे विद्या, ज्ञान यासंबंधीच्या कल्पनाही जुन्या होत्या. अनेकदा संस्कृत विद्येचा नीट अर्थही माहीत नसायचा. केवळ पाठांतर करणे यालाच विद्या म्हणण्याची पद्धत पडली होती. विद्या या शब्दाचा असा अर्थ करावा याची लोकहितवादींना अगदी चीड यायची. ते ७७व्या पत्रात यासंबंधी म्हणतात, ‘अहो, पाठ म्हणणें ही विद्या केली कोणी? यांत फळ काय? हा मूर्खपणा उत्पन्न कसा झाला असेल तो असो. परंतु एवढा मूर्खपणा कधी कोणत्याहि देशात झाला नसेल.’ लोकहितवादी म्हणत की, नुसते व्याकरण पाठ म्हणणे ही विद्या नव्हेच. त्यापेक्षा माणसाला लाकडे तोडण्याचे कौशल्य शिकवलेले बरे. कारण नुसते समजून न घेता पाठ केल्यामुळे काहीच फायदा होत नाही. उलट केवळ अज्ञान नव्हे तर विपरीत ज्ञान हे भारताच्या अधःपतनाचे पहिले कारण आहे असे त्यांना वाटत असे.
परदेशी आक्रमणांमुळे भारतातल्या अनेक भूभागातील राज्यव्यवस्था, कामाच्या पद्धती, अर्थव्यवस्था बदलू लागली. राजे-महाराज्यांचा जमान संपत चालला होता. त्यामुळे त्यांच्या पदरी काम करणाऱ्या अनेकांची नोकरी संपली. महाराष्ट्रात इ.स. १८१८ च्या सुमारास दुसऱ्या बाजीराव पेशव्यांच्या नामर्दपणामुळे पेशावाई बुडाली. त्यामुळे पूर्वीच्या सगळयाच व्यवस्था कोलमडू लागल्या. समाजात वेगळे वारे वाहू लागले. आगरकर याचे वर्णन करताना म्हणतात की, पूर्वीच्या हजार वर्षांच्या काळात भारताला सतत पाण्यात पडून राहिलेल्या लाकडाचे वा हाडकाचे, रूप प्राप्त झाले होते. त्याच्यात चैतन्य असे कसले राहिलेच नव्हते. पण पाश्चात्त्य विद्येमुळे नवी दृष्टी प्राप्त होताच हा समाज पुन्हा जिवंत होऊ लागला आणि नवभारताची निर्मिती झाली.
इंग्रजी शिक्षण पद्धतीमुळे इंग्रजी भाषा शिकणे आवश्यक झाले. या भाषेमुळे भारतीयांसाठी जगाचे दरवाजे खुले झाले. तोपर्यंत हिमालयापलीकडच्या जगात काय आहे याची हिंदुस्थानी लोकांना जाणीवच नव्हती. जगात काय चालू आहे, नवीन काय घडते आहे, जगात कोणत्या मूल्यांवर समाजघडणी होते आहे अशी सगळी माहिती शिकलेल्या भारतीयांना समजू लागली. त्यामुळे एक विस्तृत जग खुले झाले. इंग्रजी शिकलेल्या नवशिक्षितांना स्वातंत्र्य, समता, बंधुता ही समाज बांधणीची नवीन तत्त्वे समजली. लोकशाहीची नवी तत्त्वे समजू लागली. त्याच्या बाबतीत २८ मे १८४८ साली लिहिलेल्या पत्र क्र. १८मध्ये लोकहितवादी लिहितात ‘आता फिराशिसांचे (फ्रान्स) मुलखात असे झाले की ’राजा रयतेस पीडा करूं लागला व विनाकारण खर्च करून रयतेकडून नानाप्रकारचे कर वगैरे बसवून पैका घेऊं लागला, तेव्हा पारीस (पॅरीस) म्हणून फ्रेंचांची राजधानी आहे, व तेथे मोठमोठे विद्वान लोक आहेत. त्यांणी संपूर्ण रयतेस त्रास आला आहे, असे जाणून तेथें एक युद्धविद्या शिकविण्याची शाळा आहे, तेथील विद्यार्थी वगैरे लोक मिळवून राजवाड्यावर गेले व तेथें फौजफाटा होता त्यांस सांगितले की, आम्ही राज्याची सुधारणा करावी व आपल्यास स्व-इच्छ राजापासून सुख होत नाहीं. यास्तव लोकसत्तात्मक राज्य करावें यांसाठी झटतों. आमचा हेतु इतकाच कीं, सर्व लोकांस सुख व्हावें व जाचे त्याचे हक्क कायम राहावें, आम्ही लुटणारे नव्हेत; व आम्हांस काही नको. हें ऐकून ती फौज त्यांस वश झाली आणि त्यांचेबरोबर गेली. मग ते सर्व लुईस फिलीप राजास हस्तगत करणार तों तो धाकानें स्त्रीसहित पळून गेला. मग मागें शहरचे लाकांनी वाडा घेऊन सभा भरवली व असें ठरविलें कीं, आजपासून रयतेचें राज्य रयतेनें करावें. व त्याप्रमाणे नऊशें आसामी सभेस बसण्यास मुकरर केले. आणि राजाचे असबाबास काहीं हात लाविला नाहीं. राजाचे खोलीत जे मोहोर केलेले लखोटे सांपडले तेही जांचे नावावर होते त्यांजकडे पाठवून दिले. असे मर्यादेने ते लोक चालले. हल्ली फ्रेंचांचे राज्यांत लोक राज्य करतात, हे पाहून दुसरे टोपकारचे (इंग्रज) मुलूख म्हणजे अमेरिका व सुइजरलंड (स्वीग्झरलंड) वगैरे यांणीहीं आपले देशांत लोकांचे राज्य स्थापन केलें. फ्रेंचांचे देशातं ज्या वेळेस राजास काढून टाकिले तेव्हां फौजेमध्यें बोनापार्ट म्हणून एक नामांकित सरदार होता. त्याणें जय पुष्कळ मिळविले व त्यास राज्याचा लोभ उत्पन्न होऊन त्याणें राज्य बळकावलें, तेव्हां, इंग्रजांनी वेसलीसाहेब म्हणजे ड्यूक वेलिंग्टन यास पाठवून त्यास कैद करून टाकले आणि पूर्वीचे राजाचा वंशज बसविला परंतु हल्लीं प्रेंचांचे राज्यांत हात घालूं नये असा निश्चय इंग्रजांनीं केला आहे कारण संपूर्ण लोकांचा एकोपा ठरला कीं, राजा नसावा आणि प्रजा एकत्र होऊन राज्य चालवितात व इंग्रजांशी स्पर्धाही करीत नाहीत. त्यापेक्षां आपल्यास बोलण्यास काहीच जरूर नाही. असे इंग्रजांनी ठरविले आहे व इंग्रजांचे काही आधीच्या राजे-रजवाड्यांच्या काळाची पडझड होऊ लागली होती. त्यावेळचे समाजाचे नेतृत्व करणारे ब्राह्मण, सरदार, जहागीरदार यांची सत्ता तर नष्ट झाली होतीच पण त्यातल्या अनेकांना दारिद्र्याला तोंड द्यावे लागत होते. आजूबाजूला नेमके काय चालू आहे. काय बदल होत आहेत याचे त्यांना भान नव्हते. पूर्वी रावणाचे संकट आले तेव्हा रामाच जन्म झाला आणि रामाने रावणाचा संहार केला. त्याप्रमाणे कोणी देव पुन्हा या भूतलावर येईल आणि आपल्या संकटाचे निवारण करेल अशा कल्पनांमधे हा समाज अडकला होता. त्यासाठी वेगवेगळी व्रते, उपास, परंपरा यांचा सांभाळ करत होता. अशा जुनाट उपायांनी आपण संकटातून बाहेर पडू शकणार नाही. एवढेच नाही तर भारताबाहेरील देश ज्या वेगाने प्रगती करत आहेत त्यातही आपण मागे पडू हे या द्रष्टया समाजसुधारकांनी जाणले. आज आपण भारताचे जे रूप पाहतो आणि अनुभवतो आहोत त्यामागे या समाजसुधारकांचे विचार आहेत. त्यांनी काळाची बदलती पावले वेळेवर ओळखली त्यामुळेच आज आपला देश आधुनिक भारताच्या रूपात दिमाखात उभा आहे.
‘ इंग्रजी विद्वान पूर्वी हिंदुस्थानात एक असता तर राज्य न जाते याचा भावार्थ हाच की ती विद्या येथे असती तर आम्ही इतिहास, भूगोल, गणित, रसायन, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र यात प्रवीण झालो असतो. आणि मग आम्ही पाश्चात्त्य विद्येच्या प्रसारानंतर गेल्या शंभर वर्षात जसे संघटित व समर्थ झालो, तसें आधीच झालो असतो व मग अर्थातच आपले राज्य गेलें नसतें. पण हे भट, कारकून, मूर्ख जमा झाले म्हणूनच राज्य बुडालें. जर विद्या पहिल्यासारखी असती तर हिंदू लोकांची अशी अवस्था न होती.’
0
Answer link
उत्तर:
शतपत्रे हे गोपाळ हरी देशमुख यांनी लिहिले आहे, जे लोकहितवादी या नावाने प्रसिद्ध आहेत.
शतपत्रे हे त्यांनी 'प्रभाकर' नावाच्या साप्ताहिकातून लिहिलेल्या सामाजिक व राजकीय विषयांवरील १०० पत्रांचे संकलन आहे.
हे लेखन १८६६ ते १८९२ या काळात केले गेले.
अधिक माहितीसाठी, आपण खालील लिंकला भेट देऊ शकता: