कायदा तक्रार पोलीस फौजदारी कायदा

एखाद्यावर चोरीचा आरोप केल्यास, तो आपल्यावर फौजदारी गुन्हा नोंदवू शकतो का आणि फौजदारी गुन्हा केव्हा व कसा लागू होतो, कृपया मार्गदर्शन करा?

4 उत्तरे
4 answers

एखाद्यावर चोरीचा आरोप केल्यास, तो आपल्यावर फौजदारी गुन्हा नोंदवू शकतो का आणि फौजदारी गुन्हा केव्हा व कसा लागू होतो, कृपया मार्गदर्शन करा?

8
हॊ तसं होऊ शकते,
आरोप जर खोटा आहे असा विरोधकांनी दावा करून फौजदारी गुन्हा दाखल केला असता...

सविस्तर माहितीसाठी कृपया आपल्याला संपूर्ण माहिती वाचन करावे लागेल....


भारत आणि घटनात्मक तरतुदी:
समान नागरी कायद्याची चर्चा करताना सर्वप्रथम कायदे कशाप्रकारचे असतात हे जाणून घेणे गरजेचे आहे. कायदे दोन प्रकारचे असतात. फौजदारी कायदे (Criminal Laws) आणि दिवाणी कायदे(Civil Laws). दिवाणी कायद्यांमध्ये एक छोटासा भाग असतो व्यक्तिगत बाबींशी निगडीत, तो भाग म्हणजे व्यक्तिगत कायदे (Personal Laws). फौजदारी कायदे आणि दिवाणी कायदे यामध्ये अनेक प्रकारे फरक केला जाऊ शकतो. उदा. एक फरक असा कि फौजदारी गुन्ह्यात शिक्षा किंवा दंड दिला जातो तर दिवाणी गुन्हात शिक्षा नसून दंड अंतिम न्याय असतो. फौजदारी कायदे देशासाठी जवळपास एकच आहेत (परंतु त्यामध्येही प्रत्येक राज्याने आपल्यापरीने काही बदल केले आहेत), तर दिवाणीकायदेदेखील थोड्याफार फरकासह जवळपास सारखेच आहेत. दिवाणी कायद्यांचा Transfer OF Property Act, Indian Contract Act, Sale Of Goods Actवर आधारित ९०% भाग सारखाच आहे. म्हणजेच देशात पूर्वीपासूनच समान फौजदारीच नव्हे तर समान दिवाणी (नागरी) कायदादेखील लागू आहे.

👮पोलीस स्टेशनला तक्रार नोंदविने 👮
📕☎
👇
        जीवनात कधी कुणाशी भांडण होते, तर कधी चोरी, अपघात, खून, विनयभंग तर कधी कुणी जीवे मारण्याची धमकी देतो. या  ना त्या कारणाने पोलीस स्टेशनला तक्रार देण्याची वेळ येत असते. दखलपात्र असलेले व दखलपात्र नसलेले गुन्हे असे गुन्ह्यांचे दोन प्रकार आहेत. जेव्हा तुम्ही दखलपात्र गून्ह्याची तक्रार  पोलीस स्टेशनला देता त्याची दखल पोलीस घेतात त्यालाच प्रथम सुचना अहवाल first information report (एफ.     आय. आर.)म्हणतात. गून्ह्याच्या तपासाला यामुळेच चालना मिळत असल्याने व पुरावा कायद्यान्वये तक्रारकर्त्याची सत्यता न्यायालयात पडताळतांना या रिपोर्टला महत्वाचे समजले जाते. फौजदारी प्रक्रिया कायद्याच्या कलम १५४ मध्ये याबाबत तरतूद केली असून विविध खटल्यांमध्ये उच्च व सर्वाच्च न्यायालयाने या संदर्भात आपले मत व्यक्त केले आहे.
        कायद्यान्वये पोलीस स्टेशनला तक्रार तोंडी किंवा लेखी स्वरुपात देता येईल. तोंडी तक्रार पोलीसांनी लिहून घेतली पाहिजे व तक्रारकर्त्याला वाचून दाखवली पाहिजे. तक्रारकर्त्याने त्यावर सही केली पाहिजे. तक्रारकर्त्याला नक्कलप्रत ताबडतोब विनामूल्य दिली पाहिजे, अशी तरतूद आहे.
        पोलीस स्टेशन प्रमुखांनी जर तक्रार घेण्यास नकार दिला व त्यामुळे अन्याय झाला असे वाटत असेल तर कायद्यान्वये जिल्हा पोलीस अधीक्षक किंवा पोलीस आयुक्त (जेथे आयुक्त असेल त्या ठिकाणी) यांच्याकडे पोस्टाने तक्रार पाठविता येईल. हे अधिकारी स्वतः गून्ह्याचा तपास करू शकतात किंवा आपल्या हाताखालिल अधिकाऱ्यास तपासाचा आदेश देऊ शकतात.
        घटना जर दखलपात्र नसलेल्या गून्ह्याची असेल तर पोलीस तशी नोंद फौजदारी प्रक्रिया कायद्याच्या कलम १५५ अन्वये दखलपात्र नसलेल्या गुन्ह्यांच्या रजिस्टरमध्ये करून ठेवतात.अशा गुन्ह्यामध्ये पोलीसांना गुन्हा नोंदवून आरोपीस अटक करता येत नाही. त्यासाठी तक्रारकर्त्याला न्यायालयात फौजदारी खटला दाखल करण्याची सुचना पोलीसांनी दिली पाहिजे, अशी तरतूद आहे. यालाच सर्वसामान्य पणे, एन. सी. नोंदविने म्हणजे (non cognizable offence) नोंदविने म्हणतात.
        पोलीस स्टेशन प्रमुखांनी तक्रार घेतली नाही तर भादंवि १६६अन्वये त्यांच्याविरुध्द कारवाई होऊ शकते. सरकारी कायदा मोडला या गुन्ह्यासाठी कलम भादंवि १६६अन्वये १ वर्षापर्यंत तुरुंग व  दंड या शिक्षेची तरतूद आहे. गुन्ह्यांचे गंभीर स्वरूप असूनही हलक्या स्वरूपाचा गुन्हा मुद्दाम नोंदविला तर भादंवि १६७ अन्वये सरकारी नोकराने गैर दस्तऐवज तयार करणे यास्तव गुन्हा होईल व यासाठी ३वर्ष तुरुंग किंवा दोन्ही अशा शिक्षेची तरतूद आहे. किंवा भादंवि. २१७ नुसार शिक्षेपासून कुणाचा बचाव करण्याच्या हेतूने कायद्यातचा भंग केला म्हणून गुन्हा ठरेल व त्यासाठी २वर्ष तुरुंग व दंडाच्या शिक्षेची तरतूद आहे. शिवाय वरिष्ठ पोलीस अधिकारी,मुंबई  पोलीस अधिनियमाच्या कलम २५ अन्वये प्रशासकीय कारवाई करू शकतात.
🌟🌟🌟तक्रार करताना घ्यावयाची खबरदारी 🌟🌟🌟
        घटनेत दिवस, वेळ, स्थळ, नूकसानीचे वर्णन, उपस्थित व्यक्ति इत्यादि नमूद करावे. तक्रार घटना घडल्यानंतर  विनाविलंब नोंदविली पाहिजे. तक्रारीमध्ये घटनेचा महत्वाचा भाग नमूद करायचा राहू नये. तक्रार करण्यास उशीर झाला असेल तर त्याचे योग्य ते कारण नमूद करावे अन्यथा आरोपीला संशयाचा फायदा मिळतो व  तो निर्दोष होऊ शकतो. तक्रार ही सत्य असावी.

🌟🌟🌟प्रथम सूचना अहवाल सार्वजनिक दस्तऐवज 🌟🌟🌟
        न्यायालयाने चन्नपा विरुद्ध कर्नाटक राज्य या खटल्यात प्रथम सूचना अहवाल हे पुरावा कायद्याच्या कलम ७४व ७६ अन्वये सार्वजनिक दस्तऐवज (public document) आहे. हे तपासण्याचा नागरिकांना हक्क आहे. योग्य ती 'फी'  घेऊन त्याची प्रत दिली पाहिजे. असे मा. कर्नाटक उच्च न्यायालयाने म्हटले आहे (१९८० क्री. लॉ. ज. पान १०२२)

🌟🌟🌟खोटी तक्रार 🌟🌟🌟
           पोलीसांना खोटी तक्रार देणे भादंवि कलम २११ अन्वये गुन्हाअसून त्यासाठी २ वर्ष तुरुंग दंड अशा शिक्षेची तरतूद आहे. कलम १८२अन्वये सुध्दा गुन्हा होईल.
        तक्रारदेऊनही पोलीसांनी काहीही कारवाई केली नाही तर न्यायालयात खासगी फौजदारी खटला दाखल करता येतो. पोलीसांना चौकशी करण्याचा आदेश न्यायालय देऊ शकते.
       पोलीस स्टेशन प्रमुखाने तक्रार नोंदविली नाही तर जिल्हा पोलीस अधीक्षकाकडे तक्रार करता येईल.
        आपण दिलेल्या तक्रारीचे काय झाले ? याची माहिती अधिकार कायद्यान्वये विहीत नमुन्यात अर्ज करून मागता येईल. माहिती आधिकार कायद्याअंतर्गत आपणास आवश्यक माहिती कोणत्याही कार्यालयातून मिळु शकेल.
        माहिती आधिकार कायद्यान्वये विहित नमुन्यात  योग्य ती 'फी' चे कोर्ट तिकीट लावून अर्ज करायचा असतो. संबंधीत  कार्यालयाच्या माहिती अधिकाऱ्याने अर्ज पुरविणे बंधनकारक आहे. माहिती न दिल्या किंवा चुकीची किंवा अपूर्ण माहिती दिल्यास ३०दिवसा नंतर अपील करता येईल. अपील अधिकारी त्याच कार्यालयात नेमलेले असतात.त्यावर अपीलासाठी राज्यस्तरीय व राष्ट्रीयस्तरीत माहिती अधिकारी नियुक्त केलेले आहेत.पोलीस स्टेशन चे माहिती अधिकारी पोलीस आयुक्त किंवा सहाय्यक पोलीस आयुक्त कार्यालयात असतात. माहिती आधिकारा अंतर्गत माहिती पोष्टने सुध्दा मागता येते परंतु विलंब टाळण्यासाठी व अर्जातील त्रुटिंची पूर्तता करण्यासाठी संबधीत कार्यालयात प्रत्यक्ष जाऊन अर्ज करणे चांगले. माहिती अधिकाऱ्याने विनाकारण माहिती दिली नाही तर शिक्षेची तरतूद आहे. 'पेनॉल्टी' चा मराठी अर्थ शिक्षा होतो.
          फिर्याद लिहून घेण्यास नाकारने हा भा. दं. वि कलम १६६ आणी २१७ नुसार गुन्हा होईल. फिर्यादी नुसार घटनेचे गांभीर्य न  नोंदविता गुन्ह्यांचे स्वरुप सौम्य करणे हा भा. दं. वि  १६७ व २१८ अन्वये गुन्हा होईल.
         गून्ह्याची नोंद केल्यावर पोलीसांनी प्रथम सुचना अहवालाची एक प्रत न्यायालयात पाठविली पाहिजे.

🌟संधर्भ🌟
  ए. आय. आर. १९७६सुप्रीम कोर्ट पान २४२३.

         अदखलपात्र गून्ह्यात तपास करायचा असेल तर पोलीसांनी फौजदारी प्रक्रिया कायदा कलम १५५(२) अन्वये न्यायालयाची परवानगी घेतली पाहिजे.
🌟संदर्भ 🌟
   अविनाश मधुकर वि. महाराष्ट्र राज्य १९८३क्रि. लॉ. ज. ८३३ , १९८४ महाराष्ट्र लॉ. जनरल ८८.

🌟  तक्रार नोंदविण्याबाबतच्या नव्या सूधारीत तरतुदीं🌟

      भा. द. वि. 326 अ  (ॲसिड टाकणे किंवा प्रयत्न करणे)
          354, 354 अ, ब, क, ड,  (विनयभंग) 376, 376, अ, ब, क, ड, ई, व कलम 509 या गुन्ह्या अंतर्गत तक्रार देण्यास महिला पोलीस स्टेशनला आली असेल तर तिची तक्रार महिला आधिकाऱ्याने लिहिली पाहिजे. या गुन्ह्यासाठी तक्रार देणारी महिला मानसिक रुग्ण असेल किंवा अपंग असेल तर तिच्या घरी जाऊन किंवा तिच्या सोयींच्या जागेवर जावून फिर्याद लिहून घेतली पाहिजे. अशा महिलेच्या तक्रारीचे व्ही. डी. ओ. रेकॉर्डिंग सुध्दा केले  पाहिजे अशी तरतूद  2013 च्या कलम दुरुस्ती अन्वये करण्यात आली आहे.
🙏👮👮👮👮👮👮👮👮👮👮👮👮🙏

         
उत्तर लिहिले · 6/8/2018
कर्म · 28530
3
चोरी हा गुन्हा दखलपात्र असल्याने ठाणे अंमलदारास एफ.आय.आर. नोंद करून तपास करावा लागेल. ज्या दिवशी गुन्हा घडला त्या दिवशी तुम्ही गुन्ह्याच्या ठिकाणी हजर नव्हता, असे पुराव्यानिशी सिद्ध केल्यास तुमचा सहभाग या गुन्ह्यात नाही, अशी पोलिसांची खात्री झाल्यास खोटी फिर्याद दिली म्हणून फिर्यादीविरुद्ध १८२ IPC केस पोलीस दाखल करतील. काळजी करू नका.
उत्तर लिहिले · 6/8/2018
कर्म · 7430
0

एखाद्यावर चोरीचा आरोप लावल्यास, तो तुमच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करू शकतो. भारतीय दंड संहिता (IPC) मध्ये या संबंधित काही तरतुदी आहेत. त्या खालीलप्रमाणे:

  • कलम 499 (मानहानी): जर तुम्ही कोणावर चोरीचा खोटा आरोप केला आणि त्यामुळे त्याची समाजात बदनामी झाली, तर तो तुमच्यावर मानहानीचा दावा करू शकतो. मानहानी म्हणजे, "एखाद्या व्यक्तीची प्रतिमा लोकांमध्ये मलिन करणे".
  • कलम 500 (मानहानीची शिक्षा): या कलमांतर्गत, मानहानी झाल्यास दोन वर्षांपर्यंत साधा कारावास किंवा दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात.
  • खोटा आरोप (False Accusation): जर तुमच्या आरोपात तथ्य नसेल आणि केवळ त्या व्यक्तीला त्रास देण्याच्या उद्देशाने आरोप केला असेल, तर तो फौजदारी गुन्हा ठरू शकतो.

फौजदारी गुन्हा केव्हा लागू होतो:

  • जेव्हा तुमच्या आरोपांमुळे त्या व्यक्तीची समाजात प्रतिमा मलिन होते.
  • आरोप खोटा आहे हे माहीत असूनही तुम्ही तो आरोप करता.
  • तुमचा आरोप करण्यामागे द्वेष किंवा बदनामी करण्याचा हेतू असतो.

फौजदारी गुन्हा कसा दाखल होतो:

  1. पोलिसात तक्रार: ज्या व्यक्तीवर खोटा आरोप झाला आहे, ती व्यक्ती तुमच्याविरुद्ध पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करू शकते.
  2. न्यायालयात तक्रार: पोलिस तक्रार दाखल न केल्यास, पीडित व्यक्ती थेट न्यायालयात जाऊन तक्रार दाखल करू शकते.
  3. पुरावे: आरोप खोटा आहे हे सिद्ध करण्यासाठी पीडित व्यक्तीला पुरावे सादर करावे लागतात.

महत्वाचे: कोणताही आरोप करण्यापूर्वी तुमच्याकडे त्याचे पुरावे असणे आवश्यक आहे. खोट्या आरोपांमुळे तुमच्यावर कायदेशीर कारवाई होऊ शकते.

अधिक माहितीसाठी:

उत्तर लिहिले · 19/3/2025
कर्म · 1080

Related Questions

एखादी व्यक्ती कोर्टात जामीनावर असेल आणि ती व्यक्ती मयत असेल, तर त्या व्यक्तीचे नातेवाईक काय करू शकतात?
फौजदारी प्रक्रिया संहिता व इंडियन पिनल कोड यांत काय साम्य आहे?
फौजदारी गुन्हा आणि दिवाणी गुन्हा काय फरक आहे?
एका माणसाने माझ्यावर मारहाणीचा गुन्हा दाखल केला होता. त्यावर मी अटक होऊन जामीन घेतला, पण त्याने सांगितलेल्या घटना दिवशी मी बँकेत होतो, ह्याचा पुरावा मी पोलीस स्टेशनला सादर केला. माझे केस मधून नाव बाहेर आल्यावर मी त्या व्यक्तीवर अब्रुनुकसानीचा दावा करू शकतो का? कसा?
माझी एक अडचण आहे, माझे शेजारी आम्हाला विनाकारण काहीही बोलतात, आमची बदनामी करतात. मी त्यांच्यावर मानहानीचा गुन्हा दाखल करू शकतो का?
कलम 376 लागू असताना आरोपीला जामीन मिळतो का?
आजन्म कारावास म्हणजे काय आणि त्याचे नियम काय?