6 उत्तरे
6
answers
भारतातील सर्वात उंच शिखर कोणते? (१) कांचनगंगा की (२) कळसुबाई?
19
Answer link
कांचनगंगा (नेपाळी: कञ्चनजङ्घा) हे हिमालय पर्वतांतील एक उंच पर्वतशिखर आहे. हे जगातील माउंट एव्हरेस्ट व के२ यांच्यानंतरचे तिसरे सर्वात उंच शिखर असून भारताच्या सिक्कीम राज्यात असून भारतीय भूमीतील सर्वोच्च शिखर आहे. याची उंची ८,५८६ मी (२८,१६९ फूट) इतकी आहे. याचे खरे स्थानिक लिम्बू भाषेतील नाव सेवालुंग्मा असे असून त्याचा अर्थ ज्याला आम्ही शुभेच्छा देतो असा पर्वत असा होतो. किरन्त धर्मामध्ये सेवालुंग्मा म्हणजे धार्मिक असे समजले जाते
भारतीय चलनातील १०० रुपयांच्या नोटेच्या पृष्ठभागावरील हिमशिखर म्हणजे ‘माउंट कांचनगंगा’ होय. नेपाळ व भारतातील सिक्कीम राज्यालगतच्या सीमेवर हे शिखर वसलेले आहे. १९५५ साली ज्यो ब्राउन व जॉर्ज ब्रँड या ब्रिटिश गिर्यारोहकांनी ‘माउंट कांचनगंगा’वर सर्वात पहिली यशस्वी चढाई केली.



भारतीय चलनातील १०० रुपयांच्या नोटेच्या पृष्ठभागावरील हिमशिखर म्हणजे ‘माउंट कांचनगंगा’ होय. नेपाळ व भारतातील सिक्कीम राज्यालगतच्या सीमेवर हे शिखर वसलेले आहे. १९५५ साली ज्यो ब्राउन व जॉर्ज ब्रँड या ब्रिटिश गिर्यारोहकांनी ‘माउंट कांचनगंगा’वर सर्वात पहिली यशस्वी चढाई केली.



4
Answer link
भारतातील सर्वात उंच शिखर हे कांचन गंगा आहे
कांचनजुंगा म्हणजे "हिमवृष्टीचे पाच खजिना" आणि हे जगातील तिसरे सर्वोच्च शिखर आहे आणि भारतातील पहिलेच ते 8.586 मीटर उंच आहे. हे दार्जिलिंग आणि गंगटोकच्या अनेक बिंदुांवरून पाहिले जाऊ शकते. माउंटनचे दृश्यमान दृश्य पाहण्यासाठी टायगर हिल्स सर्वोत्तम स्थान आहे. सौंदर्य इतके आकर्षक आहे की ते आपल्या मनामध्ये दीर्घकाळ टिकेल.
कांचनजुंगा म्हणजे "हिमवृष्टीचे पाच खजिना" आणि हे जगातील तिसरे सर्वोच्च शिखर आहे आणि भारतातील पहिलेच ते 8.586 मीटर उंच आहे. हे दार्जिलिंग आणि गंगटोकच्या अनेक बिंदुांवरून पाहिले जाऊ शकते. माउंटनचे दृश्यमान दृश्य पाहण्यासाठी टायगर हिल्स सर्वोत्तम स्थान आहे. सौंदर्य इतके आकर्षक आहे की ते आपल्या मनामध्ये दीर्घकाळ टिकेल.
0
Answer link
भारतातील सर्वात उंच शिखर कांचनगंगा आहे.
कळसुबाई हे शिखर महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर आहे.
टीप: कांचनगंगा हे जगातील तिसऱ्या क्रमांकाचे उंच शिखर आहे. ब्रिटानिका या संकेतस्थळावर याबद्दल अधिक माहिती उपलब्ध आहे.