राजकारण संस्था पंचायतराज

स्थानिक स्वराज्य संस्था हा विषय घटनेत कोणत्या परिशिष्टात आहे?

2 उत्तरे
2 answers

स्थानिक स्वराज्य संस्था हा विषय घटनेत कोणत्या परिशिष्टात आहे?

1

१९८९ साली राजीव गांधींच्या पुढाकारातून ६४ व्या घटनादुरुस्ती विधेयकाच्या निमित्ताने स्थानिक स्वशासन सक्षमीकरणाचा विचार लोकसभेत आला. पुढे अनेक अडथळ्यांच्या शर्यती पार करीत १९९२ साली ७३ व ७४ वे घटनादुरुस्ती विधेयक संसदेत संमत झाले. या विधेयकाद्वारे भारतीय संविधानातील नवव्या भागात कलम २४३ अंतर्भूत करण्यात आले. त्याचप्रमाणे संविधानात अकरावे आणि बारावे परिशिष्ट अंतर्भूत करून त्यात नमूद राज्य सरकारकडून पंचायत राज व नागरी स्वशासन संस्थांकडे हस्तांतरित करावयाच्या अनुक्रमे २९ व १८ विषयांचा उल्लेख करण्यात आला. या घटनादुरुस्तीमधील प्रमुख तरतुदी पुढीलप्रमाणे होत्या.

१) पंचायतराज संस्थांना विशेषतः ग्रामसभेला घटनात्मक दर्जा देण्यात आला. त्रिस्तरीय व्यवस्था विकसित करण्यात आली.

२) स्थानिक स्वशासन संस्थांचा कार्यकाल पाच वर्ष करण्यात आला. निवडणुका बंधनकारक करण्यात येवून, या निवडणुकांसाठी राज्य निर्वाचन आयोग स्थापण्याची तजवीज केली गेली.

३) स्थानिक शासनाच्या आर्थिक स्थितीचे अवलोकन करून त्यांना द्यावयाच्या निधीबाबत शिफारस करण्यासाठी राज्य वित्त आयोगाचे गठन करण्याचे निश्चित करण्यात आले.

४) वंचित, शोषित व दुर्बल घटक मुख्य प्रवाहात येण्याच्या दृष्टीने अनुसूचित जाती व अनुसूचित जमातींना त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात आणि महिलांसाठी किमान १/३ जागा राखीव ठेवण्यात आल्या.

५) जिल्हा नियोजन समितीची स्थापना करण्यात आली.
उत्तर लिहिले · 31/3/2020
कर्म · 115
0

उत्तर: भारतीय राज्यघटनेतील 11 व्या परिशिष्टात स्थानिक स्वराज्य संस्थांचा उल्लेख आहे.

73 व्या घटनादुरुस्ती कायद्याद्वारे 1992 मध्ये हे परिशिष्ट जोडण्यात आले. या परिशिष्टात पंचायत राज संस्थांशी संबंधित 29 कार्यात्मक बाबी समाविष्ट आहेत.

संदर्भ:

  1. भारताचे संविधान
  2. The Constitution (Seventy-third Amendment) Act, 1992.
उत्तर लिहिले · 17/3/2025
कर्म · 2820

Related Questions

पंचायतराजची मूळ कल्पना कोणाची होती?
पंचायतराज पद्धतीचा जनक कोणाला म्हणतात?