कला सामान्य ज्ञान साहित्य

सुखकर्ता दुखहर्ता आरती कुणी लिहली?

4 उत्तरे
4 answers

सुखकर्ता दुखहर्ता आरती कुणी लिहली?

15
*_🙏सुखकर्ता दुःखहर्ता संपूर्ण आरती_*
------------------------------------
_स्वामी रामदासांनी रचलेली श्री गणेशाची आरती ही सात कडव्यांची आहे, पण आपण त्यातील तीनच कडवी म्हणतो. या गणेशोत्सवात आपल्या घरच्या बाप्पापुढे ही संपूर्ण आरती म्हणून पाहा... वातावरणात एक वेगळीच ऊर्जा निर्माण होईल._

सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची ।
नुरवी पुरवी प्रेम कृपा जयाची ॥

सर्वांगी सुंदर उटि शेंदुराची ।
कंठी झळके माळ मुक्ताफळांची ॥१॥

जय देव जय देव जय मंगलमूर्ती ।
दर्शनमात्रे मनकामना पुरती ॥ध्रु०॥

रत्नखचित फरा तुज गौरीकुमरा ।
चंदनाची उटी कुंकुमकेशरा ॥
हिरेजडीत मुकुट शोभतो बरा ।
रुणझुणती नूपरें चरणीं घागरिया ॥ जय० ॥२॥

माथा मुकुट मणी कानी कुंडले ।
सोंड दोंदावरी शेंदुर चर्चिले ।।
नागबंद सोंड-दोंद मिराविले ।
विश्वरूप तया मोरयाचे देखिले ॥ जय० ॥३॥

चतुर्भुज गणराज बाही बाहुटे ।
खाजयाचे लाडू करुनी गोमटे ।।
सुवर्णाचे ताटी शर्करा घृत ।
अर्पी तो गणराज विघ्ने वारीतो ॥ जय० ॥४॥

छत्रे चामरे तुजला मिरविती ।
उंदीराचे वाहन तुजला गणपती ।।
ऐसा तु कलीयुगी सकळीक पाहसी ।
आनंदे भक्तासी प्रसन्न होसी ॥ जय० ॥५॥

ता ता धि मि किट धि मि किट नाचे गणपती ।
ईश्वर पार्वती कौतुक पाहती ।।
ताल मृदंग वीणा घोर उमटती ।
त्यांचे छंदे करुनी नाचे गणपती ॥ जय० ॥६॥

लंबोदर पीतांबर फणिवरबंधना ।
सरळ सोंड वक्रतुंड त्रिनयना
दास रामाचा वाट पाहे सदना ।
संकटीं पावावें निर्वाणीं रक्षावें सुरवर वंदना
॥ जय ० ॥ ७ ॥

जय देव जय देव जय मंगलमूर्ती ।
दर्शनमात्रे मनकामना पुरती ॥॥
उत्तर लिहिले · 13/9/2018
कर्म · 569245
2
दे

सुखकर्ता दुःखहर्ता आरती समर्थ रामदास स्वामी नी लिहिली आहे


सुखकर्ता दुखहर्ता (म्हणजे सुख आणणारा व दु:ख दूर करणारा), ही एक प्रसिद्ध मराठी आरती आहे. ती हिंदु देवता गणपतीला उद्देशून रचलेले काव्य आहे. हे पद समर्थ रामदास (१६०८ - १६८२) ह्यांनी लिहिले आहे. ही आरती पूजेच्या शेवटी म्हणण्यात आलेल्या आरत्यांपैकी पहिली असते म्हणून विशेष प्रसिद्ध आहे. महाराष्ट्रात ही आरती गणेश चतुर्थीपासून उत्सव काळात किंंवा नित्य पूजेतही म्हटली जाते,

पूर्वभूमी  

संत समर्थ रामदास
गणेश हा बुद्धी ज्ञान, व नव्या प्रारंंभाचे हिंदु दैवत आहे. पुण्यातील अष्टविनायकांमधील एक, मयुरेश्वर, ह्या मोरगावातील गणपतीची मूर्ती पाहून ही आरती लिहिण्याची प्रेरणा समर्थ रामदास ह्यांना मिळाली असे मानले जाते. ही आरती जोगिया ह्या रागात रचली आहे.

अन्य आरतींप्रमाणे हीसुद्धा, प्राचीन मंत्रांप्रमाणे संस्कृतमध्ये लिहिलेली नसून, तिची रचना देशी भाषेमध्ये केली गेली आहे.

सुखकर्ता दुखहर्ताची तीन कडवी आहेत, प्रत्येक कडव्यानंतर धृपद म्हटले जाते.

सुखकर्ता दुखहर्ता, वार्ता विघ्नांची|
नुरवी; पुरवी प्रेम, कृपा जयाची |
सर्वांगी सुंदर, उटी शेंदुराची|
कंठी झळके माळ, मुक्ताफळांची॥१॥

अर्थ : गणपती कसा सुख आणतो व दु:ख दूर करतो, ह्याने होते. पुढे गणपती कसा भक्ताचे जीवन प्रेमाने भरुन टाकतो ह्याचे वर्णन केलेले आहे. साप्ताहिक ’लोकप्रभ”त विदित केल्याप्रमाणे, ह्या कडव्यातील नुरवी हा शब्द नुर्वी म्हणुन अनेकदा चुकीचा उच्चारला जातो.

जय देव, जय देव जय मंगलमूर्ती|
दर्शनमात्रे मन कामना पूर्ती ॥धृ॥

ह्या कडव्यात गणपतीचे मंगलमूर्ती म्हणून वर्णन केले गेले आहे. या देवाचे केवळ दर्शन हे आपल्या सर्व इच्छा पूर्ण करू शकते, असे सांगितले आहे.
 

पुजारी (डावीकडील, खाली) गणेशची आरती करताना
रत्नखचित फरा, तुज गौरीकुमरा|
चंदनाची उटी, कुमकुम केशरा|
हिरेजडित मुकुट, शोभतो बरा |
रुणझुणती नूपुरे, चरणी घागरिया|
जय देव जय देव जय मंगलमूर्ती ॥२॥

या दुसर्‍या कडव्यात गणपतीचे गौरी (पार्वती) पुत्र म्हणून वर्णन आहे. भर्पूर रत्‍ने असलेला फरा (एक दागिना) लावलेले त्याचे कपाळ चंदन, कुंकू, व केशर यांनी चोपडलेले आहे व तो हि्र्‍याचे मुकुट व वाजणारे दागिने घालतो, असे वर्णन केलेले आहे.

लंबोदर पीतांबर, फणिवरबंधना |
सरळ सोंड, वक्रतुंड त्रिनयना|
दास रामाचा, वाट पाहे सदना|
संकटी पावावे, निर्वाणी रक्षावे, सुरवरवंदना|
जय देव जय देव, जय मंगलमूर्ती|
दर्शनमात्रे मन कामना पूर्ती ॥३॥

शेवटचं कडवं हे गणपतीचे मडक्यासारखे पोट असल्याचे वर्णन करते. त्याने पितांबर नेसला आहे. त्याच्या कंबरेभोवती एका नागाचा बंध (कंबरपट्टा) आहे. या गणपतीला तीन डोळे असून त्याचे तोंड वाकडे पण सोंड सरळ आहे. गणपतीच्या मूर्तीला सहसा तिसरा डोळा नसतो, पण मोरगावच्या गणपतीला तो आहे. शेवटी, कवीचे नाव आहे, व दास रामदास हा देवाची वाट पाहतो आहे, असा उल्लेख आहे. ह्या कडव्यात गणपतीला, भक्त संकटात असतांना त्याला प्रसन्न होण्याची, व अखेरच्या क्षणी रक्षण करण्याची विनंती केली गेली आहे.
समर्थ रामदास स्वामींनी रचलेली गणपतीची संपूर्ण आरती आरती
 
    
सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची ।
नुरवी पुरवी प्रेम कृपा जयाची ॥




सर्वांगी सुंदर उटि शेंदुराची ।
कंठी झळके माळ मुक्ताफळांची ॥१॥


जय देव जय देव जय मंगलमूर्ती ।
दर्शनमात्रे मनकामना पुरती ॥ध्रु०॥

रत्नखचित फरा तुज गौरीकुमरा ।

चंदनाची उटी कुंकुमकेशरा ॥
हिरेजडीत मुकुट शोभतो बरा ।
रुणझुणती नूपरें चरणीं घागरिया ॥ जय० ॥२॥


माथा मुकुट मणी कानी कुंडले ।
सोंड दोंदावरी शेंदुर चर्चिले ।।
नागबंद सोंड-दोंद मिराविले ।
विश्वरूप तया मोरयाचे देखिले ॥ जय० ॥३॥


चतुर्भुज गणराज बाही बाहुटे ।
खाजयाचे लाडू करुनी गोमटे ।।
सुवर्णाचे ताटी शर्करा घृत ।

अर्पी तो गणराज विघ्ने वारीतो ॥ जय० ॥४॥

छत्रे चामरे तुजला मिरविती ।
उंदीराचे वाहन तुजला गणपती ।।

ऐसा तु कलीयुगी सकळीक पाहसी ।
आनंदे भक्तासी प्रसन्न होसी ॥ जय० ॥५॥

ता ता धि मि किट धि मि किट नाचे गणपती ।

ईश्वर पार्वती कौतुक पाहती ।।
ताल मृदंग वीणा घोर उमटती ।
त्यांचे छंदे करुनी नाचे गणपती ॥ जय० ॥६॥


लंबोदर पीतांबर फणिवरबंधना ।
सरळ सोंड वक्रतुंड त्रिनयना
दास रामाचा वाट पाहे सदना ।
संकटीं पावावें निर्वाणीं रक्षावें सुरवर वंदना

॥ जय ० ॥ ७ ॥

जय देव जय देव जय मंगलमूर्ती ।
दर्शनमात्रे मनकामना पुरती ॥॥

!!गणपती बाप्पा मोरया!!



उत्तर लिहिले · 11/8/2021
कर्म · 121765
0
मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर येथे देत आहे. सुखकर्ता दुखहर्ता आरती समर्थ रामदास स्वामींनी लिहली.

सुखकर्ता दुखहर्ता आरती समर्थ रामदास स्वामींनी लिहली.

समर्थ रामदास स्वामी:

  • समर्थ रामदास स्वामी हे 17 व्या शतकातील एक थोर भारतीय संत, तत्त्वज्ञानी, आणि कवी होते.
  • त्यांनी 'दासबोध' नावाचा एक महत्त्वपूर्ण ग्रंथ लिहिला, जो त्यांच्या शिकवणुकी आणि तत्त्वज्ञानाचा सार आहे.
  • रामदास स्वामी हे हनुमान आणि रामाचे भक्त होते आणि त्यांनी त्यांच्या भक्तीचा प्रसार करण्यासाठी अनेक रचना केल्या.

अधिक माहितीसाठी, आपण खालील संकेतस्थळांना भेट देऊ शकता:

उत्तर लिहिले · 16/3/2025
कर्म · 2360

Related Questions

अण्णा भाऊ साठे यांच्याबद्दल माहिती सांगा?
अंत असते प्रारंभ हे पुस्तक वाचायचे आहे का?
ग्रंथ म्हणजे काय?
नवकाव्यांची वैशिष्ट्ये स्पष्ट करा?
कथात्म साहित्य म्हणजे काय?
तुम्ही वाचलेल्या कोणत्याही एका दलित कथेचे थोडक्यात विवेचन करा?
झुंबर ही एकांकिका कोणत्या विषयावर आधारलेली आहे, थोडक्यात स्पष्ट करा?