विवाह कायदा कागदपत्रे प्रक्रिया

विवाह नोंदणी लग्न झाल्या नंतर किती वर्षांनी करता येते आणि कुठे करता येते? मी उल्हासनगर येथे राहतो.

3 उत्तरे
3 answers

विवाह नोंदणी लग्न झाल्या नंतर किती वर्षांनी करता येते आणि कुठे करता येते? मी उल्हासनगर येथे राहतो.

6
कोर्ट केसेस, वारसाहक्क, रेशनकार्ड मध्ये नाव समाविष्ट करणे अथवा कमी करणे,पासपोर्ट,गोत्र परिवर्तन आदी कारणांसाठी विवाह प्रमाणपत्राची आवश्यकता असते. विवाहासाठी पुरुषाचे वय २१ व स्त्रीचे वय १८ वर्षे पूर्ण असणे बंधनकारक आहे.

विवाह नोंदणी विवाह तारखेपासून ९० दिवसांच्या आत करावी.जर ९० दिवसांपेक्षा काही कारणास्तव उशीर झाल्यास दंड रक्कम भरून नोंदणी करता येते.

विवाह नोंदणी अधिनियान्व्ये वर किंवा वधू ज्या ठिकाणी राहतात त्यापेकी एक विवाह निबंधकाचे कार्यालयात नोंदवायची आहे.विवाह निबंधकाचे कार्यालय तहशील कार्यालयात असते.

नोंदणीसाठी १०० रु किंवा निश्चीत केलेले शुल्काची कोर्ट फी स्टॅम्प अथवा कार्यालयाच्या पध्दतीप्रमाणे भरावे.विवाह नोंदणीसाठी वर वधू यांच्या सह तीन साक्षीदार ओळखपत्र पासपोर्ट साईज रंगीत फोटो सह सादर करावे.

विवाह नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे

वर व वधू यांचा रहिवासी पुरावा ज्यात रेशन कार्ड,दूरध्वनी बिल,वीज बील,पासपोर्ट यांच्या मूळप्रतीसह झेरॉक्स सत्यप्रत वर व वधू यांचा वयाचा दाखला उदा.शाळा सोडल्याचा दाखला,जन्माचा दाखला यांच्या मूळ प्रतीसह सत्यप्रती.लग्नाची निमंत्रण पत्रिका जर लग्नाची निमंत्रण पत्रिका नसल्यास वर वधू तीन साक्षीदार व पुरोहित यांचे ठराविक नमुन्याप्रमाणे जनरल स्टॅम्प रु.१०० वर प्रतिज्ञा पत्र व लग्नविधीचे प्रसंगीचे फोटो.तीन साक्षीदार रहिवासी पुरावे उदा.रेशनकार्ड,पासपोर्ट,मतदान,ओळखपत्र यांची मूळप्रतीसह सत्यप्रत.वर वधू घटस्पोटीत असल्यास कोर्टाचे हुकुमनाम्याची सत्यप्रत.वर वधू विधुर विधवा असल्यास संबंधित मयत व्यक्तीचे मृत्यू दाखला व त्याची सत्यप्रत जोडावी.वरील बाबींची पूर्तता करून विवाह निबंधक यांचेकडून विवाह प्रमाणपत्र नमुना इ.आय मधील मागणी करून घ्यावे.
उत्तर लिहिले · 8/9/2017
कर्म · 80330
0
केंव्हाही करता येते, पण विवाह झाल्यानंतर तीन वर्षांपर्यंत केल्यास अधिक योग्य. नंतर तांत्रिक अडचणी येतात.
उत्तर लिहिले · 8/9/2017
कर्म · -20
0

उल्हासनगरमध्ये विवाह नोंदणी संदर्भात माहिती:

विवाह नोंदणी कधी करता येते:
  • विवाह नोंदणीLegislation.gov.inनुसार, विवाह झाल्यानंतर कधीही करता येते. यासाठी कोणतीही अंतिम मुदत नाही.
विवाह नोंदणी कुठे करता येते:
  • तुम्ही तुमच्या जवळच्या विवाह निबंधक कार्यालयात (Registrar Office) विवाह नोंदणी करू शकता.
  • उल्हासनगर महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर किंवा कार्यालयात तुम्हाला विवाह निबंधक कार्यालयाचा पत्ता आणि संपर्क क्रमांक मिळू शकेल.
आवश्यक कागदपत्रे:
  • पती-पत्नी दोघांचे आधार कार्ड
  • पत्त्याचा पुरावा (उदा. लाईट बिल, रेशन कार्ड)
  • लग्नाचे प्रमाणपत्र किंवा लग्नाची पत्रिका
  • witnesses ( witnesses )
  • फोटो
नोंदणी प्रक्रिया:
  • विवाह निबंधक कार्यालयात जाऊन अर्ज भरा.
  • आवश्यक कागदपत्रे जोडा.
  • शुल्क भरा आणि पावती घ्या.
  • विवाह निबंधक तुम्हाला पुढील तारखेला बोलावतील.
टीप:
  • अधिक माहितीसाठी, उल्हासनगर महानगरपालिकेच्या संकेतस्थळाला भेट द्या किंवा विवाह निबंधक कार्यालयात संपर्क साधा.

मला आशा आहे की ही माहिती तुमच्यासाठी उपयुक्त ठरेल.

उत्तर लिहिले · 16/3/2025
कर्म · 1420

Related Questions

आधार हा मालकीचा पुरावा आहे का?
सर्वोच्च न्यायालयाची रचना स्पष्ट करा?
गोत सभेतील खटल्याचे कामकाज स्पष्ट करा?
आरोपीचे अधिकार काय आहेत?
पोलिस व त्याचे तपास नियम काय आहेत?
सर्व प्रकारचे तक्रारी अर्ज मिळतील का?
कायदा व पळवाटा?