भारतीय स्वातंत्र्य दिन स्वातंत्र्य महिला स्वातंत्र्य लिखाण

मला फ्रीडम संदर्भात ७-८ ओळी सांगा पण त्या स्वातंत्र्य दिन आणि स्त्री संदर्भात असाव्यात?

2 उत्तरे
2 answers

मला फ्रीडम संदर्भात ७-८ ओळी सांगा पण त्या स्वातंत्र्य दिन आणि स्त्री संदर्भात असाव्यात?

8
स्वातंत्र्य दिन हा सर्व जण त्या विरांचा, महात्माचा,आणि विजयाचा विशेष दिन साजरा केला जातो. त्याचप्रमाणे हा दिन समस्त स्त्रियांच्या मान सन्मानाचा देखील असतो. कारण खरे स्वातंत्र्य हे स्त्रियांनाही मिळाले आहे. बालविवाह पासून पुनर्विवाह आणि शिक्षण-धर्म-जात-परंपरा-रीती-रिवाज यांपासून स्त्रियांना पूर्वी बरेच काही जाच एखाद्या शिक्षेप्रमाणे सोसावे लागे. कालांतराने बुद्धिमत्तवादि, थोर विचारवंत यांनी स्त्रियांसाठी लढ़ा दिला. आणि आज आपल्या महिलांना या बंद कोठडीतून सुटका मिळाली आहे. आज आपला स्त्री वर्ग हां चंद्रावर देखील पोहोचला आहे. घरातील संपूर्ण जबाबदारी सोबत ते व्यवसाय, नोकरी, शिक्षण सुद्धा कुशलतेने कामकाज पार पाडतात. एवढे असून तरीही देखील आजही स्त्रियांवर मानसिक शारीरिक अत्याचार होतात. आणि याला जबाबदार ही नको असलेली जुनाट विचारांची मूळ परंपरा, स्त्रियांवर बळजबरी करणारी ही रीती रिवाज. हुंडा मागणे, स्त्रियांचा सतत अपमान करणे, स्त्री भ्रूण हत्या,काही ठिकाणी स्त्रियांना वैश्यव्यवसायसाठी प्रवृत्त करणे, अशा अनेक घटना आजही काही लहान मोठ्या गावांत स्त्रियांच्या बाबतीत घडताना दिसतात. म्हणूनच स्वातंत्र्यदिनानिमित्त वारंवार आम्ही सांगू इच्छीतो, स्त्रियांच्या आदर नेहमी असावा. कारण स्त्री देखील नेहमी सतत आपल्या वडिलांचा, भावाचा, पतिचा, मुलाचा नेहमी मान सन्मान ठेवते. स्त्रियांना स्वातंत्र्य मिळाले असल्या कारणाने काही स्त्रीया त्यांच्या आरक्षणाचा गैरफायदा उचलत आहे हे देखील कटु सत्य आहे तरीही यामुळे इतर सामान्य स्त्रियांवर विनाकारण दोष लादले जातात. तसेच समाजात अश्या घटनांमुळे चुकीचे संदेश पसरले जाते. म्हणून अश्या घटनांवर प्रतिबंध बसणे गरजेचे आहे. स्त्री ही दुर्बल नसून शक्तिशाली आहे.
उत्तर लिहिले · 11/8/2017
कर्म · 458580
0
स्वतंत्रता दिनाच्या निमित्ताने, भारतीय स्त्रियांच्या संदर्भात काही ओळी:

स्वतंत्रता दिन हा प्रत्येक भारतीयासाठी गौरवाचा दिवस आहे. या दिवशी आपण त्या वीरांना आदराने स्मरण करतो, ज्यांनी आपल्या प्राणांची आहुती देऊन देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले.

भारतीय स्त्री ही शक्ती, बुद्धी आणि करुणेचा संगम आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात स्त्रिया सक्रियपणे स्वातंत्र्य लढ्यात सहभागी झाल्या. त्यांनी आपल्या कुटुंबाची जबाबदारी सांभाळून देशासाठी त्याग केला.

आज, स्त्रिया शिक्षण, विज्ञान, तंत्रज्ञान, कला, क्रीडा अशा विविध क्षेत्रांमध्ये स्वतःची ओळख निर्माण करत आहेत. त्या आत्मनिर्भर बनून देशाच्या विकासात मोलाची भर घालत आहेत.

तरीही, काही ठिकाणी स्त्रियांना आजही सामाजिक बंधनांचा सामना करावा लागतो. हुंडा, बालविवाह, लैंगिक हिंसा यांसारख्या समस्या अजूनही आहेत. त्यामुळे, स्त्रियांच्या सक्षमीकरणासाठी आणि त्यांना समान संधी मिळवून देण्यासाठी आपण सर्वांनी एकत्रितपणे प्रयत्न करणे गरजेचे आहे.

स्वतंत्रता दिनाच्या या शुभदिनी, आपण सर्वांनी मिळून एक असा समाज निर्माण करण्याचा संकल्प करूया, जिथे प्रत्येक स्त्री सुरक्षित, सक्षम आणि स्वतंत्र असेल.

उत्तर लिहिले · 16/3/2025
कर्म · 4280