जिल्हा इतिहास

अहमदनगर जिल्ह्याचा इतिहास काय आहे आणि त्याला अहमदनगर हे नाव कसे पडले?

2 उत्तरे
2 answers

अहमदनगर जिल्ह्याचा इतिहास काय आहे आणि त्याला अहमदनगर हे नाव कसे पडले?

9
१५ व्या शतकाच्या शेवटी, इ.स. १४८६ मध्ये तत्कालीन बहामनी राज्याचे पाच तुकडे झाले. त्यामधून फुटून निघालेल्या मलिक अहमदशहा बहिरी या निजामशहाने मे, इ.स. १४९० मध्ये सीना नदीकाठी पूर्वीच्या भिंगार शहराजवळ नवीन शहर वसवण्यास सुरुवात केली. याच्या नावावरूनच या शहराला अहमदनगर असे नाव पडले.१४९४ मध्ये शहर रचना पूर्ण होऊन अहमदनगर निजामशहाची राजधानी बनले. या शहराची तुलना त्या काळी कैरो, बगदाद या समृद्ध शहरांशी केली जात असे. अहमदशहा, बुर्हाणशहा, सुलताना चांदबिबी यांची कारकीर्द असणारी निजामशाही येथे १६३६ पर्यंत टिकली.मोगल बादशहा शाहजहान ने इ.स. १६३६ मध्ये अहमदनगर काबीज केले. इ.स. १७५९ साली पेशव्यांनी अहमदनगरवर ताबा मिळवला तर १८१७ रोजी ब्रिटिशांनी अहमदनगरवर विजय मिळवला. शहरातअहमदनगरचा किल्ला, रेणुकामाता मंदिर (केडगांव) व चांदबीबी महल अशी अनेक ऐतिहासिक स्थळे आहेत. या शहराला नगर या नावानेसुद्धा ओळखतात.मराठ्यांच्या कर्तुत्वाचा उदय ज्यावेळी झाला त्यात प्रमुख घराण्यांपैकी विठोजी भोसले, मालोजी राजे भोसले, लखुजी जाधवराव निंबाळकर पवार, बाजी कदमराव हे निजामशाहीचा चौथा सुलतान मुर्तझा निजामशाह आणि पुढे मलिक अंबर ह्याच्या पदरी सेवेत होते. देवळाली प्रवरा येथील सरदार बाजी कदमराव ह्यांना साल्हेर आणि मुल्हेर हे किल्ले, किल्यावर फितवा करून मिळू दिल्या बद्दल साक्री आणि रुई ही गावे दौलताबाद ( किल्ले देवगिरी ) वरून इ.स. १५८० साली इनाम मिळाली होती. पुढे विजापुरकारांशी लढताना बाजी कदमांचा बंकापुर ( कर्नाटक ) येथे मृत्यू झाला. आजहीह्यांचे वंशज हे देवळाली प्रवरा येथे आहेत.पुढे छत्रपती शिवाजी महाराजांच्या सेवेत हे घराणे आले. खंडेराव कदम आणि बाजी (तिसरे) हे शिवाजी महाराजांचे अत्यंत विश्वासू सरदार होते. ह्यांच्या कडे किल्ले राजगडची तट सरनौबती होती. छत्रपती शिवाजी महाराजांच्या दक्षिण दिग्विजय मोहिमेत तामिळनाडू येथील वली गंडापुराम जिंकल्यावर येथील भुईकोट किल्ल्याची किल्लेदारी कदमांकडे होती. छत्रपती राजाराम महाराजांच्या जिंजी मोहिमेतही कदमांनी आपले पूर्ण योगदान स्वराज्यासाठी अर्पण केले. पानिपतच्या लढाईत ह्या घरातील सात पुरुषांनी आपला देह हिंदू धर्म रक्ष्यण्यासाठी अर्पण केलेला आहे. आज हि कदमांकडे पारंपारिक आणि दुर्मिळ अशी जुनी शस्रे जपलेली आहेत. ह्यात धोप तलवारी, गूर्ज, कट्यारी, धाली, बिचवा, हस्तिदंती गुप्त्या, भाले, शिवकालीन शिवराया आणि इतर ऐतिहासिक साधने उपलब्ध आहेत.१९४२ च्या चलेजाव आंदोलनाच्या काळात पंडितनेहरू, सरदार वल्लभभाई पटेल, मौलाना आझाद, डॉ. पी.सी. घोष इत्यादी राष्ट्रीय नेते नगरमधील भुईकोट किल्ल्यात बंदिवासात होते.‘डिस्कव्हरी ऑफ इंडिया’ हा प्रसिद्ध ग्रंथ पंडित नेहरू यांनी याच किल्ल्यात लिहिला. या ग्रंथाची काही हस्तलिखिते आजही येथे पाहण्यास मिळतात. याच किल्ल्यात डॉ. पी.सी.घोष यांनी ‘हिस्ट्री ऑफ एन्शंट इंडियन सिव्हिलायझेशन’ हा ग्रंथ शब्दबद्ध केला. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ‘थॉट्स ऑफ पाकिस्तान’ व मौलाना आझाद यांनी ‘गुबार - ए - खातिर’ हे ग्रंथ याच शहरात लिहिले.
उत्तर लिहिले · 4/7/2017
कर्म · 210095
0

अहमदनगर जिल्ह्याचा इतिहास

अहमदनगर जिल्ह्याचा इतिहास खूप मोठा आहे. हा जिल्हा प्राचीन काळापासून अनेक राजवंशांच्या शासनाखाली होता. सातवाहन, शक, चालुक्य, राष्ट्रकूट आणि यादव यांसारख्या राजवंशांनी या प्रदेशावर राज्य केले.

1490 मध्ये, अहमदनगरची स्थापना अहमदनगर सल्तनतचा पहिला सुलतान अहमद निजाम शाह याने केली. त्यानेच या शहराला अहमदनगर हे नाव दिले, जे त्याचा स्वतःचा नावावरून ठेवले होते.

निजामशाहीच्या काळात अहमदनगर हे एक महत्त्वाचे शहर बनले. 1636 मध्ये मुघलांनी अहमदनगर जिंकले. त्यानंतर हा जिल्हा मराठा साम्राज्याचा भाग बनला. 1818 मध्ये ब्रिटिशांनी मराठा साम्राज्याचा पाडाव केला आणि अहमदनगर ब्रिटिशांच्या ताब्यात आले.

अहमदनगर जिल्हा अनेक ऐतिहासिक घटनांचे साक्षीदार आहे. चांद बीबीने मुघलांविरुद्ध अहमदनगरचे रक्षण केले. 1942 च्या भारत छोडो आंदोलनात अहमदनगर जिल्ह्यातील नागरिकांनी सक्रिय सहभाग घेतला होता.

अहमदनगर जिल्ह्याचे नाव

  • अहमदनगर शहराची स्थापना अहमद निजाम शाह याने केली.
  • अहमद निजाम शाहने स्वतःच्या नावावरून शहराला अहमदनगर असे नाव दिले.

संदर्भ:

उत्तर लिहिले · 15/3/2025
कर्म · 960

Related Questions

मराठी किती जुनी भाषा आहे?
औद्योगिक क्रांती कुठे झाली?
पंडित जवाहरलाल नेहरू हे आशियानचे संस्थापक होते का?
पूर्व युरोपातील सोव्हिएट रशियाच्या दबावाखालील ५ देशांची नावे लिहा?
ॲनी बेझंट यांच्या होमरूल चळवळीचे भारतात झालेले परिणाम लिहा?
1975 चा पेठ मधील दुष्काळ?
आधुनिक इतिहास म्हणजे काय?