राष्ट्रीय एकात्मता संकल्पना अडथळे आणि उपाययोजना
राष्ट्रीय एकात्मता : सकल्पना
आपण राष्ट्र म्हणजे काय ही संकल्पना समजावून घेतली. त्याचबरोबर भारतीय समाजात स्वातंत्र्यपूर्व काळापर्यंत राष्ट्र उभारणीसाठी कोणत्या घटकांचे साहाय्य झाले आणि स्वातंत्र्यानंतर ही राष्ट्रभावना सुदृढ होण्यासाठी आपण कोणती पावले उचलली आहेत याचा अभ्यास केला. पण या राष्ट्र उभारणीत येणाऱ्या काही अडचणी आहेत त्यांचाही संक्षेपाने विचार केला. आता आपणास राष्ट्रीय एकात्मतेची संकल्पना, त्यातील अडथळे व भवितव्यातदेखील भारतात राष्ट्रीय एकात्मता सुदृढ राहण्यासाठी उपाययोजना याबाबत विचार करायचा आहे.
राष्ट्रीय एकात्मता म्हणजे काय ?
राष्ट्रीय एकात्मता : राष्ट्र ही संकल्पना विकसित झालेल्या लोकसमूहात आपण एक आहोत, इतर लोकसमूह आपल्यापेक्षा वेगळे आहेत ही राष्ट्रीयतेची भावना रुजते व वाढीस लागते. या भावनेतूनच या लोकांत सामाईक अस्मिता, राष्ट्रासाठी जाज्वल्य अभिमान, समान इच्छाशक्ती, समान ध्येयाकांक्षा, वाटेल तो त्याग करण्याची तयारी या गोष्टी वाढीस लागतात. राष्ट्रीय एकात्मता बळकट झाल्याचे ते चिन्ह असते.
केवळ एकच भूप्रदेश, एक वंश, एक भाषा, एक धर्म, एक संस्कृती असे एखाद्या समाजाचे एकरंगी स्वरूप असले की, त्या समाजात राष्ट्रीय एकात्मता आहे असे म्हणणे हा राष्ट्रीय एकात्मतेचा मर्यादित अर्थ होय. ज्या समाजात वांशिक भिन्नता, बहुविध भाषिकता, अनेक धर्मांचे अस्तित्व, बहुविध सांस्कृतिक चालीरीती, जातीयता, वर्गीय भिन्नता इत्यादी वैविध्य असूनदेखील त्या समाजातील लोकांत आपण एक आहोत ही भावना प्राबल्याने वास करीत असेल, त्या समाजाचे संघटन सुदृढरित्या टिकविले जात असेल, सर्वाच्या समान हिताची उद्दिष्टे गाठण्यासाठी सर्व प्रयत्नशील असतील, त्यासाठी आवश्यकताभारतीय समाज संरचना व परिवर्तन
असेल तर संकुचित विचार, स्वार्ध बाजूला ठेवत असतील तर त्या समाजात राष्ट्रीय एकात्मता आहे असे म्हणता येईल.
९. एल. पी. मायर यांच्या मते, 'ज्या समाजात प्रस्थापित संस्था व त्यांच्याशी संबंधित असलेले हक्क व मूल्ये यांचा सर्वसाधारणपणे स्वीकार केला जातो तो समाज होय.' एकात्म
२. डॉ. ब्रिजमोहन पांच्या मते, 'राष्ट्रीय एकात्मता ही अशी एक मानसिक, सामाजिक प्रक्रिया आहे की, ज्यात सर्व प्रकारचे समूह आपापल्या संकुचित निष्ठा ओलांडून राष्ट्राने स्वीकारलेल्या उद्दिष्टांच्या पूर्ततेत समान सहभाग घेतात. '
३. येंजामिन यांच्या मते, 'देशातील सर्व लोकांना समान अस्मितेसाठी सामील करून घेणे म्हणजे राष्ट्रीय एकात्मता होय' 'National Integration refers to the assimilation of the entire people of a country to a commen identity.
राष्ट्रीय एकात्मता निर्माण होण्यासाठी सामाजिक एकात्मता (Social Integration) व भावनिक एकात्मता (Emotional Integration) या दोन्ही गोष्टी घडून येणे आवश्यक असते. राष्ट्रातील विविध भागांचे म्हणजे वंश, धर्म, भाषा, जात वगैरे संपूर्ण राष्ट्रासाठी एकात्मीकरण होणे ही सामाजिक एकात्मता होय तर विविध भागांचे परस्परांशी एकात्मीकरण होणे म्हणजे भावनिक एकात्मता होय. भारतातील एका समूहाने राष्ट्राशी एकात्मीकरण साधताना दुसऱ्या समूहाशीदेखील एकात्मीकरण साधले पाहिजे.
त्याचप्रमाणे राष्ट्रीय एकात्मतेचा राष्ट्राच्या प्रादेशिक, राजकीय, आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक अशा परस्परसंबंधित विविध बाजूंशी संबंध असतो. राष्ट्रीय एकात्मतेची निर्मिती, विकास व स्थैयंही या सर्व बाजूंच्या समान विकासावर अवलंबून असते. केवळ राजकीय एकात्मता आहे, पण पराकोटीची आर्थिक विषमता राबविली जात असेल तर ती एकात्मता ही एकांगी एकात्मता होय. एकतेची भावना ही राष्ट्राच्या सर्व बाजूंनी दिसून आली पाहिजे.
राष्ट्रीय एकात्मता ही मानसिक भावना आहे, ती काही यांत्रिक पद्धतीने साध्य होणारे उत्पादन नाही. सर्व स्त्री-पुरुषांत जात, धर्म, वंश, भाषा इत्यादी भेदांवर मात करून सर्वांच्या मनात एकमेकांबद्दल बंधुत्वाची, एकतेची परिणामी राष्ट्रीयत्वाची भावना वास करीत राहिली पाहिजे. समूहनिष्ठा व राष्ट्रनिष्ठा यात नेहमीच राष्ट्रनिष्ठेच्या बाजूने कौल दिला पाहिजे. त्यासाठी विशिष्ट अशी मनोवृत्ती, विशिष्ट असा दृष्टिकोण निर्माण झाला पाहिजे. सर्वांची इच्छा, आकांक्षा यांच्यात सुसंवाद निर्माण झाला पाहिजे. राष्ट्रीयतेस पोषक अशा व्यक्तिमत्त्वाची जडणपडण झाली पाहिजे. यासाठी आपला धर्म, भाषा, वेश, चालीरीती, इच्छा-आकांक्षा पूर्णतया टाकून दिल्या पाहिजेत असे नव्हे तर, त्याचा असा
उभारणी व राष्ट्रीय एकात्मता
स्वीकार झाला पाहिजे की, ज्यामुळे राष्ट्रीय उद्दिष्टांशी त्याचा सुयोग्य सुसंवाद, मनोहारी •संगम होईल. विविधतेतून एकता याचा अर्थ हाच होय.
अर्थात, अशा प्रकारे १०० टक्के राष्ट्रीय एकात्मता ही आदर्शवादी कल्पना आहे. तरीही हे कल्पितादर्श लक्ष्य (प्रत्येक राष्ट्राने आपल्यासमोर ठेवणे आवश्यक आहे. त्याकडे जास्तीतजास्त जाणे म्हणजे राष्ट्रातील बहुविधतेत अधिकाधिक एकात्मता साधून अधिकाधिक राष्ट्रीय उद्दिष्टे पदरात पाडून घेऊन प्रगती करणे होय.
राष्ट्रीय एकात्मतेतील मूलतत्वे पुढीलप्रमाणे आहेत
१. राष्ट्रीय दृष्टिकोण
२. विविधतेत एकता
३. सर्वोच्च राष्ट्रीय निष्ठा
४. सर्वसमावेशकता
५. राष्ट्र विघातक घटकांवरील वर्चस्य
६. राष्ट्रीय उद्दिष्टांची पूर्तता
या उद्दिष्टांची पूर्तता केल्याने राष्ट्रीय एकात्मता साध्य होऊ शकते.
राष्ट्रीय एकात्मतेतील अडथळे
जेव्हा एखाद्या राष्ट्रातील विघटनकारी शक्ती तोंड वर काढून त्या देशातील राष्ट्रीय एकात्मता धोक्यात आणू पाहतात, तेव्हा राष्ट्रीय एकात्मतेची समस्या उभ्या देशाला आव्हान ठरते. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यापासून कमी-अधिक प्रमाणात राष्ट्रीय एकात्मतेस तडे जाऊन तिचे पुन्हा लहान-लहान तुकडे पडतात की काय ? किंवा पुन्हा दुसऱ्या राष्ट्राचे आपल्यावर पारतंत्र्य येईल की काय ? असे चिंता करायला लावणारे अनेक प्रसंग वा स्थिती निर्माण झाली.
स्वातंत्र्याच्या समान ध्येयांची पूर्तता झाल्यावर शिगेला पोहोचलेली राष्ट्रवादाची व राष्ट्रीय एकात्मतेची भावना ओसरू लागली. जात, धर्म, भाषा, प्रांत विविध आर्थिक, राजकीय हितसंबंध अशा संकुचित भावना बेबंद झाल्या. त्यांनी घोडयाच काळात आक्राळ-विक्राळ स्वरूप धारण केले. स्वतंत्र भारताचा इतिहास जसा एकीकडे वैभवशाली आहे तसा म. गांधींच्या हत्येपासून ते राजीव गांधींच्या हत्येपर्यंत विविध विघटनवादी शक्तींनी भारतातील एकात्मताच धोक्यात आणणारा भयावह, लांछनास्पद तसेच कल्याणकारी राज्याची प्रगती कुंठित करणारा प्रकार आहे.
भारताला स्वातंत्र्य प्राप्त होणे ही राजकीय एकात्मता साधण्याची बाब होती पण आर्थिक, सामाजिक व मानसिकदृष्ट्या एकात्मता साधण्यासाठी एकूण राष्ट्रीय एकात्मतेची भारतीय समान संरचना परिवर्तनशि.वि./२०
भारतीय समाज संरचना व परिवर्तन
भावना बलिष्ठ करण्याची नितांत आवश्यकता आहे. आपण अद्यापि दारिद्र्यावर मात करू शकलो नाही. बेकारांचा प्रश्न वाढत आहे. या प्रश्नांची सोडवणूक करावयाची आहे. अद्यापि, जातिभेद व जातीयता आहे. स्त्रियांना दुय्यम लेखून त्यांची पिळवणूक होत आहे. याबाबत कायदे केले तरी मानसिकदृष्ट्या विषमतेची भावना पोसली जात आहे. ही सामाजिक विषमता दूर करण्यासाठी राष्ट्रीय एकात्मतेचा परिपोष होणे अत्यावश्यक आहे. भारतातील विविध भाषिकात भाषावर प्रांतरचनेमुळे प्रांतवादाच्या संकुचित राजकारणाला बाव मिळाला पण त्यामुळे भारतातील शांतता, स्वास्थ्य व आर्थिक प्रगती धोक्यात आली आहे. विद्यार्थी, कामगार, शेतकरी, कर्मचारी, राजकीय पक्ष इत्यादी आपल्या मर्यादित पण रास्त हेतूसाठी जे मार्ग योजतात त्यातून भारताच्या प्रगतीस खीळ बसत आहे. विविध समूह आपल्या वेगवेगळ्या संकुचित मागण्यांना प्राधान्य देऊन त्यांची मागणी करीत आहेत. त्यासाठी संप, मोचें, घेराव, बंद, दंगल वगैरे मार्गाचा अवलंब करून भारताच्या प्रगतीला खीळ पाडत आहेत. शिवाय या फुटीरतेस भारताचे शेजारी शत्रुदेश व भारताची तिसरी शक्ती म्हणून भारताचे वाढणारे महत्त्व नको असणारे प्रगत व 'दादा देश' खतपाणी घालत आहेत. भारतातील असलेली विघटनकारी शक्ती, आंतरराष्ट्रीय गुंड व तस्कर यांना या कामी प्रशिक्षण, बॉम्बस्फोटासाठी साहित्य, स्वयंचलित आधुनिक हत्यारे, अडचणीच्यावेळी आश्रय, पैसा पुरवून, भारताबद्दलचा द्वेष वाढवत आहेत. त्यामुळे नागा लोकांचा प्रश्न, जम्मू काश्मीरचा प्रश्न, पाकिस्तानचा प्रश्न आदींना चालना मिळाली. तशात भारतात वाढत चाललेला भ्रष्टाचार, आर्थिक व सामाजिक विषमता, राजकारणातील गुन्हेगारी, राजकीय •व्यक्तींवर गुन्हेगारी जगताची वाढती पकड यामुळे मोठ्या प्रमाणात सामाजिक असुरक्षितता वाढत चाललेली आहे. अशा वेळी इंग्रजांचेच राज्य बरे होते असे वाटायला लागणे म्हणजे आपल्या राष्ट्रवादाचा तो पराभवच म्हटले पाहिजे. अशा स्थितीत आपणास एकीकडे आपली बहुविधता मर्यादित ठेवून, संकुचित विचारांना, शक्तींना बांध घालून प्रसंगी त्यांचे निराकरण, निर्दालन करून सर्वांगीण प्रगती करावयाची आहे. सामाजिक न्यायाची, समतेची सर्वांना समान संधीची, आर्थिक, सांस्कृतिक स्वातंत्र्याची पूर्तता करावयाची आहे. त्याचबरोबर आपले सार्वभौमत्व केवळ जपावयाचे नाही तर सुखी, समृद्ध व वैभवशाली बनायचे आहे. तेव्हा विविधतेतून एकता टिकविण्यासाठी व प्रगतीकडे वाटचाल करण्यासाठी राष्ट्रीय एकात्मतेला पर्याय नाही.
अन्यथा या देशातील मानसिक ऐक्य, सुरक्षिततेची भावना, सामाजिक स्वास्थ्य धोक्यात येऊन येथील विविधता बलिष्ठ होईल. यातूनच या देशाचे अनेक तुकडे होऊन हा देश छिन्नविछिन्न होईल. पुन्हा इतिहासाची पुनरावृत्ती होऊन या देशाचे स्वातंत्र्य, सन्मान, वैभव व अस्मिता नष्ट होऊन 'न भूतो न भविष्यती' अशा प्रकारचे प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष पारतंत्र्य आपणावर लादले जाऊ शकेल.
राष्ट्र उभारणी व राष्ट्रीय एकात्मत
आपल्या देशाचे अखंडत्व आणि अस्तित्व टिकवायचे असेल तर राष्ट्रीय एकात्मता ही सर्वाधिक महत्त्वाची गरज आहे. तथापि, ही राष्ट्रीय एकात्मता टिकविण्यात अनेक अडथळे येतात. या अडथळ्यांचा सारांश रूपाने पुढीलप्रमाणे विचार करता येतो.
९. भाषावाद (भारताच्या विविध प्रांतांत भाषावादाने संघर्ष निर्माण केला आहे आणि राजकीय नेते तर बाचे भांडवल करून सत्तेसाठी त्याचा वापर करीत आहेत. प्रशासनाच्या सोईकरिता भाषावार प्रांतरचना करण्याची निकड सरकारला जाणवली व त्यानुसार १९५५ ला अशी प्रांतरचना करण्यात आली. परंतु प्रशासनाची सोय बाजूलाच राहिली आणि त्यातून माणसे दुखावली गेली, दुरावली गेली. कानडी-मराठी, मराठी हिंदी असे बाद उफाळून आले. महाराष्ट्रात सध्या चालू असलेला भाषावाद ही तर एक राष्ट्रीय समस्याच बनली आहे. भाषावाद हा एक प्रकारे लोकांच्या मनात पूर्वग्रह निर्माण करतो. भाषावाद हा प्रदेशबाद व संकुचितपणा निर्माण करतो. तसेच प्रादेशिक राजकीय पक्षांना भाषावाद एक स्वतंत्र व्यासपीठ निर्माण करून देतो. त्यातून सीमावादाची निर्मिती होते. बेगळ्या राज्याची निर्मिती त्यातून पुढे येते. भाषावादातून भाषिक अल्पसंख्याकांचा छळ होऊ शकतो. या सर्वच गोष्टी राष्ट्रीय एकात्मतेला छेद देऊ शकतात.
२. संप्रदायवाद () एका समुदायातील लोकांनी दुसऱ्या समुदायातील आणि धर्मातील लोकांचा द्वेष करणे हा संप्रदायवाद असतो. प्रामुख्याने धार्मिक दंगली या संप्रदायवादातून निर्माण होतात. तसेच धार्मिक विद्वेषाची निर्मिती संप्रदायवादातून होत असते. हिंदू, मुस्लिमांचे अलिगड, भिवंडी, ठाणे, मालेगाव या ठिकाणचे संघर्ष, खलिस्तानची चळवळ, ख्रिश्चनांवर होणारे विविध राज्यांतील हल्ले, तसेच ख्रिश्चनांतर्फे केले जाणारे सक्तीचे धर्मांतर, बाहुबली येथे मूर्ती स्थापनेबाबत झालेला हिंदू-जैन यांतील संघर्ष इत्यादी घटना संप्रदायवादाशीच निगडित असून त्यातून राष्ट्रीय एकात्मता धोक्यात येते. संप्रदायवादामुळे द्वेष, वैरभावना वाढीस लागते. धर्मनिरपेक्षतेला त्यामुळे धक्का पोहोचतो.
३. जातिवाद () कोणत्याही एका जातीप्रती एकतर्फी अथवा पक्षपाती स्वरूपाची असणारी निष्ठा म्हणजे जातिवाद असतो. डी. एन. प्रसाद यांनी असे म्हटले आहे की, 'एखाद्या जातीशी असणारी निष्ठा जेव्हा कृतीत रूपांतरित होते तेव्हा तो जातिवाद होतो.' (
श्रेष्ठ-कनिष्ठत्वाची जाणीव, पवित्र अपवित्रपणाची भावना, आंतर्जातीय निर्बंध, जटिल स्वरूप, अस्पृश्यतेचे पालन, विशिष्ट जातींना मिळणाच्या सवलती आणि विभिन्न जातीतील दुरावा अशा कारणामुळे जातीयवादाची भावना फैलावते.
राष्ट्रीयत्वाची भावना विकसित होण्यास अशा जातिवादामुळे अडथळे निर्माण होतात.
मोठी गरज आहे. त्यात येणारे अडथळे म्हणजे जातिभेद व जातीयता, भाषावाद व प्रांतवाद, आर्थिक विषमता व वाढते दारिद्रय, विविध संकुचित विचारातून निर्माण होणारे संघर्ष व आंदोलने, सदोष शिक्षणव्यवस्था व अज्ञान, स्वार्थाने बरबटलेले राजकारण, गुन्हेगारी जगताने निर्माण केलेली असुरक्षितता, भ्रष्टाचार, शासकीय दिरंगाईचा कारभार, भारताच्या शत्रू राष्ट्रांनी भारताच्या प्रगतीत निर्माण केलेल्या अडचणी वगैरे मोठ्या प्रमाणात जाणवतात.
भारतातील धार्मिक, भाषिक, बांशिक, सांस्कृतिक बगैरे विविधता दूर करणे हुकूमशाहीलादेखील शक्य नाही. उलट तशा प्रयत्नाने या भारतातील राष्ट्रीय भावनाच नष्ट होतील. अराजक माजेल. तेव्हा एकीकडे ही विविधता तरी ठेवायची. पण या विविध लोकांत, समूहात आढळणारी आंतरिक एकात्मता जोपासण्यासाठी तिचे खऱ्या अर्थाने संवर्धन होण्यासाठी पुढील सूचनांचे पालन हा आपल्या सार्वजनिक व वैचारिक जीवनाचा भाग बनला पाहिजे. कारण संघर्ष, विरोध या मार्गांनी राष्ट्रीय एकात्मता साधली जाणार नाही तर सहकार्य, समन्वय, सहनशीलता, सद्भाव, सामंजस्य यांवर भर दिला पाहिजे.
१. दारिद्र्य व लोकसंख्येविरुद्ध सर्वकष लढा अद्यापि दारिद्रयरेषेखाली असणान्या कुटुंबांना जगणे हाच एक मुख्य प्रश्न आहे. अद्यापि, शेतीत ६५ टक्के लोक गुंतलेले आहेत. तेव्हा ग्रामीण भागातील अधिकाधिक लोकांना वस्तुनिर्मितीच्या क्षेत्राकडे वळवले पाहिजे. खेडयातून औद्योगीकरणांचा वेग वाढवला पाहिजे. शासन, नियोजन मंडळे, अर्थतज्ज्ञ, समाजशास्त्रज्ञ, उद्योगपती, कामगार नेते, राजकीय पक्ष आणि जनता या सर्वांच्या परस्पर सहकार्यातून व विचारविनिमयातून दारिद्र्य व लोकसंख्येची समस्या याविरुद्ध युद्ध पातळीवरून सर्वकष लढा दिला पाहिजे. प्रसंगी यासाठी पुरोगामी कायदे केले पाहिजेत. प्रशासनातील लाल फितीचा अडसर दूर झाला पाहिजे. 'गरिबी' ही केवळ शासनाने हटवायची गोष्ट नाही तर स्वतः गरिबांनीदेखील स्वावलंबनाचा व श्रमाचा मंत्र आचरला पाहिजे. आपले कुटुंब मर्यादित ठेवले पाहिजे. भारत हा गरिबीच्या दुष्टचक्रात सापडलेला देश आहे हे आपण पाठीमागच्या प्रकरणात पाहिलेच आहे. गरीब लोकांना रोजची भाजीभाकरी मिळाली नाही तर त्यांच्याकडून राष्ट्रनिष्ठेच्या व राष्ट्रीय एकात्मतेस पोषक वर्तनाच्या अपेक्षा करणे चूक ठरेल, असेच गरीब लोक राष्ट्रविघातक शक्तींच्या हातातील साधन बनतात. तेव्हा गरिबी व वाढती लोकसंख्या मर्यादित ठेवली पाहिजे..
२. संपर्क भाषेचा विकास व स्वीकार संपर्क भाषेचा प्रश्न हा केवळ सक्तीने नाही तर सामंजस्याने सोडवला पाहिजे. दक्षिणेतील राज्यांचे याबाबत मतपरिवर्तन होणे आवश्यक आहे. यासाठी हिंदी भाषेचा विकास झाला पाहिजे. भाषांतराच्या मार्गाने व नवीन ग्रंथ लेखनांच्या मार्गाने यावर अधिक भर दिला पाहिजे. विविध प्रादेशिक भाषांचादेखील