
अन्नपदार्थ
2
Answer link
आपण आपल्या आजूबाजूच्या बर्याच लोकांना पाहिले असेल जे अतिरीक्त बोलतात, नेहमीच ते खूप वेगवान असतात किंवा ते निर्णय पटकन घेतात. त्याचप्रमाणे काही लोक बसून पाय हलवतात. वास्तविक ही सर्व वैशिष्ट्ये वात संसर्ग असलेल्या लोकांची आहेत. वात संसर्ग असलेले बहुतेक लोक आपल्याला असे करताना दिसतील. गुण आणि लक्षणांच्या आधारे आयुर्वेदात निसर्गाचे निर्धारण केले गेले आहे. आपल्या सवयी किंवा लक्षणे पाहून आपल्या स्वभावाची कल्पना येऊ शकते.

‘वात’, ‘पित्त’ आणि ‘कफ’ हे शब्द आयुर्वेदाच्या संदर्भात नेहमी ऐकलेले असतात. पण हे नक्की काय असतं, त्याचा आपल्या रोजच्या जगण्याशी काय संबंध, हे सर्वाना माहीत नसतं. वात, पित्त आणि कफ हे तीन ‘दोष’ समजले जातात. दोषाधिक्यानं बनलेल्या ‘प्रकृती’ला आयुर्वेदात खूप महत्त्व आहे. प्रकृती आणि आहार या तर अगदी जवळच्या गोष्टी. आपल्या खाण्याच्या आवडीनिवडी जशा प्रकृतीवर अवलंबून असतात, तसंच काय खावं आणि काय टाळावं यातही प्रकृती-प्रकृतीमध्ये फरक असतो. काही पथ्यं पाळली तर प्रकृती बिघडल्यामुळे होणाऱ्या आजारांना प्रतिबंध करता येऊ शकतो.
सर्व प्रकारच्या कोरड्या उसळी, कोरडे अन्न, थंड अन्न, तूप, तेल विरहीत पदार्थ, मैद्याचे तळलेले पदार्थ, डबा बंद पदार्थ, शिळे अन्न, आंबवलेले अन्न पदार्थ, वाळवलेली फळे, आंबट फळे, आंबट पदार्थ, कच्च्या भाज्या, कच्चा कांदा, हे वात दोषांची वाढ करतात. कॉफी, ब्लॅक टी, ग्रीन टी, फळांचा रस इत्यादी थंडगार पेय घेण्याचे टाळले पाहिजे.
म्हणूनच वाट असणाऱ्या व्यक्तींनी पापड, लोणची, आंबवलेले बेकरीचे पदार्थ, अतिमसालेदार पदार्थ टाळावेत. सिगारेट, अल्कोहोल, तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थाचं सेवन खरं तर सर्वानीच टाळलेलं चांगलं, पण पित्त प्रकृतीच्या व्यक्तींना या गोष्टींचा त्रास लवकर होऊ शकतो. त्यामुळे त्यांनी या सवयी टाळलेल्याच बऱ्या.
वात प्रकृतीच्या व्यक्तींनी अन्न शक्यतो गरमच खावं. थंड आणि शिळं अन्न टाळावं. अशा लोकांनी शक्यतो उपवास टाळावा. चणे, राजमा अशी द्विदल धान्ये रुक्ष आणि वात वाढवणारी असतात. ती शक्यतो टाळली पाहिजेत.
आरोग्य संवाद