Topic icon

भू erosion

0

विदारण म्हणजे मोठ्या खडकांचे लहान तुकड्यांमध्ये रूपांतर होण्याची प्रक्रिया. ही प्रक्रिया खालील गोष्टींमुळे घडून येते:

  • तापमान बदल
  • पाणी
  • रासायनिक क्रिया
  • जैविक क्रिया

विदारणाचे मुख्य प्रकार:

  1. भौतिक विदारण: खडक लहान तुकड्यांमध्ये विभागले जातात, पण त्यांचे रासायनिक गुणधर्म बदलत नाहीत.
  2. रासायनिक विदारण: खनिजांची रासायनिक संरचना बदलते आणि नवीन खनिजे तयार होतात.
  3. जैविक विदारण: वनस्पती आणि प्राणी खडक तोडण्यास मदत करतात.

विदारण ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे जी पृथ्वीच्या पृष्ठभागाला आकार देण्यास मदत करते.

अधिक माहितीसाठी, आपण खालील संकेतस्थळांना भेट देऊ शकता:

उत्तर लिहिले · 23/3/2025
कर्म · 1440
1
*⭕'रांजणखळगे⭕*
*एक नैसर्गिक चमत्कार*

पुणे व नगर जिल्ह्यात शिरूर व पारनेर तालुक्याच्या सरहद्दी वरून कुकडी नदी वाहते. या कुकडी नदीवरच रांजण खळग्याच्या रूपात निसर्गाचा अनोखा आविष्कार पाहायला मिळतो.

नगरवरून याठिकाणी यायचे असेल, तर निघोज गावात यावे आणि पुण्यावरून यायचे असेल, तर शिरुरमार्गे टाकळी हाजी गावात यावे. पुणे आणि नगर जिल्ह्याच्या सरहद्दीवरच हे ठिकाण आहे. नदीत असणाऱ्या बेसॉल्ट खडकात रांजणाच्या आकाराचे प्रचंडमोठे खळगे पडले आहेत. त्यामुळेच
या ठिकाणाला रांजणखळगे म्हटले जाते. काही रांजणखळगे इतके जवळ आहेत, की त्यांच्या भिंती एकमेकांत मिसळून गेल्या
आहेत. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी असे रांजणखळगे आहेत; परंतु असे असंख्य रांजणखळगे कोठेही नाहीत. 1990मध्ये या ऐतिहासिक रांजणखळग्यांची नोंद "गिनीज बुक ऑफ रेकॉर्डस'
मध्ये सुद्धा करण्यात आली आहे.
हा नैसर्गिक चमत्कार
पाहण्यासाठी अनेक पर्यटक, अभ्यासक येथे येतात. नदीच्या काठावरच मळगंगा देवीचे मंदिर आहे. त्यामुळे भाविकांचीही येथे गर्दी असते. हे रांजणखळगे व्यवस्थित पाहायचे असतील, तर उन्हाळ्यात याठिकाणी यावे. रांजणखळग्यातून पाणी
वाहताना ते वळणदार गिरकी घेत घेत वाहते. नक्षीदार
पाण्याचे दृश्य पाहायचे असेल, तर मात्र पावसाळ्यात येथे अवश्य यावे. कुकडी नदीच्या काठावर मळगंगा देवीचे पांडवकालीन
मंदिर आहे. मंदिराच्या समोर एक कुंड आहे. Ⓜत्यात बाराही महिने पाणी असते. नदीच्या एका काठावर शिरूर
तालुक्यातील टाकळीहाजी येथे थोरली मळगंगा, तर दुसऱ्या बाजूला नगर जिल्ह्यात निघोजजवळ धाकटी मळगंगा, अशी दोन मंदिरे आहेत. नदीवर पर्यटकांच्या आकर्षणासाठी झुलता पूल बांधला आहे. खडकात तयार झालेले हे मोठमोठे गोलाकार
खड्डे पाहिल्यावर ते कसे तयार झाले हा प्रश्न मनात
साहजिकच येतो. पाण्याच्या प्रचंड प्रवाहामुळे दगडगोटे
फिरल्याने झालेल्या खडकाच्या झीजेमुळे हे तयार झालेअसावेत, असे म्हटले जाते.Ⓜ