
पदग्रहण आणि त्यागपत्र
5
Answer link
कोणत्याही सहकारी संस्थेमध्ये अध्यक्ष, सचिव, खजिनदार या पदाधिकाऱ्यांना अनन्यसाधारण महत्त्व असते. संस्थेचे कामकाज सुरळीत चालावे यासाठी या तिघा पदाधिकाऱ्यांना वेगवेगळे महत्त्वाचे अधिकार प्रदान करण्यात आले आहेत.
सहकारी संस्थांच्या कामकाज कार्यपद्धतीमध्ये उपविधींना जसे अनन्यसाधारण महत्त्व आहे तितकेच महत्त्व सहकारी गृहनिर्माण संस्थांमध्ये व्यवस्थापक समिती तथा कार्यकारिणीला असते. त्यातही कार्यकारिणीमधील अध्यक्ष-सचिव-खजिनदार या पदाधिकाऱ्यांनासुद्धा विशेष महत्त्व असते. संस्थेच्या कामकाजावर नियंत्रण ठेवण्याची व सर्व कामे व्यवस्थितपणे वेळेवर पार पाडण्याची जबाबदारी या तिन्ही पदाधिकाऱ्यांवर असते. संस्थेचा कारभार व व्यवहार तसेच संस्थेमधील व संस्थेबाहेरील सर्व कामे या पदाधिकाऱ्यांच्याच सह्य़ांनी होत असतात. बँक, व्यक्ती, संस्था व इतर प्राधिकरणांबरोबर करावयाचे अर्थव्यवहार, येणी-देणी हीसुद्धा अध्यक्ष-सचिव किंवा सचिव-खजिनदार यांच्या सह्य़ांनी होत असतात. इतकेच नाही, तर संस्थेची सभासूचना पत्रे, संस्थेचे सचिव किंवा अध्यक्ष यांच्या स्वाक्षरीने, तर वार्षिक हिशेबपत्रके-ताळेबंद संस्थेच्या अध्यक्ष-सचिव-खजिनदार यांच्या सह्य़ांनी सभेपुढे मंजुरीसाठी ठेवण्यात येतात. त्यामागील कारणे लक्षात घेतल्यास असे दिसून येईल की, संस्थेचे कामकाज चालविणे सुलभ व्हावे, त्याची जबाबदारी केंद्रित व्हावी, कामकाजात एकसू्त्रता राहून विलंब टळावा आणि महत्त्वाचे म्हणजे सभासदांवर चांगल्या प्रकारे नियंत्रण राहून शिस्त पाळली जावी, या दृष्टिकोनातून या तिन्ही पदाधिकाऱ्यांना ज्याप्रमाणे अधिकार प्रदान करण्यात आलेले आहेत, त्याचप्रमाणे त्यांच्यावर जबाबदाऱ्यासुद्धा सोपविण्यात आल्या आहेत.
पदाचा राजीनामा देण्याची पद्धत काय असते ?
१. अध्यक्ष सचिवांकडे राजीनामा देऊ शकतो,
२. सचिव किंवा खजिनदार अध्यक्षांकडे राजीनामा देऊ शकतात.
राजीनामा अमलात कधी येतो?
१. राजीनामा स्वीकारला गेला पाहिजे आणि
२. अध्यक्ष, सचिव, खजिनदार यांनी त्यांच्या कामाचा ताबा, नवीन निवडून आलेल्या अध्यक्ष, सचिव, खजिनदार यांना रीतसर दिल्यानंतरच राजीनामा अमलात येतो.
म्हणजेच नवीन पदाधिकारी कारभार स्वीकारपर्यंत तुम्हाला कामकाज बंद करता येत नाही. तसेच संस्थेची अडवणूक सुद्धा करता येत नाही.
राजीनामा कधी स्वीकारला जातो?
१. अध्यक्ष, सचिव, खजिनदार यांच्यावर सोपवलेली कामे अद्ययावत पूर्ण केली असली पाहिजेत
२. त्यांचे ताब्यातील संस्थेची सर्व कागदपत्र, दप्तर, मालमत्ता समितीच्या समोर सादर केली पाहिजे.
३. उक्त बाबींची पूर्तता झाल्यावरच समिती राजीनामा स्वीकारू शकते.
सहकारी संस्थांच्या कामकाज कार्यपद्धतीमध्ये उपविधींना जसे अनन्यसाधारण महत्त्व आहे तितकेच महत्त्व सहकारी गृहनिर्माण संस्थांमध्ये व्यवस्थापक समिती तथा कार्यकारिणीला असते. त्यातही कार्यकारिणीमधील अध्यक्ष-सचिव-खजिनदार या पदाधिकाऱ्यांनासुद्धा विशेष महत्त्व असते. संस्थेच्या कामकाजावर नियंत्रण ठेवण्याची व सर्व कामे व्यवस्थितपणे वेळेवर पार पाडण्याची जबाबदारी या तिन्ही पदाधिकाऱ्यांवर असते. संस्थेचा कारभार व व्यवहार तसेच संस्थेमधील व संस्थेबाहेरील सर्व कामे या पदाधिकाऱ्यांच्याच सह्य़ांनी होत असतात. बँक, व्यक्ती, संस्था व इतर प्राधिकरणांबरोबर करावयाचे अर्थव्यवहार, येणी-देणी हीसुद्धा अध्यक्ष-सचिव किंवा सचिव-खजिनदार यांच्या सह्य़ांनी होत असतात. इतकेच नाही, तर संस्थेची सभासूचना पत्रे, संस्थेचे सचिव किंवा अध्यक्ष यांच्या स्वाक्षरीने, तर वार्षिक हिशेबपत्रके-ताळेबंद संस्थेच्या अध्यक्ष-सचिव-खजिनदार यांच्या सह्य़ांनी सभेपुढे मंजुरीसाठी ठेवण्यात येतात. त्यामागील कारणे लक्षात घेतल्यास असे दिसून येईल की, संस्थेचे कामकाज चालविणे सुलभ व्हावे, त्याची जबाबदारी केंद्रित व्हावी, कामकाजात एकसू्त्रता राहून विलंब टळावा आणि महत्त्वाचे म्हणजे सभासदांवर चांगल्या प्रकारे नियंत्रण राहून शिस्त पाळली जावी, या दृष्टिकोनातून या तिन्ही पदाधिकाऱ्यांना ज्याप्रमाणे अधिकार प्रदान करण्यात आलेले आहेत, त्याचप्रमाणे त्यांच्यावर जबाबदाऱ्यासुद्धा सोपविण्यात आल्या आहेत.
पदाचा राजीनामा देण्याची पद्धत काय असते ?
१. अध्यक्ष सचिवांकडे राजीनामा देऊ शकतो,
२. सचिव किंवा खजिनदार अध्यक्षांकडे राजीनामा देऊ शकतात.
राजीनामा अमलात कधी येतो?
१. राजीनामा स्वीकारला गेला पाहिजे आणि
२. अध्यक्ष, सचिव, खजिनदार यांनी त्यांच्या कामाचा ताबा, नवीन निवडून आलेल्या अध्यक्ष, सचिव, खजिनदार यांना रीतसर दिल्यानंतरच राजीनामा अमलात येतो.
म्हणजेच नवीन पदाधिकारी कारभार स्वीकारपर्यंत तुम्हाला कामकाज बंद करता येत नाही. तसेच संस्थेची अडवणूक सुद्धा करता येत नाही.
राजीनामा कधी स्वीकारला जातो?
१. अध्यक्ष, सचिव, खजिनदार यांच्यावर सोपवलेली कामे अद्ययावत पूर्ण केली असली पाहिजेत
२. त्यांचे ताब्यातील संस्थेची सर्व कागदपत्र, दप्तर, मालमत्ता समितीच्या समोर सादर केली पाहिजे.
३. उक्त बाबींची पूर्तता झाल्यावरच समिती राजीनामा स्वीकारू शकते.