Topic icon

शिक्षण दिन

0
मुलींच्या शिक्षणासाठी शासनाने विविध महत्वपूर्ण योजना राबविल्या. मुलींचा शिक्षणातील टक्का वाढावा यासाठीही शासन सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. 3 जानेवारी ते 26 जानेवारी 2017 या कालावधीत शाळांमध्ये ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले लेक शिकवा अभियान राबविण्यात येत आहे. ...


ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले “लेक शिकवा” 
मुलींच्या शिक्षणासाठी शासनाने विविध महत्वपूर्ण योजना राबविल्या. मुलींचा शिक्षणातील टक्का वाढावा यासाठीही शासन सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. त्याचाच एक भाग म्हणून दि. 3 जानेवारी ते 26 जानेवारी 2017 या कालावधीत शाळांमध्ये ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले लेक शिकवा अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानाबाबतची माहिती देणारा लेख…

“विद्या हे धन आहे रे, श्रेष्ठ साऱ्या धनाहून, तिचा साठा जयापासी, आहे तो खरा धनवान” अशा शब्दात शिक्षणाचे महत्व सांगून स्त्री शिक्षणासाठी अहोरात्र सावित्रीबाई फुले यांनी जे कार्य केले त्याला जगाच्या इतिहासात तोड नाही. अज्ञान, अनिष्ट रुढी व परंपरांच्या विळख्यात गुरफटलेल्या समाजात स्त्रियांकडे तुच्छ म्हणून पाहिले जात होते. अशा काळात समाजाची वक्रदृष्टी स्वीकारुन स्त्रियांना चूल आणि मूल यातून बाहेर काढण्यासाठी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांनी पुण्यात मुलींसाठी पहिली शाळा काढून सामाजिक परिवर्तन चळवळीचा पाया घातला.

सावित्रीबाई यांच्या महान शैक्षणिक कार्याची ओळख शाळांतील विद्यार्थ्यांना व्हावी व त्यांच्या कार्याची प्रेरणा मिळावी यासाठी राज्यातील सर्व शाळांमधून “ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले लेक शिकवा अभियान” राबविण्याचा निर्णय शासनाने घेतला. हे अभियान 3 जानेवारी ते 26 जानेवारी 2017 या कालावधीत आयुक्त (शिक्षण) महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येत आहे.

बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम-2009 नुसार प्रत्येक बालकास समान गुणवत्तेचे मोफत व सक्तीचे प्राथमिक शिक्षण देण्याची कायदेशीर तरतूद करण्याची जबाबदारी राज्य शासनास सोपविली आहे. त्यानुसार राज्यात मुलींना शिक्षण घेण्यासाठी, प्रोत्साहित करण्यासाठी, मुलींच्या शिक्षणाला गती मिळावी, एकही मुलगी शिक्षणापासून वंचित राहू नये, मुलींच्या शिक्षणाला प्रतिष्ठा आणि गुणात्मक दर्जाचे अधिष्ठान लाभावे, परिस्थतीमुळे मुलींच्या शिक्षणात खंड पडू नये, शाळाबाह्य मुलींना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी विशेष प्रयत्न करणे, स्थलांतरीत पालकांच्या मुलींच्या अखंडीत शिक्षणाची हमी देणे, मुलींना शिक्षणाची प्रेरणा देणे, त्यांच्यात आत्मविश्वास रुजविणे, वैचारिक व तार्किक क्षमता निर्माण करणे, शारीरिक क्षमता वाढीस लावणे, त्यांच्या सृजनशीलतेस वाव देणे तसेच विशेष करुन माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षणातील विद्यार्थिनींची गळती कमी होणे यासाठी “ज्ञानज्योती सावित्रीबाई फले लेक शिकवा” अभियानांतर्गत विविध कार्यक्रमांचे आयोजन शाळांमध्ये करण्यात येत आहे.
उत्तर लिहिले · 28/8/2022
कर्म · 1975
0

'लेक शिकवा दिन' उत्साहात साजरा

मुंबई, [दिनांक]: राज्यात आज 'लेक शिकवा दिन' मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्ताने विविध शाळा, महाविद्यालये आणि सामाजिक संस्थांनी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते.

'लेक शिकवा' अभियानाचा उद्देश मुलींच्या शिक्षणाचे महत्त्व समाजात वाढवणे, त्यांना शाळेत पाठवण्यासाठी प्रोत्साहन देणे आणि शिक्षणाच्या माध्यमातून त्यांना सक्षम बनवणे हा आहे.

या दिनाचे औचित्य साधून अनेक ठिकाणी प्रभातफेऱ्या काढण्यात आल्या, ज्यात विद्यार्थी, शिक्षक आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने भाग घेतला.

[शहराचे नाव] येथील [शाळेचे नाव] मध्ये आयोजित कार्यक्रमात [प्रमुख पाहुण्यांचे नाव] यांनी मार्गदर्शन केले. ते म्हणाले, "मुली शिक्षित झाल्यास समाजाचा विकास अधिक वेगाने होतो. त्यामुळे प्रत्येक मुलीला शिक्षण मिळणे आवश्यक आहे."

या कार्यक्रमात विविध सांस्कृतिक कार्यक्रम देखील सादर करण्यात आले, ज्यात मुलींच्या शिक्षणाचे महत्त्व दर्शविणारी नाटके आणि गाणी सादर करण्यात आली.

'लेक शिकवा दिना'च्या निमित्ताने अनेक ठिकाणी गरीब व गरजू मुलींना शालेय साहित्य वाटप करण्यात आले.

यावर्षी 'लेक शिकवा दिना'ची थीम [थीम] होती, ज्यामध्ये [थीम विषयी माहिती] यावर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले.

एकंदरीत, 'लेक शिकवा दिन' उत्साहात साजरा झाला आणि या अभियानाला नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला.

- बातमीदार [तुमचे नाव]

उत्तर लिहिले · 24/3/2025
कर्म · 1440
0

'लेकी शिकवा दिन' जानेवारी महिन्यात सर्वत्र साजरा!

मुंबई, [दिनांक]: शिक्षण विभागाच्या परिपत्रकानुसार, यावर्षी जानेवारी महिन्यात 'लेकी शिकवा दिन' मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. राज्यातील सर्व शाळा आणि शैक्षणिक संस्थांमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.

कार्यक्रमाची रूपरेषा:

  • जागरूकता रॅली: गावोगावी 'लेकी शिकवा' या विषयावर जनजागृती करण्यासाठी रॅली काढण्यात येतील.
  • seminar (seminar): शिक्षणतज्ज्ञांचे व्याख्यान आयोजित केले जाईल, ज्यात शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले जाईल.
  • पथनाट्ये: ' Mulgi Vachva, Mulgi Shikva ' या विषयावर पथनाट्ये सादर केली जातील.
  • निबंध स्पर्धा व कला प्रदर्शन: विद्यार्थ्यांसाठी निबंध स्पर्धा व कला प्रदर्शन आयोजित केले जाईल, ज्यात 'शिक्षणाचे महत्त्व' या विषयावर आधारित कलाकृती सादर केल्या जातील.
उत्तर लिहिले · 23/3/2025
कर्म · 1440
3
देशाला IIT,IIM,UGC देणारे पहिले शिक्षण मंत्री #भारतरत्न_मौलाना_आजाद_जयंतीदिन #राष्ट्रीय_शिक्षा_दिन...
#National_Education_Day

मौलाना आजाद म्हणजे भारताच्या स्वतंत्र लढ्यातील एक मोलाच आणि अतुल्य योगदान असणारी व्यक्ती.ते एक विद्वान पत्रकार,लेखक,कवि,इस्लामचे अभ्यासक,हिंदु-मुस्लिम एकतेचे कट्टर समर्थक होते.तसेच विविध भाषेवर त्यांची पकड़ होती त्यात अरबी,फारसी,उर्दू,इंग्रजी सोबत गणीताचा विशेष अभ्यास.वाचनाची प्रचंड आवड.त्यांचा जास्त खर्च पुस्तके खरीदी करण्यावर होत असे.

ते एक उत्तम लेखक ही होते.विविध भाषा चांगल्या अवगत होत्या व ते त्या भाषांतून लिखाणही करीत असत.मौलाना आझाद यांनी इस्लामचा पवित्र धर्मग्रंथ कुराणाचा अभ्यास करून त्याचा केलेला अनुवाद ‘तर्जुमानुल कुरान’ही प्रसिद्ध आहे .ते एक उत्कृष्ट वक्तेदेखील होते. त्यांचे भाषण ऐकण्यासाठी हजारोंच्या संख्येने लोक उपस्थित राहत असत. ते हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक होते.ते भारताच्या स्वातंत्र्यसंग्रामातील एक निष्ठावान शिपाई होते. फारसा गाजावाजा न करता कार्य करीत राहणे हे त्यांचे वैशिष्ट्य होते.

वयाच्या 12 व्या वर्षी ते एक ग्रंथालय चालवत,वयाच्या पंधराव्या वर्षी ते वयाने दुप्पट मोठ्या असलेल्या मुलांना शिकवत असे,वयाच्या 16 व्या वर्षी त्यांनी स्वतःहा ची एक पत्रिका(वर्तमानपत्र) काढली होती.

भारतीय स्वतंत्र लढयात त्यांनी महत्वाची भूमिका बजावली.स्वतंत्र लढ्यातील विविध प्रमुख आंदोलनात सक्रिय सहभागी होते मग त्यात असहकार,खिलाफत, भारत छोड़ो सारखे आंदोलन असोत किंवा अन्य आंदोलन असोत.
ते दोन वेळा राष्ट्रीय काँग्रेस चे अध्यक्ष राहिले.पहिल्या वेळी1923 ला वयाच्या 35 व्या ते काँग्रेस अध्यक्ष झाले.1940 मध्ये दुसऱ्या वेळी काँग्रेसचे अध्यक्ष झाले.स्वतंत्र चळवळीतील ते एक महत्वाचे व्यक्ती म्हणून ओळखले जातात.

स्वतंत्र लढयानंतर स्वतंत्रभारताचे ते पहिले शिक्षण मंत्री झाले व नंतर शिक्षा आणी प्राकृतिक संसाधन व वैज्ञानिक अनुसंधान मंत्री झाले.
त्यांनी संगीत नाटक आकादमी(1953),
साहित्य आकादमी(1954),
ललित कला आकादमी(1954) ,
भारतीय सांस्कृतिक सबंध परिषद,
विश्वविद्यालय अनुदान आयोग(युजीसी),
आयआयटी खरगपुर 1951 साली मग मुंबई,चैनई,कानपुर,दिल्ली याठिकाणी ह्या महत्वाच्या संस्थेची स्थापना केली.
स्वतंत्र भारताचे पहिले शिक्षण मंत्री म्हणून जे कार्य केल ते अतिशय मोलाच होत.त्यांचे शैक्षणिक धोरण धर्मनिरपेक्ष होते. आधुनिक शास्त्रे आणि आधुनिक विचार यांनाच त्यांच्या शैक्षणिक धोरणात प्राधान्य होते.म्हणूनच त्यांचा जन्मदिन राष्ट्रीय शिक्षा दिवस साजरा केला जातो.

अश्या अतिशय थोर आणि विद्वान व्यक्तीमहत्वाची आज जयंती ...त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन.
सर्वांना राष्ट्रीय शिक्षा दिनाच्या शुभेच्छा...💐💐💐
उत्तर लिहिले · 12/11/2019
कर्म · 569245