Topic icon

स्वयं अध्ययन

0

स्वयं अध्ययन म्हणजे स्वतःहून शिकणे. यात, व्यक्ती स्वतःच आपल्या शिक्षणाची जबाबदारी घेते.

स्वयं अध्ययनाचे फायदे:

  • वेळेची बचत: व्यक्ती आपल्या सोयीनुसार आणि वेळेनुसार अभ्यास करू शकते.
  • खर्चात बचत: पारंपरिक शिक्षण पद्धतीच्या तुलनेत खर्च कमी असतो.
  • आवडीचे विषय: स्वतःच्या आवडीनुसार विषय निवडता येतात.
  • आत्मविश्वास वाढतो: स्वतःच्या प्रयत्नांनी ज्ञान मिळवल्याने आत्मविश्वास वाढतो.

स्वयं अध्ययन कसे करावे:

  1. ध्येय निश्चित करा: काय शिकायचे आहे ते ठरवा.
  2. वेळापत्रक तयार करा: अभ्यासासाठी वेळ निश्चित करा.
  3. शिकण्याचे साहित्य: पुस्तके, ऑनलाइन कोर्स, व्हिडिओ इत्यादींचा वापर करा.
  4. नोट्स तयार करा: महत्त्वाचे मुद्दे लिहून घ्या.
  5. उजळणी करा: नियमितपणेnotes आणि पाठांची उजळणी करा.

स्वयं अध्ययन ही एक प्रभावी शिक्षण पद्धती आहे.
अधिक माहितीसाठी आपण हे पाहू शकता: विकिपीडिया

उत्तर लिहिले · 25/3/2025
कर्म · 1240
2
स्वयं अध्ययन म्हणजे क्लासेस न लावता, शाळा, कॉलेज रेग्युलर न करता घरच्या घरीच स्वतः पुस्तकांच्या माध्यमातून अभ्यास करणे होय. बरेच विद्यार्थी अनेक कारणांमुळे स्वयं अध्ययन करतात. ते मोठे अधिकारी सुद्धा होतात. आता तर या कोरोनाच्या काळात सर्वचजण स्वयं अध्ययन करत आहेत.
उत्तर लिहिले · 9/3/2023
कर्म · 53710
0
स्वयं अध्ययन म्हणजे क्लासेस न लावता, शाळा, कॉलेज रेग्युलर न करता घरच्या घरीच स्वतः पुस्तकांच्या माध्यमातून अभ्यास करणे होय. बरेच विद्यार्थी अनेक कारणांमुळे स्वयं अध्ययन करतात. ते मोठे अधिकारी सुद्धा होतात. आता तर या कोरोनाच्या काळात सर्वचजण स्वयं अध्ययन करत आहेत.
उत्तर लिहिले · 9/3/2023
कर्म · 53710
14
स्वयंअध्ययन म्हणजे काय? अभ्यासासाठी दुसऱ्यावर अवलंबून न राहता स्वतःच विविध विषयांचा अभ्यास करणे, दुसऱ्याच्या नोटस्‌ अथवा बाजारपेठेतील रेडिमेड नोटस्‌ न हाताळता स्वतःच्या नोटस्‌ तयार करणे होय. या व्यतिरिक्त वार्षिक, सहामाही, मासिक व दैनंदिन अभ्यासाचे नियाजन करणे. आकलन, साठवण व वेळच्या वेळी उजळणी करून अभ्यासात रममाण होणे म्हणजे स्वयंअध्ययन पद्धतीचा वापर करणे होय. या पद्धतीमुळे तरुणाच्या सर्वांगीण उन्नतीच्या शक्‍यता बळावतात.

सुरुवातीला या पद्धतीसाठी वेळ लागत असला, तरी काही दिवसांनी याचे फायदेच अधिक वाट्याला येतात. आजकाल अनेक क्‍लासेसमुळे मुलांची स्वयंअध्ययनाची सवयच संपत चालली आहे. केवळ मार्कांच्या फूटपट्ट्या लावून आपण जगातील समृद्ध ज्ञान समजावून घेण्याचा प्रयत्न करतोय. केवळ घोकंपट्टीच्या तंत्राने बोलके पोपट तयार होत असतीलही; पण या समाजाला चिंतनशील, अनुभवसंपन्न व ज्ञानी अधिकाऱ्याची गरज आहे. त्यासाठीच आयोगाकडून बदलण्यात आलेल्या अभ्यासक्रमात आकलनाला अन्यन्यसाधारण महत्त्व दिले गेले आहे. या स्पर्धा परीक्षेत असाच विद्यार्थी स्वतःचे अस्तित्व निर्माण करू शकतो. ज्याच्याकडे एकलव्यासारखी तळमळ, स्वयंअध्ययनाची पद्धती आणि चिकाटी आहे.

उत्तर लिहिले · 25/5/2018
कर्म · 800