
क्षेपणास्त्र
3
Answer link
*🤔 काय असतं बॅलेस्टिक क्षेपणास्त्र?*
या क्षेपणास्त्राचा आकार प्रचंड मोठा असतो आणि ते मोठ्या वजनाचे बाँब वाहून नेऊ शकतात. एकदा सोडल्यानंतर हे क्षेपणास्त्र नष्ट करता येत नाही.
💣 बॅलेस्टिक क्षेपणास्त्रासोबत त्याचं इंधनही असतं आणि त्यात वापरला जाणारा ऑक्सिजनही सोबतच असतो.
💥 बॅलेस्टिक क्षेपणास्त्र सोडल्यानंतर हवेमध्ये अर्धचंद्राकार मार्गानं आगेकूच करतं आणि रॉकेटसोबत त्याचा संपर्क तुटल्यानंतर त्यावर असलेला बाँब गुरूत्वाकर्षणाच्या प्रभावामुळं जमिनीवर पडतो.
〰 याच कारणामुळं एकदा सोडल्यानंतर या क्षेपणास्त्राच्या लक्ष्यावर कोणतंच नियंत्रण राहत नाही.
🔵 बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांचा वापर हा मुख्यत्वे अणुबाँब वाहून नेण्यासाठी होतो, मात्र कधीकधी पारंपरिक हत्यार वाहून नेण्यासाठीदेखील ही क्षेपणास्त्रं वापरली जातात.
या क्षेपणास्त्राचा आकार प्रचंड मोठा असतो आणि ते मोठ्या वजनाचे बाँब वाहून नेऊ शकतात. एकदा सोडल्यानंतर हे क्षेपणास्त्र नष्ट करता येत नाही.
💣 बॅलेस्टिक क्षेपणास्त्रासोबत त्याचं इंधनही असतं आणि त्यात वापरला जाणारा ऑक्सिजनही सोबतच असतो.
💥 बॅलेस्टिक क्षेपणास्त्र सोडल्यानंतर हवेमध्ये अर्धचंद्राकार मार्गानं आगेकूच करतं आणि रॉकेटसोबत त्याचा संपर्क तुटल्यानंतर त्यावर असलेला बाँब गुरूत्वाकर्षणाच्या प्रभावामुळं जमिनीवर पडतो.
〰 याच कारणामुळं एकदा सोडल्यानंतर या क्षेपणास्त्राच्या लक्ष्यावर कोणतंच नियंत्रण राहत नाही.
🔵 बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांचा वापर हा मुख्यत्वे अणुबाँब वाहून नेण्यासाठी होतो, मात्र कधीकधी पारंपरिक हत्यार वाहून नेण्यासाठीदेखील ही क्षेपणास्त्रं वापरली जातात.
0
Answer link
भारताचे मिसाइल मॅन म्हणून ओळखले जाणारे डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांनी कोणत्याही विशिष्ट 'मिसाइल'चा शोध लावला नाही.
ते एक एरोस्पेस वैज्ञानिक आणि इंजिनियर होते. त्यांनी भारताच्या क्षेपणास्त्र विकास कार्यक्रमात (Missile Development Programme) महत्त्वपूर्ण योगदान दिले.
त्यामुळे, त्यांना 'भारताचे मिसाइल मॅन' म्हणून ओळखले जाते.
अधिक माहितीसाठी:
3
Answer link
हवाई दलाच्या ‘सुखोई-३०’ प्रकारच्या ४० लढाऊ विमानांवर ब्रह्मोस क्रूझ क्षेपणास्त्रे बसवण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आल्याची माहिती हवाई दलाच्या सूत्रांनी दिली. पाकिस्तान आणि चीन यांच्याशी एकाच वेळी युद्धाची शक्यता नाकारता येत नसताना सुखोई ब्रह्मोस सज्ज केल्याने हवाई दलाच्या मारक क्षमतेत मोठी वाढ होणार आहे.
मुळात सुखोई हे अत्यंत कार्यक्षम लढाऊ विमान आहे. त्यावर ब्रह्मोससारखे जगातील सर्वाधिक वेगवान क्रूझ क्षेपणास्त्र बसवल्यावर त्याची मारक क्षमता बरीच वाढणार आहे. ब्रह्मोस हे भारत आणि रशियाच्या संयुक्त विद्यमाने तयार करण्यात आलेले क्षेपणास्त्र आहे. त्याचे वजन २.५ टन असून ते ध्वनीच्या २.८ पट वेगाने २९० किलोमीटरवरील लक्ष्याचा पारंपरिक किंवा आण्विक स्फोटकांनिशी अचूक वेध घेऊ शकते. आजवर त्याचा पल्ला वाढवण्यावर नियंत्रणे होती.
मात्र गतवर्षी भारताला मिसाइल टेक्नॉलॉजी कंट्रोल रिजिम (एमटीसीआर) या संघटनेचे सदस्यत्व मिळाल्यानंतर ती नियंत्रणे हटू शकतील आणि ब्रह्मोसचा पल्ला ४०० किमीपर्यंत वाढवणे शक्य होईल.
हवाई दलाने २२ नोव्हेंबर रोजी सुखोईवरून ब्रह्मोस डागण्याची यशस्वी चाचणी घेतली होती. ब्रह्मोस क्षेपणास्त्रे डागण्यासाठी सुखोई विमानांमध्ये काही रचनात्मक, इलेक्ट्रॉनिक आणि सॉफ्टवेअरचे बदल करावे लागतील. त्याचे काम सुरू करण्यात आले आहे. त्या कामाचे निश्चित वेळापत्रक जाहीर करण्यात आले नसले तरी २०२० सालापर्यंत ४० सुखोई विमानांवर ब्रह्मोस बसवण्याची प्रक्रिया पूर्ण होईल असा अंदाज आहे. त्यामुळे शत्रूपासून सुरक्षित अंतरावर राहून शत्रूच्या प्रदेशात खोलवर आणि अचूक मारा करण्याची क्षमता वाढणार आहे.
मुळात सुखोई हे अत्यंत कार्यक्षम लढाऊ विमान आहे. त्यावर ब्रह्मोससारखे जगातील सर्वाधिक वेगवान क्रूझ क्षेपणास्त्र बसवल्यावर त्याची मारक क्षमता बरीच वाढणार आहे. ब्रह्मोस हे भारत आणि रशियाच्या संयुक्त विद्यमाने तयार करण्यात आलेले क्षेपणास्त्र आहे. त्याचे वजन २.५ टन असून ते ध्वनीच्या २.८ पट वेगाने २९० किलोमीटरवरील लक्ष्याचा पारंपरिक किंवा आण्विक स्फोटकांनिशी अचूक वेध घेऊ शकते. आजवर त्याचा पल्ला वाढवण्यावर नियंत्रणे होती.
मात्र गतवर्षी भारताला मिसाइल टेक्नॉलॉजी कंट्रोल रिजिम (एमटीसीआर) या संघटनेचे सदस्यत्व मिळाल्यानंतर ती नियंत्रणे हटू शकतील आणि ब्रह्मोसचा पल्ला ४०० किमीपर्यंत वाढवणे शक्य होईल.
हवाई दलाने २२ नोव्हेंबर रोजी सुखोईवरून ब्रह्मोस डागण्याची यशस्वी चाचणी घेतली होती. ब्रह्मोस क्षेपणास्त्रे डागण्यासाठी सुखोई विमानांमध्ये काही रचनात्मक, इलेक्ट्रॉनिक आणि सॉफ्टवेअरचे बदल करावे लागतील. त्याचे काम सुरू करण्यात आले आहे. त्या कामाचे निश्चित वेळापत्रक जाहीर करण्यात आले नसले तरी २०२० सालापर्यंत ४० सुखोई विमानांवर ब्रह्मोस बसवण्याची प्रक्रिया पूर्ण होईल असा अंदाज आहे. त्यामुळे शत्रूपासून सुरक्षित अंतरावर राहून शत्रूच्या प्रदेशात खोलवर आणि अचूक मारा करण्याची क्षमता वाढणार आहे.