Topic icon

त्सुनामी

0

त्सुनामी म्हणजे काय?

त्सुनामी हा एक जपानी शब्द आहे. "त्सु" म्हणजे बंदर आणि "नामी" म्हणजे लाट. याचा अर्थ "बंदराची लाट" असा होतो.

त्सुनामी ही समुद्रातील लाटांची मालिका आहे, जी मोठ्या प्रमाणात पाणी विस्थापित झाल्यामुळे निर्माण होते.

या लाटा किनाऱ्याजवळ आल्यावर त्यांची उंची वाढते आणि त्या विनाशकारी ठरू शकतात.

त्सुनामी कशामुळे येतात?

त्सुनामी येण्याची मुख्य कारणे खालीलप्रमाणे आहेत:

  • भूकंप: समुद्राच्या तळाशी होणारे मोठे भूकंप हे त्सुनामीचे मुख्य कारण आहे. जेव्हा दोन टेक्टॉनिक प्लेट्स एकमेकांवर आदळतात किंवा सरकतात, तेव्हा अचानक ऊर्जा बाहेर पडते आणि त्यामुळे त्सुनामी निर्माण होते.
  • ज्वालामुखीचा उद्रेक: समुद्रातील ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे मोठ्या प्रमाणात पाणी विस्थापित होते आणि त्सुनामी येऊ शकते.
  • भूस्खलन: समुद्राच्या आत होणारे भूस्खलन देखील त्सुनामी निर्माण करू शकते.
  • उल्कापात: समुद्रात उल्का पडल्यास त्सुनामी येऊ शकते, पण हे अत्यंत दुर्मिळ आहे.

अधिक माहितीसाठी:

NOAA बद्दल अधिक माहिती

हवामान अंदाज


उत्तर लिहिले · 22/3/2025
कर्म · 980
16
त्सुनामी हा जपानी शब्द आहे. "हार्बर वेव्हज्" किंवा "बंदरातील लाटा" असा त्सुनामीचा अर्थ आहे. समुद्रतळावर किंवा समुद्रतळाखाली झालेल्या भूकंपामुळे समुद्रपृष्ठावर तयार होणाऱ्या अतिदिर्घ लांबीच्या विध्वंसक लाटा असा त्सुनामीचा शब्दशः अर्थ आहे..

*** त्सुनामी लाटा पुढील कारणांनी तयार होतात.

1) समुद्रातळावर किंवा समुद्रतळाखाली होणारा भूकंप
2) ज्वालामुखीचा उद्रेक
3) सागरतळावर उद्रेक

26 डिसेंबर 2004 रोजी त्सुनामी लाटांनी श्रीलंका, इंडोनेशिया, भारत, थायलंड, आणि मलेशिया इथल्या प्रभावक्षेत्रात थैमान घातले......
उत्तर लिहिले · 6/7/2018
कर्म · 77165
1


सुनामी



सुनामी किनाऱ्याला धडकताना

सुनामी (जपानी: 津波 ; रोमन लिपी: Tsunami ;) म्हणजे समुद्र किंवा सरोवरातील पाणी वेगाने आणि मोठ्या प्रमाणात स्थानांतरीत होते. त्यावेळी निर्माण होणाऱ्या लाटांची मालिका होय. भूकंप, ज्वालामुखीचा उद्रेक किंवा उल्कायांमुळे सुनामी निर्माण होवू शकतात. इ.स. २००४ हिंदी महासागर भूकंप व सुनामी हा रविवार, २६ डिसेंबर इ.स. २००४ रोजी ००:५८:५३ यूटीसी वाजता (०६:२८:५३ वाजता भारतीय प्रमाणवेळेनुसार) एक समुद्राखालील भूकंप होता. रिश्टर स्केलवर Mw 9.1–9.3 इतक्या क्षमतेवर मोजल्या गेलेल्या ह्या भूकंपाचे केंद्र इंडोनेशिया देशाच्या सुमात्रा बेटाच्या पश्चिमेकडे हिंदी महासागरामध्ये होते. भूकंपमापन यंत्रावर मोजला गेलेला आजवरचा हा जगामधील तिसऱ्या क्रमांकाचा मोठा भूकंप आहे. ह्या भूकंपानंतर उसळलेल्या सुनामीमुळे इंडोनेशिया, श्री लंका, भारत व थायलंडसह १४ देशांमधील २.३ लाख लोक मृत्यूमुखी पडले. जगामधील सर्वात प्रलयंकारी नैसर्गिक संकटांमध्ये ह्या भूकंपाचा समावेश होतोUpdated by Omprakashji Korde "....



सुनामी किनाऱ्याला धडकताना तयार होणारी मोठी लाट

सुनामी हा जपानी शब्द असून त्याचा अर्थ "बंदरातील लाटा" ( त्सु 津- बंदर, नामी 波 - लाटा ) असा आहे. हा शब्द कोळ्यांत प्रचलीत होता. मासेमारी करून परत आलेल्या कोळ्यांना संपूर्ण बंदर नाश पावलेले दिसे, पण समुद्रात लाटा दिसत नसत; त्यामुळे हे नाव देण्यात आले.

किनाऱ्यापासून दूर समुद्रात या लाटांची उंची जास्त नसते पण तरंगलांबी जास्त असते. त्यामुळे त्या दिसून येत नाहीत. परंतु जेव्हा या लाटा किनाऱ्याला धडकतात त्यावेळी त्यांची उंची वाढते व तरंगलांबी कमी होते, त्यामुळे पाण्यातील शक्ती किनाऱ्यावर आदळून नुकसान होते. खोल समुद्रामध्ये सुनामीची तरंगलांबी २०० कि.मी. व तरंगउंची १ मीटर असते. त्यावेळी वेग साधारण ताशी ८०० कि.मी. असतो.सुनामी किनाऱ्याला धडकताना त्यांचा वेग व ताकद धडक देते व नुकसान घडते.
उत्तर लिहिले · 8/2/2018
कर्म · 11275