
तोंडी स्वच्छता
1
Answer link
आपल जेवणाच ताट जस आपण जेवल्यानंतर स्वच्छ करतो त्याप्रमाणे तोंड सुद्धा जेवल्यानंतर स्वच्छ करायला पाहिजे. आपले तोंड चांगले धुतले गेले नाही तरी तोंडाचा वास येतो.सकाळी तोंड कसे धुवायचे हे सांगते.तुम्ही असे तोंड आठवड्यातून एकदा तरी धुवून बघा,काही फरक नक्कीच पडेल.




सकाळी ब्रश केल्यानंतर तोंड खालील प्रमाणे धुवावे.
तोंड धुण्याची योग्य पद्धती:-
तोंड धुताना प्रथम घोटभर पाण्याची चूळ भरून तोंड ओले करून हाताच्या बोटाचा अंगठा व त्यासमोरील बोटाच्या चिमटीत प्रत्येक दात अगदी मुळा पासून दाढे सकट हलकेच दाबत खाली ओढवा याप्रमाणे एक एक करून सर्व दात व दाढेचा मसाज होतो व दात स्वच्छ ही होतो .

हे झाले की हाताच्या बोटांची मूठ वळायची फक्त अंगठा मोकळा ठेवायचा तळहाताच्या अंगठ्याचा भागाने तोंडात वरच्या बाजूने घशाला अंगठ्याने हलकेच मसाज करून अंगठा आत बाहेर ,आजूबाजूला फिरवावा अगदी वरची पडजिभ हाताला लागेपर्यंत फिरवावे म्हणजे आतला चिकट थर बाहेर येतो.

तसेच खाली जिभेला सुद्धा हाताच्या करंगळी आणि अंगठा सोडून उरलेल्या तीन बोटांनी जिभेला बोट जातील तिथपर्यंत मसाज करावा आतील चिकट बेडकी बाहेर येतील.

नंतर पाण्याने तीन चार वेळा चुळ भरावी. बोटांनी तोंडात फिरवून पाण्याने चूळ भरावी.
याप्रमाणे नक्की तोंड धुवून बघा .आणि काही खाल्ले की चूळ भरायची आठवड्यातून एक दोन वेळा तुरटी च्या पाण्याच्या किंवा कोमट पाण्याच्या गुळण्या करायच्या.अशा पद्धतीने तोंड चांगले स्वच्छ केले तर कदाचित तोंडाचा वास येणार नाही. करून बघा.

12
Answer link
तोंडाला वास आल्यास तुम्ही दररोज सकाळी मिठाच्या कोमट पाण्याने गुळण्या करा... दुपारी/रात्री दोन्ही वेळचे जेवण केल्यानंतर बडीशेप खा... बडीशेप छान तव्यावर भाजून घ्या...(दीर्घकाळ टिकते) करपवू नका... मंद आचेवर परतत रहा... त्यात ओवा सुद्धा घेऊ शकता... पचनास ही मदत होईल... एका काचेच्या किंवा स्टीलच्या बरणीत भरून ठेवावी..(प्लास्टिकची बरणी नको)... दररोज जेवणानंतर अवश्य घ्यावी... मुखवास दुर्गंध येणार नाही.