Topic icon

पथनाट्ये

0
निश्चितपणे, मूल्यांवर आधारित अनेक मराठी पथनाट्ये (स्ट्रीट प्ले) आहेत. हे पथनाट्ये सामाजिक समस्या, नैतिक मूल्ये आणि जनजागृती यांवर आधारित असतात. काही प्रमुख विषय खालीलप्रमाणे आहेत:

1. शिक्षण: शिक्षणाचे महत्त्व, शिक्षणापासून वंचित राहिल्याने होणारे दुष्परिणाम यावर आधारित पथनाट्ये समाजात जागरूकता निर्माण करतात.

2. स्वच्छता: स्वच्छतेचे महत्त्व, सार्वजनिक ठिकाणी कचरा न टाकणे, वैयक्तिक स्वच्छता आणि आरोग्य यावर आधारित पथनाट्ये लोकांमध्ये स्वच्छतेची जाणीव करून देतात.

3. व्यसनमुक्ती: दारू, सिगारेट, तंबाखू आणि इतर व्यसनांच्या आहारी जाणाऱ्या लोकांना त्यातून बाहेर काढण्यासाठी जनजागृती करणारे पथनाट्ये.

4. अंधश्रद्धा निर्मूलन: समाजात पसरलेल्या अंधश्रद्धा, रूढी आणि परंपरा यांवर प्रहार करून वैज्ञानिक दृष्टिकोन वाढवणारे पथनाट्ये.

5. सामाजिक सलोखा: जातीभेद, धर्मभेद विसरून एकोप्याने राहण्याचे महत्त्व पटवून देणारे पथनाट्ये.

6. पर्यावरण संरक्षण: झाडे लावा, पाणी वाचवा, प्रदूषण टाळा यांसारख्या विषयांवर आधारित पथनाट्ये पर्यावरणाचे महत्त्व सांगतात.

7. महिला सक्षमीकरण: स्त्री शिक्षणाचे महत्त्व, महिलांवरील अत्याचार, हुंडाबळी यांसारख्या समस्यांवर आधारित पथनाट्ये महिलांना सक्षम बनण्यास प्रोत्साहित करतात.

याव्यतिरिक्त, बालविवाह, बालकामगार, मानवी हक्क, भ्रष्टाचार यांसारख्या विषयांवरही पथनाट्ये तयार केली जातात.

मराठीमध्ये अनेक संस्था आणि ना Keene कलाकार हे सामाजिक संदेश देण्यासाठी पथनाट्यांचा प्रभावीपणे वापर करतात.

उत्तर लिहिले · 8/5/2025
कर्म · 1860
0

मुलगी झाली हो - पथनाट्याची ओळख

'मुलगी झाली हो' हे पथनाट्य स्त्री भ्रूणहत्या आणि मुलींच्या जन्माबद्दल समाजाचा नकारात्मक दृष्टिकोन या विषयांवर आधारित आहे. समाजामध्ये मुलगा हवा असतो आणि मुलगी नको असते, त्यामुळे भ्रूणहत्या केली जाते. ह्या गंभीर समस्येवर प्रकाश टाकणे हा या नाटकाचा उद्देश आहे.

या नाटकामध्ये खालील गोष्टी दाखवल्या जातात:

  • समाजामध्ये स्त्रियांबद्दल असलेली चुकीची विचारसरणी.
  • भ्रूणहत्येचे दुष्परिणाम.
  • मुलींचे शिक्षण आणि सक्षमीकरण किती महत्त्वाचे आहे.
  • मुलगा आणि मुलगी यांच्यात कोणताही भेदभाव करू नये.

हे पथनाट्य लोकांना विचार करायला लावते आणि समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी प्रोत्साहित करते.

हे नाटक खालील उद्दिष्टांसाठी काम करते:

  • स्त्री भ्रूणहत्या थांबवणे.
  • मुलींच्या शिक्षणाला प्रोत्साहन देणे.
  • समाजात स्त्री-पुरुष समानता वाढवणे.

टीप: ह्या पथनाट्याबद्दल अधिक माहिती उपलब्ध नाही.

उत्तर लिहिले · 22/3/2025
कर्म · 1860
6
पथनाट्य किंवा स्ट्रीट प्ले हा नाटकाचा एक महत्त्वाचा प्रकार आहे. पथनाट्य हे रस्त्यावर किंवा चौकाचौकांत चालत असले तरी, आज रस्त्यावर चालणार्‍या गारुड्याच्या किंवा डोंबार्‍याच्या खेळांना कुणी पथनाट्य म्हणत नाही. पथनाट्य हा निव्वळ करमणुकीचा प्रकार नाही; ते निर्हेतुक असूच शकत नाही. विशिष्ट सामाजिक वा राजकीय विचार जनमानसात पोचवण्याचे काम ही पथनाट्ये करत असतात. ती एक सामाजिक चळवळ आहे. विशिष्ट विचारसरणी असलेले कलाकार आपल्या अभिनयाद्वारे त्यांचा विचार पसरवण्याचे काम अशा नाटकांद्वारे करत असतात. रस्त्यावर चालणार्‍या मोर्चा, घेराव, जाहीर सभा यांपेक्षा पथनाट्य वेगळे आहे. आर्थिक-सामाजिक विषमता, स्त्रियांवरील अत्याचार, पोलिसांची दडपशाही, सरकारची अकार्यक्षमता, नोकरशाहीची चालढकलवृत्ती, धार्मिकतेचे स्तोम, भ्रष्टाचार, पर्यावरणाचा प्रश्न आदी अनेक विषयांवर ही पथनाट्ये भाष्य करून रस्त्यावरील प्रेक्षकांमध्ये जागृतीचे काम करीत असतात. पथनाट्याच्या कलावंतांना उंच स्वरात बोलावे लागते. त्यांचा सारा भर अभिनयापेक्षा प्रेक्षकांना प्रश्नाची जाणीव करून देण्यात असतो. आपल्या आकर्षक आणि चटकदार संवादांतून रस्त्यावरील प्रेक्षकांना जखडून कसे ठेवायचे यातच त्या कलावंतांचा सगळा प्रयत्‍न असतो.

दर वर्षी पाच नोव्हेंबरला रंगभूमी दिनाच्या निमित्ताने नाट्यसमर्पित ह्या संस्थेतर्फे अहमदनगरचे डॉ.रवींद्र चव्हाण हे राज्यपातळीवर पथनाट्य स्पर्धा घेतात. यापूर्वी भोपाळमध्ये १९८४ साली तिथल्या रंगमंडल या संस्थेने अखिल भारतीय पथनाट्य शिबिर भरवले होते. मुंबईची जागर ह्या संस्थेने अनेक पथनाट्ये सादर केली आहेत. भारताच्या तत्कालीन पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांनी लादलेल्या आणीबाणीच्या निषेधार्थ त्या संस्थेने मुंबईच्या बोरीबंदरजवळ एक पथनाट्य सादर केले होते. पोलिसांनी हातात दंडुके घेऊन तो नाट्यप्रयोग बंद पाडायचा प्रयत्‍न केला. परंतु जमावाने पोलिसांना अडवले आणि 'रिंगणाच्या आत पाऊल टाकाल तर खबरदार' असा दम दिला होता, आणि पोलिसांना माघार घेणे भाग पाडले होते.किल्लारी , लातूर येथील भूकंपाच्या वेळी प्रा. दिलीप महालींगे यांनी " जादुगार " या पथनाट्याचे जवळपास ५०० प्रयोग करून त्यातून मिळालेली रक्कम भूकंप ग्रस्तांना दिली होती . या भूकंपाची तीव्रता इतकी अधिक होती की , प्रत्येकाला त्यांच्यासाठी काहीतरी करावे वाटत होते . एका भिकारी महिलेने हे पथनाट्य पाहून तिच्या झोळीत असलेले सर्व पैसे या पथनाट्य कलावंताच्या झोळीत टाकले होते.

महाराष्ट्राखेरीज बंगाल, मणिपूर व केरळ या राज्यांत पथनाट्य चळवळ जोमात आहे. ब्रूनो एकार्ड्‌ट, बॉब अर्न्सट्थल पीटर स्च्यूमन या तिघांनी १९६३मध्ये अमेरिकेत न्यूयॉर्क येथे स्थापन केलेल्या ’ब्रेड ॲन्ड पपेट थिएटर'तर्फे जगभर पथनाट्ये होतात. व्हिएटनामच्या युद्धाविरुद्ध जनमानस तयार करण्यासाठी या संस्थेने अथेन्स, आयर्लन्ड, इटली, उत्तर आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, बार्सिलोना आणि लॅटिन अमेरिकेत अनेक पथनाट्ये सादर केली होती. भारतातील पथनाट्य चळवळीचा इतिहास हा सफदर हाश्मी यांच्या योगदानाच्या उल्लेखाशिवाय पूर्णच होवू शकत नाही . जवळपास ४००० पथनाट्याचे प्रयोग करणाऱ्या या रंगकर्मीला " हल्ला बोल " या पथनाट्या चे सादरीकरण करताना मृत्यू ने कवटाळले . सफदर ला बंदुकीच्या गोळ्या घालून ठार मारले गेले .

उत्तर लिहिले · 20/11/2017
कर्म · 2020