Topic icon

श्रम

0

वेठबिगारी म्हणजे कोणत्याही व्यक्तीला त्याची इच्छा नसताना, त्याला कमी मोबदला देऊन किंवा मोबदला न देता सक्तीने काम करायला लावणे. हे एक प्रकारचेforced labour आहे, ज्यात व्यक्तीला शारीरिक आणि मानसिक त्रास दिला जातो.

वेठबिगारी पद्धतीची काही वैशिष्ट्ये:

  • सक्तीचे श्रम: यात व्यक्तीला इच्छा नसताना काम करावे लागते.
  • कमी किंवा विनामोबदला: कामाचा योग्य मोबदला मिळत नाही.
  • शारीरिक व मानसिक शोषण: व्यक्तीला शारीरिक आणि मानसिक त्रास दिला जातो.

भारतात वेठबिगारी प्रथा कायद्याने নিষিদ্ধ आहे. भारतीय संविधानाच्या अनुच्छेद २३ नुसार, वेठबिगारी करणे हा गुन्हा आहे.

अधिक माहितीसाठी, आपण खालील संकेतस्थळांना भेट देऊ शकता:

उत्तर लिहिले · 1/6/2025
कर्म · 1180
0
इमारत बांधकाम (Building construction) क्षेत्रात काम करणाऱ्या मजुरांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते, त्यापैकी काही प्रमुख समस्या खालीलप्रमाणे आहेत:
  • सुरक्षेची कमी सुविधा: बांधकाम साइटवर काम करताना अनेक धोके असतात. सुरक्षा उपकरणांचा अभाव, अपर्याप्त प्रशिक्षण आणि सुरक्षिततेच्या नियमांचे उल्लंघन यामुळे बांधकाम मजूर गंभीर जखमी होऊ शकतात किंवा त्यांचा जीवही जाऊ शकतो.

    उदाहरण: हेल्मेट, हातमोजे, आणि सुरक्षा बेल्ट्सचा वापर न करणे.

  • कमी वेतन आणि अनियमित रोजगार: बांधकाम मजुरांना अनेकदा कमी वेतन मिळते आणि त्यांच्या रोजगाराची शाश्वती नसते. कामाचे तास निश्चित नसतात आणि कामाच्या ठिकाणी वेळेवर पैसे मिळत नाहीत.
  • आरोग्याच्या समस्या: बांधकाम साइटवर धूळ, माती, आणि रासायनिक पदार्थांच्या संपर्कात आल्यामुळे श्वसनरोग, त्वचेचे रोग आणि इतर आरोग्य समस्या उद्भवू शकतात.
  • राहण्याची गैरसोय: बांधकाम साइटजवळ राहण्याची चांगली सोय नसते. तात्पुरत्या झोपड्यांमध्ये गैरसोयीस्कर परिस्थितीत राहावे लागते, ज्यामुळे आरोग्याच्या समस्या वाढू शकतात.
  • पिण्याच्या पाण्याची समस्या: अनेक बांधकाम साइटवर पिण्याच्या पाण्याची सोय नसते, त्यामुळे मजुरांना दूषित पाणी प्यावे लागते, ज्यामुळे ते आजारी पडू शकतात.
  • शौचालयाची समस्या: बांधकाम साइटवर शौचालयाची पुरेशी सोय नसल्यामुळे महिला मजुरांना अनेक अडचणी येतात.
  • सामाजिक सुरक्षा आणि कल्याणकारी योजनांचा अभाव: बांधकाम मजुरांना सामाजिक सुरक्षा योजना, विमा आणि इतर कल्याणकारी योजनांचा लाभ मिळणे कठीण होते, त्यामुळे त्यांच्या भविष्याची चिंता वाढते.
या समस्यांमुळे बांधकाम मजुरांचे जीवन अत्यंत कठीण होते आणि त्यांच्या सामाजिक, आर्थिक आणि शारीरिक आरोग्यावर नकारात्मक परिणाम होतो.
उत्तर लिहिले · 24/3/2025
कर्म · 1180
0

मजुरी (Wage): मजुरी म्हणजे श्रमाच्या बदल्यात मिळणारे मोबदला. जेव्हा एखादी व्यक्ती शारीरिक किंवा मानसिक श्रम करून दुसर्‍या व्यक्तीसाठी किंवा संस्थेसाठी काम करते, तेव्हा त्या कामाच्या मोबदल्यात तिला वेतन मिळते, त्याला 'मजुरी' म्हणतात.

मजुरीचे प्रकार:

  • शारीरिक मजुरी: शारीरिक श्रम करून मिळवलेली मजुरी, जसे की बांधकाम कामगाराला मिळणारी मजुरी.
  • मानसिक मजुरी: मानसिक श्रम करून मिळवलेली मजुरी, जसे की शिक्षकाला मिळणारे वेतन.
  • वेळेवर आधारित मजुरी: ठराविक वेळेसाठी काम केल्यावर मिळणारी मजुरी, जसे की तासावर किंवा दिवसावर आधारित वेतन.
  • उत्पादन आधारित मजुरी: उत्पादनावर आधारित मजुरी, म्हणजे कामगारांनी तयार केलेल्या वस्तूंच्या संख्येवर आधारित वेतन.

टीप:

मजुरी श्रमाचे फळ आहे आणि ते कामगारांच्या जीवनाचा आधार असते.

उत्तर लिहिले · 20/3/2025
कर्म · 1180
2
श्रमदान चा शब्दशः अर्थ म्हणजे असे दान ज्यात दाता हा स्वतः काम करतो व त्याच्या या श्रमाचा इतरांना लाभ होतो .
बदलत्या वेळेनुसार ही संकल्पना बदलत चालली आहे व ती योग्य ही आहे . यामध्ये  काही व्यक्ती व संघटना स्वतः शारीरिक श्रम न करता चांगल्या कामकरिता निधी उभारून देतात व त्याचा परिणाम चांगला असतो
तुम्ही प्रश्न विचारल्या प्रमाणे लोकवर्गणीतून आलेल्या मशीन ने जरी काम होत असले तरी ते लोकांच्या वर्गणीतून आलेले आहे म्हणून ते दान श्रमदान च्या अर्थानेच सिद्ध होईल मग ते स्वयंचलित असो किंवा मानवाने चालवलेले यंत्र असो.
"श्रमदान" ह्या शब्दाचा वापर चांगल्या कामासाठी केलेले कष्ट असा होतो .
मात्र चांगल्या कामाचा परिणाम हा चांगलाच असतो म्हणून लोकांनी स्वतः अंगमेहनत घेतली अथवा निधी ,यंत्र पुरवून चांगले काम स्वतःच्या पैशाने केले तरी ते "श्रमदान"म्हणूनच ओळखले जाते व तेच योग्य आहे .
उदा.नाना पाटेकर व मकरंद अनासपुरे यांनी पाण्यासाठी जे काम केले त्यात लोकांनी अंगमेहनत ही घेतली व काहींनी मशीन व यंत्र सामुग्री पुरवून मदत केली होती .हेच ते श्रमदान .
थोडक्यात सांगायचे झाल्यास " विनामोबदला जनकल्याणसाठी घेतलेले कष्ट किंवा उभारून दिलेली यंत्र /पैसा म्हणजेच श्रमदान होय" .
उत्तर लिहिले · 2/4/2018
कर्म · 760
या प्रश्नाचे उत्तर अद्याप लिहिलेले नाही
6

वेठबिगार : निराधार, दुर्बल, परावलंबी व असंघटित व्यक्तींच्या अज्ञानाचा व दुबळेपणाचा गैरफायदा उठवून, त्यांना अंकित करुन, त्यांच्या इच्छेविरुध्द सक्तीने व योग्य मोबदला न देता किंवा विनामोबदला पडेल त्या कामाकरिता राबवून घेणे म्हणजे वेठबिगार असे सामान्यतः म्हणता येईल. वेतन अथवा मजुरी न देता वा अल्पवेतनावर शासकीय अधिकारी, जमीनमालक व पूर्वीचे सरंजामदार, वतनदार हे रयतेकडून जुलूम जबरदस्तीने कामे करवून घेत, ही वेठबिगारीच होय. अशा पध्दतीने राबणाऱ्या मजुराला ‘वेठी’ अथवा ‘बिगारी’ असे म्हणतात.
वेठी अगर बिगारी ही कर्जाच्या बंधनापोटी तसेच कर्जाची परतफेड करण्याच्या ऋणकोच्या अक्षमतेतून निर्माण झालेली समाजातील अनिष्ट प्रथा असून ती शोषणप्रवृत्तीची निदर्शक आहे. कर्जाच्या परतफेडीसाठी ऋणकोने सावकाराच्या घरी जन्मभर राबूनही कर्ज फिटत नसे. त्याच्या वारसालासुध्दा सावकाराघरी कर्जफेडीसाठी राबावे लागे.
पूर्वीच्या काळी जमीनदार आपल्या मालकी हक्काच्या बळावर कुळांकडून त्यांना पैसे न देता, वेठीला धरुन कामे करण्यास भाग पाडीत असत. एवढेच नव्हे, तर त्यांच्या चीजवस्तूंवरही आपला अधिकार असल्याचे मानत असत. भारतात खेडोपाडयांतील गावगाडयात जमीनदार, वतनदार हे अलुतेदार- बलुतेदारांकडून वेठबिगारीप्रमाणे अनेक कामे करवून घेत असत. उदा., शेतावर राबणे, ओझी वाहून नेणे, परगावी निरोप पोहोचविणे इत्यादी . बंगाल, बिहार, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश इ. राज्यांत जमीनदार रयतेकडून अद्यापही वेठबिगारीची कामे करवून घेत असल्याचे दिसून येते. दक्षिणेकडील राज्यांत वतनदार मंडळी गावातील गरिबांना वेठबिगारी करावयास भाग पाडीत. समाजातील प्रतिष्ठित, धनिक वर्गाने दलित समाजाला वेठबिगारी म्हणून राबवून घेतल्याचीही उदाहारणे आढळतात.
जमीनदारांच्या शेतावर राबणाऱ्या आदिवासींमध्ये वेठबिगारीचे प्रमाण जास्त आढळते. उदा., केरळमधील पणियन, गुजरातमधील दुबळा, तसेच महाराष्ट्रातील वारली, कातकरी, कोकणा इत्यादी. निरनिराळ्या भागांत वेगवेगळ्या नावांनी ही पध्दती रुढ असल्याचेही दिसून येते. उदा., विंध्य प्रदेशातील ‘माहिपारी’, ओरिसामधील कोरापुट जिल्ह्यातील ‘गोठी’, राजस्थानात ‘सगरी’, बिहारमध्ये ‘कामियाती’ इत्यादी. या वेठबिगारीमध्ये जमीनदार आदिवासींकडून आपल्या जमिनीची मशागत करवून घेतात. सर्व दृष्टींनी सोयीची जमीन ते स्वतःसाठी ठेवून, बाकीची जमीन आदिवासींना खंडाने लावतात. भरमसाट खंड वसूल करणे व सक्तीने मोफत अगर अगदी माफक मोबदल्यात कामे करवून घेणे, हे अशा वेठबिगारीचे स्वरुप. वेठबिगारीविरुध्द बंड करणाऱ्या आदिवासींना अमानुष छळाला बळी पडावे लागल्याचीही उदाहरणे आढळतात. सावकारांकडून घेतलेल्या कर्जाची परतफेड रोख रकमेच्या रुपात करणे शक्य नसल्याने, आदिवासींना पिढयान्‌पिढया वेठबिगारीने कामे करावी लागत.
आदिवासींप्रमाणेच स्त्रियांना व अल्पवयीन मुलांना कमी मजुरीवर राबवून घेणे, हाही वेठबोगारीचाच एक प्रकार मानावा लागेल. तुरुंगातील कैद्यांकडून नियमितपणे उत्पादनाच्या व फायद्याच्या हेतूने, सक्तीने करवून घेतलेल्या कामासही वेठबिगार असे संबोधतात. त्यात न्यायालयाकडून शिक्षा झालेले कैदी, तसेच युध्दकैदी, राजकीय कैदी हेही समाविष्ट होतात.
वेठबिगारी हा गुलामगिरीचा वा दास्याचाच एक प्रकार म्हणता येईल. मात्र वेठबिगारीत साधारणतः एकापेक्षा अनेक व्यक्तींची, किंबहुना लोकसमूहाची बिगारी अभिप्रेत असते. गुलामगिरीत एका व्यक्तीवर दुसऱ्या व्यक्तीची संपूर्ण मालकी असते, तर वेठबिगारीत मालकाडून त्या व्यक्तीच्या श्रमांचे सक्तीने शोषण केले जाते.
आधुनिक काळात सामूहिक वेठबिगारीचा एक नवाच प्रकार, विशेषतः हुकूमशाही आणि सर्वंकष सत्तावादी राजवटींत निर्माण झाल्याचे दिसते. नाझी जर्मनीमधील छळछावण्या किंवा सोव्हिएट रशियातील बंधनागार (कॉन्सेन्ट्रेशन कँप) ही उदाहरणे या संदर्भात नमूद करता येतील. या स्वरुपातील वेठबिगारीमध्ये वांशिक, राजकीय अशी ध्येय-धोरणे असल्याचे दिसते.
वेठबिगारी प्रथेचे निर्मूलन करण्यासाठी जागतिक पातळीवर अनेक प्रयत्न झाले. संयुक्त राष्ट्रांच्या (यूएन्‌) महासभेच्या तिसऱ्या अधिवेशनात १९४८ मध्ये गुलामगिरी व तत्सदृश विविध दास्यपध्दती रद्द करण्याबाबत व गुलामांचा व्यापार थांबविण्याबाबत ठराव मंजूर झाला व त्याच्या अंमलबजावणीसाठी व्यापक पातळीवर प्रयत्न करण्यात आले, तसेच कायदेशीर तरतुदीही करण्यात आल्या.  आंतरराष्ट्रीय मजूर संघटनेने (आय्‌. एल्‌. ओ) जगभरातील वेठबिगारीचा निषेध करणारा ठराव १९५७ मध्ये मांडला व ९१ सदस्य-देशांनी त्याचे अनुसमर्थन केले.
भारतीय संविधानातील कलम २३ नुसार वेठबिगारी व सक्तीची मजुरी बेकायदा ठरविलेली आहे. तसेच कलम २४ नुसार चौदा वर्षांखालील बालकांना कारखाने, गिरण्या, खाणी इ. ठिकाणी काम करण्यासाठी नोकरीस ठेवता येत नाही. भारतातील वेठबिगारी प्रथेचे निर्मूलन व्हावे, म्हणून शासनाने १९७६ साली बंधबिगार पध्दती (उच्चाटन) अधिनियम मंजूर केला. त्यात वेठबिगार वा बंधबिगार या संज्ञेची अत्यंत विस्तृत व व्यापक व्याख्या केली आहे.
या व्याख्येनुसार वेठबिगारी पुढील बाबींत समाविष्ट आहे :
तथाकथित वेठबिगाराने किंवा त्याच्या पूर्वजाने किंवा वंशजाने घेतलेल्या अग्रिम धनापोटी लादलेली वेठबिगार,
रुढिप्राप्त किंवा सामाजिक बंधनांनुसार चालू असलेली वेठबिगार,
एखाद्या विशिष्ट जातीत किंवा समाजात जन्म झाला, म्हणून लादली गेलेली वेठबिगार,
धनकोकडे विनावेतन किंवा नाममात्र वेतन घेऊन करावयाची सक्तीची मजुरी किंवा सेवा,
वेठबिगाराच्या काळात इतर कामधंदा करण्यास किंवा उपजीविकेची अन्य साधने शोधण्यास मनाई,
भारताच्या सर्व राज्यक्षेत्रात मुक्त संचार करण्यास अटकाव व
आपल्या श्रमाचे फळ उपभोगण्याच्या व्यक्तीच्या अधिकारास नकार.
या व्याख्येनुसार ऋणकोचा जामीनदार हाच त्याच्यावतीने वेठबिगार करील, याही पध्दतीवर बंदी घालण्यात आलेली आहे. शिवाय या कायद्याचा भंग करणाऱ्यास तीन वर्षांपर्यंत कारावास आणि रु. २,०००/- दंड करण्याची तरतूद करण्यात आलेली आहे. भारत सरकारच्या वीस कलमी कार्यक्रमांपैकी सहावे कलम वेठबिगार निर्मूलन व पुनर्वसन योजनेचा निर्देश करणारे आहे. पुनर्वसनाच्या प्रक्रियेत गती यावी, म्हणून १९९५ साली या कायद्यात सुधारणा करण्यात आल्या. शासनाचा वीस कलमी कार्यक्रम (१९७५) यामधील सहावे कमल वेठबिगार निर्मूलन व पुनर्वसन योजनेसाठी होते. वेठबिगारांच्या पुनर्वसन प्रक्रियेस गती यावी, म्हणून प्रचलित कायद्यात १९८५ मध्ये काही सुधारणा करण्यात आल्या.
उत्तर लिहिले · 13/11/2017
कर्म · 2320