Topic icon

मानवी आरोग्य

0

मानवाचे आरोग्य अनेक कारणांनी धोक्यात येऊ शकते. काही प्रमुख कारणे खालीलप्रमाणे आहेत:

  • आहार आणि पोषण (Diet and Nutrition):
    • कुपोषण: आवश्यक पोषक तत्वांची कमतरता (WHO Fact Sheet on Malnutrition).
    • असंतुलित आहार: जास्त प्रमाणात प्रक्रिया केलेले (processed) अन्न खाणे.
  • प्रदूषण (Pollution):
    • हवा प्रदूषण: श्वासाद्वारे विषारी घटक शरीरात जाणे (NRDC on Air Pollution).
    • पाणी प्रदूषण: दूषित पाणी पिण्याने आजार होणे.
    • ध्वनी प्रदूषण: मानसिक आणि शारीरिक समस्या (EPA on Noise Pollution).
  • जीवनशैली (Lifestyle):
    • व्यायामाचा अभाव: शारीरिक हालचाल कमी असणे.
    • तणाव: जास्त ताण घेणे (Mayo Clinic on Stress Management).
    • पुरेशी झोप न घेणे: झोप कमी झाल्यास आरोग्यावर परिणाम.
    • धूम्रपान आणि मद्यपान: या सवयींमुळे गंभीर आजार होण्याचा धोका.
  • संसर्गजन्य रोग (Infectious Diseases):
    • जीवाणू आणि विषाणू: विविध रोगांचे संक्रमण (CDC on Infectious Diseases).
  • रासायनिक Exposure (Chemical Exposure):
    • औद्योगिक रसायने: कारखान्यांतील घातक रसायनांचा संपर्क.
    • कीटकनाशके: शेतीत वापरल्या जाणाऱ्या कीटकनाशकांचा प्रभाव.
  • आनुवंशिक कारणे (Genetic Factors):
    • आनुवंशिक रोग: काही रोग पिढीजात असतात.
  • सामाजिक आणि आर्थिक घटक (Socio-economic Factors):
    • गरीबी: गरीब लोकांना चांगले अन्न आणि आरोग्य सेवा मिळत नाहीत.
    • शिक्षणाचा अभाव: आरोग्याविषयी योग्य माहिती नसते.

याव्यतिरिक्त, वय, लिंग, भौगोलिक स्थान आणि सामाजिक परिस्थिती यांसारख्या अनेक घटकांचा मानवी आरोग्यावर परिणाम होतो.

उत्तर लिहिले · 24/3/2025
कर्म · 1440
7
👇

1) हिमोग्लोबीनच्या कमतरतेमुळे अॅनेमिया होईल.

2) रक्तातील हिमोग्लोबीन शरिराच्या सर्व भागांना अॉक्सिजनचा पुरवठा करते. हिमोग्लोबीनच्या कमतरतेमुळे शरिरातील सर्व उती आणि पेशींना अॉक्सिजन अल्प प्रमाणात मिळेल.

3) यामुळे थकवा, डोकेदुखी, मरगळल्यासारखे वाटणे यांसारखी लक्षणे दिसतील......
उत्तर लिहिले · 20/8/2018
कर्म · 77165
4


*सध्याचा कडक उन्हाळा लोक दिवसभर कसेबसे सहन करतात. सायंकाळ होताच थंड वार्‍याची झुळूक मनाला थंडावा देऊन जाते. मात्र, डासांमुळे खुल्या जागेत, मोकळ्या वातावरणात आपण जास्त वेळ बसू शकत नाही. तसेच जोपर्यंत पंख्याची घरघर सुरू आहे तोपर्यंत आपण घरात बसू शकतो. मात्र, वीजप्रवाह खंडित होताच पुन्हा आपण घामोघाम होतो.  वीज गेल्यानंतरच खरेतर डासांना रक्त प्राशन करण्याची संधी मिळते. मात्र, तुम्हाला माहीत आहे का? हे डास लोकांना कमी-अधिक प्रमाणात चावतात.*              

काही लोकांना डास मोठ्या, तर काहींना कमी प्रमाणात चावतात. डास असे का करतात? यासंदर्भात संशोधकांनी नुकतेच एक संशोधन केले. या संशोधनातील निष्कर्ष सर्वांनाच आश्‍चर्याचा धक्का देणारे ठरले.
संशोधकांनी वेगवेगळ्या रक्तगटाच्या लोकांचे गट तयार केले. यामध्ये असे सिद्ध झाले की, ज्या लोकांचा रक्तगट ‘ओ’ होता, त्यांचा डासांनी अनेकवेळा चावा घेऊन त्यांचे रक्त प्राशन केले होते. मात्र, ज्यांचा रक्तगट ‘ए’ आणि ‘बी’ होता त्यांचा या डासांनी एकदाच चावा घेतला होता. विशेष म्हणजे, हे संशोधन अनेकवेळा करण्यात आले. मात्र, प्रत्येकवेळी त्याचा निष्कर्ष एकच राहिला. म्हणजेच या संशोधनातील ठोस निष्कर्ष म्हणजे ज्या लोकांचा रक्तगट ‘ओ’ आहे त्यांचे रक्त डासांना फार आवडते, म्हणूनच ते या लोकांचा चावा घेऊन रक्त प्राशन करतात. तर ए आणि बी गटाचे रक्त या डासांना तितकेसे आवडत नाही. यामुळे या रक्तगटांच्या लोकांना डास जास्त प्रमाणात चावत नाहीत.

5
ही तक्रार मुख्यत: लहान मुलांमध्ये, पण कधीकधी मोठया वयातही आढळते. (विशेषत: गरोदरपणी अनेक स्त्रियांची ही तक्रार असते.) यात माती, भिंतीचा रंग, राख,चुना, खडू, पेन्सिल, इत्यादी एरवी 'अखाद्य' असे अनेक पदार्थ येतात. माती खाण्याची तक्रार उद्भवण्याची प्रमुख कारणे पुढीलप्रमाणे- 

- आहारात लोहक्षाराची कमतरता. 

- दीर्घकाळ निव्वळ स्तनपान व बाळास वरचे अन्न वेळेवर सुरू न करणे. 

- कुठल्याही कारणाने आलेली रक्तपांढरी. 

- काही मानसिक कारण - उदा. दुर्लक्ष झाल्याची भावना मनात बळावणे. 

माती खाणे हा विकार सहा ते सात महिन्यांनंतरच्या मुलांमध्ये दिसते. वयाच्या दोन वर्षापुढेही माती खाणे टिकल्यास तपासणी करून घ्यावी. 
उत्तर लिहिले · 9/10/2017
कर्म · 0