Topic icon

कुळ

3
•भारतीय समाजात गोत्राचे महत्त्व?

ज्या गोत्राविषयी सर्वसाधारणपणे आपण ब्राह्मणाकडून ऐकतो, ते अचानक निवडणुकांचे वारे वाहत असल्याने चर्चेचा विषय ठरत आहे. पहिल्यांदा काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि आता केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी आपले गोत्र सांगितल्याने पुन्हा हा शब्द चर्चेत आला आहे. गोत्र म्हणजे नेमकं काय, याची सुरुवात कशी झाली, याचे महत्त्व अधिक का आहे? सांगताहेत अश्विनी शास्त्री

•​अशी झाली सुरुवात
प्राचीन भारतीय परंपरेनुसार हिंदू धर्मातील सर्व जातीत गोत्र आढळतं. सर्वात आधी एखाद्या ऋषीच्या नावावरून याचे नामकरण करण्यात आले. काही गोत्रांची नावे कुळदेवीच्या नावानेही प्रसिद्ध झाले. सामान्यपणे गोत्र म्हणजे कूळ किंवा वंश परंपरा होय. संस्कृत व्याकरणाचे जनक महर्षी पाणिनी यांच्या अष्टाध्यायात एक सूत्र आहे ‘अपात्यं पौत्रप्रभृति गोत्रम्’ म्हणजेच गोत्र शब्दाचा अर्थ आहे मुलाच्या मुलापासून सुरू होणारी...

•किती आहेत गोत्र?
महाभारतातील शांतीपर्वात एका श्लोकानुसार त्यावेळी मूळ रुपात प्रमुख चार गोत्र होते - अंगिरा, कश्यप, वशिष्ठ आणि भृगु. पण कालांतराने जमदग्नि, अत्रि, विश्वामित्र आणि अगस्ती ऋषींची नावे जोडली गेल्याने त्यांची संख्या आठ झाली. जैन धर्मातही याचा उल्लेख आहे.

•असे वाढले मूल्य
जाती व्यवस्था कठोर झाल्यामुळं गोत्रांचे मूल्य अधिक वाढले. त्यावेळी शूद्र सोडून इतर सर्वजण नावासह गोत्र लावत होते आणि हळूहळू शूद्रांनीही गोत्र आपल्या नावसह जोडले. ज्या गोत्रातील व्यक्तींची किंवा परिवाराची त्यांनी वर्षानुवर्षे सेवा केली आहे, त्यांचे गोत्र शूद्र सांगू लागले. त्याकाळी क्षत्रिय किंवा वैश्य यज्ञाच्या वेळी आपल्या पुरोहिताच्या गोत्राचे नाव उच्चारत होते. आता सर्व सवर्ण जातीच्या गोत्रांची नावे पुरोहित व ब्राह्मणांच्या गोत्राच्या नावाने प्रचलित आहेत.

•​गोत्र समान असल्यास विवाह करू नये
हिंदू धर्मात समान गोत्र असलेला मुलगा आणि मुलीचा विवाह निषेध मानला गेला आहे. याचे कारण हेच आहे की, एकच गोत्र असल्याने ते एकमेकांचे भाऊ-बहीण असू शकतात, पती पत्नी नव्हे. असंही म्हटलं जातं की, एकाच गोत्रात विवाह झाला तर त्या दांपत्यापासून जन्माला येणारे संतान हे व्यंग असणारे असते. काही जाणकारांच्या मते, सात पिढ्यांनतर गोत्र बदलते. म्हणजेच सात पिढ्यांमध्ये एकच गोत्र असेल तर आठव्या पिढीत त्याच गोत्रातील व्यक्तीशी विवाह करण्याचा विचार केला जाऊ शकतो. यावर अनेकांचे एकमत नाही.

•​आई किंवा वडील कोणाचे गोत्र मानावे?
गोत्र मातृवंशीय किंवा पितृवंशीयही असण्याची शक्यता आहे. तसं पाहता समाजात आजही पितृवंशीय गोत्रच प्रचलित आहे गोत्र एखाद्या आदिपुरुषाचेच असायला हवे असं नाही. आपल्या समाजात अनेक जातीजमातींमध्ये विशिष्ट चिन्हांनीही गोत्र ठरवले जाते, जे वनस्पतींपासून ते पशु-पक्षी असेही असू शकते. सिंह, मकर, सूर्य,मासा, पिंपळ, बाभळीचे झाड यांचा यात समावेश आहे. हीच परंपरा आर्यांमध्येही चालत आलेली आआहे

•​गोत्र माहीत नसल्यास...
आजच्या समाजात सर्वांनाच आपले गोत्र साधारणपणे माहिती असते. पण असंही होऊ शकतं की, एखाद्याला आपले गोत्र माहिती नसते. अशावेळी त्याने आपले गोत्र कश्यप मानावे. असं सांगण्यामागे एक कारण आहे जे शक्यतो योग्य मानलं जातं. असं म्हणतात की, कश्यप ऋषींनी अनेक विवाह केले होते ज्यामुळे त्यांना अनेक मुले झाली आणि ही मुले कोठे ना कोठे कश्यप गोत्राशीच जोडली गेली होती. याबाबत प्राचीन ग्रंथ हेमाद्रि चंद्रिकेतही सांगितलेले आहे की, जर गोत्र ज्ञात नसेल तर काश्यप गोत्र मानावे.


संदर्भ- मठा
उत्तर लिहिले · 15/12/2020
कर्म · 14895
5
धार्मिक विधी करताना बर्याच वेळा आपले गोत्र काय ?असा प्रश्न गुरुजी विचारतात तेंव्हा गोत्र म्हणजे काय असा प्रतिप्रश्न करणारे देखिल असातात, अशावेळेला पुर्वजांपैकी कोणी एक पुरुष असे उत्तर देउन वेळ मारुन नेणारे काही जण असतात.

पण तसे नसून गोत्र ही वेद्यीक धर्माने दिलेलि देणगी आहे. जन्मवंश शास्त्रदृष्ट्या अतंत्य सूक्ष्मस्तरीय एक मानवशाखा आहे.

”धर्मसिंधु” ग्रंथामध्ये गोत्राचे लक्षण पुढील प्रमाणे दीलेले आहे,

‘तत्र गोत्र लक्षणम् – विश्वामित्रो जमदग्निर्भरद्वाजो$थ गौतमः । अत्रिर्वसिष्ठः कश्यप इत्येते सप्तऋष्यः ॥ ‘

विश्वामित्र, जमदग्नि, भरद्वाज, गौतम, अत्रि, वसिष्ठ,आणि कश्यप हे सात ऋषी आहेत. व आठवे ऋषी अगस्त्य हे होत. यापैकी प्रत्येक ऋषीचे आपत्य म्हणजे गोत्र होय.

गोत्रांची संख्या अगणीत असली तरी धर्माने त्यांची व्यवस्था सुलभ व्हावी म्हणून त्यांची विभागणी पन्नास गणामध्ये केलेली आहे. त्या त्या ऋषीं च्या नावांना गोत्र असे म्हणतात.

प्रमुख गोत्र व त्यांची प्रवरे


१ अत्रि : आत्रेय -आर्चासन -श्यावाश्व २ अघमर्षण : वैश्वामित्र -अघमर्षण-कौशिक ३ आंगिरस : आंगिरस -आंबरीष -यौवनाश्व ४ आयास्य : आंगिरस -आयास्य -गौतम ५ आर्ष्टिषेण : भार्गव – च्यावन -आप्न्वन – आर्ष्टिषेण – अनूप ६ उपमन्यु : वासिष्ठ -इंद्रप्रमद -आभ्रद्ववसु ७ कण्व : आंगिरस -आजमीढ -कण्व ८ कपि : आंगिरस -आमहीयव -औरुक्षयस ९ काश्य्प : काश्य्प -अवत्सार -नैधृव( काश्य्प) -अव्त्सार –असित¨ १० कुत्स : आंगिरस -माधांत्र -कौत्स¨ ११ कौंडिण्य : वासिष्ठ -मैत्रावरुण -कौंडिण्य¨ १२ कौशिक : वैश्वामित्र –अघमर्षण -कौशिक¨ १३ गार्ग्य : आंगिरस -शैन्य -गार्ग्य¨ १४ जामदग्न्य : भार्गव – च्यावन -आप्न्वन -और्व –जामदग्न्य¨ १५ नित्युन्द : आंगिरस – पौरुकुत्स्य -त्रासदस्यु¨ १६ नैध्रुव : काश्य्प -अव्त्सार – नैध्रुव¨ १७ पाराशर :वासिष्ठ -शाक्त्य -पाराशर¨ १८ बादराण : आंगिरस -पौरुकुत्स्य -त्रासदस्यु¨ १९ बाभ्र्व्य : वैश्वामित्र -देवरात -औदास¨ २० बिद : भार्गव – च्यावन -आप्न्वन-और्व – बिद¨ २१ भारव्दाज : आंगिरस बार्हस्पत्य -भारव्दाज २२ मित्रायु : भार्गव – च्यावन -देवोदास¨ २३ मुद्ग् गल : आंगिरस -भार्ग्याश्व -मौद्ग्गल्य¨ २४ यस्क : भार्गव वैतहव्य -सावेतस¨ २५ रथीतर :आंगिरस -वैरुप -रथीतर¨ २६ वत्स : भार्गव – च्यावन -आप्न्वन-और्व -जामदग्न्य¨ २७ वासिष्ठ : वासिष्ठ -इंद्रप्रमद -आभ्रद्ववसु¨ २८ विष्णुवृद्ध :आंगिरस -पौरुकुत्स्य -त्रासदस्यु¨ २९ वैश्वामित्र : वैश्वामित्र -अघमर्षण -कौशिक¨ ३० शांडिल्य : शांडिल्य -असित -देवल¨ ३१ शालाक्ष : वैश्वामित्र -शालंकालय -कौशिक¨ ३२ शौनक : भार्गव -शौनहोत्र -गार्स्तमद¨


प्रवर म्हणजे काय ?

¨ गोत्रांची संख्या अगणीत असली तरी धर्माने त्यांची व्यवस्था सुलभ व्हावी म्हणून त्यांची विभागणी पन्नास गणामध्ये केलेली आहे.

प्रत्येक गोत्रांना प्रर्वतक ऋषी असतात. काही गोत्रांना एक, काही गोत्रांना दोन, काही गोत्रांना तिन ते पाच पर्यंत प्रवर्तक असतात. या प्रवर्तक ऋषी गणांना प्रवर असे म्हणतात.

काही समाजामध्ये आजही सप्रवर विवाह वर्ज केला जातो.

तसेच उपनयन प्रसंगी बटूस गोत्र प्रवर ,स्वतःची वेदशाखा,सूत्र, स्वतःचे नक्षत्र व चरण नाम ह्यांची माहीती करुन दीले जाते.ही माहिती शेयर करण्याचे कारण म्हणजे आपले पूर्वज आणि आपली हिंदू संस्कृती किती संपन्न होती ह्याचे हे छान उदाहरण आहे…..

उत्तर लिहिले · 1/3/2019
कर्म · 55350
0

तारडे आडनावाचे देवक 'कदंब' आहे.

Kadamb:

  • कदंब एक मोठे, सुंदर आणि छायादार झाड आहे.
  • या झाडाला संस्कृतमध्ये 'नीप' असेही म्हणतात.
  • कदंबाची फुले लहान, गोल आणि सुगंधी असतात.
  • हे झाड अनेक सांस्कृतिक आणि धार्मिक परंपरांमध्ये महत्वाचे मानले जाते.

टीप: देवक हे गोत्रानुसार बदलू शकते, त्यामुळे कृपया आपल्या कुटुंबातील वडीलधाऱ्या व्यक्तींकडून माहिती verified करून घ्या.

उत्तर लिहिले · 20/3/2025
कर्म · 1440
0
तुळजापूरची भवानी माता मराठ्यांचे दैवत आहे आणि हे प्राचीन म्हणजे शिवाजी महाराजांच्या काळापासून चालत आले आहे.
उत्तर लिहिले · 28/5/2017
कर्म · 2560