
शोध इंजिन
माहिती मिळवण्यासाठी अनेक साधने उपलब्ध आहेत. त्यापैकी काही प्रमुख साधने खालीलप्रमाणे आहेत:
पुस्तके ज्ञानाचा भांडार आहेत. विविध विषयांवर आधारित पुस्तके वाचून आपण माहिती मिळवू शकतो.
वर्तमानपत्रे आणि मासिके आपल्याला ताज्या बातम्या आणि घटनांची माहिती देतात. हे चालू घडामोडींवर लक्ष ठेवण्यासाठी उपयुक्त आहेत.
इंटरनेट हे माहिती मिळवण्याचे सर्वात मोठे साधन आहे. आपण Google, Wikipedia आणि इतर search engine वापरून जगातील कोणत्याही विषयाची माहिती मिळवू शकतो.
लायब्ररीमध्ये पुस्तके, मासिके, वर्तमानपत्रे आणि इतर संदर्भ साहित्य उपलब्ध असते. हे ज्ञान मिळवण्याचे उत्तम ठिकाण आहे.
ज्या व्यक्तींना विशिष्ट क्षेत्रात जास्त ज्ञान आहे, त्यांच्याकडून माहिती मिळवणे. शिक्षक, प्राध्यापक, डॉक्टर, इंजिनियर इत्यादी तज्ञांकडून मार्गदर्शन घेणे.
शासकीय योजना, कायदे आणि इतर माहितीसाठी सरकारी संकेतस्थळे उपयुक्त आहेत.
शाळा, कॉलेज आणि विद्यापीठे हे शिक्षणाचे आणि माहितीचे महत्त्वपूर्ण स्रोत आहेत.
दूरदर्शन आणि रेडिओ हे बातम्या, माहितीपूर्ण कार्यक्रम आणि चर्चासत्रे प्रसारित करतात, ज्यामुळे आपल्याला जगातील घडामोडींची माहिती मिळते.
माहिती मिळवण्यासाठी आणि देण्यासाठी अनेक साधने उपलब्ध आहेत. त्यापैकी काही प्रमुख साधने खालीलप्रमाणे:
- Google: हे सर्वात लोकप्रिय सर्च इंजिन आहे. यावर तुम्ही कोणत्याही विषयाची माहिती शोधू शकता. Google
- Bing: हे मायक्रोसॉफ्टचे सर्च इंजिन आहे आणि तेसुद्धा माहिती शोधण्यासाठी उपयुक्त आहे. Bing
- DuckDuckGo: हे सर्च इंजिन वापरकर्त्यांच्या गोपनीयतेला महत्त्व देते. DuckDuckGo
- Wikipedia: यावर विविध विषयांवर माहिती उपलब्ध आहे, जी स्वयंसेवकांनी तयार केलेली आहे. Wikipedia
- Britannica: हे एक विश्वसनीय ज्ञानकोश आहे, ज्यामध्ये तज्ञांनी माहिती दिलेली आहे. Britannica
- Google Scholar: यावर तुम्हाला शैक्षणिक लेख आणि शोध निबंध मिळतील. Google Scholar
- जवळच्या लायब्ररीमध्ये पुस्तके आणि इतर साहित्य उपलब्ध असतात.
- अनेक न्यूज वेबसाइट्स आणि ॲप्स तुम्हाला ताज्या बातम्या आणि माहिती पुरवतात.
🔖 दिवसेंदिवस वाढत चाललेली गुगलची व्याप्ती जगासाठी वरदान ठरत आहे. यामुळे अशक्य वाटणारे कामही शक्य वाटू लागले आहे. गुगलमुळे माहितीसाठी दुसऱ्यांवर अवलंबून राहण्याची गरज नाही. नागरिकांसाठी सुलभ झालेल्या गुगलबद्दल मात्र नागरिकांना जास्त काही माहिती नाही. गुगलच्या कामाबद्दल काही माहिती देण्याचा हा प्रयत्न आहे.
📱 *वेब क्रॉलिंग-:*
गुगल हे आपण काहीतरी शोधणे सुरू करतो त्या आधीपासून काम करीत असते. यातली पहिले काम असते क्रॉलिंग. या शब्दाचा मराठी अर्थ हा रांगणे/रेंगाळणे असा होतो. जेव्हा एखादा वापरकर्ता सर्च इंजिनवर एखादा शब्द लिहितो तेव्हा गुगल ती माहिती त्याच्या डाटाबेसमध्ये शोधते आणि त्यासंबंधी असलेली माहिती सादर करते. त्यासाठी सर्च इंजिन स्वत:च्या वेब क्रॉलर या प्रोग्रॅमचा वापर करून कोट्यावधी वेब पेजेस क्रॉल करते. या वेब क्रॉलरला सामान्यतः सर्च इंजिन बॉट किंवा सर्च इंजिन स्पायडर म्हणतात. हे क्रॉलर्स, बॉट्स किंवा स्पायडर्स हे दुसरे तिसरे काही नसून कोडिंग केलेला एक प्रोग्रॅम असतो. याद्वारे इंटरनेटवर असलेल्या प्रत्येक संकेतस्थळाला भेट दिली जाते आणि त्या संकेतस्थळाची माहितीची नोंद करण्यात येते. ही प्रकिया अत्यंत गुंतागुंतीची आणि वेळ घेणारी आहे. मात्र, गुगलचे काम चालण्यासाठी ही सर्वात आवश्यक पायरी आहे. या प्रक्रियेशिवाय गुगल आपल्या प्रश्नांना अचूक उत्तरे देऊ शकत नाही.
🔰 *इंडेक्सिंग-:*
क्रॉलिंग दरम्यान मिळवलेली सगळी माहिती सर्च इंजिनच्या डेटाबेसमध्ये जोडली जाते. या प्रक्रियेला इंडेक्सिंग असे म्हणतात. इंडेक्सिंग म्हणजे उपलब्ध झालेल्या माहितीच्या नोंदी घेणे. गुगलचा क्रॉलर प्रोग्राम नवीन संकेतस्थळांवर शोध घेत जातो आणि त्या सर्व संकेतस्थळांवर असलेल्या महितीचा एक एक डेटाबेस बनवतो. या डेटाबेसला इंडेक्स म्हणतात. या मिळालेल्या माहितीवर प्रक्रिया करून त्याचा इकमेकांशी संबंध जोडण्यात येतो. तसेच त्या माहितीचे वर्गीकरण देखील केले जाते.
🌐 *पेज रँकिंग-:*
पेज रॅकिंग म्हणजे जेव्हा वापरकर्ता एखादी माहिती शोधतो तेव्हा त्याला मिळणारी माहिती ही पेजवर ज्या क्रमांकावर दिसते त्याला रँकिंग म्हणतात. गुगल मिळालेल्या माहितीवर जी प्रक्रिया करतो त्यानुसार माहितीचा रँक ठरत असतो. प्रत्येक पेजवर वापरकर्त्याला १० रिझल्ट्स दिसतात ते त्यांच्या ठरलेल्या रँकनुसारच दिसत असतात. इंडेक्सिंग सोबतच त्यावर प्रक्रिया करताना त्याचा पेज रँक देखील ठरवला जातो. माहितीचा शोध घेण्यासाठी जे शब्द गुगलकडे आपण देतो त्या शब्दांनुसार माहितीची रँक ठरते. कुठले संकेतस्थळ शोध उत्तरांत वर दिसेल हे देखील या पेज रँकिंग वरून हे निश्चित होते.
🌀 *सर्च-:*
ही एखादी माहिती मिळवण्याची शेवटची पायरी असते. जेव्हा वापरकर्ता एखादा किवर्ड गुगलच्या सर्च बारवर टाकतो तेव्हा सर्च इंजिनचा प्रोग्राम लगेच त्या शब्दांशी संबंधित माहितीचा शोध इंडेक्समध्ये सुरू करतो. आपल्या शब्दांशी निगडित असलेली सर्व संकेतस्थळे एकत्र करतो. त्यांचा पेज रँक ठरवतो आणि क्षणात ती यादी आपल्यासमोर शोध निकाल म्हणून दाखवतो. सर्व प्रक्रिया एका क्षणात पार पाडते आणि आपल्याला हवी असणारी माहिती तत्काळ उपलब्ध होते.
____________________________________
*🤳🌐आत्ता तुम्ही मिळवू शकता तुमच्या व्हाट्सअप्प वर बातम्या,मनोरंजन,जॉब,माहिती-तंत्रज्ञान,सरकारी योजना,सण-उत्सव,आरोग्य,आहार विषयक लेख ते ही तुमच्या व्हाट्सअप्प वर अगदी विनामूल्य.*
_अपडेट्स मिळवण्यासाठी फॉर्म भरून पाठवा_
*_महा डिजिटल मॅगेझिन_*
https://bit.ly/34kRwdy
हे नेमके काय आहे याची माहिती नसतेच, पण कधी कधी अज्ञानापोटी गावकऱ्यांनी देखील त्याची उपेक्षा केलेली असते. अनाम वीरांच्या स्मृतींच्या या खुणा इतिहासाच्या मूक साक्षीदारच असतात. आपल्या भटकंतीत जाणीवपूर्वक त्यांचा वेध घ्यायला हरकत नाही. रणांगणावर वीरमरण येणे हे भारतीय लोकजीवनात गौरवास्पद आणि पुण्यप्रद मानले गेले आहे. असे वीरमरण प्राप्त झालेल्या वीराचे उचित स्मारक वीरगळाच्या रूपाने गावोगावी उभारलेले आपल्याला पाहायला मिळते. वीरगळ म्हणजे काय, आणि ते कसे असतात हा प्रश्न उपस्थित होणे साहजिक आहे. मुळात हा शब्द कानडी भाषेतून आला आहे. कानडी भाषेमध्ये कल्लू म्हणजे दगड. वीराचा दगड तो वीरकल्लू, त्यावरून वीरगळ हा शब्द मराठीत प्रचलित झाला. स्थानिक लोक तर वीर गळून पडला म्हणून त्याचे स्मारक ते वीरगळ, असा अगदी सुटसुटीत अर्थ सांगतात. एका पाषाणाच्या शिळेवर काही विशिष्ट शिल्पांकन करून तो पाषाणस्तंभ उभा करणे आणि त्या वीराचे स्मरण करणे; तो पाषाणस्तंभ म्हणजेच वीरगळ. आपल्या लाडक्या योद्धय़ाचे स्मारक असलेले हे वीरगळ महाराष्ट्रात गावोगावी पाहायला मिळतात. पण जनमानसात त्याची माहिती फारच कमी असते. हे वीरगळ तयार करायची एक खास पद्धत आहे. आकाराने सामान्यत: अडीच ते तीन फूट उंचीच्या शिळेवर एकावर एक असे तीन किंवा चार चौकोन खोदून त्यात या वीराच्या कथेचे अंकन केलेले असते. सर्वात खाली तो वीर मृत्युमुखी पडलेला दाखवतात. त्याच्या वरच्या थरात त्याचे युद्ध चाललेले दाखवले जाते. त्याच्या वर तो मृत झाला असून त्याला अप्सरा स्वर्गात घेऊन जात असल्याचे कल्पिले आहे. तर सर्वात वरच्या चौकोनात तो शिवमय झाला असे दाखवण्यासाठी तो शिवपिंडीची पूजा करताना दाखवण्याची प्रथा आहे. युद्धात मरण आले तर तुम्हाला हमखास स्वर्गप्राप्ती होते हे जनमानसावर बिंबवणे हा देखील त्यामागील दृष्टिकोन असावा. यात अजून वर त्या पाषाणाच्या दोन बाजूंना चंद्र-सूर्य दाखवलेले असतात. याचा अर्थ असा की जोपर्यंत आकाशात चंद्र-सूर्य आहेत तोपर्यंत त्या वीराचे स्मरण आम्हाला होत राहील असे सूचित करायचे असते. मृत्युमुखी पडलेल्या वीराची पत्नी जर त्याच्यासोबत सती गेली असेल तर त्या वीरगळावर स्त्रीचा हातदेखील कोरलेला असतो. त्या हातात बांगडय़ा दाखवलेल्या असतात. काही ठिकाणी नुसताच स्त्रीचा हात कोरलेले दगड दिसतात. यांना सतीशिळा असे म्हटले जाते. वीरगळांची परंपरा कर्नाटकातून महाराष्ट्रात आल्याचे सांगितले जाते. कर्नाटकात दहा-बारा फूट उंचीचे मोठे शिल्पपट असलेले वीरगळ पाहायला मिळतात. त्यांच्यावरील युद्धप्रसंग अगदी तपशीलवर कोरलेले दिसतात. कर्नाटकात अनेक वीरगळांवर लेखदेखील कोरलेले आहेत. महाराष्ट्रात मात्र अगदी अपवादानेच लेख पाहायला मिळतात. त्यामुळे आपल्याकडचे वीरगळ हे कुठल्या वीरासाठी तयार केलेले आहेत याचा संदर्भ मिळणे कठीण जाते. महाराष्ट्रात अनेक गावागावांतून असे वीरगळ पाहायला मिळतात. एखाद्या गावात वीरगळ असणे हे त्या गावाचे प्राचीनत्त्व अधोरेखित करणारे असते. भूतकाळात इथे समरप्रसंग घडला होता आणि कोणी वीर धारातीर्थी पडले होते याची मूकपणाने साक्ष आज हे वीरगळ आपल्याला देत असतात. रायगड जिल्ह्यतल्या माणगाव तालुक्यात असलेले उंबर्डी हे गाव म्हणजे वीरगळांचे संग्रहालयच म्हणावे लागेल. इथे असलेल्या शिवमंदिराच्या आवारात अत्यंत देखणे असे ४५ वीरगळ ठेवलेले आहेत. इथे सतीचे हात असलेले अत्यंत रेखीव वीरगळ पाहायला मिळतात. कोणी महत्त्वाचा सरदार इथल्या लढाईत मृत्युमुखी पडला असणार. इथूनच जवळ दिवेआगरच्या रस्त्यावरील देगावला शिवमंदिरात चारही बाजूंनी घडवलेले अनेक वीरगळ ठेवले आहेत. त्यातल्या एका वीरगळावर दहा डोकी आणि वीस हात असलेल्या व्यक्तीचे अंकन केलेले दिसते. अगदी आगळावेगळा हा एकमेव वीरगळ आहे. बोरिवलीजवळच्या एक्सर या गावात तर वीरगळावर नौकायुद्ध दाखवलेले आहे. अत्यंत अप्रतिम असा हा वीरगळ शिलाहार राजा सोमेश्वर आणि देवगिरीचा राजा महादेव यांच्यातील युद्धाचा प्रसंग दाखवणारा आहे. इतका आकर्षक आणि देखणा वीरगळ महाराष्ट्रात दुसरा नाही. सातारा जिल्ह्यतील किकली, नगर जिल्ह्यतल्या श्रीगोंदा या गावी असेच अनेक वीरगळ दिसतात. राजापूरच्या धूतपापेश्वर मंदिराच्या बाहेर तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यतील वाडा इथल्या विमलेश्वर मंदिराच्या बाहेर असे देखणे वीरगळ रांगेत मांडून ठेवलेले आहेत. त्याचबरोबर अनेक किल्लय़ांवर आजही असे अनेक वीरगळ विखुरलेले पाहायला मिळतात. पालीजवळील सुधागडवर अनेक वीरगळ आणि काही सतीशिळा आहेत. मुरबाडजवळील सिद्धगडावर असेच अनेक वीरगळ दिसतात. पण अशी व्यवस्था सगळ्याच वीरगळांच्या नशिबी मात्र नाही. अज्ञानामुळे अनेक ठिकाणी त्यांना शेंदूर फसलेला दिसतो. माहिती सेवा गृप पेठवड़गाव -अनेक ठिकाणी त्यांना शनीचा दगड म्हणून तेल वाहिलेले दिसते. त्यांचा वापर हा कपडे धुण्यासाठी घासायला उत्तम दगड म्हणून करणारेही कमी नाही.
https://m.facebook.com/story.php?story_fbid=191467997917798&id=100011637976439
रांजणगाव जवळच पिंपरी दुमाला या गावात तर मंदिराचा जीर्णोद्धार करताना मंदिराच्या भिंतीत अनेक वीरगळदेखील बसवलेले आढळतात. वीरगळ म्हणजे आपल्या इतिहासाचा थेट साक्षीदार असलेला ठेवा. त्याचे काळजीपूर्वक जतन करायला हवे. त्याचे संवर्धन पूर्णार्थाने शक्य नसले तरी किमान त्याची नोंद भटकंतीत करणे, गावकऱ्यांना त्याचे महत्त्व समजावून देणे इतपत तरी आपण करू शकतो.♍