Topic icon

राष्ट्रीय प्रतीके

8
*आपली राष्ट्रीय दांभिकता*.

*देशाच्या प्रगतीचे मापन करायचे असेल तर नागरिक काय लायकीचे होते आणि आता काय लायकीचे झाले, या निकषावर करायला हवे.*

*सातत्याने ढासळत जाणारा नागरिकांचा दर्जा हा राष्ट्रीय काळजीचा विषय असायला हवा.*

*बोगीतील संडासातल्या टमरेलला साखळी बांधण्याची आयडिया ज्या कुठल्या कल्पक अधिकाऱ्याला सुचली असेल, त्याला शोधून काढून रेल्वे बोर्डाचे चेअरमन करायला हवे.भारतीय नागरिकांचे त्याचे आकलन हे श्रेष्ठ दर्जाचे आहे.*

*‘तेजस’ या आधुनिक, वेगवान रेल्वेत सुंदर बाकडी, एलईडी, छान वातानुकूलित व्यवस्था आणि असे बरेच काही असावे, ही कल्पना ज्याने मांडली त्याचे भारतीय नागरिकांचे आकलन कमी आहे, या कारणावरून निलंबनच करायला हवे.....*

*हातगाडीवर बसवून न्यायच्या लायकीच्या लोकांना त्याने पालखीत बसवून रुबाबात न्यायचे स्वप्न पाहण्याचा प्रमाद केला आहे.*

*बाळासाहेब ठाकरे एक किस्सा त्यांच्या शैलीत नेहमी सांगायचे.....लोक इथल्या हॉटेलमधले चमचे चोरून नेतात. अगदी रोज नेतात.अरे, चोरी करायची ठरवलेच आहेस तर निदान मोठा दरोडा तरी टाक. चमचे काय चोरतोस.....?*

*एका श्रेष्ठ भारतीय नागरिकाने ,एका प्राणीसंग्रहालयात,पिंजऱ्यातील माकड जाळीजवळ आल्यावर त्याच्या अंगाला* *खाजखुजली लावली होती आणि माकड खाजवून खाजवून वेडेपिसे झाल्याचा व्हिडीओ फेसबुकवर टाकला होता.*

*रात्री दोन वाजता ढिनच्यॅक ढिनच्यॅक संगीत गाडीत वाजवत गल्ल्यांतून फिरणारे, गाडीचा दरवाजा उघडून ओकल्यासारखे तंबाखू थुंकणारे,*
*ऐतिहासिक इमारतींवर स्वताःचे आणि स्वताःच्या टिनपाट मैत्रिणीचे नाव कोरणारे,*
*कोणी बघत नाही म्हणून सार्वजनिक शौचालयाचा वापर करून पाणी न टाकता निघून जाणारे,*
*शाळेतल्या लहान मुलांना वाटायला आणलेल्या खिचडीचा तांदूळ बाजारात नेऊन विकणारे,*
*सार्वजनिक उत्सवात ,लोकांकडून जमविलेल्या वर्गणीतून अवास्तव खर्चाच्या नावाखाली कमिशन म्हणून आपली तुंबडी भरणारे,*
*सार्वजनिक गणेशोत्सव बाप्पाच्या पुढ्यातील फुले प्रसाद आपल्या बापाचा समजून घरातील फ्रिजची कपाटं भरणारे बाप्पाचे उत्साही कार्यकर्ते, नेतेपणाची हौस भागवणारे बिनबुडाचे महाभाग,*
*रस्त्यावरची बाकडी- रोड डिव्हायडर - फरशा चोरून नेऊन विकणारे, एसटी किंवा रेल्वेचे सीट कव्हर सहज विरंगुळा म्हणून फाडणारे...हीच आपली ओळख आहे.*
*या ओळखीबद्दल काय बोलणार...?*
*वर्तमान लाजीरवाणा आणि भिकारडा असला की गतकाळातल्या फुशारक्या मारण्याशिवाय आपल्या हातात दुसरे काय उरते.....?*

*सरकार बदलून खूप प्रयोग करून झाले. त्याने काही फरक पडत नाही. आता जनताच बदलायला पाहिजे.*
*या देशात जर सुधारणा घडवून आणायच्या असतील, तर आपले नागरिक देशातून हाकलवून देऊन बाहेरच्या देशांतले चकचकीत लोक आयात करणे अतिशय आवश्यक आहे.*
*आणि तसे जर करायचे नसेल, आणि आपल्याच नागरिकांना जाब विचारायचा असेल तर मग मागच्या ६३ वर्षांत तुम्ही अजूनही टुकार नागरिकच का आहात, असा प्रश्न विचारायला हवा....!*

*सरकार काय, मतदानाने कधीही बदलता येईल. जे कधीच बदलत नाहीत आणि दिवसेंदिवस अधिकच भिकार दर्जाचे बनत चाललेत, त्या नागरिकांचे काय करायचे.....?
उत्तर लिहिले · 27/10/2017
कर्म · 6610
8
१) राष्ट्रध्वज- तिरंगा,
२) राष्ट्रीय भाषा- हिंदी,
३) राष्ट्रीय गान- जन_गण_मन,
४) राष्ट्रीय गीत- वंदेमातरम,
५) राष्ट्रीय खेळ- हॉकी,
६) राष्ट्रीय प्राणी- वाघ,
७)  राष्ट्रीय नदी- गंगा,
८) राष्ट्रीय चलन- रुपया,
९) राष्ट्रीय राजकीय प्रतीक- अशोक स्तंभ,
१०) राष्ट्रीय लिपी- देवनागरी,
११) घोषवाक्य- सत्यमेव जयते,
१२) राष्‍ट्रीय पुष्‍प- कमल,
१३) राष्ट्रीय वक्ष- वड,
१४) राष्‍ट्रीय फळ- आंबा,
१५) राष्‍ट्रीय जलीय जीव- गंगेतील डॉलफिन.
उत्तर लिहिले · 5/4/2017
कर्म · 2210