Topic icon

कर्म

0
कर्माचा नियम (Law of Karma) म्हणजे कार्यकारणभावावर (Cause and Effect) आधारित एक मूलभूत आध्यात्मिक सिद्धांत आहे. या नियमानुसार, प्रत्येक कृती, विचार किंवा शब्द याचे काहीतरी परिणाम होतात आणि ते परिणाम कर्त्याला परत मिळतात.

या नियमाची मुख्य तत्त्वे खालीलप्रमाणे आहेत:

  • प्रत्येक कृतीचे फळ: तुम्ही जे काही करता, बोलता किंवा विचार करता, ते चांगले असो वा वाईट, त्याचे परिणाम तुम्हाला अनुभवावे लागतात. "पेराल ते उगवेल" हे या नियमाचे उत्तम उदाहरण आहे.
  • जबाबदारी: कर्माचा नियम आपल्याला आपल्या कृतींची जबाबदारी स्वीकारायला शिकवतो. आपल्या सध्याच्या परिस्थितीसाठी आपणच जबाबदार असतो, कारण ती आपल्या पूर्वीच्या कर्मांचे फळ आहे.
  • निश्चितता आणि न्याय: हा नियम कोणत्याही मानवी न्यायव्यवस्थेपेक्षा अधिक निश्चित आणि न्यायपूर्ण मानला जातो. कोणतीही कृती फळाशिवाय राहत नाही.
  • जन्मोजन्मीचा संबंध: अनेक भारतीय धर्म आणि तत्त्वज्ञानानुसार, कर्माचा नियम केवळ एका जन्मापुरता मर्यादित नसतो, तर तो अनेक जन्मांमध्ये विस्तारतो. या जन्मातील कर्मे पुढील जन्मावर परिणाम करतात आणि मागील जन्मातील कर्मे या जन्मावर परिणाम करतात.
  • सुधारणेची संधी: कर्माचा नियम शिक्षा किंवा दंडासाठी नाही, तर शिकण्यासाठी आणि स्वतःमध्ये सुधारणा घडवून आणण्यासाठी आहे. वाईट कर्मांची फळे भोगून, व्यक्ती चांगल्या मार्गावर येण्यास प्रोत्साहित होते.
  • संकल्पना:
    • संचित कर्म: मागील अनेक जन्मांतील जमा झालेले कर्म.
    • प्रारब्ध कर्म: संचित कर्माचा तो भाग, जो आपल्याला या जन्मात अनुभवायचा असतो.
    • क्रियमाण कर्म: या जन्मात आपण करत असलेली नवीन कर्मे.

थोडक्यात, कर्माचा नियम आपल्याला समजावतो की आपण आपल्या नशिबाचे शिल्पकार आहोत आणि आपल्या भविष्याची निर्मिती आपल्या आजच्या कृतींद्वारेच होत असते. यामुळे सकारात्मक विचार आणि चांगल्या कृती करण्याचे महत्त्व अधोरेखित होते.

उत्तर लिहिले · 20/1/2026
कर्म · 5000
0

तुमच्या प्रश्नानुसार, "कुणी श्रीमंत, कुणी गरीब, कुणी सुंदर, कुणी कुरूप, कुणी बुद्धिवान, कुणी कमी बुद्धिवान" हे सर्व गोष्टी कर्म सिद्धांत आणि आनुवंशिकतेवर अवलंबून असतात.

कर्म सिद्धांत:

  • कर्म सिद्धांतानुसार, आपल्या पूर्वीच्या जन्मांतील कर्मानुसार या जन्मातील सुख-दुःख, चांगले-वाईट गोष्टी ठरतात. Wikipedia
  • चांगल्या कर्मांचे फळ चांगले आणि वाईट कर्मांचे फळ वाईट मिळते, असे मानले जाते.

आनुवंशिकता:

  • आनुवंशिकतेनुसार, आपले गुणधर्म (Genes) आपल्या आई-वडिलांकडून मिळतात. त्यामुळे काही जण जन्मतःच सुंदर, बुद्धिवान किंवा शारीरिकदृष्ट्या सक्षम असतात. NCBI
  • उदाहरणार्थ, जर आई-वडील दोघांनाही चांगली बुद्धी असेल, तर त्यांच्या मुलांमध्येही बुद्धीची शक्यता जास्त असते.

या दोन्ही गोष्टींच्या मिश्रणामुळे व्यक्तीच्या आयुष्यातील गोष्टी ठरतात.

उत्तर लिहिले · 25/3/2025
कर्म · 5000
5
एक राजाला चार राण्या होत्या, पहिली राणी इतकी सुंदर होती! कि तो तिला फक्त प्रेमाने बघत रहायचा?

दुसरी राणी इतकी सुंदर होती की, तिला तो सतत जवळ घेऊन बसायचा!

तिसरी राणी इतकी सुंदर होती कि, तिला कायम बरोबर घेऊन फिरायचा ?

चौथ्या राणीकडे तो कधीच लक्ष द्यायचा नाही !!!!

राजा म्हातारा झाला, तो मरणासन्न अवस्थेत असताना त्याने पहिल्या राणीला बोलावले आणी म्हणाला, "मी तुला एवढे प्रेम दिले, तू माझ्याबरोबर येशील का?"

राणी म्हणाली मी तुला इथेच सोडुन देणार आहे.

राजाला दुखः झाले. मग त्याने दुसऱ्या राणीला तोच प्रश्न विचारला राणी म्हणाली, "मी तुमच्याबरोबर स्मशानापर्यंत येईल त्यापुढे नाही.

राजाला अपारं दुखः झालं, त्याने आशेने तिसऱ्या राणीला विचारले, "तू तरी माझ्याबरोबर येशील का नाही ?

तिसरी राणी म्हणाली, "मी तुम्ही गेल्याबरोबर दुसऱ्या कुणाबरोबर जाणार आहे, तुमच्याजवळ रहाणार नाही.

आता मात्र राजाच्या दुखाःला पारावार राहिला नाही. तो विचार करू लागला. मी या राण्यांवर माझे पुर्ण जीवन घालवले! त्या कधीही माझ्या नव्हत्याच ?

माझे जीवन व्यर्थ घालवले, फुकटं वेळ, पैसा, आयुष्य खर्च केले?

तेवढ्यात राजाची चौथी राणी तेथे आली, जिच्याकडे राजाने कधीच लक्ष दिलं नव्हते? तिला अंगभर कपडे नव्हते की, तिच्या अंगावर मुठभर मांस नव्हते कि, दागिने नव्हते.

ती म्हणाली, "तुम्ही जाल तिकडे येईल. नरकात असो की स्वर्गात, कोणत्याही प्रकारच्या जन्म असला तरी मी तुम्हाला कधीच अंतर देणार नाही. हे माझे तुम्हास वचनं आहे.

राजा थक्कं होऊन समोर पहात राहिला, विचार करू लागला कि,जीला मी प्रेम सोडा, साधा प्रेमाचा शब्द कधी दिला नाही, ना पुर्ण आयुष्यात जिचा कधी एक क्षणभर काळजी केली.

ती आज माझ्यासाठी सर्वस्व अर्पण करत आहे? राजाच्या डोळ्यातून आनंदाश्रु वाहू लागले. त्याने मोठ्या समाधानाने आपला प्राण त्यागं केला.

कोण होता तो राजा? कोण होत्या त्या तीन राण्या? कोण होती ती चौथी राणी? इतके प्रेम देऊनही तिन्ही राण्यांनी राजाचा त्याग का केला?

त्या उलट ती चौथी राणी, जिच्याकडे राजाने कधीही लक्ष दिले नाही, पण तरीही एवढा त्याग का केला?

तो राजा दुसरा तिसरा कोणीही नसुन स्वतः आपणच आहोत.

आपली पहिली राणी जी आपल्याला जागेवरचं सोडते ते म्हणजे आपले शरीर ज्याला आपण आयुष्यभर बघत रहातो.

आपली दुसरी राणी स्मशानापर्यंत आपल्याला सोडण्यास येते, ते आपली मुले, आप्तेष्ट, मित्र थोडक्यात समाज.

आपली तिसरी राणी, जी आपल्याला सोडून दुसऱ्याकडे जाते म्हणजे, धन-पैसा आपल्या मृत्युनंतर आपली

लगेच दुसऱ्याची होते.

आता सर्वात दुर्लक्षित चौथी राणी म्हणजे पुण्यकर्म जे आपण सदभावनेने नि:स्वार्थपणे,आणि विणा अहंकाराने केले. जिच्याकडे बघण्यास आपणास अजिबात वेळ नाही, तरीपण जन्मोजन्मी आपल्याबरोबर येतचं असते...!
उत्तर लिहिले · 17/4/2022
कर्म · 121765
8
*🚩II"जय जय रामकृष्ण हरि"II🚩*
  • *माऊली*🌹👏
  • *भोग हे फक्त भोगूनच संपतात.*
  • *मग आजवर जेवढं पाप केलं आहे,*
  • *त्याचे जे भोग भोगायला येणार आहेत,*
  • *ते भोगावेच लागणार आहेत.*
  • *मग ते गत जन्मीचे असोत,*
  • *वा जन्मोन्जन्मीचे,*
  • *भोगणे हे फळ संचिताचे।*
  • *भोग पुढे ढकलू शकता,*
  • *पण संपूर्ण नष्ट करू शकत नाहीत.*
  • *हे मात्र नक्की...*
  • *जेंव्हा आपण भगवंताची भक्ती करतो,*
  • *तेंव्हा भगवंत काय करतो.*
  • *तर आधी तुमचे जे भोग आहेत ना..*
  • *ते तुमच्या मार्गात आणतो,*
  • *आधी तुमचे भोग संपवतो,*
  • *आणि मग जवळ करतो.*
  • *म्हणून आयुष्यात कितीही,*
  • *कसल्याही अडचणी,संकट,*
  • *दुःखं आली,*
  • *तरी कधीच भगवंताला ती सोडव,*
  • *असं म्हणू नका...*
  • *फक्त हात जोडा...*
  • *आणि हे भोग समर्थपणे भोगण्याची,*
  • *ताकद दे इतकेच सांगा.*
  • *तो भक्त वत्सल आहे,*
  • *सोडव म्हणालात तर तो ते कर्म पुढे ढकलेलंही,*
  • *पण पुन्हा केंव्हा तरी ते भोगावेच लागतात,*
  • *एवढं मात्र नक्की.*
  • *भोग हे कर्क रोगाच्या गाठी प्रमाणे आहेत,*
  • *डॉक्टर जोवर ती गाठ पूर्णपणे काढत नाही,*
  • *तोवर तो आजार पुन्हा पुन्हा त्रास देतच राहतो.*
  • *एकदा का ती गाठ मुळासकट निघाली,*
  • *की पुन्हा उद्भवण्याचा संबंध नाही,*
  • *तसे कर्म पूर्ण भोगून झाले की,*
  • *पुन्हा त्रास करून घेण्याचा संबंधच नाही.*
  • *जर भोग आले, दुःख आलीत,*
  • *संकट आली की खात्रीने समजा,*
  • *की आपली भक्ती उदयास येते आहे,*
  • *आणी लवकरच कर्मात्रीतून,*
  • *मुक्त होणार आहोत.*
  • *मग अशा वेळेस अधिकाधिक भक्ती करा,*
  • *नामस्मरण करा...*
  • *निश्चितच लवकरच,*
  • *चांगले दिवस येतील...!!*
*हरि ‌हरि*🚩🌹👏
उत्तर लिहिले · 27/6/2021
कर्म · 44255
0

तुमचा प्रश्न आहे, "वाईट वागणे म्हणजे प्रारब्ध का?" या प्रश्नाचे उत्तर काही भागांमध्ये विभागून देणे अधिक सोपे जाईल.

प्रारब्ध म्हणजे काय:

  • प्रारब्ध म्हणजे आपल्या मागील जन्मांतील कर्मानुसार या जन्मात मिळणारे फळ.
  • आपण जे काही चांगले किंवा वाईट अनुभवतो, ते आपल्या प्रारब्धाचा भाग असतो, असे मानले जाते.

वाईट वागणे आणि प्रारब्ध:

  • Prarabdh आणि वाईट वागणे या दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या आहेत. वाईट वागणे हे आपल्या कर्मांवर अवलंबून असते. आपण जे कर्म करतो, त्याचे फळ आपल्याला भोगावे लागते.
  • Prarabdh पूर्वीच्या कर्मांचे फळ आहे, तर वाईट वागणे हे आपले सध्याचे कर्म आहे. त्यामुळे, वाईट वागणे म्हणजे Prarabdh नव्हे.
  • आपण वाईट कर्म टाळू शकतो आणि चांगले कर्म करू शकतो, ज्यामुळे आपले भविष्य सुधारू शकते.

निष्कर्ष:

वाईट वागणे हे Prarabdh नाही, तर ते आपल्या कर्मांचे फळ आहे. आपण चांगले कर्म करून आपले भविष्य बदलू शकतो.

उत्तर लिहिले · 22/3/2025
कर्म · 5000
4
कर्म म्हणजे आपण केलेले चांगले किंवा वाईट कृत्य. याचे परिणाम आणि दुष्परिणाम हे प्रत्येक व्यक्तीस भोगावे लागतात.
उत्तर लिहिले · 9/9/2020
कर्म · 458580
8
कर्माच्या पुढे येणारी संख्या म्हणजे तुम्हाला मिळालेले गुण.तुम्ही जेव्हा एकादे उत्तर सविस्तर लिहिता तेव्हा तुम्हाला 10 गुण मिळतात.तुमच्या उत्तराला कोणी आवडले केले तर तुम्हाला 20 गुण मिळतात। तुमच्या प्रश्नावर कोणी उत्तर लिहिले तर तुम्हाला 5 गुण मिळतात.अशा प्रकारे तुमचे गुण वाढत जातात.म्हणजेच  तुम्हाला मिळालेले गुण म्हणजे तुमचे कर्म.जेव्हा एकाद्याने काही चांगले काम केले की त्याच्या पाठीवर शाबासकीची थाप पडते व त्यामुळे चांगले काम करण्याचा त्याचा उत्साह वाढतो.त्याप्रमाणेच विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा उत्साह वाढावा यासाठी उत्तर अँपमधे अशी सोय करण्यात आली आहे.थोडक्यात म्हणजे कर्मापुढे लिहिलेली संख्या म्हणजेच तुमचे तेवढे कर्म.
उत्तर लिहिले · 27/12/2018
कर्म · 250