Topic icon

ऐतिहासिक घटना

0
निश्चितपणे, येथे एक ऐतिहासिक घटना आहे:

भारताची फाळणी (1947):

भारताची फाळणी ही 1947 मध्ये घडलेली एक महत्त्वपूर्ण ऐतिहासिक घटना आहे. ब्रिटीश राजवटीने भारत आणि पाकिस्तान या दोन स्वतंत्र राष्ट्रांमध्ये भारताची विभागणी केली. या फाळणीमुळे मोठ्या प्रमाणावर हिंसा, विस्थापन आणि सामाजिक अशांतता झाली.

फाळणीची कारणे:

  • धार्मिक भिन्नता: हिंदू आणि मुस्लिम यांच्यातील वाढती धार्मिक भिन्नता हे फाळणीचे एक प्रमुख कारण होते.
  • राजकीय अस्थिरता: ब्रिटीश राजवटीच्या काळात राजकीय अस्थिरता वाढली होती, ज्यामुळे फाळणी अटळ झाली.
  • मुस्लिम लीगची मागणी: मुस्लिम लीगने मुस्लिमांसाठी स्वतंत्र राष्ट्राची मागणी केली, ज्यामुळे फाळणीच्या प्रक्रियेला आणखी गती मिळाली.

परिणाम:

  • विस्थापन: सुमारे 10-12 दशलक्ष लोकांनी आपले घर सोडले आणि ते विस्थापित झाले.
  • हिंसा: फाळणीच्या दरम्यान मोठ्या प्रमाणावर हिंसा झाली, ज्यात अंदाजे 1-2 दशलक्ष लोकांचा मृत्यू झाला.
  • सामाजिक अशांतता: फाळणीमुळे समाजात दीर्घकाळ अशांतता राहिली आणि त्याचे परिणाम आजही दिसून येतात.

अधिक माहितीसाठी:

उत्तर लिहिले · 9/6/2025
कर्म · 1660
0

शंभूराजेंचे बलिदान:

छत्रपती संभाजी महाराज यांचा जन्म १४ मे १६५७ रोजी पुरंदर किल्ल्यावर झाला. ते मराठा साम्राज्याचे दुसरे छत्रपती होते. त्यांनी अत्यंत कमी वयात अनेक भाषा व शास्त्रांचे ज्ञान प्राप्त केले होते. शंभूराजे पराक्रमी, शूर आणि आपल्या धर्मावर निष्ठा असणारे होते.

१ फेब्रुवारी १६८९ रोजी संगमेश्वर येथे मुघलांनी संभाजी महाराजांना पकडले. औरंगजेबाने त्यांना इस्लाम धर्म स्वीकारण्यास सांगितले, परंतु त्यांनी नकार दिला. त्यानंतर औरंगजेबाने त्यांना हालहाल करून मारण्याची शिक्षा दिली.

११ मार्च १६८९ रोजी तुळापूर येथे संभाजी महाराजांची हत्या करण्यात आली. त्यांच्या बलिदानाने मराठा साम्राज्याला मोठी प्रेरणा मिळाली. त्यांनी धर्मासाठी आणि स्वराज्यासाठी आपले प्राण अर्पण केले.

महत्व:

  • धर्मनिष्ठा: संभाजी महाराजांनी धर्मासाठी आपले प्राण दिले.
  • स्वराज्याचे रक्षण: त्यांनी मराठा साम्राज्याचे रक्षण केले.
  • प्रेरणा: त्यांचे बलिदान मराठा साम्राज्यासाठी एक प्रेरणा ठरले.
उत्तर लिहिले · 9/4/2025
कर्म · 1660
0

नाही, छत्रपती संभाजीराजे जिवंत असताना छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांचे पिंडदान केले नव्हते.

या दाव्याला कोणताही ऐतिहासिक पुरावा नाही.

शिवाजी महाराजांनी १६८० मध्ये रायगडावर अखेरचा श्वास घेतला.

संदर्भ:

उत्तर लिहिले · 25/3/2025
कर्म · 1660
0
☼ अफजलखानाचा वध ☼ (लेखक - गणेश पावले)
Submitted by गणेश पावले on 6 January, 2015 - 00:06
शालिवाहन शके १५७७ मध्ये पौष महिन्यात शिवाजी महाराजांनी चंद्रराव मोरे यास जिंकून त्याचा जावळी प्रांत काबीज केला. शिवाजी महाराज आता एक एक किल्ला जिंकून आपले राज्य वाढवत होते. पुढे शके १५८० च्या अश्विनात राजे कर्नाटकाकडे कूच करत होते. हळू हळू हि वार्ता विजापूरच्या दरबारात कळू लागली. बादशाहने शहाजी राजेना पत्र लिहून शिवाजीला रोखण्यास सांगितले. पण त्याचा काही फारसा उपयोग झाला नाही. तेंव्हा शिवाजी राजांकडे दुर्लक्ष करणे म्हणजे विजापूरच्या इभ्रतीस काळिमा होता.
आता शिवाजीला रोखलाच पाहिजे यासठी बेगम ने दरबार भरवला आणि आपल्या सर्व सरदारांस आव्हान केले कि कोण रोखेल त्या शिवाजीला " कोणीच तयार होत न्हवते…. तेव्हढ्यात एक सरदार उठला आणि म्हणाला मै लावूंगा शिवाजी को… ! जिंदा या मुर्दा ! सर्व दरबार सुन्न झाला अफलखानाने विडा उचलला आणि तो मोठ्या सैन्यानिशी मराठी स्वराज्यावर चाल करून आला.

☼ विजापूर दरबारात आपल्याला सेनापती अधिकार आणि शिवाजी महाराजांना कैद अथवा मारून टाकण्याचा विडा उचलून अफजल्या वाईकडे यावयास निघाला.- वाईतून मग जावळी प्रांतात आला.

☼ शिवरायांचा या आधीचा पराक्रम आणि कोणी अवलियाने (फकिराने) तुझे अनिष्ठ होयील अस सांगताच खान आधीच खचला होता. आपण माघार घ्यायची नाही व बडी बेगमला दिलेला शब्द पाळायचा असा निर्वाणीचा विचार करून त्याने आपल्या त्रेसष्ठ पत्नींना ठार मारले.(क्यारे नावाच्या फ्रेंच प्रवाशाने त्याच्या ग्रंथात त्रेसष्ठ बायका मारल्याचा उल्लेख केला आहे)

☼ अफजल खानाचा मार्ग - डोण नदीला डावे घालून पंढरपूर - माणकेश्वर - करंकभोस - शंभूमहादेव - मलवडी - रहमतपूर मार्गे वाई (तुळजापूर - पंढरपूर येथे तुळजाभवानी व पांडुरंगाच्या देवस्थानाचा उपद्रव केला)

☼ वाई येथे अफजलखानशी दोन हात करण्यास कठीण जायील खान जावळीस यावा यासाठी शिवाजी महाराजांनी खानाचे वकील कृष्णाजी भास्कर यांच्यावतीने खानास निरोप पाठविला " राजा कचदिल आहे, वाईस येवून भेट घेण्यास भितो"

☼ हाती आला ससा । तो जावू कसा द्यावा" असा विचार करून खान जावळीस यायला तयार झाला (माशाला गळाचे आमिष नीट लागले)

☼ शिवाजी राजांनीही आपले वकील पंताजी गोपीनाथ बोकील यांच्या मार्फत पत्र पाठविले त्यात लिहिले " जैशे शहाजीराजे तैसे तुम्ही, आपण खानाचा भतीजा होय" असा पत्रव्यवहार करून दोघेही एकमेकांना शब्दांचा, पत्रांचा व्यवहार करून खेळवत होते. पण, इकडे शिवाजी महाराज आपली योजना आखत होते तर खान गुर्मीत शिवाजीला कसा ठार मारू याचा विचार करत होता.
☼भेटीचा दिवस निश्चित करण्यासाठी महाराजांकडे वकील आला त्या दिवशी मार्गशीष शुद्ध पंचमी होती "खानाचे वकील राजीयास जावून भेटले. लौकिक बोलणे जे बोलायचे ते बोलले, एकांती मागती सर्व वर्तमान सांगितले कि आपण बोलल्या प्रमाणे खानास घेवून आलो. आता तुमची त्यांची भेटी एकांती खासे खासे यांची करवितो. तुम्ही हरीफी करून कार्यभाग करणे तो करावा. म्हणोन सांगितले, भेटीस एक दिवस आड करून दुसऱ्यादिवशी दिवशी भेटावे असे केले. राजे गडावरून उतरावे, खानाशी गोठांतून पुढे यावे, उभयतांनी दरम्यान देरे देवून खासे खासे भेटावे" खानास वर्तमान सांगितले व खानानेही ते मान्य केले. { संदर्भ - कृष्णाजी अनंत सभासद बखर } -
► खलबताच्या वेळी भेटीचा दिवस एक दिवस आड करून ठरविला. त्याचे कारण -
१. दुसरे दिवशी चंपाष्टी होती.
२. अफजलखान अजूनही वाई प्रांतात होता त्याला जावळीस यायला वेळ मिळावा. शिवाय अफजलखान व शिवाजी महाराज भेट होणार याची खबर इतर सरदारांत, मुलखांत पोहोचावी, व आपल्या मावळ्यानकडून गुप्त तयारी करून घेण्यास वेळ मिळावा.

☼अफजलखान भेटीची शिवरायांनी केलेली तयारी -
गडाच्या खाली डोंगराच्या चढणीवर एक उत्तम सदर तयार करणेस शिवाजी महाराजांनी "अंबाजी रंगनाथ मलकरे यांना पाठवले (काही ठिकाणी मळेकर, माळेकर असा उल्लेख आहे) [संदर्भ - अफजलखानाचा वध . वि. ल. भावे]
सैन्य दूर ठेवले होते ते जवळ आणून सरदारांस ठिकाणे नेमुंन दिली. ढवळे घाटात चंद्रगडावर लोक जमवून ठेवले कारण हि जागा अशी आहे कि येथून आजूबाजूचा परिसर स्पष्ट दिसतो. आणि येथे सैन्य घेवून जाणे खूपच अवघड आहे. अशा प्रकारे इतर उंच उंच ठिकाणी नाकेबंदी केली.
आपले सैन्य दिसणार नाही असा झाडी झुडपातून दबा धरून मावळे तयार ठेवले व गडावरून तोफेचा आवाज होताच खानच्या सैन्याची धूळधाण उडवावी असा हुकुम दिला.
शिवरायांनी अशी जागा निवडली की सदरेत होणारी मसलत सर्वांना दिसेल, बुरुजावरील तोफ अशी ठेवली कि भेटीचा शामियाना आणि खानाचे सैन्य दोन्ही टप्यात येईल. व सहज दिसतील.
अफजल खान शामियाना बघूनच भूलेल अशा शाही थाटात सदर उभारली. डेऱ्यास सोन्याचे चंदाराई कळस लावला (चंदाराई कळस- चंद्रराव मोऱ्यांचा आणलेला) बाजूने मखमली झालर व पडदे लावले.[संदर्भ - अफजलखानाचा वध . वि. ल. भावे]
तंबूत एक चौथरा बांधला. हा चौथरा ३३ फुट रुंद आणि ४० फुट लाब असा होता. त्याचे कारण असे कि सदरेच्या परिसरात खानाने पुष्कळ लोक आणायचे ठरविले तर अशक्य होते. व दोन्ही बाजूला तुटलेले कडे होते त्यामुळे शिवाजी महाराजांनी जाणीवपूर्वक चौथरा बांधला होता.
मुसलमान बैमान आहे…. कदाचित भेटीच्या वेळी दगाफटका करेल याचा अंदाज शिवाजी महाराजांना होता त्यामुळे सावधगिरीचा इशारा देवून शिवाजी महाराजांनी " हैबतराव, बालाजी सिलीमकर, बांदल सरदार यांना सैन्य जर जवळ आणून अफजलखानाच्या संपूर्ण सैन्याला चांगलेच घेरले होते. अफजलखान आता चांगलाच चक्रव्युहात सापडला होता. माघारी फिरणेही आता शक्य न्हवत.
शिवाजी महाराजांनी खुद्द प्रतापगडावरही नियोजन पूर्वक बंदोबस्त आखला होता. दर बुरजास ५० मावळे, मागील व पुढील बाजूस १०० मावळे, दरवाजावर तसेच कचेरी नजीक तोफा ठेवल्या, तोफांचा आवाज होताच सर्वांनी हुशार व्हावे असा इशाराच देवून ठेवला. [ संदर्भ - शिवद्विग्विजय १६५]
भेटीच्या सदरेच्या मागच्या अंगाला एका खोल दरीत, गर्तेत हिरोजी फर्जंद असे विश्वासू ४० माणूस लपविले
शके १५८१ मध्ये मार्गशीष शुद्ध सप्तमी दिवशी भेटीचा संकल्प ठरला. सकाळी पूजा अर्चा करून शिवरायांनी सर्व विश्वासू सरदाराना एकत्र बोलविले, आम्हाला काही दगाफटका झाल्यास काशीस जावून उत्तर कार्य करावे, धर्म हस्तके व गोदानें सुद्धा दिधली.
स्वताची तयारी करताना दाडी लांब होती ती लहान केली, अंगात चिलखत व जरीची कुडती घातली. डोक्यात बखतर टोप घातला. डाव्या हातात बिचवा लपविला तर अस्तनीत नवटाकी पट्टा घातल, पायात चोळणा घालून कास कसली. अशा मजबुतीने राजे गडाखाली येण्यास तयार झाले.
राजे आई जीजावूंचा आशीर्वाद घेण्यासाठी निघाले, सर्व सरदार आजूबाजूला जमले होते. त्यावेळी राजेंनी आपल्या मातोश्रींकडे संभाजी राजेंना हवाली केले. व म्हणाले "काही वावडे झाल्यास घाबरे न होता, गर्दी करून शत्रूस बुडवावे. राज्य रक्षावे." सभोवारच्या सरदारांना म्हणाले … " तुम्ही सर्व शूर पराक्रमी आहात आमची मदार तुमच्यावरच आहे….सर्वांनी आपली शर्त करावी, राज्य वृद्धीस न्यावे ते तुमचेच आहे. मातोश्रींचा आशीर्वाद घेवून राजे निघाले ते खानच्या भेटीला.

☼ भेटीचा प्रसंग -
अफजलखान प्रचंड सैन्यानिशी येत होता हे दिसताच शिवाजी महाराजांचे वकील पंताजी गोपीनाथ बोकील यांनी खानकडे निरोप पाठविला कि "भेटीसाठी इतके लोक कशाला, राजे आपणाला घाबरतात. इतका जमाव पाहून राजे घाबरून माघारी जातील. व आपली भेट होणार नाही. आपण सोबत एक अंगरक्षक घेवून यावा व बाकीचे लोक परत पाठवावे. खानाला हे पटले व तो पालखीसोबत दोन हुद्देकरी सशत्र, कृष्णाजी पंत, व बरोबर सय्यद बंडा नावाचा पटाईत सरदार होता.
खान सदरेजवळ येतोय हे शिवरायांना वरून दिसत होते. खानच्या मनात दगा आहे हे शिवराय जाणून होते त्यांनी तसा सर्वांना सावधगिरीचा इशारा दिला होता.
प्रतापगडाच्या पलीकडे नेताजी पालकर व मोरोपंत पिंगळे हे सैन्य घेवून सज्ज होते. तोफेचा आवाज होताच हे खानवर तुटून पडणार होते. [ संदर्भ - कृष्णाजी अनंत सभासद बखर]
गडाच्या भोवती रानभर मावळे पेरले होते. सदरेच्या बाहेर एक रणशिंग घेवून मावळा उभा केला होता. "भेट घडताना माझे काहीही होवूदे पण तू शिंग वाजवून सैन्यास इशारा दे" अस शिवरायांनी त्याला सूचना केली होती. शिंगवाल्याचा इशारा होताच गडावरील तोफ डागावी व तोफेच्या इशाऱ्याने सैन्याने शत्रूवर तुटून पडावे अशी योजना होती.
अफजलखान सदरेजवळ येताच शामियाना पाहून थक्क झाला. खानाने राजांना लवकर भेटावयास असा निरोप पाठवला. राजे गड उतरून आलेच होते. राजेंच्या सोबत विश्वासू जीवा महाला (यांचे उपनाव सकपाळ. जावळी प्रांतात मौजे कोंडवली येथे राहणारे जीवा महाले ) होता. तर खानासोबत त्याचा अंगरक्षक सय्यदबंडा उभा होता. मनासारखे सर्व जुळून आले होते जीवामहाला व संभाजी कावजी राजेंसोबत शामियानाच्या दिशेने निघाले.
शिवाजी महाराज शामियाना जवळ येताच त्यांनी सय्यद बंडाला दूर करा. आम्हाला त्याची भीती वाटते खानाने हसत हसत त्याला दूर केला खान मनात खूप खुश होता कि माझ्या अंगरक्षकाला शिवाजी इतका घाबरला तर मला किती घाबरला असेल. खान गुर्मीत शिवाजी राजांकडे पाहत होता. खान म्हणाला हाच का शिवाजी. तेंव्हा राजेंनी हि हा खानच असल्याची खात्री करून घेतली
खानाने राजीयांची मुंडी कवटाळून बगलेखाली धरली - [संदर्भ - सभासद बखर व शिवदिग्विजय]
राजांना थोडे घेरी आल्यासारखे झाले, यावेळी राजेंच्या मनास रामदास स्वामींची आठवण झाली. महाराजांचे मन जरा ठिकाणावर येते न येते इतक्यात खानाच्या कमरेत भली मोठी जमदाड होती. तिचे म्यान टाकून खानाने ती राजीयाच्या कुशीत चालविली. पण राजीयाच्या अंगावर जरीची कुडती होती. त्यावर ती खरखरली अंगास लागली नाही. खानाने दगा केला हे पाहून, मोठ्या हिमतीने सर्व ताकत एकटवून डावे हाती बिचवा होता तो राजांनी खानाच्या हृदयाखाली पोटी मारला. व 'एकांगी करून खानावर तडाख्याचा वार केला. त्या जोरावर एकाच तडाख्यानिशी खानची आतडी बाहेर आली. - [संदर्भ - हनुमंत स्वामींची बखर व रायगडची बखर ]
खान ओरडला "दगा दगा दगा…। इतक्यात खानाचे कृष्णाजी पंत तिथे आले त्यांनी राजांवर वार केला. परंतु तो कारीगार झाला नाही व लागू पडला नाही. इतक्यात राजांनी दुसऱ्याने पट्याचा वार खानवर केला त्याच बरोबर खानची आतडी बाहेर आली. खान पुरा झाला खाली पडला. कृष्णाजी पंतांनी राजांशी पुन्हा लगट केली पण राजेंनी त्यास दूर होण्यास सांगितले. कृष्णाजी पंत निघून न जात भोयांस आत बोलावले व खानाला पालखीत बसवू लागले. तेवढ्यात संभाजी कावजी व जीवा महाला तिथे होते. संभाजी कावजींनी भोयांचे पाय तोडले व खानाची पालखी अडवली. त्यांनी खानाचे मुंडके कापले. इकडे खानाचा अंगरक्षक सय्यद बंडा राजेंवर चाल करून आला. वर्मी घाव मारणार इतक्यात जीवा महालांनी सय्यद बंडाचा हात वरच्यावर कलम केला व राजीयास वाचविले "यावरून एक म्हण प्रसिद्ध झाली "होता जीवा म्हणून वाचला शिवा" [संदर्भ - अफजलखानाचा वध . वि. ल. भावे]
[ टीप - अफजलखानाचे वकील कृष्णाजी भास्कर शिवाजी महाराज यांच्या हातून मारला गेल्याचा हनुमंत स्वामींची बखर, रायगडची बखर, कृष्णाजी अनंत सभासद बखर, शिवदिग्विजय या समकालीन साहित्यात कोणताच पुरावा नाही ]
खान पडला वार्ता सगळीकडे पसरली, रणशिंग वाजताच तोफेचा आवाज झाला. आणि एकच कापाकापी उडाली. मराठ्यांचे सैन्य खानच्या सैन्यावर तुटून पडले तुफान युद्ध झाले. खानाचे सीने जीव तोडून पळत होते. या घनघोर युद्धात शिवरायांचे दोन सरदार शामराज पद्मनामी व त्रिंबक भास्कर कामी आले [संदर्भ - अफजलखानाचा वध . वि. ल. भावे]
अफजलखानाचा मुलगा फाजलखान कोयना काठाने निसटून जात असता खंडोजी काकडे(खोपडे) या सरदाराचे हाती सापडला. पण खंडोजीने धनाच्या मोहास पडून त्यास सोडून दिले. हि वार्ता राजांस कळताच तात्काळ खंडोजीला पकडून त्याचा शिरच्छेद करण्यात आला. [संदर्भ - अफजलखानाचा वध . वि. ल. भावे]
प्रतापगड युद्धात महाराजांना हजार बाराशे उंट, चार हजार घोडे, तीन लाखांचे जवाहीर, सात आठ रोकड राज्यांच्या खजिन्यात जमा झाली. कापड हत्यारे लुट मिळाली ती निराळीच.अशी हि 


अफजलखान वधाची गोष्ट शके १५८१ विकारी नाम संवछरी मार्गशीष सप्तमी गुरवारी घडली.
उत्तर लिहिले · 6/3/2023
कर्म · 9415
0



बाबासाहेबांच्या जीवनातील 3  प्रसंग

संस्कृत भाषेचं ज्ञान
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना स्वतंत्र भारताची नवीन राज्यघटना तयार करण्याबाबत घटनेच्या मसुदा समितीचे अध्यक्षपदी नियुक्त केले गेले.
 
अनुसूचित भाषांची यादी तयार करण्याची वेळ आली तेव्हा बाबासाहेबांनाही त्यातील सर्व भाषांची माता संस्कृत असे द्यायची फार इच्छा होती पण काही सदस्यांच्या विरोधामुळे हे शक्य झाले नाही. पण त्या काळात श्री लाल बहादूर शास्त्री आणि आंबेडकर ह्यांच्यात संस्कृत भाषे संदर्भात चर्चा झाली. त्या वेळी विरोधकांच्या लक्षात आले की दोन महान व्यक्ती संस्कृतभाषेत संभाषण करीत आहेत.
 
शास्त्रीजींना संस्कृत भाषेचे ज्ञान असणे अपेक्षित होते, परंतु अशिक्षित दलित कुटुंबात जन्मलेल्या बाबासाहेबांचा संस्कृत भाषेवर प्रभुत्व असेल हे कोणालाही अपेक्षित नव्हते. ह्या मुळे ही माहिती लवकरच पसरली. त्या दिवसापासून सर्व आंबेडकरांच्या ज्ञानावर विश्वास ठेवू लागले.
 
************

शिपाई नाही तर पाणी नाही
अस्पृश्य मानल्या जाणार्‍या महार जातीचे बाबासाहेब होते. हेच कारण होते की त्यांना शाळेत इतर विद्यार्थ्यांसह बसणे शक्य नव्हते आणि त्यांना वर्गाच्या बाहेरच बसून अभ्यास करावा लागायचा.
 
या शिवाय त्यांना त्या शाळेच्या नळालाही स्पर्श करण्याची परवानगी नव्हती, पण इतर विद्यार्थ्यांना असे कुठलेही बंधन नव्हते. ते पाहिजे तेव्हा पाणी पिऊ शकत होते.

 
त्यांना पाणी तेव्हाच मिळू शकते ज्या वेळी तिथला शिपाई त्यांना नळ सुरु करून देत असत. तो नसल्यावर अजून कोणते ही इतर विध्यार्थी त्यांना नळ सुरु करून देत नव्हते. या परिस्थितीचा सारांश त्यांने आपल्या एका लेखात पण नमूद केला आहे.
 
" शिपाई नाही पाणी नाही।"
 
***********
 
बाबासाहेब आणि ग्रंथपाल
डॉ. आंबेडकर यांनी त्यांच्या आयुष्यात खूप त्रास सहन केले पण त्याचा परिणाम त्यांनी कधीही आपल्या शिक्षणावर होऊ दिला नाही. ते दररोज १४ ते १८ तास अभ्यास सहजच करत असे. बडोद्याचे शाहू महाराजांनी त्यांना उच्च शिक्षणासाठी इंग्लंडला पाठविले. शिक्षण आणि कठोर परिश्रमाच्या त्यांच्या आग्रहाखातर.
 
* बाबासाहेबांना पुस्तके वाचण्याची फार आवड होती. असे आख्यादित आहे की त्यांची वैयक्तिक लायब्ररी जगातील सर्वात मोठी लायब्ररी होती आणि त्यात पुस्तकांची संख्या ५० हजारांपेक्षा देखील अधिक होती.
 
लंडन येथे वास्तव्याच्या वेळी ते दररोज एका लायब्ररीत जात असे आणि तासंतास अभ्यास करत असे. एकदा ते दुपारच्या जेवणाच्या वेळी लायब्ररीत बसून भाकरी खात होते तेव्हा ग्रंथपालाने त्यांना बघितले आणि त्यांना चिडवले आणि टोमणा दिला की कॅफेटेरिया जाण्याऐवजी ते येथे लपून- छपून भोजन करत आहे. ग्रंथपालाने त्यांना शिक्षा करण्याची व त्याचे सदस्यत्व संपविण्याची धमकी दिली. ते ऐकून बाबासाहेबांनी त्यांची माफी मागितली आणि स्वतःच्या आणि आपल्या समाजाच्या संघर्ष आणि इंग्लंडमध्ये येण्याचे कारण सांगितले. तसेच दुपारच्या जेवणासाठी कॅफेटेरिया जाण्यासाठी आपल्याकडे पुरेसे पैसे नसल्याची प्रामाणिक कबुलीही त्याने दिली. हे ऐकल्यावर ग्रंथपाल म्हणाला-
" आजपासून आपण दुपारच्या जेवण्याच्या वेळी येथे न बसता माझ्यासोबतच कॅफेटेरियात येणार आणि मी माझे भोजन तुमच्याबरोबर वाटून खाणार.
* ग्रंथपाल एक ज्यू (यहुदी) होता आणि त्याचा या वागणुकीमुळे बाबासाहेबांच्या मनात यहुदींसाठी एक विशेष स्थान होते.
 
उत्तर लिहिले · 5/2/2023
कर्म · 53710
0
आग्र्याहून सुटका......
जंजिरा किल्ल्यावरून सिद्धी जौहरच्या अफाट सैन्याला तोंड देऊन विशाळगडावर जाणे
उत्तर लिहिले · 25/1/2023
कर्म · 65