
शैक्षणिक समानता
0
Answer link
शिक्षणात समानता, निष्पक्षपातीपणा आणि गुणात्मकता हे तीनही घटक शिक्षणाच्या विकासासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत.
- समानता (Equity): समानता म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्याला त्याच्या सामाजिक, आर्थिक, किंवा सांस्कृतिक पार्श्वभूमीची पर्वा न करता समान संधी मिळायला हवी. याचा अर्थ असा नाही की सर्वांना सारखेच शिक्षण द्यावे, तर ज्या विद्यार्थ्यांना जास्त मदतीची गरज आहे, त्यांना ती मदत पुरवावी.
- निष्पक्षपातीपणा (Impartiality): शिक्षण देताना कोणताही পক্ষপাত नसावा. शिक्षक आणि शिक्षण प्रणालीने प्रत्येक विद्यार्थ्याला समान वागणूक देणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांमध्ये जात, धर्म, लिंग, वंश, किंवा इतर कोणत्याही आधारावर भेदभाव करू नये.
- गुणात्मकता (Quality): शिक्षणाची गुणवत्ता उच्च दर्जाची असावी. शिक्षण असे असावे की ज्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये ज्ञान, कौशल्ये आणि क्षमता विकसित होतील, जेणेकरून ते भविष्यकाळात यशस्वी होऊ शकतील.
हे तीनही घटक एकत्रितपणे काम करतात तेव्हाच शिक्षण सर्वांसाठी प्रभावी आणि अर्थपूर्ण ठरू शकते.
10
Answer link
महाराष्ट्र मध्ये ग्रामीण आणि शहरी भागातील शैक्षणिक अंतर का वाढत आहे याची कारणमीमांसा करणे सर्वप्रथम गरजेचे आहे.

१. मार्गदर्शनाचा अभाव: ग्रामीण भागात शैक्षणिक क्षेत्रात यशस्वी झालेल्या लोकांची कमतरता असते त्यामुळे योग्य मार्गदर्शन मिळत नाही
२. नकारात्मक विचार: शिकून लई मोठा होणारे का रे का ?, आम्ही काय शाळा शिकलो नाही का ? हे असे सर्रास वापरले जाणारे विधान हेच सर्वात धोकादायक असतात.
३. गोष्टींची कमतरता: शैक्षणिक साहित्य , गरजेच्या गोष्टी लवकर वेळेवेवर न मिळणे.
४ अडाणी परिवार: जर घरचे लोक शिकलेले नसले तर शैक्षणीक गोष्टीकडे आपसूक दुर्लक्ष होते.
५ महागाई: ग्रामीण भागात मिळकत कमी असल्यामुळे शैक्षणिक गोष्टीना प्रथमता मिळत नाही.
६. न्यूनगंड: ग्रामीण भागाती विद्यार्थ्यांमध्ये हा जरा जास्त प्रमाणात आढळतो. आपल्याला इंग्लिश येत नाही मग आपण कमी हुशार. इंग्लिश बोलणारे मूल जास्त हुशार अशा विचारांमुळे विद्यार्थी मानाने खचतात आणि प्रयत्न काणे सोडून देतात.
७. माहितीचा अभाव: बर्याचश्या गोष्टी होतकरू विद्यार्थ्यांना माहित नसतात किंवा वेळेवर माहित होत नाही.

असेच बरेचशे कारण आपण सांगू शकतो जे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मागे राहण्यास करणी भूत ठरतात आणि शैक्षणिक अंतर वाढवण्यास मदत करतात. तर हे अंतर कमी करण्यासाठी खालील उपाय करू शकतो.
१. तंत्रज्ञानचा उपयोग: आजकाल इंटरनेट, स्मार्ट फोन या द्वारे आपण माहितीची कमतरता दूर करू शकतो. इंटरनेट सारखा गुरु नाही !! सर्व माहिती क्षणात उपलब्ध होते. योग्य वापर होणे गरजेचं. आजकाल खेड्यापाड्यात हि सुविधा उपलब्ध आहे/ होत आहे.
२. योग्य व्यतींकडून वेळोवेळी सल्ला: खेड्यामधील विद्यार्धीना जरी घरचे शिकलेले नसले तरी योग्य सुशीक्षीत व्यतींकडून वेळोवेळी सल्ला घेणं त्यांच्याशी चर्चा कारण फायद्याचं ठरू शकत.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी न्यूनगंड न बाळगता प्रयानांची पराकाष्टा करून,
वर नमूद केलेल्या अडचणींवर मात केल्याने हे शैक्षणिक अंतर नक्कीच कमी होऊ शकते.