
धार्मिक स्थळे
0
Answer link
देवाचे गुरू বৃহস্পতি (बृहस्पती) यांचे मंदिर महाराष्ट्रात अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यात श्री क्षेत्र मढी येथे आहे.
हे मंदिर 'कान्होबा महाराजांचे मंदिर' म्हणून प्रसिद्ध आहे. कान्होबा महाराज हे गुरु बृहस्पतींचे अवतार मानले जातात.
मंदिराचा पत्ता:
श्री क्षेत्र मढी,
तालुका: पाथर्डी,
जिल्हा: अहमदनगर,
महाराष्ट्र
अधिक माहितीसाठी, आपण खालील संकेतस्थळाला भेट देऊ शकता:
0
Answer link
श्री स्वामी समर्थ महाराज हे अक्कलकोट येथे प्रगट झाले, असे मानले जाते. ते नेमके कोणत्या वनात प्रकट झाले याबाबत निश्चित माहिती उपलब्ध नाही, पण ते प्रथम मंगळवेढ्यात आले आणि नंतर अक्कलकोटला स्थायिक झाले.
0
Answer link
‼️🪢‼️🪢‼️🪢

🔅 संकेश्वर येथील नवसाला पावणारा निलगार गणपती
हा गणपती २१ दिवसाचा असतो
सविस्तर माहिती ⤵️

0
Answer link
चला महाराष्ट्रातील काही सर्वाधिक भेट दिलेली मंदिरे आणि त्यामागील पौराणिक कथांवर एक नजर टाकूया.
- शिर्डी साईबाबा मंदिर हे महाराष्ट्रातील सर्वात जास्त भेट दिलेल्या मंदिरांपैकी एक आहे.
- सिद्धिविनायक मंदिर...
- नांदेडचा गुरुद्वारा...
- इगतपुरी पॅगोडा...
- शनि शिंगणापूर मंदिर...
- महालक्ष्मी मंदिर...
- त्र्यंबकेश्वर मंदिर...
- भीमाशंकर मंदिर
0
Answer link
नांदेड जिल्हा अनेक गोष्टींसाठी प्रसिद्ध आहे, त्यापैकी काही प्रमुख गोष्टी खालीलप्रमाणे:
- श्री गुरु गोविंद सिंग साहिब यांचे समाधी स्थळ: नांदेड हे शिखांचे दहावे गुरु, गुरु गोविंद सिंग साहिब यांचे समाधी स्थळ आहे. येथे 'तखत श्री हजूर साहिब' गुरुद्वारा आहे, जे शिखांचे महत्त्वाचे तीर्थस्थान आहे. SGPC
- नांदेडची होळी: नांदेडची होळी खूप प्रसिद्ध आहे, रंगांची उधळण आणि पारंपरिक पद्धतीने हा सण साजरा केला जातो.
- कृषी उत्पादन: नांदेड जिल्हा ज्वारी, बाजरी, कापूस, सोयाबीन आणि इतर कृषी उत्पादनांसाठी ओळखला जातो.
- सांस्कृतिक आणि ऐतिहासिक महत्त्व: नांदेडमध्ये अनेक प्राचीन मंदिरे आणि ऐतिहासिक वास्तू आहेत, ज्यामुळे या जिल्ह्याला सांस्कृतिक आणि ऐतिहासिक महत्त्व आहे.
- निसर्गरम्य स्थळे: नांदेडमध्ये अनेक निसर्गरम्य स्थळे आहेत, जसे की धबधबे आणि डोंगर, जे पर्यटकांना आकर्षित करतात.
या व्यतिरिक्त, नांदेड जिल्हा शिक्षण आणि उद्योग क्षेत्रातही हळूहळू विकसित होत आहे.
1
Answer link
"म्हसोबा देवस्थान
पुणे जिल्ह्यातील निसर्गरम्य मुळशी तालुक्याच्या रमणीय परिसरातील खारवडे येथे भाविकांच्या भक्तीचे अढळ श्रद्धास्थान असलेले स्वयंभू जागरूक असे नवसाला पावणारे पवित्र भक्तिवैभवी तीर्थक्षेत्र "म्हसोबा देवस्थान' आहे. कौल लावण्याची असलेली पारंपरिक प्रथा म्हणून भाविकांना त्यांच्या अडीअडचणीतून सोडवणूक करून त्यांना बावनकशी निर्णयाची खात्री देणारे मंगलमय वातावरण असलेले देवस्थान आहे.
श्री क्षेत्र म्हसोबा देवाच्या उत्पत्तीची तेराव्या शतकातील आख्यायिका सांगितली जाते. खारवडे गावातील घनदाट झाडी व बांबूच्या बेटात पालापाचोळा गोळा करीत असताना बुवाजी मारणे यांना निंबोणिच्या झाडाखाली हाताला अचानक शेंदूर लागला. त्याच दिवशी रात्री त्यांना श्री म्हसोबाची उत्पत्ती होत असल्याचा दृष्टांत झाल्याने त्यांनी त्या ठिकाणी उत्खनन केले असता शेंदूर लागलेली मोठी मूर्ती आढळली. तीच श्री म्हसोबा देवाची मूर्ती होय. त्यामुळेच खारवडे हे देवाचे मूळस्थान समजले जाते.
पूर्वी खेड्यात असे काही देव सापडले की म्हसोबा संबोधत. त्यामुळे बुवाजींना सापडलेल्या स्वयंभू मूर्तीलाही "म्हसोबा' असे नाव पडले (असावे). मूर्तीचा आकार शंकराच्या पिंडीसारखा (निमुळता) असून, भगवान शंकराचाच हा अवतार असल्याचे मानले जाते, कारण शंकराप्रमाणेच हा देखिल लवकर प्रसन्न होतो!
मूर्ती सापडल्यानंतर त्यावेळी केंबळाचे (गवताचे) देऊळ उभारण्यात आले. आंदगाव येथील (कै.) वामनकाका खोले यांनी मूर्तीस आकार देऊन देखणेपण आणले. स्वयंभू मूर्ती शेजारी एक पितळी मूर्ती असून ती देखील श्री म्हसोबा देवाचीच आहे. त्या शेजारी एक त्रिशूळ देखील आहे. मारणे यांच्याच घरातर्फे देवाची पूजा अर्चा, धार्मिक विधी होऊ लागले. नियमित येणाऱ्या भाविकांमुळे पंचक्रोशीतील ही भाविक येऊ लागले. भाविकांची गर्दी होऊ लागली. देणगीही मिळू लागल्याने मिळालेली देणगी, ग्रामस्थांची वर्गणी व हरिभाऊ कचरे यांच्या उत्पन्नाची रक्कम एकत्र करून बहुलीचे श्री. दिसले यांना मंदिर बांधकामाचे कंत्राट दिले. मंदिर उभारणी 4 एप्रिल 1936 रोजी केली.
देवाची नैमित्तिक पूजा अर्चा करण्याचे अधिकार ठराविक घराण्याकडे असतात; त्याप्रमाणे महादेव कोळी घराण्याकडे खारवडे गावातील सर्व देवांच्या पूजा अर्चेचा मान आहे. दैनंदिन धार्मिक विधिवत पूजेनंतर दुपारी 12 वाजता देवाची आरती होते. नंतर वरण-भात अथवा पुरणपोळीचा नैवेद्य दाखविला जातो.
महिन्याच्या दर पौर्णिमेला रुद्राभिषेक केला जातो. चैत्र पौर्णिमा हा देवाचा वार्षिकोत्सव; त्या दिवशी महारुद्राभिषेक करण्यात येतो. नवरात्रात घटस्थापनेपासून देवाचे मुखवटे मारणे घराण्यातून पालखीतून मिरवणुकीने मंदिरात आणले जातात. दसऱ्याच्या दिवशी भैरवनाथ मंदिरापर्यंत व परत श्री म्हसोबा मंदिरात पालखीतून मिरवणूक काढण्यात येते. तेथे सर्व ग्रामस्थ एकत्र येऊन सोने लुटण्याचा सोनेरी कार्यक्रम करतात.
श्री म्हसोबा देवाच्या मूर्ती जवळ वाळंजाई देवीची मूर्ती असते, त्याप्रमाणे येथेही देवाच्या उजव्या बाजूस वाळंजाई देवीची मूर्ती आहे. देवाच्या समोरील दोन्ही बाजूला संरक्षक आहेत. दक्षिणेकडून बाहेर पडल्यावर श्री गणपती, श्री मारुती व श्री दत्ताचे मंदिर आहे. ह्या देवांचे दर्शन घेऊन बाहेर पडल्यावर एक पिंड व दोन हत्तींची दगडी मूर्ती आहे. मुख्य मंदिरा लगत असलेल्या छोट्या मंदिरातील मूर्ती ही आंदगांवचे देवाचे भक्त श्री. साळुंके यांच्या घराण्यातील आहे. मंदिराच्या मागे उत्तरेला बुवाजी मारणे यांची मूर्ती असून तिथे मुंजाबा देवाचीही मूर्ती आहे. खारवडे गावात श्री भैरवनाथ, शंकर, काळुबाई, हनुमान आदी. देवांच्या पुरातन मूर्ती व शिवकलेचे स्तंभ आहेत. सर्व देवतांचा समावेश करून कारभारात सुसूत्रता येण्यासाठी विश्वस्त मंडळाची सन 1993 मध्ये स्थापना करण्यात आली आहे.
सन 1936 मध्ये बांधण्यात आलेल्या पूर्वीच्या देवळाच्या जीर्णोद्धाराचे सुनियोजित व सुबक काम खारवड्याचे शिल्पकार लक्ष्मण तुकाराम मारणे आणि त्यांचे सहकारी कै. रघुनाथराव जोगावडे, कै. लक्ष्मणराव विठ्ठलराव मारणे, कै. नारायणराव मारणे, कै. सखाराम मारणे, श्री. नामदेवराव सोनवणे, श्री. रामभाऊ साळेकर, श्री. सादबा जोगावडे व समस्त ग्रामस्थांच्या सहकार्यातून सन 1980 मध्ये सध्या अस्तित्वात असलेल्या मंदिराची उभारणी करण्यात आली.
मंदिरासमोरील श्री दत्त मंदिराच्या संस्थापक श्रीमती. बिरमल, गेनूजी व हरिभाऊ कचरे, कृष्णाजी धावडे ह्या भक्तांनी निस्सीम भक्तीने देवाची सेवा केली. त्याच निस्सीम भक्ती भावाने श्री. रमेश ऊर्फ बाबा कचरे, विजय कचरे, वांजळवाडीकर देवास सेवा समर्पित करीत आहेत.
पूर्वापार परंपरेनुसार सालाबादप्रमाणे चैत्री पौर्णिमा "हनुमान जयंती' हा श्री म्हसोबा देवाचा वार्षिकोत्सव असतो; तर कोजागरी पौर्णिमेच्या दिवशी श्री भैरवनाथाचा वार्षिक उत्सव! उदंड उत्साहाने दोनही उत्सव साजरे केले जातात.
चैत्र पौर्णिमेला सूर्योदयासमयी हनुमानाची षोडशोपचारे पूजा करून जन्मोत्सव साजरा केला जातो. श्री म्हसोबा देवास महारुद्राभिषेक करून दुपारी 12 वाजता आरती झाल्यावर गोडाचा नैवेद्य व उपस्थित सर्वांस लाडवाचा प्रसाद देण्यात येतो. दुपारी चार वाजता मारणे यांच्या घरातील देवाच्या मूर्तींची पालखी काठ्यांच्या मिरवणुकीसह देवळात आणल्या जातात. तेथे पूजा अर्चा झाल्यावर पुन्हा सायंकाळी सहा वाजता आरती केली जाते. आरती नंतर भक्तांच्या अंगात देव आल्यावर श्रद्धेने भाविक त्यांचे दर्शन घेतात. देवही त्यांना श्रीफळ, अंगारा प्रसाद म्हणून देतात.
रात्रीच्या सुमारास देवांना "छबिना'चांदीच्या पालखीतून देवळास प्रदक्षिणा घालत असताना पंचक्रोशीतील आंदगाव, भोंडे, वातुंडे, आटाळवाडी आदी. ग्रामदेवतांच्या मानाच्या काठ्यांचाही सहभाग असतो. उत्सवानिमित्त जमलेल्या भाविकांसाठी पंचक्रोशीतील ढोल-लेझीम व सांस्कृतिक कार्यक्रम करण्यात येतात. फार पूर्वीपासूनचा वांजळवाडीकरांचा नवसाचा तमाशा झाल्यावर सांस्कृतिक कार्यक्रम होतात. सकाळी "हजेरी' झाल्यानंतर पारंपरिक कुस्त्यांचा कार्यक्रम होऊन उत्सवाची सांगता होते.
आश्विन शुद्ध पौर्णिमा म्हणजेच कोजागरी पौर्णिमेच्या दिवशी श्री भैरवनाथाचा वार्षिकोत्सव साजरा केला जातो. सकाळी श्री भैरवनाथाची पालखीमधून मिरवणूक काढून विधिवत पूजा-अर्चा करण्यात येते. श्री भैरवनाथ व जोगेश्वरी देवी यांचे लग्न असते. निरभ्र आकाशातील चांदण्यात सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जातात. रात्री 12 वाजता देवाचे लग्न लागल्यानंतर चंद्राची पूजा करून चंद्रप्रकशात ठेवलेल्या आटीव दुधाचा नैवेद्य दाखवून सर्वांना प्रसाद म्हणून देण्यात येतो.
मार्गशीर्ष शुद्ध पौर्णिमेस "दत्त जयंती' उत्सवाची "गुरुचरित्र'चे सामुदायिक पारायणाने सांगता केली जाते. पौष महिन्यातील दोन मंगळवारी वनभोजन आयोजित केले जाते. सर्व ग्रामस्थ एकत्र येऊन देवाला गोडाचा नैवेद्य करून वनभोजनाचा कार्यक्रम आनंदात साजरा करतात.
मुठा खोऱ्यातील लढवय्ये लढाईला जाताना श्री म्हसोबाचे दर्शन घेऊन जात असत. सुप्रसिद्ध पराक्रमी वीर बाजी पासलकर देवदर्शनास येत असे.
ज्योतिर्पीठाधीश्वर बद्रिकाश्रम हिमालय अनंत श्री. विभूषित स्वामी अमृतानंद देवतीर्थ महाराज शंकराचार्य देवाच्या दर्शनास तीन वेळा येऊन गेले. अशा या पवित्र परिसरात दरवर्षी श्री. चंद्रकांत भरेकर व मित्र परिवारांतर्फे मोफत सामुदायिक बिगर हुंडा शुभविवाह मंगलमयी वातावरणात आयोजित केले जातात. देवस्थान मार्फत भाविकांसाठी तसेच गावाच्या विकासासाठी अनेक स्तुत्य उपक्रम राबविले जातात. भारत सरकारच्या "निर्मल ग्राम' स्पर्धेतील निखळ व निर्भेळ यश हे त्याचेच एक उदाहरण होय!
1
Answer link
दूरगावला पुण्यावरून दौंड-श्रीगोंदा-हिरडगाव-दूरगाव असे जाता येते. दौड पासून साधारण ४० किमी अंतरावर आहे दूरगाव. या छोट्याशा गावात वसले आहे महाराष्ट्रातील एकमेव "दुर्योधनाचे मंदिर"!
महाराष्ट्रातील एकमेव दुरगावातील आगळेवेगळे दुर्योधनाचे मंदिर
आश्चर्याने विस्फारलेले त्यांचे डोळे अजूनही माझ्या नजरेसमोर आहेत. किती बोलके होते ते भाव! खेळातल्या स्टॅच्यु प्रमाणे पूर्णत: स्तब्ध!
आपल्या दूरगावातील एक मंदिर पहायला एवढे लोकं आले आहेत ह्या कल्पनेने, कडेवर विसावलेल्या बाळापासून, सर्व वयोगटातील स्त्री-पुरुष आमच्याकडे अचंबित नजरेने पाहत होते.
"दूरगाव"! अहमदनगर जिल्यात, कर्जत तालुक्यातील एक छोटेसे गाव! दूरगावला पुण्यावरून दौंड-श्रीगोंदा-हिरडगाव-दूरगाव असे जाता येते. दौड पासून साधारण ४० किमी अंतरावर आहे दूरगाव. या छोट्याशा गावात वसले आहे महाराष्ट्रातील एकमेव "दुर्योधनाचे मंदिर"! त्याच बरोबर इथे आहे साधारण पंधराव्या शतकातील शंकराचे मंदिर!
दुर्योधन म्हटल की आठवते महाभारत आणि दुर्योधनाच्या सांगण्यावरून दु:शासनाने केलेले द्रौपदी वस्त्रहरण!
महाभारतातील "खलप्रवृत्ती" दर्शवणाऱ्या दुर्योधनाचे मंदिर? कोणी बांधले? कधी? का? दूरगावीच का?
आमच्या ग्रुपमध्ये कोणीतरी म्हणाल, दुर्योधनाच खर नाव सुयोधन होत. त्याच्या वाईट कर्माने त्याच नाव पडल दुर्योधन.
मंदिर पाहण्याची उत्सुकता वाढली होती. "दुर्योधनाचे मंदिर कुठे आहे?" असं विचारल्यावर गावकऱ्यांनी रस्ता दाखवला. काही सेकंदांत जवळजवळ पूर्ण गावात बातमी पसरली. लोकं घराबाहेर येऊन उभे राहिले. रस्त्याच्या दुतर्फा जमलेले गावकरी विस्मयकारक नजरेने आमच्याकडे पाहत होते.
गाववस्तीकडे पाठ करून असलेले हे मंदिर. आधी झाले ते कळसाचे दर्शन. 

बऱ्यापैकी उंची असलेल्या आणि आतून पोकळ असलेल्या रंगीत कळसाने उत्सुकता अधिकच वाढली. काही पायऱ्या चढून गेल्यावर मंदिर दिसले.

मंदिराचे प्रवेशद्वार विटांनी बंद केलेले. आम्ही आलोय म्हटल्यावर १-२ गावकऱ्यांनी पटापट त्या विटा बाजूला करायला सुरुवात केली. बघता बघता विटांचा ढीग बाहेर काढल्या गेला.

आता मंदिराचे दार उघडले गेले. एक छोट्याश्या खोलीत दुर्योधनाचा पुतळा ठेवलेला. अत्यंत सुस्थितीतील आणि आकर्षक!

'महाराष्ट्राची शोधयात्रा' या संकेतस्थळावरील उपलब्ध माहितीनुसार आणि गावातील लोकांनी सांगितलेल्या आख्यायिकानुसार, महाभारतातील भीषण युद्धानंतर भीमाच्या भीतीने दुर्योधन एका सरोवरामध्ये जाऊन लपला. भीमाने दुर्योधनाला युद्धासाठी आव्हान केले तेव्हा सरोवरातील जलदेवतेने दुर्योधनाला सरोवराबाहेर जायला सांगितले. भीम आणि दुर्योधन यांच्यामध्ये घनघोर युध्द होऊन दुर्योधन मारला गेला. तेव्हापासून असे समजले जाते की पाण्याचे थेंब, पाण्याचे ढग, विस्तृत जलसाठे इ. वर दुर्योधन राग धरून आहे. रागीट आणि तापसी वृत्तीच्या दुर्योधनाची जर ढगांवर दृष्टी पडली तर पाऊस पडणार नाही. पाऊस पडला नाही तर दुष्काळ पडेल ह्या समजाने दूरगावचे ग्रामस्थ मंदिराचे दार विटांनी बंद करून ठेवतात.
हीच माहिती विटा दूर करत असलेल्या गावकऱ्यांनीही आम्हाला दिली. दुर्योधनाची मूर्ती कोणी आणली, कधी वसवली गेली इ. बद्दलची माहिती गावकऱ्यांना तितकीशी सांगता आली नाही. परंतु अतिशय सुंदर, सुबक आणि लक्षवेधक दुर्योधनाची मंदिरस्थित मूर्ती पाहून मनात आल की "खलप्रवृत्ती" असणाऱ्या दुर्योधनाचे ही मंदिर असावे ही गोष्टच किती विलक्षण आहे!
भीमाशी झालेल्या युद्धानंतर दुर्योधनाने अंत्यसमयी महेश्वराची म्हणजे शंकराची प्रार्थना केली म्हणून येथे महेश्वर अर्थात शंकराचे मंदिर आहे. मंदिराच्या शिखरामधे दुर्योधनाचे वैशिष्टपूर्ण मंदिर आहे.
शंकराचे मंदिर दगडी चौथऱ्यावर उभारलेले आहे. मंदिराच्या खांबावर जास्त कलाकुसर नसली तरी त्याच्या रचनेवरून ते पंधराव्या शतकातील असू शकतात असे अनुमान आहे.
›

आणि गाभाऱ्यात दोन शिवपिंडी आहेत. हे या मंदिराचे वैशिष्ट्यच म्हणावे लागेल.
महाशिवरात्र आणि अधिक महिन्यात इथे उत्सव भरतो.

महाराष्ट्रातील एक छोट्याशा गावात वसलेला आणि गावकऱ्यांनी जपलेला हा वारसा!

श्रद्धा-अंधश्रद्धा या पलीकडे जाऊन विचार करून महाराष्ट्रात असलेल्या एकमेव अशा दुर्योधन मंदिराला एकदा अवश्य भेट देऊन गावकऱ्यांनी जतन केलेला वारसा तुमच्या आमच्या सारख्या लोकांसमोर यावा हाच ह्या मंदिराबद्दल लिहिण्यामागील एक उद्देश!
🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻