Topic icon

धार्मिक स्थळ

0
जगातील सर्वात मोठे मंदिर कंबोडियामधील अंगकोर वाट (Angkor Wat) आहे. हे मंदिर ख्मेर राजघराण्याने 12 व्या शतकात बांधले असून ते विष्णू देवाला समर्पित आहे.

हे मंदिर सुमारे 162.6 हेक्टर (402 एकर) क्षेत्रफळात पसरलेले आहे. अंगकोर वाट हे केवळ सर्वात मोठे मंदिरच नाही, तर ते जगातील सर्वात महत्वाचे पुरातत्वीय स्थळांपैकी एक आहे.


अधिक माहितीसाठी आपण खालील संकेतस्थळांना भेट देऊ शकता:

उत्तर लिहिले · 6/7/2025
कर्म · 2200
0

जटायु मंदिर केरळ राज्यात आहे.

हे मंदिर கொல்லம் (Kollam) जिल्ह्यात Chadayamangalam नावाच्या गावी एका मोठ्या टेकडीवर आहे.

हे ठिकाण तिरुवनंतपुरम आंतरराष्ट्रीय विमानतळापासून (Thiruvananthapuram International Airport) सुमारे 51 किलोमीटर अंतरावर आहे.

अधिक माहितीसाठी:

उत्तर लिहिले · 6/4/2025
कर्म · 2200
0

कामाख्या देवी मंदिर हे भारतातील आसाम राज्यातील गुवाहाटी शहरामध्ये स्थित आहे. हे मंदिर तंत्रमार्गातील एक महत्त्वाचे शक्तिपीठ मानले जाते.

या मंदिराची काही वैशिष्ट्ये:
  • योनीरूपात देवी: येथे देवीची मूर्ती नसून योनीच्या रूपात तिची पूजा केली जाते.
  • अंबुबाची उत्सव: दरवर्षी जून महिन्यात अंबुबाची उत्सव असतो, ज्यात देवी रजस्वला होते, असा समज आहे. या काळात मंदिर तीन दिवस बंद ठेवले जाते.
  • नैसर्गिकरित्या रक्तस्त्राव: मंदिरातील योनीतून नैसर्गिकरित्या रक्तस्त्राव होतो, असे मानले जाते.
  • तंत्र साधना: हे मंदिर तंत्र साधनेसाठी महत्वाचे केंद्र आहे.
  • 51 शक्तिपीठांपैकी एक: कामाख्या मंदिर हे 51 शक्तिपीठांपैकी एक मानले जाते.

अधिक माहितीसाठी आपण खालील संकेतस्थळांना भेट देऊ शकता:

उत्तर लिहिले · 5/4/2025
कर्म · 2200
0

रामेश्वरम हे भारताच्या तमिळनाडू राज्यातील एक बेट शहर आहे. हे शहर अनेक गोष्टींसाठी प्रसिद्ध आहे:

  • रामनाथस्वामी मंदिर: हे मंदिर भारतातील सर्वात महत्वाचे हिंदू तीर्थक्षेत्रांपैकी एक आहे. यात जगातील सर्वात लांब कॉरिडॉर आहे.
  • डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचे जन्मस्थान: रामेश्वरम हे भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचे जन्मस्थान आहे.
  • धनुषकोडी: हे एक निर्जन शहर आहे, जे 1964 च्या चक्रीवादळात पूर्णपणे उध्वस्त झाले होते. हे शहर भारत आणि श्रीलंका यांच्यातील सीमेवर आहे.
  • पंबन पूल: हा भारतातील पहिला समुद्रावरील पूल आहे, जो रामेश्वरमला भारताच्या मुख्य भूभागाशी जोडतो.
  • अगनि तीर्थम: येथे रामाने रावणावर विजय मिळवल्यानंतर प्रायश्चित्त केले होते, असे मानले जाते.

याव्यतिरिक्त, रामेश्वरम हे सुंदर समुद्रकिनारे आणि धार्मिक महत्त्वासाठी देखील ओळखले जाते.

संदर्भ:

उत्तर लिहिले · 25/3/2025
कर्म · 2200
0
भगवंत मंदिर श्री विष्णुला समर्पित आहे. ह्या मंदिराचे वैशिष्ठ्य म्हणजे संपूर्ण भारतात श्री विष्णुला भगवंत या नावाने ओळखले हे एकमेव मंदिर आहे. हे मंदिर ई स १२४५ मध्ये हेमाडपंथी कला शैलीत बांधले गेले. मंदिराला चार दिशांनी चार प्रवेश द्वार आहेत पण मुख्य प्रवेश द्वार हे पूर्वाभिमुख आहे.

बार्शी
बार्शीतील भगवंत मंदिर

बार्शी शहर भगवंत मंदिरासाठी प्रसिध्द आहे. भगवंत मंदिर श्री विष्णुला समर्पित आहे. ह्या मंदिराचे वैशिष्ठ्य म्हणजे संपूर्ण भारतात श्री विष्णुला भगवंत या नावाने ओळखले हे एकमेव मंदिर आहे. हे मंदिर ई स १२४५ मध्ये हेमाडपंथी कला शैलीत बांधले गेले. मंदिराला चार दिशांनी चार प्रवेश द्वार आहेत पण मुख्य प्रवेश द्वार हे पूर्वाभिमुख आहे. गर्भ गृहा समोर गरुड खांब आहे. श्री भगवंताची मूर्ती काळ्या पाषाणाची असून भगवंताच्या हातात शंख, चक्र व गदा आहेत. राजा अंबरीश ची मूर्ती भगवंताच्या उजव्या हातास आहे. श्री लक्ष्मी भगवंताच्या पाठीमागे आहे. भगवंताच्या कपाळा वर शिवलिंग असून छातीवर भृगू रीशीच्या पायाचे ठसे आहेत.

मंदिराला श्री नानासाहेब पेशवे यांच्याकडून १७६० साली, इस्ट इंडिया कंपनी यांच्याकडून १८२३ साली व ब्रिटीश सरकारकडून १७८४ मध्ये इनाम मिळाल्याचे ईतिहास नोंदी आहेत. मंदिराची देख भाल पंच कमिटी मार्फत केली जाते. मंदिराच्या नित्य सेवा बडव्याकडून केली जाते. नित्य सेवांमध्ये सकाळी काकडा आरती, नित्य पूजा, महापूजा, संध्याकाळी धुपारती व रात्री शेजारती संपन्न होते. आषाढी, कार्तिकी, चैत्री व माघी एकादशी च्या पंढरपूरच्या यात्रा महोत्सवा दरम्यान मोठ्या संख्येने भक्त गण भगवंताचे दर्शन घेतात. आषाढी व कार्तिकी एकादशीच्या वेळेस भगवंताची गरुडावर बसून नगर प्रदक्षिणा केली जाते. प्रत्येक पौर्णिमाला छबिना काढला जातो.

छायाचित्र दालनसर्व माहिती पहा
श्री भगवंत बार्शीश्री भगवंत मुर्ती
Previous
Next
भगवंत मुर्तीश्री भगवंत मुर्ती
Previous
Next
कसे पोहोचाल?:
विमानाने
जवळचे विमानतळ - पुणे.

रेल्वेने
मध्य रेल्वेच्या कुर्डुवाडी-लातुर मार्गावर आहे.

रस्त्याने
सोलापूरपासुनचे अंतर 72 की.मी.


उत्तर लिहिले · 2/10/2021
कर्म · 121765
2
🄼🄰🄷🄸🅃🄸

*🔹 भारतातील अशी दोन मंदिरे जेथे ‘दुर्योधनाची’ पूजा केली जाते*











————————————————
★माहिती सेवा ग्रूप पेठवडगाव कोल्हापूर★
————————————————
दुर्योधन म्हणजे महाभारतातील सर्वात दुष्ट पात्र ! महाभारत घडण्यासाठी दुर्योधनाचा अहंकार आणि पांडवांप्रती असलेला त्याचा द्वेष कारणीभूत होता हे आपण सर्वजण जाणतोच. https://bit.ly/4cCOqEM अश्या या दुर्योधनाला देवाचे रूप प्राप्त आहे हे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटल्याखेरीज राहणार नाही. आपल्या भारतात दोन टोकांना म्हणजे उत्तरेला आणि दक्षिणेला दुर्योधनाची दोन मंदिरे आहेत आणि तेथील स्थानिक न चुकता दरोरोज दुर्योधनाची पूजा करतात हे विशेष!
🔹एक मंदिर आहे उत्तराखंड राज्यामधील उत्तरकाशी या ठिकाणी ! : 
या भागातील एकूण २२ गावातील स्थानिक दुर्योधनाची पूजा करतात आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे या प्रत्येक गावामध्ये दुर्योधनाची आणि इतर कौरवांची छोटी छोटी देऊळे आहेत. या गावांपैकी नेतवाड-जखोल-ओस्ला या गावामध्ये दुर्योधनाचे सर्वात मोठे मंदिर आहे. गावकऱ्यांची अशी श्रद्धा आहेकी दुर्योधन या संपूर्ण भागाला वाईट प्रवृत्तींपासून वाचवतो आणि या भागाचे संरक्षण करतो. अशी आख्यायिका सांगितली जाते की जेव्हा दुर्योधन मृत्यू पावला तेव्हा येथील स्थानिक इतके रडले की त्यांच्या डोळ्यांतून वाहणाऱ्या अश्रुंमधून येथील तामस नदीचा उगम झाला. या भागात दुर्योधन-कौरव यांच्या नावाने मोठे उत्सव साजरे केले जातात. सर्वात मोठा उत्सव हा वैशाख महिन्यात होतो. या उत्सवावेळी लोक रात्रभर जागरण करतात आणि ज्या माणसाच्या अंगात दुर्योधन येतो तो माणूस रुपन आणि सुपन नद्यांच्या काठी यमराजाने बोलावलेल्या भूतांच्या बैठकीसाठी जातो. तो भूतांना आणि यमराजाला प्रश्न विचारतो आणि पहाटे पुन्हा मंदिराच्या ठिकाणी परततो. दुर्योधनाला मेंढी अर्पण करण्याची येथे प्रथा आहे असे केल्याने दुर्योधनाची आपल्यावर कृपादृष्टी होते असे येथील गावकऱ्यांचे मत आहे.            
╔══╗ 



╚══╝
▄ █ ▄ █ ▄ ▄ █ ▄ █ ▄ █
👁- - - - - - - - - - - -●
🥀 ᵐᵃʰiᵗi ˢᵉᵛᵃ ᵍʳºᵘᵖ, ᵖᵉᵗʰᵛᵃᵈᵍᵃºⁿ
🔹दुसरे मंदिर आहे केरळ राज्यात ! : 
केरळ राज्याच्या कोल्लम जिल्ह्यात मलांडा नावाचे एक मंदिर आहे.हे मंदिर दुर्योधन आणि त्याच्या उर्वरित ९९ भावांना म्हणजेच कौरवांना अर्पित आहे. 𝔐𝔞𝔥𝔦𝔱𝔦 𝔰𝔢𝔳𝔞 𝔤𝔯𝔬𝔲𝔭 𝔭𝔢𝔱𝔥𝔳𝔞𝔡𝔤𝔞𝔬𝔫मलांडा मंदिरामध्ये मलायापोप्पमदेव या नावाने द्रविडी परंपरेने दुर्योधनाची पूजा अर्चा केली जाते. या भागातील कौरव समाजाचे लोक दुर्योधनाला आपला मूळपुरुष मानतात. दुर्योधनाच्या या मलांडा मंदिरामध्ये भीष्म, द्रोणाचार्य, कर्ण आणि दुशला यांच्याही मुर्त्या आढळतात.ᵐᵃʰⁱᵗⁱ
मंदिरात येणारे भाविक दुर्योधनाला मद्य, सुपारी, कोंबडाआणि लाल रंगाचे कपडे अर्पण करतात. येथील कौरव समाज मार्च महिन्यात दुर्योधनाच्या नावाने ‘मालाकुडा’ नावाचा सण साजरा करतात. केरळ मधील प्रसिद्ध ‘केत्तूकाझचा’ परंपरा ‘मालाकुडा’ सणापासूनच सुरु झाली आहे.https://whatsapp.com/channel/0029VaPJhXL84Om4z32l8I24



______

https://m.facebook.com/story.php?story_fbid=490117038052891&id=100011637976439
4
💠शिखर शिंगणापूरचा शंभू 💠
शिखर शिंगणापूर! पार्वतीने रुसून लपून बसलेल्या शंकराला अचूक हुडकून काढले आणि पुन्हा जाऊ नये म्हणून चक्क दुसर्‍यांदा जिथे लग्न केले ते हे ठिकाण. स्वयंभू महादेवाचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध आहे. शंकर पार्वतीच्या विवाहाचे ठिकाण म्हणून शिखर शिंगणापूरला 'दक्षिण कैलास' असे म्हणतात.
सातारा जिल्ह्यातल्या माण तालुक्यामध्ये दहिवडी गावापासून २० कि.मी. अंतरावर शिखर शिंगणापूर वसले आहे. इथे असलेल्या डोंगराला शंभू महादेवाचा डोंगर म्हणतात. या डोंगराच्या पायथ्याशी शिंगणापूर गाव आहे. हा डोंगर म्हणजे सह्याद्रीचाच एक फाटा असल्याने डोंगरावर दाट झाडी आहे. महादेवाचे मंदिर याच डोंगरावर आहे. मंदिरात जायला जवळपास ४०० पायर्‍या चढून जावे लागते. त्यापुढे आणखी थोडे चढून गेल्यावर खडकेश्वर मंदिर आहे.
महादेवाचे हे मंदिर आणि शिंगणापूर गाव यादव कुळातील सिंधण राजाने वसवले आहे असे म्हणतात. मंदिराला दगडी तटबंदी आहे आणि या मंदिराच्या आवारात पाच मोठ्ठे मोठ्ठे नंदी आहेत. या मंदिराचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे मोठ्या घंटा आहेत. या घंटापैकी एक घंटा ब्रिटीशांकडून मंदिराला मिळाली आहे. मंदिराच्या गाभार्‍यामध्ये दोन शिवलिंग आहेत. त्यांनाच शिव पार्वतीचे प्रतिक मानतात.

शिवाजी महाराजांच्या घराण्यामध्ये शिखर शिंगणापूरच्या महादेवाचे अतिशय महत्त्व होते. इथे असणारा तलाव शिवतीर्थ असे म्हणतात. शिवाजी महाराजांचे आजोबा मालोजी भोसले यांनी १६०० मध्ये बांधला. या मंदिराविषयी आणखी एक की, जीजाबाईंना शिवनेरीवर सोडून चिंताक्रांत शहाजीराजे परतत असतांना या मंदिरात दर्शनासाठी आले होते. तेव्हा त्यांना दृष्टांत मिळून सारे काही ठीक होईल असे शंकरांनी सांगितले. या गोष्टीची आठवण म्हणून जरी पटक्याबरोबर भगवा झेंडाही लावण्याचे त्यांनी ठरवले.माहिती सेवा ग्रूप पेठवडगांवची पोस्ट,या मंदिराचे शिखर हा स्थापत्यकलेचा उत्कृष्ट नमुना आहे. शिखरावर अगदी नाजुक नक्षीकाम केले आहे. मंदिराच्या आवारात अनेक दिपमाळा आहेत. या मंदिराच्या पश्चिमेकडे अमृतेश्वराचे हेमाडपंथी मंदिर आहे. मंदिरात चार वेळा पुजा केली जाते. दरवर्षी चैत्र शु. अष्टमीला शंकर पार्वती विवाह सोहळा अगदी साग्रसंगीत साजरा केला जातो. पंचमीला हळदीचा कार्यक्रम असतो. या लग्नासाठी एक भले मोठे ५५० फुट लांब पागोटे विणले जाते. ज्या कुटूंबाला हे काम दिले जाते ते कुटूंब पूर्ण वर्षभर यासाठी मेहनत करते. विवाहाच्या दिवशी या पागोट्याचे एक टोक महादेवाच्या कळसाला तर दुसरे टोक अमृतेश्वराच्या देवळाच्या कळसाला बांधतात.
या महादेवाला अभिषेक करण्यासाठी खालून कावडीत पाणी आणतात. या कावडींमध्ये सगळ्यात मोठी कावड असते ती भुत्या तेल्याची. या कावडीला दोन मोठे मोठे रांजण लावलेले असतात. ते वर घेऊन जाणे हे तसे कष्टाचे काम. आणि मग ज्याच्या अभिषेकासाठी हे पाणी न्यायचे त्यालाच मदतीला बोलवतात. आणि हाकही हक्काचे माणूस असावे तशी म्हणजे, हे म्हादया, धाव, मला सांभाळ अशी. असा सगळा द्रविडी प्राणायाम करत ही कावड वर नेली जाते आणि महादेवाचा अभिषेक होतो.
असं हे शिखर शिंगणापूर ऐतिहासिक, पौराणिक कथांशी जोडलेले एक रम्य ठिकाण आणि तीर्थक्षेत्रही!