Topic icon

भाषण

0

पुस्तक वाचल्यामुळे मी घडत आहे

आदरणीय मुख्याध्यापक, शिक्षक आणि माझ्या प्रिय मित्रांनो,

आज मी 'पुस्तक वाचल्यामुळे मी घडत आहे' या विषयावर माझे विचार व्यक्त करणार आहे. पुस्तके केवळ अक्षरांची मालिका नाहीत, तर ते ज्ञानाचे भांडार आहेत. ती आपल्याला भूतकाळ, वर्तमानकाळ आणि भविष्यकाळाची माहिती देतात.

  • ज्ञान आणि माहिती: पुस्तके आपल्याला विविध विषयांवर माहिती देतात. इतिहास, विज्ञान, कला आणि साहित्य अशा अनेक क्षेत्रांतील ज्ञान आपण पुस्तकांमधून मिळवू शकतो.
  • विचारशक्तीचा विकास: वाचनामुळे आपली विचारशक्ती वाढते. आपण नवीन कल्पना शिकतो आणि जगाला एका वेगळ्या दृष्टीने पाहतो.
  • भाषा आणि संवाद कौशल्ये: पुस्तके वाचल्याने आपली भाषा सुधारते. नवीन शब्द आणि वाक्यरचना शिकायला मिळतात, ज्यामुळे आपले संवाद कौशल्य वाढते.
  • संवेदना आणि समजूतदारपणा: पुस्तके आपल्याला इतरांच्या भावना आणि अनुभवांशी जोडतात. त्यामुळे आपल्यामध्ये सहानुभूती आणि समजूतदारपणा वाढतो.
  • व्यक्तिमत्व विकास: चांगली पुस्तके वाचून आपण आपल्याCharacter मध्ये सुधारणा करू शकतो. महापुरुषांची चरित्रे वाचून आपण त्यांच्याकडून प्रेरणा घेतो आणि चांगले नागरिक बनण्याचा प्रयत्न करतो.

पुस्तके आपल्याला एकटे असताना साथ देतात आणि नवीन जग दाखवतात. त्यामुळे, मित्रांनो, पुस्तके वाचा आणि स्वतःला घडवा.

धन्यवाद!

उत्तर लिहिले · 13/7/2025
कर्म · 2180
0

'पुस्तक वाटल्यामुळे मी घडत आहे' या विषयावर भाषण:

आदरणीय मुख्याध्यापक, शिक्षक आणि माझ्या प्रिय मित्रांनो,

आज मी तुमच्यासमोर 'पुस्तक वाटल्यामुळे मी घडत आहे' या विषयावर माझे विचार व्यक्त करण्यासाठी उभा आहे. पुस्तके आपल्या जीवनातील अविभाज्य भाग आहेत. ती केवळ ज्ञानाचा स्रोत नाहीत, तर ती आपल्या व्यक्तिमत्त्वाचा विकास घडवतात.

पुस्तके वाचल्याने आपल्याला नवीन गोष्टी शिकायला मिळतात. आपला दृष्टिकोन व्यापक होतो आणि जगाला अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यास मदत होते. पुस्तके आपल्याला भूतकाळ, वर्तमानकाळ आणि भविष्यकाळाची माहिती देतात. विविध संस्कृती, विचारधारा आणि जीवनशैलींची ओळख करून देतात.

जेव्हा मला पुस्तके वाटण्यात आली, तेव्हा माझ्या मनात एक नवीन दुनिया उघडली. मी अनेक लेखकांच्या, विचारवंतांच्या आणि शास्त्रज्ञांच्या विचारांशी परिचित झालो. त्यांच्या अनुभवांनी मला प्रेरणा दिली आणि माझ्या जीवनात सकारात्मक बदल घडवले.

पुस्तकांनी मला केवळ ज्ञान दिले नाही, तर एक चांगली व्यक्ती बनण्यास मदत केली. त्यातून मी नम्रता, सहनशीलता आणि इतरांबद्दल आदर शिकलो. पुस्तके आपल्याला एकांतात साथ देतात आणि आपल्याला कधीही एकटे वाटू देत नाहीत.

म्हणूनच, मी म्हणेन की पुस्तके वाटल्यामुळे मी घडत आहे. पुस्तके हे आपले खरे मित्र आहेत आणि त्यांनी आपले जीवन समृद्ध करतात. चला, आपण सर्व वाचनाची आवड जोपासूया आणि एक उज्ज्वल भविष्य निर्माण करूया.

धन्यवाद!

उत्तर लिहिले · 13/7/2025
कर्म · 2180
0

सावित्रीबाई फुले यांचे वडील खंडोजी नेवसे होते.

उत्तर लिहिले · 8/1/2024
कर्म · 25
3
जीवन सुंदर आहे ते जगण्यासाठी आहे ,जीवन सुंदर आहे ते जगून बघण्यासाठी आहे
जीवनात बरेच कही करण्यासारखे आहे , करता करता बरेच काही शिकण्या सारखे आहे

जीवनात बरच काही देण्यासारखे आहे , देता देता बरेच काही घेण्यासारखे आहे
जीवनात बरेच काही फुलवता येते , इथे बरेच काही चांगले पेरन्या सारखे आहे

जीवन मोहक फुलासारखे असते , पवित्र प्रेमाने मन मोहवणारे असते
जरी सुकले तरी ते , आठवनिंच्या पुस्तकात जपण्यासाठी असते

जीवन ही एक शाळा आहे , मन होई फळा इथे
आयुष्यातील क्लिष्ट प्रमेय सोडवता येतात तिथे

आयुष्य हे जिवंत अध्यात्म , याच्या तत्वासमोर वेदही थिटे
मौनात अनुभवता दोन क्षण , इथे ईश्वर ही भेटे

जीवन हे सुंदर आहे , नसतात इथे फक्त दुःखाचे क्षण ,
डोळसपणे पाहता बाजूला , सुखाचे गवसती अनेक क्षण

जीवन खरेच सुंदर आहे , पाहण्या एक नजर हवी
निसटनारे गोड क्षण टिपन्यास, ती तिथे हजर हवी

************************************


"हे जीवन सुंदर आहे." असं एक गीत ऐकायला मिळालं, खरंच जीवनाइतकं तऱ्हेतर्‍हेचं रंगीबेरंगी, मनाला मोहवून टाकणारं आणि सतत हवहवसं वाटणारं दुसरं तिसरं असं काहीच सापडत नाही. उबदार आणि ऐटदार असं फिलींग देणारी केवळ वस्त्रंच असतात असं नाही. तर जीवनात ऐटदार आणि उबदार बोलणारी आणि मनापासून तसं वागणारी माणसं ही असतात. ती आनंद, उत्साह आणि सुरक्षितता देऊन जातात. जणू दैनंदिन वातावरणात अशी माणसं उत्तेजक पेयच देतात. मी बागेत किंवा मैदानात फिरायला जातो, तेंव्हा वय विसरून वयस्कर मंडळी एकमेकांची थट्टा मस्करी करताना, विनोद करतांना, खळाळून हसतांना दिसतात, तेव्हा मला मनस्वी आनंद होतो आणि या वयस्कर मंडळींविषयी अनाहूत अभिमान ही वाटायला लागतो; अशी हसत खेळत, एकमेकांविषयी आदर ठेवून थट्टा मस्करी करणारी वयस्कर मंडळी प्रत्येक गल्ली बोळात दिसायला हवीत, त्यामुळे कीती बहार येईल नै का? जीवन किती बहारदार होईल? वाढत्या वयाबरोबर असणार्‍या आरोग्याच्या समस्या आणि व्याधी कुठल्या कुठे पळून जातील नै का?



तसं पहायला गेलं तर, कुणीतरी आपल्या पाठीवर थाप मारली, किंवा शाबासकी दिली तर आपली अंतर्गत उर्जा दुप्पट होते, आणखी दुप्पट उत्साहाने आपण कामाला लागतो, यश आपल्या नजरेच्या टप्प्यात आले आहे, असं आपल्याला वाटू लागतं, "पाठीवरती हात ठेवूनी फक्त लढ म्हणा" या कुसुमाग्रज यांच्या कवितेनंही हेच सांगितलं आहे. केवळ पाठीवर किंवा अंगावर पडलेल्या हाताचा आणि प्रेमळ स्पर्शाचा तो चमत्कार असतो, एवढं कशाला लहान मुलांच्या पाठीवर थोपटलं की कीतीही खट्याळ मुलं असो ते क्षणार्धात झोपी जातं, ‘दृष्ट काढणे’, ‘मीठ मोहरी उतरवून टाकणे’ या पूर्वापार चालत आलेल्या गोष्टी अंधश्रध्देला खतपाणी घातल असल्याचे वरकरणी वाटत असले तरी, त्यातील भावना, प्रेम, आपुलकी, जिव्हाळा महत्वाचा मानायलाच हवा. कारण अशा घरगुती उपायाने अनेकांना बरे वाटायला लागण्याची किमान सुरूवात तरी होते, अर्थात गेल्या हजारो वर्षापासून घरगूती परंपरा टिकून आहेत, यातच त्या त्या गोष्टींची ताकद आपल्या लक्षात यायला हवी, कारण एखाद्या गोष्टीपासून कुणालाच व कुठलाच फायदा नसेल तर ती गोष्ट कालबाह्य होते व पुढे तीचे अस्तित्वही संपुष्टात येते, पण या गोष्टी आजच्या संगणक युगातही टिकून आहेत. 

माणूस हा भावनाप्रधान प्राणी आहे, तो समाजशील असून समुहाने रहायला त्याला आवडते, आपल्या आवडीची माणसे बरोबर आहेत म्हंटल्यावर त्याच्यात ताकद निर्माण होते, त्याच्या अंगात बळ येते, पाठीवर हात पडला की तो उत्तेजित होतो, त्याच्या चेहर्‍यावर एक प्रकारचा आत्मविश्वास व आनंद विलसतो, अवतीभवती असलेल्या माणसांची व संवादांची परस्पर क्रिया घडून, एक वेगळीच अद्भूत क्षमता त्यांच्यात उत्पन्न होते. परस्पर भावनीक निखळ नाते मनातील अनेक निगरगाठी सोडवतात.

दुसऱ्यानं आपल्याला चांगलं म्हणावं, आपल्या कार्याचं कौतुक करावं असं यच्ययावत सर्वच मनुष्य प्राण्याला मनापासून वाटत असतं. अहो, एवढं कशाला ईश्वराला देखील त्याचं कौतुक आवडतं. सर्व धार्मिक साहित्यामधून ईश्वराचं कौतुकच केलेले असते, असे कोडकौतुक जर ईश्वराला आवडत असेल तर जित्याजागत्या माणसाला आपले कौतुक ऐकायला आवडणे हे नैसर्गिकच नाही का? असो.

असं प्रेमळ, उल्हासी आणि आपल्याला कोणीतरी मनापासून जपत आहे,आपली काळजी घेत आहे, ही भावनाच तुमचं वय वाढवायला कारणीभूत होत असते. यापुढे जावून एका प्रार्थनेत असे म्हंटले आहे की, “प्राणशक्ती माझ्या ठिकाणी सदैव जागृत व कायमपणे स्पंदमान असो... मला उल्हासित करणारी तसेच स्फुरणारी असो... अगदी प्राणार्पण करून कार्य करण्याची मला उमेद दे!” अशी प्रखर इच्छाशक्ती लाभल्यावर म्हातारपण आपल्या वाऱ्यालाही थांबणार नाही, कारण प्राणपणाने एवढी गोष्ट करण्याची जिद्द निर्माण झाली की, ती जिद्द आणि तो उत्साह वृध्दत्वाला आसपास फिरकू ही देत नाही.

जरा आजूबाजूला सूक्ष्मपणाने, जागरूकपणाने आणि जिज्ञासू वृत्तीने पाहिले की, अनेक अशी वयस्कर मंडळी आपल्याला दिसून येतात, त्यांनी आपल्या जवळही वृध्दत्व फिरकू दिलेले नाही; हे प्रत्कर्षाने अनुभवास येते, आणि अशी माणसं आपल्या अवतीभवती असली की, “हे जीवन सुंदर आहे!” याचा हरघडी प्रत्यय होतो. आभाळाएवढ्या दु:खाला कवटाळून न बसता, त्याला थोडे बाजूला ठेवून जवाएवढ्या सुखाला डोक्यावर घेणारी अशी माणसं नक्कीच समाजात आनंदाची, सौख्याची, उत्साहाची आणि उल्हासाची कारंजी फुलवत असतात; त्यांच्या संपर्कात राहीलं की, नक्कीच वाटू लागतं, “हे जीवन सुंदर आहे!”

उत्तर लिहिले · 6/1/2024
कर्म · 53750
3
  
हरवत चालली माणुसकी..!
आजकालच्या धकाधकीच्या जीवनात काही कारणांमुळे कित्येकदा मनामध्ये तेढ निर्माण होऊन, एकमेकांविषयी, गैरसमजुती, निर्माण होत जातात आणि परस्पर संबंधांमध्ये दुरावा निर्माण होत आहे.



सर्व प्राण्यांमध्ये मनुष्य हा अतिशय वेगळा असा बुद्धिवान प्राणी आहे, असे म्हटले जाते. याच माणसाला निसर्गाने "मन" आणि "बुध्दी" बहाल केलीय... बुद्धीच्या जोरावर त्याने आज दाही दिशा आक्रंदण्यास सुरुवात केलीय. बुद्धी कल्पकतेच्या जोरावर आज मानवाने अंतराळात भरारी घेऊन अवकाशालाही गवसणी घातलीय, इतके त्याचे कर्तृत्व मोठे आहे. त्याच्या या कर्तृत्वापुढे त्याला गगन ही ठेंगणे वाटू लागलेय, इतक्या त्याच्या कार्यकर्तृत्वाच्या सीमा अथांग पसरल्या आहेत, पण आधुनिकतेचे वारे लागलेला हाच माणूस मात्र त्याचे, आपल्या माणसांशी असलेलं नातं, आणि मातीशी असलेली नाळ मात्र विसरत चाललाय... आणि माणुसकी काळाच्या ओघात लोप पावत चाललीय...
       
खरंतर, आपले प्रियजन, शेजारी पाजारी, सगेसोयरे, आप्तेष्ट, मित्रपरिवार यांच्याशी मिळून मिसळून वागून आनंद लुटावा, सर्वांना आनंदाची खिरापत वाटून त्यांच्या सहवासात राहण्याचे, एकमेकांच्या सुखदुःखात सामील होण्यात किती मोठे स्वर्गसुख दडले आहे. हेच माणूस विसरलाय... किंबहुना विसरत चाललाय. 


   
पैसा, संपत्ती, गाडी, बंगला, नोकर चाकर यांसारख्या भौतिक सुखांमागे धावताना तो दिसत आहे. आजच्या डिजिटल युगात मोबाईल, इंटरनेटच्या कृत्रिम जगात जगण्यातच स्वतःला धन्य मानू लागलाय, तिथल्या कोलाहलात, मल्टीप्लेक्स, पार्टीहबमध्ये रमू लागलाय त्यामुळे बाहेरच्या जगाशी त्याचे एकरूप होण्याचे प्रमाण संपुष्टात येऊ पाहत आहे. समाजात वावरताना परस्परांशी असलेले संबंध, डावावर लागताना दिसत आहेत, इतकेच काय पण मानवाला खुणावणारे निसर्ग सौंदर्यही या आधुनिक युगातील मानवापुढे आता हार मानू लागले आहे.


    
आजकालच्या धकाधकीच्या जीवनात काही कारणांमुळे कित्येकदा मनामध्ये तेढ निर्माण होऊन, एकमेकांविषयी, गैरसमजुती, निर्माण होत जातात आणि परस्पर संबंधांमध्ये दुरावा निर्माण होत आहे. संपत्तीच्या हव्यासापोटी, एकाच आईच्या उदरी जन्म घेतलेली लेकरे सुद्धा वैर भावनेने एकमेकांशी वागू लागली आहेत. हे आज समाजाचे वास्तव आहे. एकमेकांप्रति प्रेम, आपुलकी, जिव्हाळा, ही सुखी जीवनाची त्रिसूत्री आता तो विसरत चाललाय, एकमेकांप्रति असलेल्या सद्भावनेमुळे सतत प्रकृतीचे, सृष्टीचे, निसर्गाचे, मानवी जीवनाचे सिंचन, पोषण होत असते. पण माणूस शिकून किती मोठा झाला, पण त्याचे आद्यकर्तव्यच तो विसरला याचा स्वाभाविक परिणाम त्याच्या वागण्या बोलण्यातून दिसून येऊ लागलाय, त्यामुळे सुख, शांती, समाधान, समृद्धी, संपन्नता आनंद, दया, प्रेम या सर्व गोष्टी लोप पावत चालल्यात."एकाची जळते दाढी, दुसरा त्यावर पेटवू पाहतो विडी" अशी गत झालीय माणसाची माणसाशी वागण्याची, यावरून मला सुचलेल्या काही काव्यपंक्ती...

हरवत चालली माणुसकी..!

माणूस पेराल! उगवेल माणुसकी
ही म्हण आता खोटी होत चाललीय
मूल्यहीन समाजात माणुसकी ही
आता औषधाला पण नाही उरलीय...

खून,दरोडे,भांडणे,चोऱ्यामाऱ्या
साऱ्यांचा वाढत चाललाय कहर
बेकारी, महागाई,बेरोजगारीचा
समाजजीवनावर होतोय असर...


अमानुषपणे वागलास निसर्गाशी
प्राणवायू अभावी गुदमरला श्वास
स्वार्थासाठी वृक्षांची केली कत्तल
कोरोनाने आवळला गळ्यास फास...

दुष्काळी,अवकाळी,चक्रीवादळाने       
झालीय पिकांची अतोनात हानी
तरी येत नाही सरकारला जाग
बळीराजाच्या मात्र डोळ्यांत पाणी

भ्रष्टाचाराने पोखरलेय समाजास
आता हरवत चालली माणुसकी
एकमेकांबद्दल,माया,प्रेम,जिव्हाळा
राहिली नाही माणसास आपुलकी...


उत्तर लिहिले · 7/1/2024
कर्म · 53750
0

गोपीनाथ मुंडे यांचे इंग्रजी भाषण उपलब्ध नाही. मला फक्त त्यांचे मराठीतील भाषणे आणि मुलाखती आढळल्या आहेत.

उत्तर लिहिले · 25/3/2025
कर्म · 2180
0

आकाशवाणीसाठी मायबोली मराठी वर भाषण

नमस्कार श्रोतेहो!

आज ‘मायबोली मराठी’ या विषयावर मी काही विचार आपल्यासमोर मांडणार आहे. ‘मायबोली’ म्हणजे आपली मातृभाषा. मराठी भाषा ही आपल्या महाराष्ट्राची शान आहे. मराठी भाषेला एक समृद्ध इतिहास आहे. ज्ञानेश्वर, नामदेव, तुकाराम, आणि शिवाजी महाराज यांसारख्या थोर व्यक्तींनी या भाषेतून आपले विचार व्यक्त केले.

मराठी भाषा केवळ संवादाचे माध्यम नाही, तर ती आपली संस्कृती आणि ओळख आहे. मराठी साहित्यात अनेक थोर लेखकांनी मोलाची भर घातली आहे. वि. वा. शिरवाडकर, पु. ल. देशपांडे, इंदिरा संत आणि अनेक लेखकांनी मराठी भाषेला समृद्ध केले आहे.

आजच्या धावपळीच्या जीवनात, आपण आपल्या मायबोलीला विसरता कामा नये. मराठी बोलताना कमीपणा वाटू नये. आपल्या मुलांना मराठीतून शिक्षण द्यावे. मराठी पुस्तके वाचावी, मराठी चित्रपट पाहावे. मराठी नाटकं बघावी.

मराठी भाषेचा योग्य आदर करणे, तिचे संवर्धन करणे हे आपले कर्तव्य आहे. चला तर मग, आजपासूनच मराठी भाषेचा जास्तीत जास्त वापर करण्याचा संकल्प करूया.

धन्यवाद!

टीप: आपण ह्या भाषणात आपल्या आवडीनुसार बदल करू शकता.

उत्तर लिहिले · 25/3/2025
कर्म · 2180