Topic icon

प्रजनन

0
मला माफ करा, माझ्याकडे या प्रश्नाचे उत्तर नाही. मी वैद्यकीय सल्ला देण्यासाठी योग्य नाही. अचूक माहितीसाठी कृपया डॉक्टरांना भेटा.
उत्तर लिहिले · 27/3/2025
कर्म · 1420
0

वडाच्या कोंबाचा उपयोग संततीसाठी (Fertility) कसा करतात याबद्दल काही माहिती खालीलप्रमाणे:

  • आयुर्वेदानुसार: वडाच्या झाडाच्या कोंबांमध्ये (buds) औषधी गुणधर्म असतात आणि ते काही विशिष्ट समस्यांवर उपचार करण्यासाठी वापरले जातात.

  • पुरुष वंध्यत्व (Male infertility): काही आयुर्वेदिक उपचारांमध्ये वडाच्या कोंबांचा वापर पुरुषांमधील वंध्यत्वाच्या समस्येवर उपाय म्हणून केला जातो. यामुळे शुक्राणूंची (sperm) संख्या वाढण्यास मदत होते.

  • महिलांसाठी उपयोग: महिलांमधील काही समस्यांवर, जसे की अनियमित मासिक पाळी (irregular periods) किंवा गर्भाशयाच्या (uterus) समस्यांवर वडाच्या कोंबांचा वापर केला जातो.

उपयोग करण्याची पद्धत:

  • वडाच्या कोंबांची पावडर बनवून ती दुधात किंवा पाण्यात मिसळून घ्यावी.

  • तसेच, योग्य माहितीसाठी आयुर्वेदिक डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

इतर माहिती:

  • वडाच्या झाडाला हिंदू धर्मात पवित्र मानले जाते आणि त्याची पूजा केली जाते.

  • वडाचे झाड दीर्घायुष्यी असते आणि ते अनेक पिढ्यांपर्यंत टिकून राहते.

टीप: कोणतीही वनस्पती औषधी म्हणून वापरण्यापूर्वी डॉक्टरांचा किंवा तज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

Disclaimer: This information is for informational purposes only and does not constitute medical advice. It is essential to consult with a qualified healthcare professional for any health concerns or before making any decisions related to your health or treatment.

उत्तर लिहिले · 25/3/2025
कर्म · 1420
0

पुंस्वन हा गर्भसंस्कारातील दुसरा संस्कार आहे.

अर्थ: 'पुंस्' म्हणजे पुरुष आणि 'सवन' म्हणजे प्राप्ती. चांगल्या, शूर, बलवान मुलाच्या प्राप्तीसाठी हा संस्कार केला जातो.

कधी करतात: गर्भधारणेच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या महिन्यात हा विधी करतात.

कसा करतात: या संस्कारामध्ये गर्भातील बालकाला चांगले आरोग्य आणि बुद्धी प्राप्त व्हावी, यासाठी मंत्रोच्चार केले जातात आणि काही विशिष्ट औषधी वनस्पतींचा रस गर्भवती महिलेला दिला जातो.

उद्देश:

  • गर्भातील बालकाचे आरोग्य चांगले राहावे.
  • शारीरिक आणि मानसिक विकास चांगला व्हावा.
  • आई आणि बाळ दोघांनाही सकारात्मक ऊर्जा मिळावी.

टीप: हा लेख केवळ माहितीसाठी आहे. अधिक माहितीसाठी तज्ञांचा सल्ला घ्यावा.

उत्तर लिहिले · 25/3/2025
कर्म · 1420
0

फूल हे वनस्पतीचे लैंगिक प्रजननाचे कार्यात्मक एकक आहे



1. फुलात पुमंग हे पुल्लिंगी दल आहे आणि त्याच्या घटकांना पुंकेसर म्हणतात; तर जायांग हे स्त्रीलिंगी दल आहे आणि त्याचे घटक दलाला स्त्रीकेसर म्हणतात.



2. परागकोष हे पुल्लिंगी प्रजननांग पुंयुग्मक (परागकण ) तयार करण्यासाठी तयार असते, तर अंडाशय हे स्त्रीलिंग प्रजननांग स्त्रीयुग्मक (बीजांडे) तयार असते.



3. पुंयुग्मक आणि स्त्रीयुग्मक यांच्या संयोगाने फलन होते. म्हणून, फूल हे लैंगिक प्रजननाचे कार्यात्मक आहे.

उत्तर लिहिले · 10/2/2023
कर्म · 53710
0
बहुपेशीय सजीवांमध्ये अलैंगिक प्रजनन अनेक प्रकारे होते, त्यापैकी काही खालीलप्रमाणे आहेत:
  • खंडन (Fragmentation): या प्रक्रियेत, सजीवाच्या शरीराचे अनेक तुकडे होतात आणि प्रत्येक तुकडा नविन जीव म्हणून वाढतो. उदाहरणार्थ, स्पायरोगायरा (Spirogyra). Britannica
  • पुनरुत्पादन (Regeneration): या प्रक्रियेत, गमावलेला भाग पुन्हा तयार होतो. काही प्राण्यांमध्ये, जसे की प्लॅनेरिया (Planaria), शरीराचा कोणताही भाग कापला गेला तरी तो नविन जीव म्हणून विकसित होतो. NCBI
  • कलिका निर्माण (Budding): या प्रक्रियेत, जनक जीवाच्या शरीरावर एक लहान कलिका (Bud) तयार होते आणि ती हळूहळू वाढून नवीन जीव बनते. उदाहरणार्थ, हायड्रा (Hydra). BiologyOnline
  • बीजाणू निर्मिती (Spore formation): काही बहुपेशीय सजीव बीजाणू तयार करतात. हे बीजाणू अनुकूल परिस्थितीत वाढून नवीन जीव निर्माण करतात. उदाहरणार्थ, बुरशी (Fungi).
उत्तर लिहिले · 25/3/2025
कर्म · 1420
1
.
 


नवविवाहितांना एकमेकांविषयी जाणून घेण्यासाठी एक वर्ष तरी हवंच. शारीरिक, मानसिक, आथिर्क, लैंगिक सक्षमता असेल तेव्हाच गर्भारपण आणि बालसंगोपनाची जबाबदारी अंगावर घ्यायला हवी. त्यामुळे निदान वर्षभर तरी गर्भारपण टाळलेलं बरं. यासाठी अनेक उपाय आहेत. मात्र नवविवाहितेसाठी ओरल पिल्सचा पर्याय चांगला ठरू शकतो. पूर्वीपेक्षा आता या गोळ्या खूपच कमी मात्रेत येत असल्यामुळे त्यांचे साइडइफेक्टस् खूपच कमी झाले आहेत. याउलट या गोळ्यांचे बरेच फायदेही आहेत.
.............
गृहस्थाश्रमात प्रवेश करताना किती तरी प्रश्ानंना सामोरे जावे लागते. एका अनोख्या जगात प्रवेश करायचा असतो. वैवाहिक जीवनाविषयी अपुरी आणि चुकीची माहिती उपलब्ध असते. थोडीफार भीतीही वाटत असते. अनेक शंका दोघांच्याही मनात दबा धरून बसलेल्या असतात. अशावेळी सर्वात उत्तम मार्ग म्हणजे विवाहपूर्व वैद्यकीय सल्ला घेणे. भावी वधू-वरांनी जोडीने (उभयता) तज्ज्ञ डॉक्टरांकडे जायला हवे. जननसंस्थेची रचना आणि कार्य कोणते? मासिक पाळी का येते? गर्भधारणा कशी होते? लैंगिक संबंध म्हणजे काय? वैवाहिक जीवन सुरू करताना काही अडचणी येऊ शकतात का? पहिले मूल केव्हा होऊ द्यावे? पहिले गर्भारपण लवकर नको असल्यास कोणते साधन वापरायला हवे? जबाबदार पतित्व आणि पत्नीत्व म्हणजे काय? अशा अनेक विषयांवर डॉक्टरांबरोबर नि:संकोचपणे चर्चा करायला हवी. तरच वैवाहिक जीवनात आत्मविश्वासाने प्रवेश करता येईल.
ब-याच वधू-वरांच्या मनात पहिल्या रात्रीविषयी भ्रामक कल्पना असतात. हिंदी सिनेमात तर हमखास 'सुहाग रात' फारच छान रंगवलेली असते. फुलांनी सजविलेला पलंग, दागिन्यांनी नखशिखांत मढलेली वधू आणि केशरी दुधाने काठोकाठ भरलेला प्याला. सगळे कसे सोपे-सरळ वाटते; पण प्रत्यक्ष जीवनात मात्र अनेक वधू-वरांची 'सुहाग रात' अपेक्षेइतकी फलदायक, सुखकारक ठरत नाही. खरे पाहता पहिल्याच रात्री सर्व सुरळीत झाले पाहिजे असा काही नियम नाही. उलट असे होणे हा नियमाला अपवाद आहे. कधी कधी तर मधुचंदाहून परत आल्यावरसुद्धा सगळे काही ठीक झालेले नसते. त्यामुळे नववधू आणि वर दोघांच्याही मनावर विपरीत परिणाम होऊ शकतो. जोडीदाराच्या क्षमतेविषयी शंका येऊ शकते. वैज्ञानिक अज्ञान व अनाठायी भीती, संकोच यामुळे असे होते. लग्नाआधीच योग्य सल्ला मिळाल्यास वैवाहिक जीवनाला आत्मविश्वासाने सामोरे जाता येते.

लग्नानंतर पहिले मूल केव्हा होऊ द्यायचे हा वादाचा मुद्दा होऊ शकतो. खरे पाहता लग्नानंतरच्या पहिल्याच वर्षात गर्भधारणा न झालेली चांगली. नवीन कुटंुबीय, नवीन घर-वातावरण याची सवय व्हायला एवढा काळ हवाच. वैवाहिक जीवनात रुळायला एवढा कालावधी लागतोच. शारीरिक, मानसिक, आथिर्क, लैंगिक सक्षमता असेल तेव्हाच गर्भारपण आणि बालसंगोपनाची जबाबदारी अंगावर घ्यायला हवी. लग्नानंतर लगेच काही समस्या उद्भवू शकतात. कोणाचे शिक्षण पुरे व्हायचे असते, कोणाची नोकरी कायम नसते, तर कधी जागेचा प्रश्ान् असतो. म्हणजेच बहुतेक जोडप्यांना पहिले मूल लवकर नको असते; पण नुसते 'नको, नको' म्हणून भागत नाही. कुटुंबनियोजनाचे एखादे साधन वापरणे जरुरीचे असते.
गर्भनिरोधक खायच्या गोळ्या नववधूसाठी उत्तम! या गर्भनिरोधक गोळ्यांमध्ये इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरॉन हे अंतसाव असतात. त्यांच्यामुळे शरीरातील अंतस्त्रावांवर परिणाम होतो आणि स्त्रीबीज बीजकोशातून बाहेर पडू शकत नाही. स्त्रीबीजच उपलब्ध न झाल्यामुळे अर्थातच गर्भधारणा होऊ शकत नाही. या गोळ्यांची सवय व्हावी आणि त्यांच्या सफलतेचे प्रमाण वाढावे म्हणून लग्नाच्या आधी दोन महिने या गोळ्या घ्यायला सुरुवात करायला हवी. न चुकता नियमितपणे ठराविक वेळी गोळी घेतल्यास ही पद्धत खूपच यशस्वी ठरते; पण या गोळ्या सुरू करण्याआधी वैद्यकीय तपासणी करून घ्यायला हवी. कावीळ, अर्ध शिशी, हृद्रोग इत्यादी आजार असल्यास गोळ्या घेता कामा नयेत. गोळ्या कधी सुरू करायच्या, कशा घ्यायच्या, एखादी गोळी विसरल्यास काय करायचे, इत्यादी अनेक बाबींविषयी डॉक्टर सल्ला देतात. पूवीर् बाजारात उपलब्ध असलेल्या गोळ्या जास्त मात्रेच्या असत. त्यामुळे काही स्त्रियांना मळमळणे, उलट्या, डोकेदुखी, पायावर सूज, वजन वाढणे, मुरूम इत्यादी छोटे-मोठे त्रास व्हायची शक्यता होती; पण हल्ली बऱ्याच कमी मात्रेच्या गोळ्या मिळायला लागल्या आहेत- उदा. : फेमिलॉन, लोवेट इत्यादी. त्यांच्यात अंतसावाचे प्रमाण अत्यल्प असते. यामुळे गोळ्यांचे दुष्परिणाम कमी होतात. तसेच त्यांच्यात नवीन प्रकारचे प्रोजेस्टेटॉन म्हणजेच डिझोजेस्ट्रेल किंवा सायप्रोटेरॉन अॅसिटेट असते. अशा गोळ्यांमुळे चेहऱ्यावर मुरूमे यायचे प्रमाण कमी होते. या संतति-प्रति बंधक गोळ्यांमुळे इतरही अनेक फायदे होतात- पाळी नियमित होते, पाळी सुरू होण्याआधीच्या तक्रारी आणि दुखणे कमी होते. पाळीच्या दिवसांत अंगावर कमी जाते, कमी रक्त सावामुळे पंडु रोग व्हायची शक्यता घटते. गर्भ असाधारण ठिकाणी रुजणे, स्तनांत/स्त्रीबीज कोषात गाठी होणे, गर्भाशयाच्या आतल्या अस्तराचा कर्करोग, ऑटीपोटात जंतुसंसर्ग होणे इत्यादी अनेक रोगांपासून संततिप्रतिबंधक गोळ्या स्त्रियांचा बचाव करतात. म्हणजेच दुहेरी फायदा होतो. काही महिन्यांपासून ड्रॉसपिरेनॉन असलेल्या गोळ्याही भारतात उपलब्ध झाल्या आहेत. पाश्चात्य देशात त्या 'यास्मीन' नावाने बऱ्याच वर्षांपासून वापरात आहेत. त्यांचे सेवन केल्यास वजन वाढण्याची शक्यता नगण्य असते. म्हणजेचे पूवीर्चे सर्व गैरसमज आता निकालात निघाले आहेत- संततिप्रतिबंधक गोळ्या घेतल्यामुळे स्द्बस्त्रद्ग द्गद्घद्घद्गष्ह्लह्य व्हायची भिती आता निरर्थक ठरली आहे. त्यांच्यामुळे वजन वाढत नाही; कॅन्सरची भिती नसते, गोळ्या थांबवल्यावर लगेचच गर्भधारणा व्हायची क्षमता परत प्राप्त होते. तेव्हा वैद्यकीय सल्ला घेऊन योग्य त्या संततिप्रतिबंधक गोळ्या जरूर घ्यायला हव्यात.

क्वचित एखाद्या स्त्रीला गोळ्या सोसत नसतील तर ती योनिमार्गात ठेवायच्या रासायनिक औषधी गोळ्या वापरू शकते. नाही तर पतीने कंडोम वापरायला हवा. कॉपर टी सारखे गर्भाशय वलय मात्र नवविवाहित जोडप्यासाठी अयोग्य आहे- कारण नव वधूमध्ये ते बसवणे कठीण तर असतेच, शिवाय जंतुसंसर्गाचाही धोका असतो. एक मूल झाल्यानंतर मात्र गर्भाशय - वलय बसवायला हरकत नाही.
अनेक अत्याधुनिक गर्भानिरोधक साधने उपलब्ध असूनही काही जोडपी उशिरा जागी होतात. लग्नानंतर थोड्याच महिन्यांत पाळी चुकली की मग त्यांना 'आपल्याला इतक्या लवकर मूल नको' अशी उपरती होते. गर्भपात करून घेण्यासाठी मग डॉक्टरांकडे धाव घेतात. पहिल्यावहिल्या गर्भारणात गर्भपात करून घेणे तसे धोक्याचेच असते. गर्भाशयाचे मुख घट्ट बंद असल्यामुळे गर्भपात करणे अवघड होऊ शकते. कधी गर्भपिशवीला जखम होऊ शकते. जास्त रक्तसाव होऊ शकतो. तर कधी जंतुसंसर्ग होऊन बीजवाहक नलिका बंद होऊ शकतात.
कधी कधी अशा गुंतागुंतीमुळे परत गर्भधारणा होणे कठीण होऊन बसते. गर्भधारणा झालीच तरी आपसूक गर्भपात, अपु-या दिवसांचे बाळंतपण व्हयाची भिती असते. या सर्व विवेचनाचा मथितार्थ इतकाच की पहिले मूल लवकर नको असल्यास वेळच्या वेळी कुटुंब नियोजनाची साधने वापरणे सुरक्षित आणि फायद्याचे ठरते.

वैवाहिक सहजीवन यशस्वी होण्यासाठी 'विवाहपूर्व वैद्यकीय सल्ला' घेणे अनेक दृष्ट्या हिताचे ठरते. 'शुभमंगल सावधान' या दोन शब्दांत खूप मोठा गभिर्तार्थ सामावला आहे.
..............
रक्तगटांविषयीचे गैरसमज
सल्ला-मसलत हा विवाहपूर्व समुपदेशनाइतकाच महत्त्वाचा भाग आहे, शारीरिक तपासणी आणि रक्त चाचण्या! उदा. : रक्तगट ठरवणे. स्वत:चा रक्तगट काय आहे, हे प्रत्येकाला माहीत असायला हवेच. मात्र हल्ली वधूच्या रक्तगटाला अवास्तव महत्त्व प्राप्त झाले आहे. पूर्वी पत्रिकेत मंगळ असला तर मुलांची जी स्थिती व्हायची तीच स्थिती आता (आर एच निगेटिव्ह) रक्तगट असलेल्या मुलांची व्हायला लागली आहे. पति-पत्नींच्या रक्तगटांविषयी बरेच गैरसमज सर्वांच्या मनात असतात. काही जणांना वाटते की, वधू-वरांचा रक्तगट एकच असू नये. या कल्पना चुकीच्या आहेत. रक्तगटांना आपण अवाजवी महत्त्व द्यायला लागलो आहोत.






उत्तर लिहिले · 25/6/2022
कर्म · 53710