औषधे आणि आरोग्य फरक औषधशास्त्र

काही औषधांच्या गोळ्यांवर मध्यभागी एक रेष असते जिथे ती गोळी अर्धी तोडता येईल.काही औषधांवर अशी रेष नसते.हा फरक का असतो?

1 उत्तर
1 answers

काही औषधांच्या गोळ्यांवर मध्यभागी एक रेष असते जिथे ती गोळी अर्धी तोडता येईल.काही औषधांवर अशी रेष नसते.हा फरक का असतो?

1
कोरोनाने थैमान घातले आहे. दिवसागणिक रुग्णसंख्या वाढत असल्याने परिस्थिती गंभीर बनली आहे. वाढत्या रुग्णसंख्यामुळे औषधांची मागणी वाढली आहे. कोरोनाग्रस्तांना औषध दिली जात आहेत. मात्र दुसरीकडे अनेकजण आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी विविध गोळ्यांचे सेवन करताना दिसत आहेत. त्यामुळे अनेकदा मेडिकल दुकानात पाहिजे त्या गोळ्या मिळत नाहीत. आपल्याला 250 एमजीच्या डोसची गरज आहे. पण मेडिकलमध्ये 500 एमजीचा डोस आहे. अशावेळी आपण 500 एमजीची गोळी अर्धी करून खावू शकतो का? 500 एमजीची गोळी अर्धी करून खाणे आरोग्यासाठी लाभदायक आहे का? याबद्दल तज्ज्ञ काय सांगतात जाणून घ्या.याबाबत डॉ. प्रदीप चौरसिया म्हणाले की, ज्या गोळीवर रेघ असते, अशी गोळी आपणाला अर्धी करून खाता येते. त्यासाठी गोळ्यांवर रेघ दिलेली असते. समजा आपल्याला 500 एमजीची गोळी हवी आहे, पण आपल्याकडे 1000 एमजीची गोळी उपलब्ध आहे. तर अशावेळी आपण ती गोळी अर्धी करून खावू शकतो. 1000 एमजीची गोळी अर्धी करून खाल्यास ती 500 एमजीच्या गोळी प्रमाणे काम करते. तसेच मध्ये रेघ नसलेल्या गोळ्या आपण अर्ध्या करून खावू शकत नाही. त्यामुळे फक्त मध्ये रेघ असलेल्या गोळ्या आपणाला अर्ध्या करून खाता येते. तसेच कॅप्सूल देखील अर्ध्या तोडून खाता येत नसल्याने म्हणाले. ↑
उत्तर लिहिले · 31/12/2021
कर्म · 121705

Related Questions

भारतामध्ये कोरोना व्हायरस इन्फेक्शन रोखण्यासाठी कोणती केमिकल फवारले जाते?
ज्या आजारात दुखण्याचा त्रास होतो, त्या आजारात दुखणं थांबण्यासाठी जे औषध/गोळ्या दिल्या जातात त्यामध्ये स्टेराँइड असते का? व स्टेराँइड वापरण्याने हाडे ठिसूळ होण्याचा किंवा इतर काही त्रास होण्याचा धोका असतो का?
उंदरीसाठी औषध कोणते?
एकाद्या त्रासासाठी आयुर्वेदिक औषध जास्त काळ म्हणजे एक दिड वर्ष घेतल्यास काहि दुसरा शारिरीक त्रास उद्भवू शकतो का?
ज्याप्रमाणे औषधाने त्रास/आजार/रोगबरे होतात त्याचप्रमाणे प्राणिक/काँस्मिक/रेकी या वैश्विक उर्जा असलेल्या उपचार पध्दतीने हिलिंग दिले असता त्रास/आजार/रोग बरे होतात का?
चाफ्याच्या शेंगाचा औषधी उपयोग काय?
दुखापतीचे मूलभूत कारणे कोणती?