2 उत्तरे
2
answers
नैसर्गिक वीज साठवून ठेवल्यास काय फायदा होईल?
6
Answer link
वीज साठवून ठेवणे भौतिकशास्त्राच्या नियमानुसार अवघड आहे. जी वीज आपण वापरतो ती जशीच्या तशी साठवून ठेवता येत नाही. तिचे आधी रूपांतर करावे लागते.
म्हणजेच वीज साठवून ठेवण्यासाठी एसी करंट ला डीसी करंट मध्ये रूपांतरित करावे लागेल. नैसर्गिक वीज जी पडते करंट होल्टेज म्हणजेच विद्युतधारा व विभवांतर गोष्टी खूप जास्त प्रमाणात कमी जास्त असू शकतात. त्यांच्यामध्ये काही सातत्य नसते, त्यामुळे ही वीज साठवून ठेवण्यासाठी आपल्याला जो घट(बॅटरी) तयार करायचा असेल तो खूप शक्तिशाली व तितकाच लवचिक लागेल. आतापर्यंत बऱ्याच कंपन्यांनी असे करण्याचा प्रयत्न केला आहे परंतु त्यांना त्यात यश आले नाही.
हे सगळे अडथळे पार करून जर आपण वीज यशस्वीरीत्या साठवली तर इतर नैसर्गिक साधनसंपत्तीची बचत होईल. कोळशाचा वापर कमी होईल. अणुऊर्जेचा वापर कमी होऊन त्यापासून होणाऱ्या दुष्परिणामपासून संरक्षण होईल.
एकंदरीत वीज तयार करण्यासाठी लागणारा वेळ व पैसा यांची बचत होईल.
0
Answer link
नैसर्गिक वीज (solar energy) साठवून ठेवल्यास अनेक फायदे होऊ शकतात:
- पर्यावरणाची काळजी: नैसर्गिक वीज वापरल्याने कार्बन उत्सर्जन कमी होते, ज्यामुळे हवामान बदलाला आळा बसतो.
- खर्च कमी: एकदा सौर ऊर्जा पॅनेल (solar panel)Install केल्यावर, ती वीज वापरणे Murfat आणि पारंपरिक वीजेवरील अवलंबित्व कमी होते.
- सुरक्षितता: नैसर्गिक वीज वापरणे सुरक्षित आहे, कारण त्यात धोकादायक रासायनिक प्रक्रियांचा समावेश नसतो.
- स्वयंपूर्णता: आपण स्वतःची वीज तयार करू शकतो, त्यामुळे वीजपुरवठ्यात अडचणी येत नाहीत.
या फायद्यांमुळे नैसर्गिक वीज साठवणे एक चांगला पर्याय आहे.
अधिक माहितीसाठी, आपण हे पाहू शकता:
महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण