4 उत्तरे
4
answers
लग्न जमवताना कुंडली पहावी का?
11
Answer link
(अगदी स्पष्टपणे लिहीत आहे कोणाला वाईट वाटेल, कुणाला रुचणार नाही तरीही....)
कुंडली पाहणे,मंगळ असणे,ग्रह फिरणे या भ्रामक कल्पना प्राचीन काळी स्वतःला एका उच्चशिक्षित समजणाऱ्या लोकांनी अडाणी, गरीब लोकांना कर्मकांड,रूढी,परंपरा या मध्ये अडकून टाकले अन कुणी या विरुद्ध बोलण्याचा प्रयत्न केला की त्याना वाळीत टाकणे,धर्म भ्रष्ट झाला असे म्हणून त्यांच्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला गेला.
★ महात्मा फुले,संत गाडगेबाबा यांनी सांगितले होते" भटजी पंचांग पाहती मग त्यांच्या बायका विधवा का होती"?
★नवसाने पोरं-बाळ होत असतील तर लग्न का करायची मग?
★काही भडजी सांगतात "तूम्हाला ग्रह शांती करावी लागेल,ग्रहाची दृष्टी वक्र झाली इत्यादी".
ग्रहाला शांत करणे म्हणजे या भटजीच्या घर ची मालमत्ता आहे का?
★सर्व ग्रहाची वक्र दृष्टी फक्त भारतातील लोकांवरच झाली का?
जगातील बाकी देशातील लोकांना शांती,नवस,अभिषेक करताना कधी पाहिले का?
★घराची वास्तू शांती करताना ही आपण भटजी द्वारे पूजा करतो ती अगदी चूक आहे.
त्या पेक्षा ज्या मजुराने दिवसरात्र मेहनत करून घर बांधले त्यांना गोड खाऊ घाला,नवीन कपडे देऊन त्यांचा सन्मान करावा..
थोडक्यात,
कुंडली,अभिषेक, पंचाग,मुहूर्त पाहून लग्न करण्यापेक्षा एकमेकांचे मेडिकल चेकअप करून ,आचार-विचार जुळवून लग्न करावे.
धन्यवाद......👍
कुंडली पाहणे,मंगळ असणे,ग्रह फिरणे या भ्रामक कल्पना प्राचीन काळी स्वतःला एका उच्चशिक्षित समजणाऱ्या लोकांनी अडाणी, गरीब लोकांना कर्मकांड,रूढी,परंपरा या मध्ये अडकून टाकले अन कुणी या विरुद्ध बोलण्याचा प्रयत्न केला की त्याना वाळीत टाकणे,धर्म भ्रष्ट झाला असे म्हणून त्यांच्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला गेला.
★ महात्मा फुले,संत गाडगेबाबा यांनी सांगितले होते" भटजी पंचांग पाहती मग त्यांच्या बायका विधवा का होती"?
★नवसाने पोरं-बाळ होत असतील तर लग्न का करायची मग?
★काही भडजी सांगतात "तूम्हाला ग्रह शांती करावी लागेल,ग्रहाची दृष्टी वक्र झाली इत्यादी".
ग्रहाला शांत करणे म्हणजे या भटजीच्या घर ची मालमत्ता आहे का?
★सर्व ग्रहाची वक्र दृष्टी फक्त भारतातील लोकांवरच झाली का?
जगातील बाकी देशातील लोकांना शांती,नवस,अभिषेक करताना कधी पाहिले का?
★घराची वास्तू शांती करताना ही आपण भटजी द्वारे पूजा करतो ती अगदी चूक आहे.
त्या पेक्षा ज्या मजुराने दिवसरात्र मेहनत करून घर बांधले त्यांना गोड खाऊ घाला,नवीन कपडे देऊन त्यांचा सन्मान करावा..
थोडक्यात,
कुंडली,अभिषेक, पंचाग,मुहूर्त पाहून लग्न करण्यापेक्षा एकमेकांचे मेडिकल चेकअप करून ,आचार-विचार जुळवून लग्न करावे.
धन्यवाद......👍
2
Answer link
हा ज्याच्या त्याच्या श्रद्धेचा प्रश्न आहे. कोणाच्या मते कुंडली न बघता लग्न जमवले तर त्या दाम्पत्याच्या पुढील जीवनात अडथळे, अडचणी येत राहतात. ज्योतिषशास्त्रानुसार काही ग्रह चांगले व काही वाईट असतात. त्याप्रमाणे कुंडलीत असलेल्या ग्रहांचा बरा वाईट परिणाम माणसाच्या आयुष्यावर होतो. त्यामुळे कुंडलीत वाईट ग्रह असतील त्याची शांती करून घ्यावी. म्हणजे नंतर त्रास होत नाही किंवा झालाच तर त्याची तीव्रता कमी झालेली असते. तर कोणाच्या मते कुंडली व ग्रहांवर काही अवलंबून नसते. जे व्हायचे ते चुकत नाही. माणूस परिस्थिती कशी हाताळतो यावर त्याचे चांगले किंवा वाईट अवलंबून असते.
0
Answer link
लग्न जमवताना कुंडली पाहावी की नाही, हा एक व्यक्तिगत प्रश्न आहे. या संदर्भात काही लोकांचे विचार आणि मान्यता खालीलप्रमाणे आहेत:
1. कुंडली पाहण्याचे फायदे:
- जुळणारे गुण: कुंडलीमध्ये जुळणारे गुण पाहून दोघांमधीलCompatibility तपासता येते, ज्यामुळे वैवाहिक जीवन सुखी राहण्यास मदत होते, असे मानले जाते.
- दोष निवारण: काही लोकांच्या कुंडलीत काही दोष (उदा. मंगळ दोष) असतात. कुंडली पाहिल्याने दोषांचे निवारण करता येते.
- मार्गदर्शन: ज्योतिषी कुंडलीच्या आधारावर वैवाहिक जीवनासंबंधी मार्गदर्शन करू शकतात.
2. कुंडली न पाहण्याचे फायदे:
- वैज्ञानिक आधार नाही: कुंडली हे पूर्णपणे ज्योतिषशास्त्रावर आधारित आहे, ज्याला कोणताही वैज्ञानिक आधार नाही.
- अंधश्रद्धा: कुंडलीवर जास्त विश्वास ठेवणे अंधश्रद्धाळू असू शकते.
- गैरसमज: कधीकधी कुंडलीतील दोषांमुळे चांगले संबंधही तुटू शकतात, ज्यामुळे गैरसमज निर्माण होतात.
3. तज्ञांचे मत:
- अनेक तज्ञांच्या मते, कुंडली पाहणे हे पूर्णपणेOptional आहे. दोघांमधील समजूतदारपणा, प्रेम आणि आदर हे जास्त महत्त्वाचे आहे.
- काही ज्योतिषी सांगतात की कुंडली पाहिल्याने संभाव्य अडचणींची माहिती मिळते आणि त्यावर उपाय करता येतात.
निष्कर्ष: अखेरीस, लग्न जमवताना कुंडली पाहायची की नाही, हे ज्या त्या व्यक्तीच्या श्रद्धा आणि मतांवर अवलंबून असते. कुंडली पाहण्याबरोबरच दोघांमधील विचार जुळणे, समजूतदारपणा आणि प्रेम असणे आवश्यक आहे.
टीप: ही माहिती केवळ सामान्य ज्ञानासाठी आहे. कोणत्याही निर्णयावर पोहोचण्यापूर्वी जाणकार व्यक्तीचा सल्ला घेणे उचित राहील.