सोशिअल मीडिया फोन आणि सिम सामाजिक शुभेच्छा

माझ्या वाढदिवसाच्या ज्यांनी कोणी मला शुभेच्छा दिल्या त्यांचे मला आभार मानायचे आहेत, त्याबद्दल मला संदेश मिळेल का?

3 उत्तरे
3 answers

माझ्या वाढदिवसाच्या ज्यांनी कोणी मला शुभेच्छा दिल्या त्यांचे मला आभार मानायचे आहेत, त्याबद्दल मला संदेश मिळेल का?

15
प्रिय फेसबुक मित्रानो आणि मैत्रिणीनो,

काल सकाळ पासून  तुम्हा सर्वांच्या शुभेच्छांचा अक्षरश: वर्षाव होत आहे. तुमच्या मनस्वी प्रेमाने व निर्मळ मैत्रीने मी तर खरोखर भारावून गेलो आहे .

वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्याबद्दल मी सर्वांचा  मनापासून खूप ऋणी आहे. काहीना धन्यवाद करण्याचे राहून गेले असेल तर त्यांनी कृपया राग मानू नये.

ज्या मित्रांनी  शुभेच्छा दिल्या आणि ज्या मित्रांनी मनातल्या मनात  शुभेच्छा  दिल्या, त्या सर्वांचे मी मनापासून आभार मानतो .

तुम्हा सर्वांचे हे प्रेमाचे व मैत्रीचे ऋण मी कधीच फेडू शकणार नाही. फक्त त्यास पात्र होण्याचा सदैव प्रयत्न करत राहीन. हे प्रेम असेच राहो हीच ईश्वर चरणी प्रार्थना.

धन्यवाद
उत्तर लिहिले · 29/9/2017
कर्म · 510
0
हो
उत्तर लिहिले · 7/11/2020
कर्म · 0
0
दिवसेंदिवस तुमच्या शुभेच्छांचा वर्षाव माझ्यावर होत आहे, त्याबद्दल मी खूप आभारी आहे! वाढदिवसाच्या शुभेच्छांसाठी मनःपूर्वक धन्यवाद!

उदाहरण १:

माझ्या वाढदिवसानिमित्त ज्यांनी मला प्रत्यक्ष भेटून, फोन करून, मेसेज पाठवून किंवा सोशल मीडियावर शुभेच्छा दिल्या, त्या सर्वांचे मी मनापासून आभार मानतो/मानते. तुमच्या शुभेच्छा माझ्यासाठी खूप महत्वाच्या आहेत आणि त्या मला नेहमीच आनंदित ठेवतील.

उदाहरण २:

वाढदिवसाच्या शुभेच्छांसाठी मी तुमचा/तुमची खूप आभारी आहे/आहे. तुमच्या शुभेच्छांनी माझा दिवस आणखी खास बनवला. तुमचे प्रेम आणि आशीर्वाद माझ्यासोबत आहेत, याबद्दल मी स्वतःला भाग्यवान समजतो/समजते.

उदाहरण ३:

तुमच्यासारख्या प्रियजनांकडून मिळालेल्या शुभेच्छांमुळे माझा वाढदिवस अविस्मरणीय बनला. तुमच्या शुभेच्छा, प्रेम आणि पाठिंब्याबद्दल मी सदैव ऋणी राहीन. धन्यवाद!

उत्तर लिहिले · 16/3/2025
कर्म · 1080

Related Questions

एससी जातीचा दाखला काढण्यासाठी कोणती कागदपत्रे लागतील?
आजच्या तरुणांची व्यसनाधीनता?
वृद्धांच्या कल्याणासाठी राष्ट्रीय धोरण स्पष्ट करा?
स्वच्छ भारत अभिनायचा जनक कोनाला म्हणतात?
स्वच्छ भारत अभियानाचे काय?
'हंडाभर चांदण्या' या एकांकिकेतील पाणी प्रश्नाचे स्वरूप विशद करा?
गोरगरिबांना उद्धारण्यासाठी, बहुजन हिताय बहुजन सुखाय म्हणून समाजसुधारकांनी सहकारी संस्था हे संघटन तयार करून उभे केले, ते टिकले पाहिजे. यासाठी निस्वार्थ सेवा देणारे खरे सेवार्थी हवे आहेत, याबद्दल आपले मत काय आहे?