Topic icon

मराठवाडा

2
इतिहास मराठवाडा हा मूलक देश म्हणून ओळखला जात असे. वैभवशाली आणि महान यादव मराठी साम्राज्याची स्थापना याच मराठवाड्यात झाली. विदर्भातील सिंदखेडचे सरदार लखोजी जाधव हे याच यादव घराण्याचे वंशज यांची कन्या राजमाता जिजाऊ आणि वेरूळचे पाटील मालोजी भोसले यांचे पुत्र शहाजीराजे ते याच मातीतील होते.

जिल्हे: औरंगाबाद, उस्मानाबाद, जालना, नांदेड, परभणी, बीड, लातूर, ..


शोधा
मराठवाडा
प्रशासकीय प्रदेश
इतर भाषांत वाचा
Download PDF
पहारा
संपादन करा
मराठवाडा हा महाराष्ट्राचा गोदावरी नदीच्या खोऱ्यात आणि आसपास वसलेला एक प्रदेश असून त्यात आठ जिल्ह्यांचा समावेश होतो. औरंगाबाद शहर हे ह्या विभागाचे मुख्यालय आहे. महाराष्ट्रातली १६.८४ टक्के लोकसंख्या या प्रदेशात राहाते. त्यापैकी तीस टक्के लोक दारिद्र्यरेषेखाली आहेत. प्रदेशाचा तीस टक्के भाग पर्जन्यछायेत येतो.[१] कोरडवाहू शेतीचे प्रमाण नव्वद टक्क्यांवर आहे. कोरडवाहू शेतीच लोकांच्या निर्वाहाचा प्रमुख स्रोत आहे. औरंगाबाद, नांदेड आणि लातूर ही विभागातली उद्योग, शिक्षण आणि पर्यटनाची मुख्य केंद्रे आहेत. पैठणचे सातवाहन ते देवगिरीचे यादव हा ऐतिहासिक काळ मराठवाडा विभागाच्या राजकीय उत्कर्षाचा काळ होता. मराठवाड्यास संतांची भूमी म्हटले जाते.

  मराठवाडा
महाराष्ट्र • भारत
मराठवाडा, भारत


भाप्रवे (यूटीसी+५:३०)
क्षेत्रफळ
६४,८११ चौ. किमी
जिल्हे
औरंगाबाद, उस्मानाबाद, जालना, नांदेड, परभणी, बीड, लातूर, हिंगोली
लोकसंख्या
• घनता
साक्षरता
१,५५,८९,२२३ (2001)
• २४१/किमी२
६८.९५ %

मराठवाडा हा मूलक देश म्हणून ओळखला जात असे. वैभवशाली आणि महान यादव मराठी साम्राज्याची स्थापना याच मराठवाड्यात झाली. विदर्भातील सिंदखेडचे सरदार लखोजी जाधव हे याच यादव घराण्याचे वंशज यांची कन्या राजमाता जिजाऊ आणि वेरूळचे पाटील मालोजी भोसले यांचे पुत्र शहाजीराजे ते याच मातीतील होते. ४०० वर्षे याच मराठवाड्यातील देवगिरीवरून यादवांनी विदर्भ, खानदेश,कोंकण,पश्चिम महाराष्ट्र, माळवा, तेलंगण, बेळगाव, उत्तर कर्नाटक आणि निम्म्यापेक्षा जास्त भूभाग असलेल्या भारतावर राज्य केले.मराठवाडा निजामाच्या संस्थान चा भाग होता हे खरे असले तरी त्या आधी मुस्लिम राजवट येण्याआधी तेथे ४०० वर्ष देवगिरीच्या यादवांचे मराठी साम्राज्य होते आणि ते निम्म्यापेक्षा जास्त भारताच्या भागावर राज्य करत होते हे क्वचितच आणि तेही एका ओळीत सांगितले जाते.

इसवी सन १४०० पूर्वी हजारो वर्षे मराठवाड्यावर सातवाहन,चालुक्य,यादव या सारख्या मराठी लोकांचे राज्य होते आणि नंतर चार शतके मुस्लिम राजवटीखाली मराठवाडा मुस्लिम राजवटीखाली आणि निजामाच्या हैदराबाद संस्थानाचा भाग होता. निजामाने मराठवाड्यावर हैदराबाद संस्थान भारतात विलीन होईपर्यंत राज्य केले.[२] भारतीय स्वातंत्र्याच्या लढ्यात बरोबरीनेच हैदराबाद मुक्तिसंग्राम लढला गेला.१७ सप्टेंबर ला मराठवाड्याला हैदराबाद संस्थानातून स्वातंत्र्य मिळाले. १ नोव्हेंबर १९५६ पासून मराठवाडा विभाग मुंबई राज्यास जोडण्यात आला. १ मे १९६० पासून मराठवाडा हा नवीन महाराष्ट्र राज्याचा भाग झाला.[३]

स्वातन्त्र्योत्तर काळात कॉंग्रेसचे नेते, शंकरराव चव्हाण यांचे प्रदीर्घ काळ मराठवाडा भागावर राजकीय प्रभुत्व होते. ते आधी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले व नंतर त्यांनी भारतीय संघराज्याचे गृहमंत्री,अर्थमंत्री ईत्यादी केन्द्रीय मंत्रिपदेही सांभाळली. त्यांचा महाराष्ट्रातील जलसिंचन क्षेत्रांचा गाढा अभ्यास होता. विकास क्षेत्रातील.पैठणचा जायकवाडी जलसिंचन प्रकल्प हे त्यांचे महत्त्वाचे योगदान आहे.


उत्तर लिहिले · 1/10/2021
कर्म · 121765