
शब्द इतिहास
1
Answer link
*♏ गुंठा हा शब्द कसा अस्तित्वात आला?*

————————————————
★माहिती सेवा ग्रूप पेठवडगाव कोल्हापूर★
————————————————
आपल्यापैकी बहुतेक लोकांनी गुंठा हा शब्द ऐकला असेलच. https://bit.ly/3EtFRjc मात्र या गुंठा शब्दाची उत्पत्ती कशी झाली ? त्याची माहिती आपल्याला नाही.
इंग्रजांनी भारतात राज्य प्रस्थापित केल्यावर जमीन महासुला करिता सबंध देशाची उभी आडवी मोजणी केली.सर लॅम्टन यांनी दक्षिण भारतातील केपकामोरिन येथून १० एप्रिल १८०२ मध्ये त्रिकोणमितीय भूमापनाची सुरुवात केली होती.

ही सुरवात मद्रास (चेन्नई) जवळील थॉमस पर्वतापासून केली. भूमापनाच्या कामात सर जॉर्ज एव्हरेस्ट यांनी मोठी मदत केली. सर जॉर्ज एव्हरेस्ट भूमापक प्रमुख व त्रिकोणमितीय भूमापनाचे अधीक्षक होते. १८३० मध्ये त्यांची भूमापन कामाचे अधीक्षक म्हणून नेमणूक झाली. 𝔐𝔞𝔥𝔦𝔱𝔦 𝔰𝔢𝔳𝔞 𝔤𝔯𝔬𝔲𝔭 𝔭𝔢𝔱𝔥𝔳𝔞𝔡𝔤𝔞𝔬𝔫जॉर्ज एव्हरेस्ट यांना ‘सर्व्हेअर जनरल बहादूर’ असे संबोधले जाऊ लागले. भारतीय भूखंडाचे मोजणीचे काम चालू असताना कर्नल लॅम्टन यांचा मृत्यू झाला
नंतर हे काम त्यांच्या "गुण्टर" नावाच्या अधिकाऱ्याने केले. त्याने मोजणी साठी ३३ फुट लांबीची चैन (साखळी) वापरली, त्याला "गुण्टर चैन" म्हणत असत. त्यामुळे ३३ बाय ३३ फुट गुण्टर चैनने मोजलेला जमीनीचा तुकडा म्हणजे "एक गुण्टर" (गुंठा) हे रूढ झाले.Ⓜhttps://whatsapp.com/channel/0029VaPJhXL84Om4z32l8I24
2
Answer link
👳♀️ पाटील' शब्दाच्या व्युत्पत्तीसंबंधी माहिती 👳♀️
पाटील हा शब्द कानाडीत 'ಪಾಟೀಲ' आणि तेलगुत 'పాటిల' अश्या पद्धतीने लिहिला जातो. याचा इंग्रजी अर्थ 'chief of village' असा होतो.
मराठी विश्वकोशात दिलेल्या माहितीप्रमाणे प्राचीन ग्रामसंस्थेतील गावाचा मुख्य वतनदार अधिकारी. ‘पट्टकील’ या संस्कृत शव्दांवरून ‘पाटील’ हा शब्द बनला आहे. कापसाचे विणलेले पट्ट गावकीच्या नोंदी विहिण्यासाठी पूर्वी वापरीत आणि ते वेळूच्या नळीत जतन करीत. या नळकांड्याला पट्टकील म्हणत. या शब्दावरून पुढे पट्टकील, पाटैलू, पाटेल, पाटील, या क्रमाने तो शब्द प्रचारात आला. वि. का. राजवाड्यांच्या मते चालुक्यादी घराण्यांच्या वेळी गणसंघातील काही गण गावगन्नाचे पाटैलू बनले आणि काही गण कुणबी झाले. तज्ञांच्या मते पाटीलकी हे वतन जमिनीच्या नांगरपटीबरोबरच उदयास आले असावे. पाटलाला ग्रामसंस्थेत प्रदेशपरत्वे कमी-अधिक मानमराबत असत. पाटलाला गावपाटील किंवा पाटील-मोकदम असेही म्हणतात. पाटील घराण्यात सर्वच पाटील आडनाव लावीत असले, तरी पाटीलकी उपभोगणाराच खरा पाटील असतो.Ⓜ
शं. बा जोशी यांच्या मते 'पट्टा इल्ला'- पट्टीला हा शब्द प्राकुत असून पट्टी शब्दाला इला हा प्रत्यय लागला असून जो पट्टी मध्ये राहतो तो पट्टीला. मध्य-युगात पट्टीजन हा भाग नर्मदेच्या दक्षिणेला होते. हट्ट, हट्टी हे पट्टी या संस्कुत शब्दाचे कानडी रूप होय. आजसुद्धा पूर्वीचा बेरार भाग म्हणजेच हिंगोली,परभणी,वाशीम यांच्या आजूबाजूचा परिसरात हटकरांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. धनगर आणि कुणबी समाजातील लोक पाटील म्हणून ओळखले जायचे त्याचा खरा मूळ अर्थ गावाचा प्रमुख नसावा कारण संपूर्ण समाजातील लोक हे एका गावाचे प्रमुख पाटील असू शकत नाहीत.आपण वाचत आहातमाहिती सेवा गृप पेठवड़गावची पोस्ट,पाटीलकी हे वतन अनेक समाजात असल्याचे उल्लेख आढळतात. छत्रपती शिवाजी महाराजांचे पणजोबा बाबाजीराजे भोसले यांना दौलताबाद जवळ वेरूळ परिसरातील देऊळगाव, हिंगणी, बेरडी, जिंती, वेरूळ, मुंगी, बनसेंद वगैरे दहा गावांची पाटीलकी असल्याची माहिती मिळते. देशमुखी खालोखाल पाटीलकीला महत्त्व होते आणि त्याचे वतनही वंशपरंपरागत चाले. जुन्या काळी पाटील हा जणू गावचा राजाच असे. महाराष्ट्रात प्रदेशपरत्वे त्यास भिन्न नावे आढळतात. जातपाटील, सरपाटील, जडेपाटील असेही भेद आहेत. यांशिवाय पोलीस पाटील व मुलकी पाटील, अशी एखाद्या गावात कामविभागणी असे. पाटील हा गावचा मुख्य मिरासदार असून त्याच्याकडे मुलकी, दिवाणी व फौजदारी अधिकार असत. गावचा सारा वसूल करणे, ही पाटलाची जबाबदारी असे. एखाद्या वर्षी रक्कम जमली नाही, तर ती त्यास भरावी लागत असे. पाटलाचे काम गावीची सुव्यवस्था ठेवून शांतता राखणे हे असे. गावाच्या सुरक्षिततेची पूर्ण जबाबदारी त्याच्या वर असे. म्हणूनच पाटीलगढी सर्वसाधारणपणे पूर्ण जबाबदारी त्याच्यावर असे. म्हणूनच पाटीलगढी सर्वसाधारणपणे त्याचावर असे. म्हणूनच पाटीलगढी सर्वसाधारणपमे गावकुसाजवळ बहुधा शत्रूच्या माऱ्याच्या ठिकाणी बांधलेली सर्वत्र आढळते. एका ऐतिहासिक कैफियतीत पाटील म्हणतो,Ⓜ ‘‘गावाची चाकरी, लावणी, उगवती वगैरे जे सरकारचे काम पडते, ते करीत असतो’’. यावरून त्याचा कर्तव्यांची कल्पना येते. त्यामुळे पीकपाणी, बलुतेदारांच्या तक्रारी, वतनदार, सामाजिक संस्थांची वतने, भांडण-तंटे इत्यादींची देखरेख व निवारण ही त्याची प्रमुख कामे होत. यांशिवाय सरकारी हुकुमांची अंमलबजावणी, गावात येणाऱ्या-जाणाऱ्यांची रबर मिळविणे इ. कामे असत. कामासाठी पाटलाला वार्षिक मुशाहिरा मिळत असे. त्यांना वतन इनामी जमिनीही दिलेल्या आढळतात. विविध समारंभाच्या प्रसंगी−शिमगा, दसरा, पोळा−पाटलाचा मान पहिला असे.
माहिती सेवा गृप पेठवड़गाव
* पाटीलप्रमाणे कर्नाटकात नाडगौडा असावेत. एल्फिन्स्टनचा रिपोर्टप्रमाणे नाडगौडा- नाडू म्हणजे प्रांत अथवा जिल्हा आणि गांवडा (गौडा) म्हणजे त्यावरील एक अधिकारी. हा कानडी शब्द आहे. चोलसाम्राज्यांत हे नाडू पुष्कळ होते. सांप्रत कुर्ग प्रांतांत नाडू हा शब्द जिल्ह्यांनां लावलेला आढळतो. नाडगौडा हा अधिकारी महाराष्ट्रांतील देशमुखदेशपांड्यांच्या दर्जाचा असतो. मोकासबाब जी चौथाईंत दाखल केलेली असे, त्या मोकाशांतून एकंदर चौथाईच्या शेंकडा तीन टक्के इतकी रक्कम हक्काबाबत या नाडगौडास सरकारांतून मिळे. तिलाच नाडगौडी म्हणत. नाडगौडाचा अधिकार खुद्द छत्रपति देत व तो वाटेल त्याला मिळे व वाटेल तेव्हां काढून घेतां येई; हा हक्क वंशपरंपरेचा नसे. परंतु अभ्यासक संतोष पिंगळे यांच्यामाहितीनुसार हाटकर सरदार बंडगर, महार्णवर,आटोळे ,देवकाते यांना हे हक्क वंशपरंपरागत दिल्याचे आढळते.Ⓜ
