
राज्याभिषेक
3
Answer link
रायगड किल्ला

छत्रपती शिवरायांच्या स्वराज्य स्थापनेतील अत्यंत महत्वाचा टप्पा व पुढील राजकारभाराचा एक महत्वाचा साक्षीदार असा हा रायगड किल्ला, जिल्ह्याचे नाव देखील या किल्ल्यावरुनच पुढे आलेले आहे. रायगड हा किल्ला सह्याद्री पर्वत रांगामध्ये रायगड जिल्ह्यातील महाड या ठिकाणापासून सुमारे २५ किमी अंतरावर आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी या किल्ल्याची डागडुजी करून त्याला इ. सन १६७४ मध्ये मराठा साम्राज्याची राजधानी घोषित केली. रायगडावर ९ जुन १६७४ रोजी शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक होऊन खर्या अर्थाने छत्रपती झाले. हिंदवी स्वराज्याची राजधानी असलेला हा किल्ला एक नुसता एक गड नसुन ते एक राष्ट्रीय स्मारक आहे. रायगडावर पहाण्यासाठी होळीचा माळ, भवानी मंदीर, जित दरवाजा, खुब लढा बुरुज, महादरवाजा, मिना दरवाजा, राणी वसा, पालखी दरवाजा, राजभवन, राजसभा,गंगासागर, नगारखाना, जगदिश्वर मंदिर, बारा टाकी, वाघदरवाजा, टकमक टोक, रामेश्वर मंदिर व शिवछत्रपतींची समाधी इ. ठिकाणे आहेत. रायगड किल्ल्यावरती एक मानवनिर्मित तळे असून त्याचे नाव “गंगासागर तलाव” असे आहे. किल्ल्यावरती जाण्यासाठी असलेला एकमेव मार्ग “महा-दरवाजा” मधून जातो. किल्ल्यामध्ये असलेल्या राज्याच्या दरबारात एक सिंहासनाची प्रतिकृती असून ती नगारखाना दरवाज्याकडे तोंड करून ठेवली आहे. सिहासनाजवळील भाग ध्वनीलहरीसाठी अशा पद्धतीने बनवला गेला आहे कि दरबारातील दरवाजाच्या इथे बोललेले शब्द सिंहासनापर्यंत सहजरीत्या ऐकू येऊ शकतात. रायगड किल्ल्यावरती उंच दरीवरती बांधलेला एक प्रसिद्ध बुरुज असून त्याला “हिरकणी बुरूज” असे म्हणतात. रायगडावर चढण्यासाठी साधारण १४५० पयर्या चढुन जावे लागते, साधारण ३.५० तासाची चढण आहे, आता 'बांधा, वापरा, हस्तांतरीत करा' या तत्वावर केबल कार सेवा सुरु झालेली आहे. या मुळे पर्याटकांची फारच सुविधा झालेली आहे. रायगडावरील महत्वाच्या ऐतिहासिक नोंदी : - शिवराज्याभिषेक दिन – ६ जून १६७४, राजाराम महाराजांची मुंज आणि लग्न रायगडावर झाले, - शिवपुण्यतिथी दिन – ३ एप्रिल १६८०. - रायगडावर शिवराज्याभिषेक दिन आणि शिवपुण्यतिथीदिन साजरे केले जातात. - रायगड या किल्ल्याची माहिती सांगणारी जेवढी पुस्तके लिहिली गेली आहेत, तेवढी पुस्तके इतर कोणत्याही किल्ल्यावर लिहिलेली नाहीत. - रायगड हा भारताचे ३ पंतप्रधान आणि १ राष्ट्रपती यांनी भेट दिलेला एकमेव किल्ला आहे. रायगडावर केवळ पर्यटक म्हणून जायचे असेल तर सह्याद्रीच्या कुशीत वसलेला हा अप्रतिम गड पाहण्यासाठी नक्की जा. स्वराज्याच्या राजधानीस भेट देण्यासाठी रायगड वारी करायची असेल तर, महाराष्ट्राचे आराध्य दैवत शिवाजी राजांच्या पद स्पर्शाने पावन झालेल्या रायगडावर जात असताना तिथे आपल्याकडून काही उपद्रव होणार नाही, याची नक्की काळजी घ्या. गडाचे पावित्र्य आणि सौंदर्य टिकवून ठेवण्यासाठी गडावर स्वच्छता राखण्याचे काम आपणच करणे गरजेचे आहे. पाचाडचा जिजाबाईंचा वाडा आणि समाधी : रायगड किल्ल्याच्या पायथ्याशी पाचाड येथे राजमाता जिजाऊंची समाधी आहे. उतारवयात जिजाबाईंना गडावरील थंड हवा आणि वारा सहन होत नसे, त्यामुळे महाराजांनी त्यांच्यासाठी पाचाडजवळ एक कोटयुक्त वाडा बांधून दिला होता. पाचाड गावात या वाड्याचे अवशेष सुस्थितीत आहेत. येथे असलेली तक्क्याची विहीर, तसेच जिजाबाईंना बसण्यासाठी केलेले दगडी आसन बघण्यासाठी पर्यटक विशेष गर्दी करतात. वाड्याच्या परिसरात फिरत असताना जिजाऊ मासाहेब आणि त्यांच्या आयुष्यातील शेवटच्या क्षणांच्या सर्व कल्पनांचा येथे भास होतो. महादरवाजा : रायगड चढत असताना सुरुवातीस वाटेवर असणाऱ्या महादरवाज्याच्या बाहेरील दोन्ही बाजूस दोन, कमळाच्या सुंदर आकृती, हत्ती आणि शरभ यांची शिल्पे कोरलेली आहेत. महादरवाज्याच्या दोन्ही बाजूस भव्य बुरूज आहेत. महादरवाज्यातून आत आल्यावर पहारेकऱ्यांसाठी आणि संरक्षकांसाठी केलेल्या देवड्या दिसतात. महादरवाज्यापासून टकमक टोकापर्यंत आणि हिरकणी बुरूजापर्यंत भक्कम तटबंदी बांधलेली आहे. शिवदुर्गनिर्मितीचे वैशिष्ट असणारी गोमुखी रचना या द्वारनिर्मितीत पाहावयास मिळते. हत्ती तलाव आणि गंगासागर तलाव : महादरवाज्यातून बरेच वर चढून गेल्यानंतर थोडे पुढे जात असताना हत्ती तलाव समोरच दिसतो. गजशाळेतून येणाऱ्या हत्तींच्या पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी याकरिता हा तलाव बांधण्यात आलेला होता. हत्तीतलावापासून जवळच गंगासागर तलाव आहे. महाराज्यांच्या राज्याभिषेकानंतर सप्तसागर आणि नद्यांची आणलेली तीर्थे याच तलावात टाकलेली होती. त्यामुळेच या तलावाचे गंगासागर असे नाव अस्तित्वात आले आहे, असा समज आहे. गडावर आजही या पाण्याचा उपयोग केला जातो. या तलावांसाठी ही नावे सध्या वापरात आहेत. शिवकाळात याला काय म्हणत असत याची कल्पना नाही. हिरकणी बुरुज : गंगासागराच्या पश्चिमेस चिंचोळी वाट हिरकणी टोकाकडे जाते. हिरकणी गवळणीची एक कथा हिरकणी टोकाशी संबंधित असल्यामुळे या बुरुजास हिरकणी बुरुज असेही म्हणतात. या बुरुजावर तीन तोफा ठेवलेल्या दिसतात. येथेच बलभीम मारुतीचे देखील शिल्प आहे. बुरुजावरून पाचाड, खूबलढा बुरूज, मशीद मोर्चा ही ठिकाणे स्पष्टपणे दिसतात. पालखी दरवाजा आणि मेणा दरवाजा : मेणा दरवाज्यातून बालेकिल्ल्यावर प्रवेश करता येतो. तर पालखी दरवाज्याने प्रवेश केला की, चढउतार असलेला एक सरळ मार्ग आपल्याला मेणा दरवाजापर्यंत घेऊन जातो.त्याच्या जवळच राण्यांचे महाल दिसून येतात. सारे अवशेष रूप आज याठिकाणी अस्तित्वात आहे. काही संशोधकांच्या मते ही भांडारगृहे होती. राजसभा आणि राजभवन : महाराजांचे सिंहासनारोहण राजसभा येथे झाले होते. येथे पूर्वेकडे तोंड करून महाराजांच्या सिंहासनाची जागा आहे. येथून मागील बाजूने बालेकिल्ल्याच्या अंतर्भागात प्रवेश केला की, राजभवनमध्ये प्रवेश करता येतो. जवळच तळघरातील जवाहीरखाना आहे. राजसभा परिसरात गेल्यानंतर समोरच सिंहासनस्थ शिवाजी महाराजांचा पुतळा दिसून येतो. बाजारपेठ : राजभवनाकडून महाराजांच्या समाधी स्थळाकडे जात असताना समोर होळीचा माळ लागतो. याठिकाणी छत्रपतींचा १९७४ साली भव्य पुतळा बसवण्यात आलेला आहे. पुढे जात असताना पुतळ्यासमोर जे दोन रांगांमध्ये भव्य अवशेष दिसतात, तेथे पूर्वी बाजारपेठ होती. भव्य बाजारपेठेचे अवशेष आजही पर्यटकांना आकर्षित करतात. बाजारपेठेतून जात असताना इतिहासात तेथील वैभव काय असेल याची जाणीव होते. अगदी याची देही याची डोळा प्रसंग समोर उभा राहावा, अशा ठिकाणी मोकळ्या जागेत बाजारपेठ वसलेली आहे. काही संशोधकांच्या मते येथेच रायगडाची नगरपेठ होती. कारण इथे बाजार भरत असल्याचे उल्लेख नाहीत. टकमक टोक : बाजारपेठेच्या समोरून खाली उतरून टकमक टोकाकडे जाता येते. गुन्हेगारांना शिक्षा देण्यासाठी टकमक टोकावरून त्यांचा कडेलोट केला जात असे. टकमक टोकाकडे जात असताना जागा निमुळती होत जाते, अन आपल्या ह्रदयाचा ठोका वाढत जातो. इतिहासात या ठिकाणी कित्येक जणांचा कडेलोट झाला असावा आणि त्यांचे पुढे काय झाले असावे. याचा विचार आपण टोकाच्या शेवटी जावून नक्की करायला लागतो. शिरकाई देवी मंदिर आणि जगदीश्वर मंदिर (वाडेश्वर मंदिर) : शिरकाई देवी ही गडावरील मुख्य देवता आहे. शिर्के पाचव्या शतकापासून रायगडाचे स्वामी होते. याची आठवण देणारी गडस्वमिनी शिरकाई हिचे मंदिर गडावर आहे. महाराजांच्या समाधी स्थळाकडे पुढे जात असताना समोर दिसणारे भव्य मंदिर वाडेश्वर उर्फ जगदीश्वराचे आहे. जगदीश्वराच्या मंदिरासमोर नंदीची मोठी भग्नावस्थेतील मूर्ती आहे. मंदिराच्या सभामंडपात गेल्यास समोर हनुमंताचीही मूर्ती दिसते. मंदिराच्या प्रवेशद्वारावर महाराजांच्या समाधी स्थळाकडे जात असताना, पायऱ्यांच्या खाली एक शिलालेख दिसतो. ‘सेवेचे ठायी तत्पर हिरोजी इंदलकर’. अशा मजकुराचा हा शिलालेख आहे. शिवाजी महाराजांची समाधी : जगदीश्वर मंदिराच्या पूर्वदरवाजापासून बाहेर पडताच समोर छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी दिसते. महाराजांच्या समाधी स्थळावर एक मेघडंबरी उभारण्यात आलेली आहे.

छत्रपती शिवरायांच्या स्वराज्य स्थापनेतील अत्यंत महत्वाचा टप्पा व पुढील राजकारभाराचा एक महत्वाचा साक्षीदार असा हा रायगड किल्ला, जिल्ह्याचे नाव देखील या किल्ल्यावरुनच पुढे आलेले आहे. रायगड हा किल्ला सह्याद्री पर्वत रांगामध्ये रायगड जिल्ह्यातील महाड या ठिकाणापासून सुमारे २५ किमी अंतरावर आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी या किल्ल्याची डागडुजी करून त्याला इ. सन १६७४ मध्ये मराठा साम्राज्याची राजधानी घोषित केली. रायगडावर ९ जुन १६७४ रोजी शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक होऊन खर्या अर्थाने छत्रपती झाले. हिंदवी स्वराज्याची राजधानी असलेला हा किल्ला एक नुसता एक गड नसुन ते एक राष्ट्रीय स्मारक आहे. रायगडावर पहाण्यासाठी होळीचा माळ, भवानी मंदीर, जित दरवाजा, खुब लढा बुरुज, महादरवाजा, मिना दरवाजा, राणी वसा, पालखी दरवाजा, राजभवन, राजसभा,गंगासागर, नगारखाना, जगदिश्वर मंदिर, बारा टाकी, वाघदरवाजा, टकमक टोक, रामेश्वर मंदिर व शिवछत्रपतींची समाधी इ. ठिकाणे आहेत. रायगड किल्ल्यावरती एक मानवनिर्मित तळे असून त्याचे नाव “गंगासागर तलाव” असे आहे. किल्ल्यावरती जाण्यासाठी असलेला एकमेव मार्ग “महा-दरवाजा” मधून जातो. किल्ल्यामध्ये असलेल्या राज्याच्या दरबारात एक सिंहासनाची प्रतिकृती असून ती नगारखाना दरवाज्याकडे तोंड करून ठेवली आहे. सिहासनाजवळील भाग ध्वनीलहरीसाठी अशा पद्धतीने बनवला गेला आहे कि दरबारातील दरवाजाच्या इथे बोललेले शब्द सिंहासनापर्यंत सहजरीत्या ऐकू येऊ शकतात. रायगड किल्ल्यावरती उंच दरीवरती बांधलेला एक प्रसिद्ध बुरुज असून त्याला “हिरकणी बुरूज” असे म्हणतात. रायगडावर चढण्यासाठी साधारण १४५० पयर्या चढुन जावे लागते, साधारण ३.५० तासाची चढण आहे, आता 'बांधा, वापरा, हस्तांतरीत करा' या तत्वावर केबल कार सेवा सुरु झालेली आहे. या मुळे पर्याटकांची फारच सुविधा झालेली आहे. रायगडावरील महत्वाच्या ऐतिहासिक नोंदी : - शिवराज्याभिषेक दिन – ६ जून १६७४, राजाराम महाराजांची मुंज आणि लग्न रायगडावर झाले, - शिवपुण्यतिथी दिन – ३ एप्रिल १६८०. - रायगडावर शिवराज्याभिषेक दिन आणि शिवपुण्यतिथीदिन साजरे केले जातात. - रायगड या किल्ल्याची माहिती सांगणारी जेवढी पुस्तके लिहिली गेली आहेत, तेवढी पुस्तके इतर कोणत्याही किल्ल्यावर लिहिलेली नाहीत. - रायगड हा भारताचे ३ पंतप्रधान आणि १ राष्ट्रपती यांनी भेट दिलेला एकमेव किल्ला आहे. रायगडावर केवळ पर्यटक म्हणून जायचे असेल तर सह्याद्रीच्या कुशीत वसलेला हा अप्रतिम गड पाहण्यासाठी नक्की जा. स्वराज्याच्या राजधानीस भेट देण्यासाठी रायगड वारी करायची असेल तर, महाराष्ट्राचे आराध्य दैवत शिवाजी राजांच्या पद स्पर्शाने पावन झालेल्या रायगडावर जात असताना तिथे आपल्याकडून काही उपद्रव होणार नाही, याची नक्की काळजी घ्या. गडाचे पावित्र्य आणि सौंदर्य टिकवून ठेवण्यासाठी गडावर स्वच्छता राखण्याचे काम आपणच करणे गरजेचे आहे. पाचाडचा जिजाबाईंचा वाडा आणि समाधी : रायगड किल्ल्याच्या पायथ्याशी पाचाड येथे राजमाता जिजाऊंची समाधी आहे. उतारवयात जिजाबाईंना गडावरील थंड हवा आणि वारा सहन होत नसे, त्यामुळे महाराजांनी त्यांच्यासाठी पाचाडजवळ एक कोटयुक्त वाडा बांधून दिला होता. पाचाड गावात या वाड्याचे अवशेष सुस्थितीत आहेत. येथे असलेली तक्क्याची विहीर, तसेच जिजाबाईंना बसण्यासाठी केलेले दगडी आसन बघण्यासाठी पर्यटक विशेष गर्दी करतात. वाड्याच्या परिसरात फिरत असताना जिजाऊ मासाहेब आणि त्यांच्या आयुष्यातील शेवटच्या क्षणांच्या सर्व कल्पनांचा येथे भास होतो. महादरवाजा : रायगड चढत असताना सुरुवातीस वाटेवर असणाऱ्या महादरवाज्याच्या बाहेरील दोन्ही बाजूस दोन, कमळाच्या सुंदर आकृती, हत्ती आणि शरभ यांची शिल्पे कोरलेली आहेत. महादरवाज्याच्या दोन्ही बाजूस भव्य बुरूज आहेत. महादरवाज्यातून आत आल्यावर पहारेकऱ्यांसाठी आणि संरक्षकांसाठी केलेल्या देवड्या दिसतात. महादरवाज्यापासून टकमक टोकापर्यंत आणि हिरकणी बुरूजापर्यंत भक्कम तटबंदी बांधलेली आहे. शिवदुर्गनिर्मितीचे वैशिष्ट असणारी गोमुखी रचना या द्वारनिर्मितीत पाहावयास मिळते. हत्ती तलाव आणि गंगासागर तलाव : महादरवाज्यातून बरेच वर चढून गेल्यानंतर थोडे पुढे जात असताना हत्ती तलाव समोरच दिसतो. गजशाळेतून येणाऱ्या हत्तींच्या पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी याकरिता हा तलाव बांधण्यात आलेला होता. हत्तीतलावापासून जवळच गंगासागर तलाव आहे. महाराज्यांच्या राज्याभिषेकानंतर सप्तसागर आणि नद्यांची आणलेली तीर्थे याच तलावात टाकलेली होती. त्यामुळेच या तलावाचे गंगासागर असे नाव अस्तित्वात आले आहे, असा समज आहे. गडावर आजही या पाण्याचा उपयोग केला जातो. या तलावांसाठी ही नावे सध्या वापरात आहेत. शिवकाळात याला काय म्हणत असत याची कल्पना नाही. हिरकणी बुरुज : गंगासागराच्या पश्चिमेस चिंचोळी वाट हिरकणी टोकाकडे जाते. हिरकणी गवळणीची एक कथा हिरकणी टोकाशी संबंधित असल्यामुळे या बुरुजास हिरकणी बुरुज असेही म्हणतात. या बुरुजावर तीन तोफा ठेवलेल्या दिसतात. येथेच बलभीम मारुतीचे देखील शिल्प आहे. बुरुजावरून पाचाड, खूबलढा बुरूज, मशीद मोर्चा ही ठिकाणे स्पष्टपणे दिसतात. पालखी दरवाजा आणि मेणा दरवाजा : मेणा दरवाज्यातून बालेकिल्ल्यावर प्रवेश करता येतो. तर पालखी दरवाज्याने प्रवेश केला की, चढउतार असलेला एक सरळ मार्ग आपल्याला मेणा दरवाजापर्यंत घेऊन जातो.त्याच्या जवळच राण्यांचे महाल दिसून येतात. सारे अवशेष रूप आज याठिकाणी अस्तित्वात आहे. काही संशोधकांच्या मते ही भांडारगृहे होती. राजसभा आणि राजभवन : महाराजांचे सिंहासनारोहण राजसभा येथे झाले होते. येथे पूर्वेकडे तोंड करून महाराजांच्या सिंहासनाची जागा आहे. येथून मागील बाजूने बालेकिल्ल्याच्या अंतर्भागात प्रवेश केला की, राजभवनमध्ये प्रवेश करता येतो. जवळच तळघरातील जवाहीरखाना आहे. राजसभा परिसरात गेल्यानंतर समोरच सिंहासनस्थ शिवाजी महाराजांचा पुतळा दिसून येतो. बाजारपेठ : राजभवनाकडून महाराजांच्या समाधी स्थळाकडे जात असताना समोर होळीचा माळ लागतो. याठिकाणी छत्रपतींचा १९७४ साली भव्य पुतळा बसवण्यात आलेला आहे. पुढे जात असताना पुतळ्यासमोर जे दोन रांगांमध्ये भव्य अवशेष दिसतात, तेथे पूर्वी बाजारपेठ होती. भव्य बाजारपेठेचे अवशेष आजही पर्यटकांना आकर्षित करतात. बाजारपेठेतून जात असताना इतिहासात तेथील वैभव काय असेल याची जाणीव होते. अगदी याची देही याची डोळा प्रसंग समोर उभा राहावा, अशा ठिकाणी मोकळ्या जागेत बाजारपेठ वसलेली आहे. काही संशोधकांच्या मते येथेच रायगडाची नगरपेठ होती. कारण इथे बाजार भरत असल्याचे उल्लेख नाहीत. टकमक टोक : बाजारपेठेच्या समोरून खाली उतरून टकमक टोकाकडे जाता येते. गुन्हेगारांना शिक्षा देण्यासाठी टकमक टोकावरून त्यांचा कडेलोट केला जात असे. टकमक टोकाकडे जात असताना जागा निमुळती होत जाते, अन आपल्या ह्रदयाचा ठोका वाढत जातो. इतिहासात या ठिकाणी कित्येक जणांचा कडेलोट झाला असावा आणि त्यांचे पुढे काय झाले असावे. याचा विचार आपण टोकाच्या शेवटी जावून नक्की करायला लागतो. शिरकाई देवी मंदिर आणि जगदीश्वर मंदिर (वाडेश्वर मंदिर) : शिरकाई देवी ही गडावरील मुख्य देवता आहे. शिर्के पाचव्या शतकापासून रायगडाचे स्वामी होते. याची आठवण देणारी गडस्वमिनी शिरकाई हिचे मंदिर गडावर आहे. महाराजांच्या समाधी स्थळाकडे पुढे जात असताना समोर दिसणारे भव्य मंदिर वाडेश्वर उर्फ जगदीश्वराचे आहे. जगदीश्वराच्या मंदिरासमोर नंदीची मोठी भग्नावस्थेतील मूर्ती आहे. मंदिराच्या सभामंडपात गेल्यास समोर हनुमंताचीही मूर्ती दिसते. मंदिराच्या प्रवेशद्वारावर महाराजांच्या समाधी स्थळाकडे जात असताना, पायऱ्यांच्या खाली एक शिलालेख दिसतो. ‘सेवेचे ठायी तत्पर हिरोजी इंदलकर’. अशा मजकुराचा हा शिलालेख आहे. शिवाजी महाराजांची समाधी : जगदीश्वर मंदिराच्या पूर्वदरवाजापासून बाहेर पडताच समोर छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी दिसते. महाराजांच्या समाधी स्थळावर एक मेघडंबरी उभारण्यात आलेली आहे.