Topic icon

किल्ल्यांचे जतन

0
महाराष्ट्रातील विविध गड किल्ल्यांची माहिती सविस्तर वाचण्यासाठी कृपया येथे क्लिक करा किंवा www.sopenibandh.com 

उत्तर लिहिले · 13/2/2022
कर्म · 1100
11

काळाच्या ओघात राज्यातील अनेक वैभवशाली ऐतिहासिक गड-किल्ल्यांपैकी काहींची पडझड सुरू आहे. या गड-किल्ल्यांचे संवर्धन आणि जतन करणे आता गरजेचे आहे.

OLYMPUS DIGITAL CAMERAगोविंदाग्रजांनी महाराष्ट्राचे वर्णन करताना म्हटले आहे,
‘‘राकट देशा, कणखर देशा, दगडांच्या देशा
नाजूक देशा, कोमल देशा, फुलांच्याही देशा’’
महाराष्ट्र हा राकट देश आहे, असे गोविंदाग्रज म्हणतात. अनेक कवींनी, शाहिरांनीही महाराष्ट्राचे वर्णन करताना अशाच आशयाचे काव्य रचले आहे. त्यामागची प्रेरणा म्हणजे आपल्या या महाराष्ट्रातील सह्याद्री आहे. या सह्याद्रीच्या अंगाखांद्यावर उभे असलेले कितीतरी गड-किल्ले आहेत.


सह्याद्रीवर कोठेही उभे राहून नजर फिरवली तर, दर चार-दोन शिखरांआड एखादा गड-किल्ला दिमाखात उभा असलेला आपल्याला पाहायला मिळतो. यातील बहुतेक दुर्गानी छत्रपती शिवाजीमहाराजांची चरणधूळ आपल्या मस्तकी धारण केली आहे. या भक्कम गड- किल्ल्यांच्या आधारेच शिवरायांनी परकीय आक्रमण पचवून धर्माध सत्ताधीशांना नामोहरम केले होते.

आपणास जर गडकिल्ले सवर्धन करायचे असेल तर काही गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे किल्ल्यावर फिरायला जायच्या वेळी आपन किमान एक मोठी पिशवी गेऊन गेल पाहिजे व जोही कचरा प्लास्टिकच्या बाटल्या तसेच जोही कचरा मिळेल तो त्या पिशवी मद्दे भरुन गडावुन खाली येतानी गेऊन येणे व पायथ्याला असनाऱ्या कचरा कुंडी मद्दे फेकुन देने आपण पावसाळ्यात गेलो तर किल्ल्याच्या तटबंदी  व ईमराती वर उघवलेली झाडे झुडपे उपटुन टाकने यानी खुप मोठे कार्य घडेल ते म्हनजे असे आहे की ती झाडे झुडपे आपण उपटुन टाकतो म्हनुन ती तटबंदी आणी भिंती जशास तश्या राहतात त्यामुळे ते अवशेष पडझड होण्याची भिती नसते तसेच आपन खिशात झाडाच्या बिया गेऊन जाणे व वाटेच्या बाजुला चिखलात टाकुन देणे
उत्तर लिहिले · 12/2/2020
कर्म · 7285